logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पारदर्शक व्यवहाराच्या अनुषंगाने महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या, महानगरपालिकेचा व्यवहार पूर्णपणे पारदर्शक पवार यासाठी प्रयत्न करा असा सल्ला त्यांनी दिला. लातूर महानगरपालीकेचा कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख राहील यांची दक्षता घ्या,निधीचा विनीयोग आणि योजनांची काटेकोर अमंलबजावणी करा - आ. अमित देशमुख लातूर (प्रतिनिधी) बुधवारी लातूर शहर महानगरपालीकेत सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आ. अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आ. अमित देशमुख यांनी खा. डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजा बाबत विस्तृत आढावा घेतला. वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था: सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लग्न समारंभांचे दिवस असल्याने शहरात वाहतूक कोंडीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. यावर तातडीने कार्यवाही करून शहरातील वाहतुकीला शिस्त लावावी. सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करावी. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रभावीपणे अतिक्रमणविरोधी मोहीम राबवावी. शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, रुग्णालये, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच रहिवासी संकुलांत पार्किंग व्यवस्था अनिवार्य करावी. शासनमान्य सल्लागाराची नियुक्ती करून भविष्यातील नियोजन करावे आणि प्रदूषणाचा स्तर कमी राहील यासाठी प्रयत्न करावेत अशी सुचना आमदार अमित देशमुख यांनी दिली आहे. कचरा व्यवस्थापन:शहरातील कचरा व्यवस्थापनात सुधारणा झाली असली तरी त्यात आणखी दुरुस्त्या कराव्यात. कचऱ्यावर प्रक्रिया अधिक प्रभावी करून ढीग लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. या एकूण कामकाजात महिलांचा सहभाग वाढवावा असे आमदार अमित देशमुख म्हणाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक: लातूर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य-दिव्य पुतळा उभारणीचे काम सुरू झाले आहे. मात्र, या कामाचा दर्जा आणि पारदर्शकतेबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे पुनरावलोकन करावे. हैदराबादच्या धरतीवर हे काम व्हावे, अशी लोकभावना असल्याने तेथे अभ्यास गट पाठवून सूचना घ्याव्यात. संपूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून स्मारकाची उभारणी करावी असे त्यांनी सांगीतले. नियमित पाणीपुरवठा: शहरात नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. पिवळे किंवा दूषित पाणी वितरित होणार नाही याची काळजी घ्यावी. ठिकठिकाणी होणारी गळती थांबवावी. हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. पथदिवे आणि सौर ऊर्जा: शहरातील पथदिव्यांची देखभाल नियमित व्हावी. 'घर तिथे पथदिवा' अशी योजना तयार करून विस्तार करावा. मंजूर सोलर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून वीज वापराच्या बाबतीत महापालिका स्वयंपूर्ण करावी. प्रशासकीय सुलभता: नागरिकांना बांधकाम परवाना मिळण्यात होणारी दिरंगाई टाळावी. या प्रक्रियेत नागरिकांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्यावी आणि दिलेल्या परवान्याप्रमाणेच बांधकामे होतील याची दक्षता घ्यावी. शहरातील प्रलंबित कबाले वाटपाचा आढावा घेऊन, नियमानुसार असलेले कबाले वाटप ताबडतोब करावेत, यासाठी शासनाच्या नवीन धोरणाचा आधार घ्यावा असे यावेळी सांगीतले. युनीपोल बाबत कायदेशीर कार्यवाही लातूर शहरात मागच्या काळात उभारण्यात आलेल्या युनिपोल संदर्भात कायदेशीर प्रक्रिया तपासून घ्यावी, हे युनिपोल नियमानुसार नसतील तर ते काढून टाकावेत. आगामी काळात जाहिरात फलक परवानगी देताना नियमाचे उल्लंघन होणार नाही, शहराचे सौंदर्य बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आमदार देशमुख यांनी सांगीतले. नागरिकांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी कामकाजात सुधारणा करावी, शहरात फेरीवाला धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, गंजगोलाई तसेच शहरातील इतर ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी असे सांगीतले. नवीन तंत्रज्ञानाचा वापर एकूणच प्रशासकीय कामकाज पारदर्शक, सुलभ आणि गतिमान होण्यासाठी एआय व इतर अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासह अनेक महत्त्वाच्या सूचना याप्रसंगी केल्या असून अधिकारी, कर्मचारी यांचेही म्हणणे ऐकून घेऊन, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येइल व आवश्यक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपूरावा करण्याची ग्वाही यावेळी दिली. या प्रसंगी नगरसेवक फारुक शेख, विकास कांबळे, युनुस मोमीन, इसरार सगरे, डॉ. बालाजी सांळुके, मुक्तार शेख, अमोल लांडगे, व्यकंटेश पुरी यांच्यासह मनपाचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

1 hr ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
1 hr ago
7a34fb1a-0955-42cd-b6ef-40b9cd405e2b

महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पारदर्शक व्यवहाराच्या अनुषंगाने महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या, महानगरपालिकेचा व्यवहार पूर्णपणे पारदर्शक पवार यासाठी प्रयत्न करा असा सल्ला त्यांनी दिला. लातूर महानगरपालीकेचा कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख राहील यांची दक्षता घ्या,निधीचा विनीयोग आणि योजनांची काटेकोर अमंलबजावणी करा - आ. अमित देशमुख लातूर (प्रतिनिधी) बुधवारी लातूर शहर महानगरपालीकेत सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आ. अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आ. अमित देशमुख यांनी खा. डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा

26349ce3-a2ec-4644-8449-f0eebc84fc3f

आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजा बाबत विस्तृत आढावा घेतला. वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था: सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लग्न समारंभांचे दिवस असल्याने शहरात वाहतूक कोंडीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. यावर तातडीने कार्यवाही करून शहरातील वाहतुकीला शिस्त लावावी. सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करावी. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रभावीपणे अतिक्रमणविरोधी मोहीम राबवावी. शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, रुग्णालये, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच रहिवासी संकुलांत पार्किंग व्यवस्था अनिवार्य करावी. शासनमान्य सल्लागाराची नियुक्ती करून भविष्यातील नियोजन करावे आणि प्रदूषणाचा स्तर कमी राहील यासाठी प्रयत्न करावेत अशी सुचना आमदार अमित देशमुख यांनी दिली आहे. कचरा व्यवस्थापन:शहरातील कचरा व्यवस्थापनात सुधारणा झाली असली तरी त्यात आणखी दुरुस्त्या कराव्यात. कचऱ्यावर प्रक्रिया अधिक प्रभावी करून ढीग लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. या एकूण कामकाजात महिलांचा सहभाग वाढवावा असे आमदार अमित देशमुख म्हणाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक: लातूर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य-दिव्य पुतळा उभारणीचे काम

75b981b4-6840-405a-a179-9883d9500c89

सुरू झाले आहे. मात्र, या कामाचा दर्जा आणि पारदर्शकतेबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे पुनरावलोकन करावे. हैदराबादच्या धरतीवर हे काम व्हावे, अशी लोकभावना असल्याने तेथे अभ्यास गट पाठवून सूचना घ्याव्यात. संपूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून स्मारकाची उभारणी करावी असे त्यांनी सांगीतले. नियमित पाणीपुरवठा: शहरात नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. पिवळे किंवा दूषित पाणी वितरित होणार नाही याची काळजी घ्यावी. ठिकठिकाणी होणारी गळती थांबवावी. हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. पथदिवे आणि सौर ऊर्जा: शहरातील पथदिव्यांची देखभाल नियमित व्हावी. 'घर तिथे पथदिवा' अशी योजना तयार करून विस्तार करावा. मंजूर सोलर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून वीज वापराच्या बाबतीत महापालिका स्वयंपूर्ण करावी. प्रशासकीय सुलभता: नागरिकांना बांधकाम परवाना मिळण्यात होणारी दिरंगाई टाळावी. या प्रक्रियेत नागरिकांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्यावी आणि दिलेल्या परवान्याप्रमाणेच बांधकामे होतील याची दक्षता घ्यावी. शहरातील प्रलंबित कबाले वाटपाचा आढावा घेऊन, नियमानुसार असलेले कबाले वाटप ताबडतोब करावेत, यासाठी शासनाच्या नवीन धोरणाचा

c15db586-2226-4a47-a399-73c03827dcf7

आधार घ्यावा असे यावेळी सांगीतले. युनीपोल बाबत कायदेशीर कार्यवाही लातूर शहरात मागच्या काळात उभारण्यात आलेल्या युनिपोल संदर्भात कायदेशीर प्रक्रिया तपासून घ्यावी, हे युनिपोल नियमानुसार नसतील तर ते काढून टाकावेत. आगामी काळात जाहिरात फलक परवानगी देताना नियमाचे उल्लंघन होणार नाही, शहराचे सौंदर्य बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आमदार देशमुख यांनी सांगीतले. नागरिकांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी कामकाजात सुधारणा करावी, शहरात फेरीवाला धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, गंजगोलाई तसेच शहरातील इतर ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी असे सांगीतले. नवीन तंत्रज्ञानाचा वापर एकूणच प्रशासकीय कामकाज पारदर्शक, सुलभ आणि गतिमान होण्यासाठी एआय व इतर अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासह अनेक महत्त्वाच्या सूचना याप्रसंगी केल्या असून अधिकारी, कर्मचारी यांचेही म्हणणे ऐकून घेऊन, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येइल व आवश्यक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपूरावा करण्याची ग्वाही यावेळी दिली. या प्रसंगी नगरसेवक फारुक शेख, विकास कांबळे, युनुस मोमीन, इसरार सगरे, डॉ. बालाजी सांळुके, मुक्तार शेख, अमोल लांडगे, व्यकंटेश पुरी यांच्यासह मनपाचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मी भाजपाचा साधा सदस्य सुद्धा नाही, संघ परीवारच कुठल दायीत्व माझ्याकडे नाही असे सांगत स्वत: किशोर शिवणीकर यांनी भाजपा संबंधाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
    1
    मी भाजपाचा साधा सदस्य सुद्धा नाही, संघ परीवारच कुठल दायीत्व माझ्याकडे नाही असे सांगत स्वत: किशोर शिवणीकर यांनी भाजपा संबंधाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • माजी आ. सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी शिवसेना मजबुतीकरणसाठी पाया रोवला उदगीर (विशेष प्रतिनिधी) सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी मुख्यमंत्री बनतो, हे शिवसेनेचे नेते ना. एकनाथराव शिंदे यांनी दाखवून दिले. मात्र ते मुख्यमंत्री असताना देखील लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला बाळसे धरता आले नव्हते. नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि शिवसेना बांधणीचे काम सुरू झाले. खऱ्या अर्थाने पक्ष संघटन बांधणे हे काही फार सोपे नाही, मात्र अवघ्या पंधरा दिवसात सुधाकरराव भालेराव यांच्या संघटन कुशल नेतृत्वामुळे उदगीर नगरपालिकेमध्ये स्वतंत्र पॅनल शिवसेनेने टाकले, आणि 40 च्या 40 जागा लढवल्या, जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळे ती ही जागा मोठ्या ताकतीने शिवसेनेने लढवली. ज्या ठिकाणी बोटावर मोजन्या इतके कार्यकर्ते होते, त्याच उदगीर शहरांमध्ये गल्लीबोळातून हजारोंच्या संख्येने रॅली निघाली, घराघरातून शिवसेना आणि ना. एकनाथराव शिंदे यांचे नाव घुमू लागले. ही किमया घडउन आणली केवळ माजी आमदार सुधाकर भालेराव आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या आणि पक्ष बांधणी संघटन कुशलतेमुळेच असे म्हटले तर नवल वाटू नये. त्यानंतर आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील मोठ्या ताकतीने शिवसेनेने जागा लढवल्या, उदगीर विधानसभा मतदार संघामध्ये महायुती असली तरीही शिवसेनेला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी युती केली होती. तरीही शिवसेनेने अत्यंत तगडी लढत देत अनेक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. काही जागा तर शुल्लक मतांनी गेल्या. निवडणुका म्हटले की, हार जीत हे येणारच, परंतु अल्पावधीत माजी आमदार सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी उदगीर परिसरात जादूची कांडी फिरावी, त्या पद्धतीने शिवसेनेची बांधणी केली आहे. असे म्हटले तर नवल वाटू नये. कार्यकर्त्याची मोठी फळी त्यांनी उभारून दाखवली, त्यामुळेच अनेक नेत्यांना शिवसेना हा पक्ष आवडू लागला. परिणामतः अहमदपूरचे माजी मंत्री विनायकराव पाटील, औसा येथील सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, लातूर येथील भाजपचे नेते गोमसाळे या मान्यवरांनी आपापल्या परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते आणि माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री असताना देखील शिवसेनेची बांधणी एवढ्या मोठ्या ताकतीने झाली नव्हती, तेवढ्या ताकतीने सध्या लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष बांधणी सुरू आहे. कार्यकर्त्याचे संघटना अत्यंत गतिमान पद्धतीने सुरू असल्यामुळेच माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्यावर लातूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवलेली आहे. जिल्ह्याचे संघटक म्हणून ते काम पाहत आहेत. संघटन बांधणीसाठी गाव पातळीवर त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक अशी मोहीम राबवत असताना, प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील नागरिकाच्या मनामध्ये शिवसेना घर करून बसू लागली आहे. हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेसाठी फार प्रबळ दावेदारी ठरू शकणार आहे. अहमदपूर मध्ये विनायकराव पाटील यांनी मित्र मंडळाच्या बळावर निवडणूक लढवून जिंकून दाखवली होती. कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसताना देखील त्यांनी त्यावेळी निवडणूक जिंकली होती. आता तर शिवसेनेचे पाठबळ मिळाले आणि पक्ष बांधणी याच ताकतीने सुरू राहिली तर निश्चितपणे त्यांनाही भविष्य आहे. अशी चर्चा कार्यकर्ते करू लागले आहेत. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद वाढावी या दृष्टीने आपले प्रयत्न चालू राहतील अशी ग्वाही लातूर जिल्ह्याचे संघटक म्हणून कार्य करत असलेले माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. आपल्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक पद्धतीने शिवसेनेला बळ देण्याचे काम आपण करून दाखवू असा विश्वास जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी बोलून दाखवला आहे.
    4
    माजी आ. सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी शिवसेना मजबुतीकरणसाठी पाया रोवला 
उदगीर (विशेष प्रतिनिधी) सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी मुख्यमंत्री बनतो, हे शिवसेनेचे नेते ना. एकनाथराव शिंदे यांनी दाखवून दिले. मात्र ते मुख्यमंत्री असताना देखील लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला बाळसे धरता आले नव्हते. नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि शिवसेना बांधणीचे काम सुरू झाले. खऱ्या अर्थाने पक्ष संघटन बांधणे हे काही फार सोपे नाही, मात्र अवघ्या पंधरा दिवसात सुधाकरराव भालेराव यांच्या संघटन कुशल नेतृत्वामुळे उदगीर नगरपालिकेमध्ये स्वतंत्र पॅनल शिवसेनेने टाकले, आणि 40 च्या 40 जागा लढवल्या, जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळे ती ही जागा मोठ्या ताकतीने शिवसेनेने लढवली. ज्या ठिकाणी बोटावर मोजन्या इतके कार्यकर्ते होते, त्याच उदगीर शहरांमध्ये गल्लीबोळातून हजारोंच्या संख्येने रॅली निघाली, घराघरातून शिवसेना आणि ना. एकनाथराव शिंदे यांचे नाव घुमू लागले. ही किमया घडउन आणली केवळ माजी आमदार सुधाकर भालेराव आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या आणि पक्ष बांधणी संघटन कुशलतेमुळेच असे म्हटले तर नवल वाटू नये.
त्यानंतर आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील मोठ्या ताकतीने शिवसेनेने जागा लढवल्या, उदगीर विधानसभा मतदार संघामध्ये महायुती असली तरीही शिवसेनेला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी युती केली होती. तरीही शिवसेनेने अत्यंत तगडी लढत देत अनेक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. काही जागा तर शुल्लक मतांनी गेल्या. निवडणुका म्हटले की, हार जीत हे येणारच, परंतु अल्पावधीत माजी आमदार सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी उदगीर परिसरात जादूची कांडी फिरावी, त्या पद्धतीने शिवसेनेची बांधणी केली आहे. असे म्हटले तर नवल वाटू नये. कार्यकर्त्याची मोठी फळी त्यांनी उभारून दाखवली, त्यामुळेच अनेक नेत्यांना शिवसेना हा पक्ष आवडू लागला. परिणामतः अहमदपूरचे माजी मंत्री विनायकराव पाटील, औसा येथील सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, लातूर येथील भाजपचे नेते गोमसाळे या मान्यवरांनी आपापल्या परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते आणि माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. 
मुख्यमंत्री असताना देखील शिवसेनेची बांधणी एवढ्या मोठ्या ताकतीने झाली नव्हती, तेवढ्या ताकतीने सध्या लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष बांधणी सुरू आहे. 
कार्यकर्त्याचे संघटना अत्यंत गतिमान पद्धतीने सुरू असल्यामुळेच माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्यावर लातूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवलेली आहे. जिल्ह्याचे संघटक म्हणून ते काम पाहत आहेत. संघटन बांधणीसाठी गाव पातळीवर त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक अशी मोहीम राबवत असताना, प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील नागरिकाच्या मनामध्ये शिवसेना घर करून बसू लागली आहे. हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेसाठी फार प्रबळ दावेदारी ठरू शकणार आहे. 
अहमदपूर मध्ये विनायकराव पाटील यांनी मित्र मंडळाच्या बळावर निवडणूक लढवून जिंकून दाखवली होती. कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसताना देखील त्यांनी त्यावेळी निवडणूक जिंकली होती. आता तर शिवसेनेचे पाठबळ मिळाले आणि पक्ष बांधणी याच ताकतीने सुरू राहिली तर निश्चितपणे त्यांनाही भविष्य आहे. अशी चर्चा कार्यकर्ते करू लागले आहेत. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद वाढावी या दृष्टीने आपले प्रयत्न चालू राहतील अशी ग्वाही लातूर जिल्ह्याचे संघटक म्हणून कार्य करत असलेले माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. आपल्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक पद्धतीने शिवसेनेला बळ देण्याचे काम आपण करून दाखवू असा विश्वास जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी बोलून दाखवला आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • जळकोट
    1
    जळकोट
    user_मुस्तफा कोतवाल
    मुस्तफा कोतवाल
    जळकोट, लातूर, महाराष्ट्र•
    35 min ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आरटीओ आणि वाहनचालकात शाब्दिक चकमक. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी बाबळगाव चे वाहन चालक यांना केली मदत. रेनापुर पोलीस ठाण्यात आरटीओ ने दिलेली तक्रार मध्यस्थीने माघार. सुरू ॲप इन मराठी न्यूज. बुधवार दिनांक 29 एप्रिल 2026. लातूर तालुक्यातील बाबळगाव चे रहिवासी असलेले निळकंठ शिंदे यांची बोलेरो पिकप वाहन ही कोथिंबीर भरण्यासाठी लातूर तालुक्यातील बामणी शिवारात लावली असता या ठिकाणी आरटीओ सहाय्यक इन्स्पेक्टर यांनी गाडीचे कागदपत्रे विचारात दोघांमध्ये तक्रार होऊन निळकंठ शिंदे विरोधात रेनापुर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. लातुर जिल्ह्याच्या आरटीओ. कार्यालयातील आरटीओ सहाय्यक इन्स्पेक्टर यांनी कारण नसतांना बाभळगाव येथील बुलेरो पीकअपचे मालक निळकंठ शिंदे यांच्या विरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे बेलोरो पिकप वाहन मालक निळकंठ शिंदे यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांना माहिती कळवताच तात्काळ प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी रेणापूर पोलीसांना संपर्क साधुन निळकंठ शिंदे यांना मदत करीत प्रकरणाविषयी चौकशी कामे निळकंठ शिंदे हे बाभळगाव येथील रहीवाशी आहेत, त्यांनी कर्ज काढून एक बुलेरो पिक अप मालवाहतूक गाडी खरेदी केली आहे,ते दररोज शेतकऱ्यांची कोथिंबीर घेऊन नागपूर ला जातात, रोजच्या प्रमाणे ते लातुर तालुक्यातील बामणी शिवारात रसत्याच्या कडेला (रस्ता सोडून) आपली बुलेरो पिक अप व्हॅन लावली होती आणी ते कोथिंबीर घेण्यासाठी शेतकर्यांच्या फडात गेले होते, तेंव्हा अचानक अष्टा मोड हुन एक RTO ची गाडी आली आणी निळकंठ यास बुलेरो पिक अप व्हॅन चे कागदपत्र मागितले, निळकंठ यांनी सर्व कागदपत्र दाखविले, लायसन्स दाखविले यात गाडी मालकाची कोणतीही चूक नसताना संबंधित इन्स्पेक्टर नी पैसे मागीतले ते पैसेही गाडी मालक निळकंठ यांनी दिले, तरीही 1500 रुपयाचा खोटा फाईन गाडी वर लावला आणी संबंधित इन्स्पेक्टर नी निळकंठ यांना शिवीगाळ केली, नंतर इन्स्पेक्टर आणी निळकंठ मध्ये शाब्दिक चकमक झाली, आणी संबंधित इन्स्पेक्टर नी निळकंठ शिंदे यांच्या विरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, ही बातमी समजताच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी रेणापूर पोलीस निरीक्षक आणी संबंधित बीट आमलदार यांना संपर्क साधुन, निळकंठ यांना समज देत हे प्रकरण या ठिकाणीच मिटवण्यात आले. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे खंडापूरकर बाबा यांनी बोलताना आजही RTO लातुर मधील इन्स्पेक्टर यांची मुजोरी समाप्त झाली नाही, यापुढे जो कोणी भ्रष्टाचार इन्स्पेक्टर करत आसेल तर त्याच्या तोंडाला काळे फासून त्याची गाढवावर बसवुन धिंड काढण्यात यावे. आरटीओ कार्यालयातून कोणी त्रास देत असेल तर स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, फोन नंबर - 8888184444, 8055088888 वर संपर्क साधावा. वाहान चालकास मी विनंती करणार आहे, RTO ऑफिस मधील कोणाही इन्स्पेक्टर अन्य कर्मचाऱ्यांना एकरी भाषेचा वापर करु नका, त्यांना व्यक्तिगत भांडण करु नका आपण कायदेशीर तक्रार देवू असे सर्व वाहनचालकांना आवाहन करण्यात आले.
    1
    आरटीओ आणि वाहनचालकात शाब्दिक चकमक.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी बाबळगाव चे वाहन चालक यांना केली मदत. 
रेनापुर पोलीस ठाण्यात आरटीओ ने दिलेली तक्रार मध्यस्थीने माघार. 
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
बुधवार दिनांक 29 एप्रिल 2026. 
लातूर तालुक्यातील बाबळगाव चे रहिवासी असलेले निळकंठ शिंदे यांची बोलेरो पिकप वाहन ही कोथिंबीर भरण्यासाठी लातूर तालुक्यातील बामणी शिवारात लावली असता या ठिकाणी आरटीओ सहाय्यक इन्स्पेक्टर यांनी गाडीचे कागदपत्रे विचारात दोघांमध्ये तक्रार होऊन निळकंठ शिंदे विरोधात रेनापुर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.
लातुर जिल्ह्याच्या आरटीओ. कार्यालयातील आरटीओ सहाय्यक इन्स्पेक्टर यांनी कारण नसतांना बाभळगाव येथील बुलेरो पीकअपचे मालक निळकंठ शिंदे यांच्या विरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे बेलोरो पिकप वाहन मालक निळकंठ शिंदे यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांना माहिती कळवताच तात्काळ प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी रेणापूर पोलीसांना संपर्क साधुन निळकंठ शिंदे यांना मदत करीत प्रकरणाविषयी चौकशी कामे निळकंठ शिंदे हे बाभळगाव येथील रहीवाशी आहेत, त्यांनी कर्ज काढून एक बुलेरो पिक अप मालवाहतूक गाडी खरेदी केली आहे,ते दररोज शेतकऱ्यांची कोथिंबीर घेऊन नागपूर ला जातात, रोजच्या प्रमाणे ते लातुर तालुक्यातील बामणी शिवारात रसत्याच्या कडेला (रस्ता सोडून) आपली बुलेरो पिक अप व्हॅन लावली होती आणी ते कोथिंबीर घेण्यासाठी शेतकर्यांच्या फडात गेले होते, तेंव्हा अचानक अष्टा मोड हुन एक RTO ची गाडी आली आणी निळकंठ यास बुलेरो पिक अप व्हॅन चे कागदपत्र मागितले, निळकंठ यांनी सर्व कागदपत्र दाखविले, लायसन्स दाखविले यात गाडी मालकाची कोणतीही चूक नसताना संबंधित इन्स्पेक्टर नी पैसे मागीतले ते पैसेही गाडी मालक निळकंठ यांनी दिले, तरीही 1500 रुपयाचा खोटा फाईन गाडी वर लावला आणी संबंधित इन्स्पेक्टर नी निळकंठ यांना शिवीगाळ केली, नंतर इन्स्पेक्टर आणी निळकंठ मध्ये शाब्दिक चकमक झाली, आणी संबंधित इन्स्पेक्टर नी निळकंठ शिंदे यांच्या विरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, ही बातमी समजताच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी रेणापूर पोलीस निरीक्षक आणी संबंधित बीट आमलदार यांना संपर्क साधुन, निळकंठ यांना समज देत हे प्रकरण या ठिकाणीच मिटवण्यात आले.
यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे खंडापूरकर बाबा यांनी बोलताना आजही RTO लातुर मधील इन्स्पेक्टर यांची मुजोरी समाप्त झाली नाही, यापुढे जो कोणी भ्रष्टाचार इन्स्पेक्टर करत आसेल तर त्याच्या तोंडाला काळे फासून त्याची गाढवावर बसवुन धिंड काढण्यात यावे. आरटीओ कार्यालयातून कोणी त्रास देत असेल तर स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, फोन नंबर - 8888184444, 8055088888 वर संपर्क साधावा. वाहान चालकास मी विनंती करणार आहे, RTO ऑफिस मधील कोणाही इन्स्पेक्टर अन्य कर्मचाऱ्यांना एकरी भाषेचा वापर करु नका, त्यांना व्यक्तिगत भांडण करु नका आपण कायदेशीर तक्रार देवू असे सर्व वाहनचालकांना आवाहन करण्यात आले.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • 📍लातूर जिल्ह्यातील पानचिंचोली येथील एका ७५ वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी व्यक्त केला संशय...उष्माघाताने जिल्ह्यात आत्तापर्यंत तीन जणांचा झालाय मृत्यू
    1
    📍लातूर जिल्ह्यातील पानचिंचोली येथील एका ७५ वर्षीय शेतकऱ्याचा  उष्माघाताने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी व्यक्त केला संशय...उष्माघाताने जिल्ह्यात आत्तापर्यंत तीन जणांचा झालाय मृत्यू
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    9 hrs ago
  • लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई
    4
    लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • जाहीर अवाहन... जाहीर अवाहन... ​उदगीर शहरातील सर्व नागरिकांना, ​आपल्या शहराच्या आणि देशाच्या नियोजित विकासासाठी 'जनगणना २०२७' हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या जनगणनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. ​या मोहिमेचा पहिला टप्पा 'स्व-गणना' (Self-Enumeration) दिनांक १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविला जात आहे. ​माझे आपणास नम्र आवाहन आहे की, ​आपल्या कुटुंबाची माहिती डिजिटल पोर्टल/ॲपद्वारे स्वतःहून नोंदवावी. ​या राष्ट्रीय कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे. ​अचूक माहिती देऊन शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले योगदान द्यावे. ​चला, डिजिटल जनगणनेचा भाग बनूया आणि उदगीरच्या विकासाला गती देऊया! ​आपले नम्र सौ. स्वातीताई सचिन हुडे नगराध्यक्षा, उदगीर नगरपरिषद ​ ​हेडलाइन
    1
    जाहीर अवाहन... जाहीर अवाहन...
​उदगीर शहरातील सर्व नागरिकांना,
​आपल्या शहराच्या आणि देशाच्या नियोजित विकासासाठी 'जनगणना २०२७' हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.
या जनगणनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे.
​या मोहिमेचा पहिला टप्पा 'स्व-गणना' (Self-Enumeration) दिनांक १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविला जात आहे.
​माझे आपणास नम्र आवाहन आहे की,
​आपल्या कुटुंबाची माहिती डिजिटल पोर्टल/ॲपद्वारे स्वतःहून नोंदवावी.
​या राष्ट्रीय कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे.
​अचूक माहिती देऊन शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले योगदान द्यावे.
​चला, डिजिटल जनगणनेचा भाग बनूया आणि उदगीरच्या विकासाला गती देऊया!
​आपले नम्र
सौ. स्वातीताई सचिन हुडे
नगराध्यक्षा, उदगीर नगरपरिषद
​
​हेडलाइन
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.