Shuru
Apke Nagar Ki App…
ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड
Sayad Jamil
ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड
More news from महाराष्ट्र and nearby areas
- भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय द्या! राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा सुचविण्याचे आवाहन. भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय द्या! राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा सुचविण्याचे आवाहन. सोनपेठ (दर्शन) :- छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी आपले सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय द्यावेत. दि.१८ सप्टेंबर २०२६ ⏰ सकाळी १० ते सायंकाळी ६ 📍 आठही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांत विशेष कक्ष 🏛️ २१ सप्टेंबर २०२६ | सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात उच्चस्तरीय समिती नागरिक व संबंधित घटकांशी थेट चर्चा करणार. 📧 प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्यास लेखी अभिप्राय पाठवा आपला अभिप्राय — अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह भरती परीक्षेकडे एक महत्त्वाचे पाऊल!1
- आकाशात चंद्र-चांदणीचा दुर्मिळ योग; मनमोहक दृश्याने वेधले लक्ष आकाश निरीक्षकांसाठी सोमवारी एक अनोखी पर्वणी ठरली. आकाशात चंद्राच्या कोरीसोबत तेजस्वी चांदणीचे मनोहारी दर्शन घडल्याने नागरिकांचे लक्ष या खगोलीय दृश्याकडे वेधले गेले. पावसाळ्यानंतर स्वच्छ होत चाललेल्या आकाशात चंद्राची कोर आणि जवळ चमकणारी चांदणी यांचे दृश्य अत्यंत आकर्षक दिसत होते. अनेकांनी हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपत सोशल मीडियावर शेअर केले. खगोल अभ्यासकांच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात आकाश निरीक्षणासाठी अनेक विशेष घटना घडत आहेत. १४ सप्टेंबर रोजी चंद्र, शुक्र आणि बुध यांच्या कोरीसदृश दृश्याचे दर्शन होणे ही विशेष खगोलीय घटना ठरली. सायंकाळच्या आकाशात चंद्राच्या आसपास दिसणारी तेजस्वी चांदणी पाहण्यासाठी नागरिकांनी काही काळ आकाशाकडे नजर लावली. निसर्गाचे हे सुंदर रूप पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. खगोलीय घटनांबाबत वाढते कुतूहल अशा दुर्मीळ खगोलीय घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि खगोलप्रेमींमध्ये आकाश निरीक्षणाची उत्सुकता वाढत आहे. दुर्बीण नसतानाही काही घटना स्वच्छ आकाशात साध्या डोळ्यांनी पाहता येतात, त्यामुळे या घटनांकडे नागरिकांचे विशेष आकर्षण असते.1
- मुलींच्या शिक्षणाचे ध्येय बाळगत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या 47 वर्षीय महिलेचा तहसिलदारांच्या हस्ते सत्कार मुलींच्या शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून साडी परिधान करून, अनवानी पायी चालत जाऊन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी संघर्ष करत कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील रमाबाई अशोक रणवीर या 47 वर्षीय महिलेने अंबाजोगाई येथेअमृत दौड़ मॅरेथॉन स्पर्धा जिंकून भल्या भल्या प्रशिक्षित मुलीना लाजवेल अशी मोलाची कामगिरी केली आहे.या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे तहसीलदार यांनी सोमवारी रमाबाई च्या घरी भेट देऊन सत्कार करून अभिनंदन केले . रमाबाई रणवीर हया अत्यंत गरिब कुटुंबातील महिला आहे .मोलमजुरी करून ती आपली उपजीविका धकवत असते, तिला दोन मुलीच आहेत .याच मजुरीच्या पैशातून ती आपल्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण करीत आहे .2012 मध्येच नवऱ्याने साथ सोडली,तेव्हा पासून त्या एकट्या पडल्या आहेत . हालाखीची कठीण परिस्थिती असताना ही तिने आपल्या एका मुलीला नांदेडला शिक्षणाला, तर दुसऱ्या मुलीला अंबाजोगाई येथे एका अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्याकरता ठेवले आहे .त्याच अकॅडमी मध्ये त्या स्वयंपाक करण्याचे काम करित होत्या .त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याकरता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या कौशल्याने स्पर्धा जिंकली .या पार्श्वभूमीवर कळमनुरी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी पोत्रा या ठिकाणी येऊन रमाबाई रणवीरचा सत्कार करून अभिनंदन केले आहे .त्यावेळी रमाबाईला घरकुल, शौचालय,या सह सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तहसीलदार कांबळे यांनी दिले आहे.याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी शिवशंकर गुट्टे, पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, रवी कांबळे,रघूनाथ पाटील, जिजाराम मुलगीर, श्रीकांत मुलगीर,वैभव मुलगीर, रघूनाथ गुहाडे, शामराव रायपुरे, गजानन राणगिरे, विक्रम रणवीर, सोपान रणवीर, डॉ. कैलास रणवीर ,शिवाजी मुलगीर, डॉ. मिलींद रणवीर यांच्या सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती .1
- परळी येथील बौद्ध विहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद1
- *मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, बेटमोगरेकरांच्या नेतृत्वाखाली मागणी.* हेक्टरी 1 लाख अनुदान द्या. प्रतिनिधी-मुखेड-कंधार मध्ये तात्काळ दुष्काळ जाहिर करुन हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्या व दुष्काळ संबंधीत निवेदनातील 10 प्रश्न तात्काळ सोडवा. गेल्या 45 दिवसापासुन नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधारमध्ये पाऊसाचा खंड पडल्याने शेतामधील उभी पिके वाळली आहेत.आता पाऊस पडला तरी शेतातली पीक उत्त्पन्न देणार नाहीत.म्हणून मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळाचे सर्व लाभ लागू करा,अशी मागणी उपजिल्हाकारी अनुप पाटील व मुखेडचे तहसीलदार अभयराय नंजुडे व कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याकडे माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 15 सप्टेंबर रोजी शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थिती मागणी केली गेली. नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधार दुष्काळ जाहीर करून अनुदान देण्याच्या मागणीसोबत दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पिकविमा लागु करा.चालु कर्जदार शेतकऱ्यांना थकित शेतकऱ्यांप्रमाणे 2 लाख रुपये ची कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर रक्कम द्या.दुष्काळामध्ये विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्क माफी सोबत प्रवेश फी देखील माफ करा.सतत जाणाऱ्या लाईट मुळे शेतकरी व नागरीक त्रस्त आहेत, लाईटचा कायमस्वरुपी प्रश्न सोडवा.दुष्काळामध्ये शेतीवर अवलंबुन असलेल्या मजुरांना व भुमीहिन यांना काम द्या, किंवा अनुदान द्या.निराधार, अपंग, दिव्यांग यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवुन खात्यात अनुदान टाका.दुष्काळामध्ये चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चारा छावणी उभी करा, व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करुन प्रश्न सोडवा.थकित असलेल्या घरकुलांच्या बिलासाठी पैसे न घेता तात्काळ लाभधारकांच्या खात्यात रक्कम जमा करा.बँकांना तात्काळ कर्ज वाटपाचे आदेश द्या, व कर्ज वाटपामध्ये शेतकऱ्यांची होणारी अडवणुक व लूट थांबवा.या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी शेतकरी मोठी संख्या मुखेड तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर जमा झाल्यामुळे निवेदनाला मोर्चाचे स्वरूप आले. या शेकडो शेतकरी आणि नागरिकांनी मुखेड गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे यांना मुखेडच्या पंचायत समिती कार्यालयाचा भ्रष्टाचार संपविण्यासाठी घेराव घेतला आणि घराकुलामध्ये पैसे घेणे बंद करा अशी मागणी केली.यावेळी राजु पाटील रावानगावकर, विश्वंभर पाटील मस्लगेकर, शोकत पठाण, संजय रावणगावकर, नासर पठाण, माधवराव पाटील उंद्रीकर, अच्यतुराव पाटील बिल्लालीकर, शंकर पाटील जांभळीकर,रमेश पाटील आमणर,किरण पाटील धामणगावकर,बालाजी वारे, जयपाल गायकवाड, बालाजी काटशेव, गणेश मोरे, वसु पाटील येवतीकर, मैंनू साब येवतीकर, हावगिराव पाटील, संदीप घाटे , नागनाथ पाटील बेळीकर,संजय नुकुलवार, हरिदास पाटील, मगदूम पठाण,माधव पाटील होनवडज,शफी कुरेशी, हणमंत मुगवणे, रामभाऊ पाटील,संदीप पाटील निवळीकर,माऊली कोठारे,शंकर आतनूरे शिवाजी पाटील बेळीकर, गणेश आप्पा स्वामी, सुनील आरगिळे,प्रकाश पाटील कबीर, परशुराम गवाले, विजय पाटील तारदड,विजय पाटील इंमडे,पत्रे चेअरमन,बालाजी खांडेकर,बालाजी साबणे,मारोती मटके, रियाज शेख पत्रकार, मनोज गुट्टे, बजरंग बोडके तुपदाळ,बालाजी गुट्टे, भानुदास पाटील, बळते माऊलीकर, इरफान मोमिन,विलास इमडे,रमेश तेलंग, अविनाश इंगळे *मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, बेटमोगरेकरांच्या नेतृत्वाखाली मागणी.* हेक्टरी 1 लाख अनुदान द्या. प्रतिनिधी-मुखेड-कंधार मध्ये तात्काळ दुष्काळ जाहिर करुन हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्या व दुष्काळ संबंधीत निवेदनातील 10 प्रश्न तात्काळ सोडवा. गेल्या 45 दिवसापासुन नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधारमध्ये पाऊसाचा खंड पडल्याने शेतामधील उभी पिके वाळली आहेत.आता पाऊस पडला तरी शेतातली पीक उत्त्पन्न देणार नाहीत.म्हणून मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळाचे सर्व लाभ लागू करा,अशी मागणी उपजिल्हाकारी अनुप पाटील व मुखेडचे तहसीलदार अभयराय नंजुडे व कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याकडे माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 15 सप्टेंबर रोजी शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थिती मागणी केली गेली. नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधार दुष्काळ जाहीर करून अनुदान देण्याच्या मागणीसोबत दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पिकविमा लागु करा.चालु कर्जदार शेतकऱ्यांना थकित शेतकऱ्यांप्रमाणे 2 लाख रुपये ची कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर रक्कम द्या.दुष्काळामध्ये विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्क माफी सोबत प्रवेश फी देखील माफ करा.सतत जाणाऱ्या लाईट मुळे शेतकरी व नागरीक त्रस्त आहेत, लाईटचा कायमस्वरुपी प्रश्न सोडवा.दुष्काळामध्ये शेतीवर अवलंबुन असलेल्या मजुरांना व भुमीहिन यांना काम द्या, किंवा अनुदान द्या.निराधार, अपंग, दिव्यांग यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवुन खात्यात अनुदान टाका.दुष्काळामध्ये चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चारा छावणी उभी करा, व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करुन प्रश्न सोडवा.थकित असलेल्या घरकुलांच्या बिलासाठी पैसे न घेता तात्काळ लाभधारकांच्या खात्यात रक्कम जमा करा.बँकांना तात्काळ कर्ज वाटपाचे आदेश द्या, व कर्ज वाटपामध्ये शेतकऱ्यांची होणारी अडवणुक व लूट थांबवा.या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी शेतकरी मोठी संख्या मुखेड तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर जमा झाल्यामुळे निवेदनाला मोर्चाचे स्वरूप आले. या शेकडो शेतकरी आणि नागरिकांनी मुखेड गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे यांना मुखेडच्या पंचायत समिती कार्यालयाचा भ्रष्टाचार संपविण्यासाठी घेराव घेतला आणि घराकुलामध्ये पैसे घेणे बंद करा अशी मागणी केली.यावेळी राजु पाटील रावानगावकर, विश्वंभर पाटील मस्लगेकर, शोकत पठाण, संजय रावणगावकर, नासर पठाण, माधवराव पाटील उंद्रीकर, अच्यतुराव पाटील बिल्लालीकर, शंकर पाटील जांभळीकर,रमेश पाटील आमणर,किरण पाटील धामणगावकर,बालाजी वारे, जयपाल गायकवाड, बालाजी काटशेव, गणेश मोरे, वसु पाटील येवतीकर, मैंनू साब येवतीकर, हावगिराव पाटील, संदीप घाटे , नागनाथ पाटील बेळीकर,संजय नुकुलवार, हरिदास पाटील, मगदूम पठाण,माधव पाटील होनवडज,शफी कुरेशी, हणमंत मुगवणे, रामभाऊ पाटील,संदीप पाटील निवळीकर,माऊली कोठारे,शंकर आतनूरे शिवाजी पाटील बेळीकर, गणेश आप्पा स्वामी, सुनील आरगिळे,प्रकाश पाटील कबीर, परशुराम गवाले, विजय पाटील तारदड,विजय पाटील इंमडे,पत्रे चेअरमन,बालाजी खांडेकर,बालाजी साबणे,मारोती मटके, रियाज शेख पत्रकार, मनोज गुट्टे, बजरंग बोडके तुपदाळ,बालाजी गुट्टे, भानुदास पाटील, बळते माऊलीकर, इरफान मोमिन,विलास इमडे,रमेश तेलंग, अविनाश इंगळे3
- 🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना ! ताफ्यासह 🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अखेर आज १५ सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना झाले आहेत. कडेकोट पोलिस बंदोबस्तात त्यांनी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.ड्रोन व्हिडीओ1
- ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड1
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे अभियान राबविण्यात येणार १७ सप्टेंबरपासून राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे अभियान राबविण्यात येणार १७ सप्टेंबरपासून राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ सोनपेठ (दर्शन) :- शासकीय सेवा थेट नागरिकांच्या दारी ; महिनाभर लोकसहभागातून सेवेचा जागर ‘सेवा सेतूपासून ‘जनसेवक महाकुंभापर्यंत विविध उपक्रम ; गाव-वॉर्डस्तरावर सामाजिक सेवेची चळवळ शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ पात्र नागरिकांच्या हातात पोहोचावा,प्रशासन आणि सामान्य माणूस यांच्यातील अंतर कमी व्हावे आणि लोकसहभागातून सेवाभावाची व्यापक चळवळ उभी राहावी,या उद्देशाने राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे अभियान राबविण्यात येणार आहे.‘सेवा परमो धर्म’ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याच्या भूमिकेतून या महिनाभराच्या अभियानाची आखणी करण्यात आली आहे. तालुक्यात ‘सेवा सेतू’; एकाच ठिकाणी योजनांचा लाभ अभियानातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘सेवा सेतू अभियान’. प्रत्येक तालुकास्तरावर शिबिर घेऊन राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचे लाभ पात्रतेनुसार नागरिकांना थेट उपलब्ध करून दिले जाणार आहेत.‘आपले सरकार सेवा केंद्रा’मार्फत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून शक्यतो शिबिरातच लाभ देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.तसेच प्रत्येक तालुक्यात किमान एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केले जाणार आहे. वनहक्क दाव्यांसाठी ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय वनहक्क समित्यांच्या बैठका घेऊन नवीन दावे तसेच पूर्वीच्या दाव्यांतील दुरुस्त्यांची कार्यवाही केली जाणार आहे.अभियानाच्या कालावधीत सर्व दावे निर्णयित होतील,यासाठी जिल्हानिहाय वेळापत्रक तयार करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. सातबाऱ्यापासून आधारपर्यंत २२ सेवा ‘सेवा सेतू’ शिबिरांमधून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित २२ महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहे. प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा व जिवंत सातबारा मोहीम,गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप,मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते उपलब्ध करणे,पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरण,नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र,वनहक्क दावे मंजूर करणे,मालमत्ता हस्तांतरण नोंद,नवीन नळजोडणी, मालमत्ता कर आकारणी व मागणीपत्र,प्रलंबित घरगुती वीजजोडणी मंजुरी आणि मालमत्ता हस्तांतरणानंतर वीजजोडणीवर नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे यांचा त्यात समावेश आहे. याशिवाय बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरींसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी,दिव्यांग प्रमाणपत्र,विवाह नोंदणी प्रमाणपत्र,आधार कार्ड,जन्म-मृत्यू नोंद व प्रमाणपत्र,शिकाऊ वाहनचालक परवाना,महिला बचतगट नोंदणी,ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र,महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप, ७/१२ व ८-अ मधील नोंदी अद्ययावत करणे आणि जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार जमिनीच्या मोजणीशी जोडणे या सेवांचाही समावेश आहे. युवकांच्या कल्पकतेला ‘इनोव्हेशन चॅलेंजचे व्यासपीठ राज्यातील युवक,विद्यार्थी, स्टार्टअप्स,व्यावसायिक,कॉर्पोरेट इनोव्हेटर्स तसेच ग्रामीण भागात नवी समाधाने विकसित करणाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी राज्यस्तरीय ‘इनोव्हेशन चॅलेंज ’आयोजित करण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्था,स्टार्टअप नेटवर्क, इन्क्युबेशन सेंटर आणि खासगी कंपन्यांचा यात सहभाग असेल. उत्कृष्ट इनोव्हेटर्सना तज्ज्ञांसमोर आपल्या कल्पना मांडण्याची संधी मिळेल आणि त्यातून राज्यस्तरीय उत्कृष्ट इनोव्हेटर्सची निवड केली जाईल.कौशल्य,रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यासाठी नोडल विभाग असेल. प्रत्येक गाव-वॉर्डात ‘सेवा माझे योगदान’ अभियानाला खऱ्या अर्थाने लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी प्रत्येक गाव आणि वॉर्डात ‘सेवा माझे योगदान’ कार्यक्रम होणार आहे.युवक,महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह शिक्षण,कला, साहित्य,क्रीडा व समाजसेवा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींना सहभागी करून घेतले जाणार आहे.समुद्रकिनारे,नदीघाट आणि बारवांच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवून भविष्यात नियमित स्वच्छता व्हावी यासाठी स्थानिक समित्याही स्थापन केल्या जाणार आहेत.स्वच्छतेनंतर सामूहिक संकल्प घेतला जाणार असून या कामाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येईल. या उपक्रमात स्थानिक गरजेनुसार रक्तदान शिबिर,अनाथालय- वृद्धाश्रम भेट,वृक्षारोपण,‘स्वच्छता ही सेवा’,आरोग्य तपासणी,‘एक गाव दत्तक घ्या-सेवा कार्य’, योग व ध्यान सत्र,प्लास्टिकमुक्ती जागृती, महिलांचे आरोग्य व स्वच्छता, वंचित मुलांसाठी शिक्षण सहकार्य, करिअर कौन्सिलिंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता असे उपक्रम घेता येणार आहेत. यासोबतच अवयवदान संकल्प, व्यसनमुक्त भारत,पोषण व ॲनिमिया,रस्ते सुरक्षा,जलसंधारण व जलस्रोत स्वच्छता,कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंग,सायबर सुरक्षा,फिट इंडिया खेळ सत्र, वीरगाथा व सैनिकांचा सन्मान, दिव्यांगजन सहयोग, मतदार जागृती व नोंदणी,‘व्होकल फॉर लोकल’,सरकारी योजनांची जनजागृती आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व प्रमाणपत्रे देण्यासंबंधी उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.ग्रामीण भागात गटविकास अधिकारी,तर शहरी भागात मुख्याधिकारी अथवा वॉर्ड अधिकारी नोडल अधिकारी असतील. ‘विकसित भारताचा बदल नागरिकांसमोर राज्यातील महत्त्वाचे व परिवर्तनकारी प्रकल्प आणि क्षेत्रांची यादी तयार करून या प्रकल्पांमुळे नागरिकांच्या जीवनमान,सुरक्षा,अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि संधींमध्ये झालेल्या बदलांची माहिती संकलित केली जाणार आहे. ‘विकसित भारत-२०४७ सेवा ज्योत यात्रा’ प्रत्येक गावातून काढण्यात येईल,तर शहरी भागात बाइक रॅली आयोजित केली जाईल.गाव आणि शहरांतील प्रमुख ठिकाणी विकसित भारत-२०४७ तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाईल.कार्यक्रमाच्या शेवटी ‘विकसित भारत-२०४७’चा सामूहिक संकल्प घेतला जाईल. जिल्हास्तरावर पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील भारत कागदावर अन् शब्दांत शासकीय आणि खासगी शाळांमध्ये ‘विकसित भारत’ संकल्पनेवर चित्रकला स्पर्धा होईल.‘मुलांच्या स्वप्नातील भारत’ आणि ‘विकसित भारत-२०४७’ या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतील.विजेत्यांना पुरस्कार देण्यात येतील.निवडक स्पर्धकांचे व्हिडिओ तयार करून जिल्हास्तरीय आणि त्यानंतर राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. तालुकास्तरावर गटशिक्षण अधिकारी नोडल अधिकारी असतील. अंगणवाडी उत्सवात माता-बालकांच्या आरोग्यावर भर सर्व अंगणवाडी केंद्रांवर मुलांसोबत मातांनाही निमंत्रित करून ‘अंगणवाडी उत्सव’ साजरा केला जाणार आहे. महिलांना आरोग्य व पोषण योजनांची माहिती, मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच फळे व मिठाईचे वाटप केले जाईल.अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.लाभार्थी महिलाही पोषण व आरोग्य योजनांमुळे झालेल्या फायद्यांचे अनुभव सांगतील. लाभार्थ्यांच्या घरी पेटणार ‘आशीर्वादाचा दिवा’ अभियानातील हृदयस्पर्शी उपक्रम म्हणून ‘आशीर्वादाचा दिवा’ राबविण्यात येणार आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी संबंधित विभागांचे अधिकारी जाऊन दीप प्रज्वलित करतील. विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या याद्या ११ सप्टेंबरपर्यंत मुख्य सचिवांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व मंत्रालयीन विभागांना देण्यात आले आहेत. ‘बदलाची गोष्ट’ सांगणार लाभार्थ्यांची यशोगाथा शासकीय योजनांनी एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यात नेमका काय बदल घडविला,हे आता लाभार्थी स्वतः सांगणार आहेत.‘बदलाची गोष्ट’ या उपक्रमांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमुळे लाभार्थ्यांच्या जीवनमानात झालेल्या सकारात्मक बदलांच्या यशोगाथा नावासह व्हिडिओ स्वरूपात संकलित केल्या जातील. उत्कृष्ट व्हिडिओ व रिल्सची राज्यस्तरावर निवड केली जाणार आहे. १७ सप्टेंबरला ‘आभार आणि संकल्पाची रांगोळी’ १७ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी जनकल्याणकारी योजना,राष्ट्रीय प्रतीके आणि विकसित भारत या संकल्पनांवर आधारित मानवी रांगोळी साकारली जाणार आहे. नैसर्गिक साहित्याचा वापर करून कला- परंपरा,पर्यटन, निसर्ग आणि संस्कृतीवर आधारित रांगोळ्याही काढण्यात येतील. सांस्कृतिक कार्य विभाग या उपक्रमासाठी नोडल विभाग असेल. २ ऑक्टोबरला ‘नमो सेवागाथा’ केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती कला व नाट्यपथकांद्वारे शाळा,महाविद्यालये आणि ग्रामपंचायतस्तरापर्यंत पोहोचविली जाणार आहे.उत्कृष्ट पथकांना जिल्हा व राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळेल आणि स्थानिक कलाकार,विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान केला जाईल. २ ऑक्टोबर रोजी तालुकास्तरावर ‘नमो सेवागाथा’ कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. संकल्प यात्रा याच अभियानांतर्गत ‘जल,जन आणि सेवा संकल्प यात्रा’ धुळे जिल्ह्यातून जाणार असून तेथे यात्रेचे स्वागत करून स्थानिक योजना आणि विकासकामांबाबत संवाद कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.यात्रेतील एलईडी स्क्रीनवर माहितीपट दाखविण्यात येतील.१७ ऑक्टोबरला ‘जनसेवक महाकुंभ’ ; अभियानाची सांगता अभियानाचा समारोप १७ ऑक्टोबर रोजी ‘जनसेवक महाकुंभा’ने होईल. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत काम करणारे लोकप्रतिनिधी यात सहभागी होतील.सरपंचापासून संसद सदस्यांपर्यंत विविध स्तरांवरील लोकप्रतिनिधी विकसित भारताबाबत आपले अनुभव मांडतील. मा.पंतप्रधान हे उपस्थित लोकप्रतिनिधींना संबोधित करतील.त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व लोकप्रतिनिधी विकसित भारताचा संकल्प करतील.त्यानंतर ‘सेवा संकल्प अभियानाची’ सांगता होईल. ग्रामविकास विभाग या कार्यक्रमासाठी नोडल विभाग असेल.हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. संकलन : जिल्हा माहिती कार्यालय परभणी1
- महिना उलटला पाऊस नाही, विहिर बोरवेलला पुरेसे पाणी असूनही शेतातील वीज गुल,खरीप पिके धोक्यात,शेतकऱ्याचा टाहो हिंगोली जिल्ह्यात विशेषता कळमनुरी तालुक्यात एका महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके हातची गेली आहेत,तूर ,कापूस, सोयाबीन,हळद ही पिके पाऊस नसल्याने धोक्यात आली आहे.एकंदरीत तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.महिनाभरापासून पाऊस नाही विहिरी बोरला पुरेशी पाणी असताना देखील शेतातील वीज वारंवार गुण होत आहे त्यामुळे मुबलक पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही,अशी परिस्थिती शेतकऱ्यावर येऊन ठेपली आहे कळमनुरी तालुक्यातील सांडस परीसरात शेतकऱ्यांनी या समस्या बद्दल एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे .या भागात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने येथील पिकाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे .1