सेनगाव महालक्ष्मी बाजारावर चोरांचा 'डल्ला' रोखा;पोलिसांना साध्या गणवेशात गस्त घालण्याचे आवाहन! ग्रामीण भागातील हजारो नागरिक,महिला खरेदीसाठी येणार;मोबाईल,दागिने आणि पैशांची पाकीटमारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क होणार का? सेनगाव/विश्वनाथ देशमुख महालक्ष्मी (गौरी) सणाच्या पार्श्वभूमीवर आज दि.१६ सप्टेंबर बुधवार रोजी भरणाऱ्या सेनगाव शहरातील मुख्य आठवडा बाजारात खरेदीसाठी नागरिकांची आणि महिलांची अलोट गर्दी होत आहे.सेनगाव तालुक्यासह परभणी,जिंतूर, रिसोड आणि हिंगोली येथून मोठ्या संख्येने व्यापारी दाखल झाले आहेत.सणाचा मोठा उत्साह बाजारात दिसून येत असतानाच, दुसरीकडे गर्दीचा फायदा घेणाऱ्या चोरांचा 'डल्ला' रोखण्यासाठी सेनगाव पोलिसांनी बाजारपेठेत अत्यंत सतर्क राहून साध्या गणवेशात चोख गस्त घालावी,असे आवाहन सुजाण नागरिकांमधून केले जात आहे. सेनगावचा हा आठवडी बाजार परिसरातील एक प्रमुख व्यापार केंद्र मानला जातो.आजच्या विशेष बाजारात किराणा, कपडे, भाजीपाला,कटलेरी आणि फळविक्रेत्यांनी मोठी दुकाने थाटली आहेत.या बाजारासाठी तालुक्यातील जवळपास ३५ ते ४० गावांतील नागरिक,विशेषतः महिला वर्ग महालक्ष्मी सणासाठी आवश्यक असणारे साहित्य,भाजीपाला आणि नवीन कपडे खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने बाजारात येत आहे.सणासुदीच्या काळात बाजारपेठेत होणाऱ्या अलोट गर्दीचा फायदा घेऊन भामट्यांनी नागरिकांचे महागडे मोबाईल पळवल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.इतकेच नव्हे तर,एका आठवडी बाजाराच्या दिवशीच कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील एका आडत्याचे २० हजार रुपये दिवसाढवळ्या पळवल्याची खळबळजनक घटना घडली होती.या पार्श्वभूमीवर,आजच्या मोठ्या बाजारात मोबाईल,महिलांचे दागिने आणि पैशांची पाकीटमारी करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही संभाव्य डोकेदुखी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता,पोलिसांनी आधीच पावले उचलणे गरजेचे बनले आहे.कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि सणाचा आनंद अबाधित राहावा,यासाठी सर्वांनीच सतर्क राहणे आवश्यक आहे.बाजार समिती परिसर,कपडा दुकाने,भाजी बाजार आणि कटलेरी दुकानांच्या परिसरात साध्या गणवेशातील पोलीस कर्मचारी आणि महिला अंमलदारांची नियुक्ती केल्यास संशयास्पद हालचालींवर तात्काळ जरब बसेल.परभणी,जिंतूर,रिसोड आणि हिंगोली मार्गावरून येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये,यासाठी प्रमुख चौकात वाहतूक व्यवस्था चोख ठेवणे गरजेचे आहे.तसेच बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी,विशेषतः महिलांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना आपले दागिने,पर्स आणि महागडे मोबाईल स्वतःहून सांभाळावेत.कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळून आल्यास तातडीने तैनात पोलिसांशी संपर्क साधावा.महालक्ष्मी सणाच्या या महत्त्वाच्या दिवशी सेनगाव पोलीस प्रशासन बाजारपेठेत चोख बंदोबस्त ठेवून चोरांचे मनसुबे कसे हाणून पाडते आणि नागरिकांना कसा दिलासा देते,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सेनगाव महालक्ष्मी बाजारावर चोरांचा 'डल्ला' रोखा;पोलिसांना साध्या गणवेशात गस्त घालण्याचे आवाहन! ग्रामीण भागातील हजारो नागरिक,महिला खरेदीसाठी येणार;मोबाईल,दागिने आणि पैशांची पाकीटमारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क होणार का? सेनगाव/विश्वनाथ देशमुख महालक्ष्मी (गौरी) सणाच्या पार्श्वभूमीवर आज दि.१६ सप्टेंबर बुधवार रोजी भरणाऱ्या सेनगाव शहरातील मुख्य आठवडा बाजारात खरेदीसाठी नागरिकांची आणि महिलांची अलोट गर्दी होत आहे.सेनगाव तालुक्यासह परभणी,जिंतूर, रिसोड आणि हिंगोली येथून मोठ्या संख्येने व्यापारी दाखल झाले आहेत.सणाचा मोठा उत्साह बाजारात दिसून येत असतानाच, दुसरीकडे गर्दीचा फायदा घेणाऱ्या चोरांचा 'डल्ला' रोखण्यासाठी सेनगाव पोलिसांनी बाजारपेठेत अत्यंत सतर्क राहून साध्या गणवेशात चोख गस्त घालावी,असे आवाहन सुजाण नागरिकांमधून केले जात आहे. सेनगावचा हा आठवडी बाजार परिसरातील एक प्रमुख व्यापार केंद्र मानला जातो.आजच्या विशेष बाजारात किराणा, कपडे, भाजीपाला,कटलेरी आणि फळविक्रेत्यांनी मोठी दुकाने थाटली आहेत.या बाजारासाठी तालुक्यातील जवळपास ३५ ते ४० गावांतील नागरिक,विशेषतः महिला वर्ग महालक्ष्मी सणासाठी आवश्यक असणारे साहित्य,भाजीपाला आणि नवीन कपडे खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने बाजारात येत आहे.सणासुदीच्या काळात बाजारपेठेत होणाऱ्या अलोट गर्दीचा फायदा घेऊन भामट्यांनी नागरिकांचे महागडे मोबाईल पळवल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.इतकेच नव्हे तर,एका आठवडी बाजाराच्या दिवशीच कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील एका आडत्याचे २० हजार रुपये दिवसाढवळ्या पळवल्याची खळबळजनक घटना घडली होती.या पार्श्वभूमीवर,आजच्या मोठ्या बाजारात मोबाईल,महिलांचे दागिने आणि पैशांची पाकीटमारी करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही संभाव्य डोकेदुखी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता,पोलिसांनी आधीच पावले उचलणे गरजेचे बनले आहे.कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि सणाचा आनंद अबाधित राहावा,यासाठी सर्वांनीच सतर्क राहणे आवश्यक आहे.बाजार समिती परिसर,कपडा दुकाने,भाजी बाजार आणि कटलेरी दुकानांच्या परिसरात साध्या गणवेशातील पोलीस कर्मचारी आणि महिला अंमलदारांची नियुक्ती केल्यास संशयास्पद हालचालींवर तात्काळ जरब बसेल.परभणी,जिंतूर,रिसोड आणि हिंगोली मार्गावरून येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये,यासाठी प्रमुख चौकात वाहतूक व्यवस्था चोख ठेवणे गरजेचे आहे.तसेच बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी,विशेषतः महिलांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना आपले दागिने,पर्स आणि महागडे मोबाईल स्वतःहून सांभाळावेत.कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळून आल्यास तातडीने तैनात पोलिसांशी संपर्क साधावा.महालक्ष्मी सणाच्या या महत्त्वाच्या दिवशी सेनगाव पोलीस प्रशासन बाजारपेठेत चोख बंदोबस्त ठेवून चोरांचे मनसुबे कसे हाणून पाडते आणि नागरिकांना कसा दिलासा देते,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
- महिना उलटला पाऊस नाही, विहिर बोरवेलला पुरेसे पाणी असूनही शेतातील वीज गुल,खरीप पिके धोक्यात,शेतकऱ्याचा टाहो हिंगोली जिल्ह्यात विशेषता कळमनुरी तालुक्यात एका महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके हातची गेली आहेत,तूर ,कापूस, सोयाबीन,हळद ही पिके पाऊस नसल्याने धोक्यात आली आहे.एकंदरीत तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.महिनाभरापासून पाऊस नाही विहिरी बोरला पुरेशी पाणी असताना देखील शेतातील वीज वारंवार गुण होत आहे त्यामुळे मुबलक पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही,अशी परिस्थिती शेतकऱ्यावर येऊन ठेपली आहे कळमनुरी तालुक्यातील सांडस परीसरात शेतकऱ्यांनी या समस्या बद्दल एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे .या भागात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने येथील पिकाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे .1
- “ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक" “ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक"1
- मंजूर झालेले सोलर संबंधित सोलर कंपनीने बसवल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सोलर तात्काळ बसून देण्याची सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांची महावितरण कडे मागणी मंजुर सोलर परंतु न बसवल्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्या अभावी नुकसान! (शेतकऱ्यांनी वर्ग संबंधित ऑफिसमध्ये मारतात चक्ररा) तात्काळ सोलर बसवावे जाधव यांनी केली मागणी, मालेगाव प्रतिनिधी,दि,१५:- पावसाने तर मारली दांडी परंतु सोलर व महावितरण अधिकारी पण देत आहेत उडवा उडी चे उत्तर, पाण्याअभावी शेतकऱ्यांचे शेतातील हळद सोयाबीन इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात होत आहे नुकसान शासन दरबारी शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सोलर सह इतर योजना असल्या तरी मात्र पात्र लाभार्थ्यांनी दोन दोन तीन तीन महिने पूर्वी लागणारी कागदपत्रे व सोलर साठी लागणारी रक्कम ची भरणा केली परंतु अद्यापही त्यांना सोलर कंपनी मार्फत सोलर तसेच महावितरण कंपनीकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून खंत शेतकरी वर्ग व्यक्त करत आहेत, मालेगाव तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध सोलर कंपन्याकडे ऑनलाइन अर्ज केले आहेत, अमानी येथील शेतकरी राजू भिमराव गवळी,व अनिल गंगाराम जाधव यांनी मागील दोन - महीन्यापृर्वी सोलर साठी,ओस्वाल कंपनी साठी ऑनलाइन अर्ज केला तसेच लागणारी रक्कम सुद्धा भरली परंतु अद्याप यांच्या शेतात बोरवर सोलर बसवण्यात आले नसल्याने यांचे हळद ,सोयाबीन इतर पिक वाळून चालले यांनी मालेगाव महावितरण कंपनीकडे तसेच वाशिम कंपनीकडे चकरा मारून परेशान झाले असता आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी महावितरणचे अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय वाशिम संदीप दत्तात्रेय दरवडे यांची प्रत्यक्ष भेट सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव तसेच शेतकरी राजु गवळी यांनी घेतली असता, त्यांनी संबंधित महावितरणचे उपकार्यकारी अभियंता व्हि बी चव्हाण, तसेच ओसवाल कंपनीचे विनोद ब्रह्मेकर यांच्याशी संपर्क साधून या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात सांगितले, याबाबत ओबीसी सेलचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख विवेक गवळी यांनी सुद्धा दूरध्वनीवरून साहेबांशी संपर्क साधून विचारणा केली, सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी थेट महावितरण चे वरिष्ठ अधीक्षक दरवडे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली व त्यांनी तात्काळ दाखल घेऊन दोनच दिवसात सोलर बसवल्या जातील असे यावेळी जाधव यांना सांगितले, जाधव यांनी महावितरण व सोलर कंपनी वाले शेतकऱ्याकडून पैशाची मागणी देखील करतात असे सांगितले असता, दरवडे म्हणाले ज्यांनी पैशाची मागणी केली असेल त्यांना डायरेक्ट लाच लुचपत विभागाकडे तक्रार करून पकडून द्या , काही शेतकरी तर आमचे अधिकाऱ्यांचे पाय धरायचे राहिले हो साहेब असे म्हणाले तेव्हा या बाबीची तात्काळ दखल घेऊन पात्र परंतु सोलर पासून वंचित असलेले सर्व शेतकऱ्यांचे सोलर तात्काळ बसून द्यावे अशी मागणीही अनिल जाधव यांनी यावेळी केली2
- सोनपेठ नगर परिषदेने जिल्हा परिषद उर्दू शाळेचा ठराव मान्य केला तसेच परभणी जिल्हा परिषदेला पाठवला आहे तो परभणी जिल्हा परिषदेने ही सोनपेठ जिल्हा परिषद उर्दू शाळेचा ठराव मंजूर केला सोनपेठ नगर परिषदेने जिल्हा परिषद उर्दू शाळेचा ठराव मान्य केला तसेच परभणी जिल्हा परिषदेला पाठवला आहे तो परभणी जिल्हा परिषदेने ही सोनपेठ जिल्हा परिषद उर्दू शाळेचा ठराव मंजूर केला सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ नगर परिषदेने जिल्हा परिषद उर्दू शाळेचा ठराव मान्य केला तसेच परभणी जिल्हा परिषदेला पाठवला आहे तो परभणी जिल्हा परिषदेने ही सोनपेठ जिल्हा परिषद उर्दू शाळेचा ठराव मंजूर केला, लोकनियुक्त लोकप्रिय नगराध्यक्ष परमेश्वर भैय्या कदम यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व नगरसेवकांनी मिळून जिल्हा परिषद उर्दू शाळेचा ठराव एक मुखाने मंजूर करून पंचवीस वर्षानंतर मुस्लिम समाज बांधवांना न्याय देण्याचं काम केलं आहे अशी भावना मुस्लिम समाजातून व्यक्त होताना दिसत आहे.2
- 🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना ! ताफ्यासह 🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अखेर आज १५ सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना झाले आहेत. कडेकोट पोलिस बंदोबस्तात त्यांनी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.ड्रोन व्हिडीओ1
- बुलढाणा:-गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी देऊळघाटमध्ये पोलिसांचे शक्तीप्रदर्शन; चोख बंदोबस्तासह काढला जोरदार रूटमार्च1
- हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या स्थितीचा तातडीने सर्वेक्षण अहवाल करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कृषी विभागाला निर्देश जिल्ह्यातील पावसाचा खंड आणि त्याचा खरीप पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेता कृषी विभागाने पिकांचे प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर व वस्तुनिष्ठ असा तालुका, पीकनिहाय अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक झाली. बैठकीत जिल्ह्यातील पर्जन्यमान, पावसातील खंड, खरीप पिकांची सद्य:स्थिती तसेच दुष्काळाच्या अनुषंगाने आवश्यक बाबींचा जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. बी. एन. संगनवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शिवाजी बुचाले, जिल्ह्याचे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची उपस्थिती होती. जिल्ह्याचे जून ते सप्टेंबर कालावधीतील सरासरी पर्जन्यमान ७९५.३ मि.मी. आहे. १३ सप्टेंबरअखेर ५०१.५ मि.मी. पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या ६३.१ टक्के आहे. ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ ३०.२ टक्के पाऊस झाला आहे. या कालावधीत १४ ते १८ दिवसांचा पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे. सप्टेंबरमध्येही आतापर्यंत केवळ १७.५ मि.मी. पाऊस झाला आहे. या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निकषानुसार आवश्यक त्या उपाययोजनेसाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा. कृषी विभागासह वरिष्ठ भूवैज्ञानिक, पशुसंवर्धन विभागाने समन्वय ठेवत आवश्यक ती कार्यवाही तत्काळ पार पाडावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना दिले.1
- ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड1
- परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यातील जिल्हास्तरीय आदर्श शाळा पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळा डिगोळ ई परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यातील जिल्हास्तरीय आदर्श शाळा पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळा डिगोळ ई सोनपेठ (दर्शन) :- परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यातील जिल्हास्तरीय आदर्श शाळा पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळा डिगोळ ई, शिक्षकांच्या अथक परिश्रमाने व पालकांच्या सहकार्याने तसेच शालेय व्यवस्थापन समिती यांच्या मार्गदर्शनात प्रथमच जिल्ह्यास्तरीय आदर्श शाळेचा बहुमान मिळवला त्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न घेतले त्या सर्वांचे आभार मुख्याध्यापक तथा शिक्षक वर्गांनी व्यक्त केली आहेत.1