logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सैराट फेम अभिनेता अरबाज शेख यांच्या वडिलांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून १ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण मदतीसाठी शिवसेना नेते मंगेश चिवटे यांनी समन्वय साधला आहे. अरबाज शेख यांनी आपल्या वडिलांच्या उपचारासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. याची तात्काळ दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मंगेश चिवटे यांना आवश्यक ती मदत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शिवसेनेकडून यापूर्वीच अरबाज शेख यांना १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. दरम्यान, मंगेश चिवटे यांनी मागील आठवड्यात सोलापूर येथील रुग्णालयात जाऊन अरबाज शेख यांच्या वडिलांची भेट घेतली आणि त्यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक यांना फोन जोडून दिला.

5 hrs ago
user_EXPRESS NEWS
EXPRESS NEWS
Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
5 hrs ago

सैराट फेम अभिनेता अरबाज शेख यांच्या वडिलांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून १ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण मदतीसाठी शिवसेना नेते मंगेश चिवटे यांनी समन्वय साधला आहे. अरबाज शेख यांनी आपल्या वडिलांच्या उपचारासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. याची तात्काळ दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मंगेश चिवटे यांना आवश्यक ती मदत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शिवसेनेकडून यापूर्वीच अरबाज शेख यांना १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. दरम्यान, मंगेश चिवटे यांनी मागील आठवड्यात सोलापूर येथील रुग्णालयात जाऊन अरबाज शेख यांच्या वडिलांची भेट घेतली आणि त्यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक यांना फोन जोडून दिला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराष्ट्रात सर्वच राजकीय मंडळी एकसारखीच असून एका पक्षाने दुसऱ्या पक्षाची आणि दुसऱ्याने इतर पक्षांची केवळ पोलखोल चालवली आहे. या राजकीय साठमारीत केवळ राज्यातील सर्वसामान्य जनता आणि गोरगरीब शेतकरीच भरडले जात आहेत. सत्तेच्या बळावर विरोधकांवर थेट गुन्हे दाखल केले जात असून सत्ताधाऱ्यांना काहीही बोलण्याची सोय उरलेली नाही. महाराष्ट्रात स्वतः अजितदादा यांच्यावर कोणतीही एफआयआर (FIR) दाखल होऊ शकत नाही, मात्र जे कोणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतात किंवा लिहितात, त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल केले जातात. यामुळे "राजकारण लय वगांळ हाय" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे।
    1
    महाराष्ट्रात सर्वच राजकीय मंडळी एकसारखीच असून एका पक्षाने दुसऱ्या पक्षाची आणि दुसऱ्याने इतर पक्षांची केवळ पोलखोल चालवली आहे. या राजकीय साठमारीत केवळ राज्यातील सर्वसामान्य जनता आणि गोरगरीब शेतकरीच भरडले जात आहेत.

सत्तेच्या बळावर विरोधकांवर थेट गुन्हे दाखल केले जात असून सत्ताधाऱ्यांना काहीही बोलण्याची सोय उरलेली नाही. महाराष्ट्रात स्वतः अजितदादा यांच्यावर कोणतीही एफआयआर (FIR) दाखल होऊ शकत नाही, मात्र जे कोणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतात किंवा लिहितात, त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल केले जातात. यामुळे "राजकारण लय वगांळ हाय" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे।
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पाऊले पंढरीची वाट चालत असून, दिंडी पंढरपूरच्या वाटेने पुढे मार्गस्थ होत आहे.
    1
    पाऊले पंढरीची वाट चालत असून, दिंडी पंढरपूरच्या वाटेने पुढे मार्गस्थ होत आहे.
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मुंबईत आज अजितदादांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन सुरू झाले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी प्रदर्शनातील छायाचित्रे पाहताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित असलेले सर्वच नेते अजितदादांच्या आठवणींमध्ये रमले आणि अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
    1
    मुंबईत आज अजितदादांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन सुरू झाले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी प्रदर्शनातील छायाचित्रे पाहताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित असलेले सर्वच नेते अजितदादांच्या आठवणींमध्ये रमले आणि अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • कल्याण ज्वेलर्सच्या बारामती येथील शोरूमच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री तब्बू बारामतीत आली आहे.
    1
    कल्याण ज्वेलर्सच्या बारामती येथील शोरूमच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री तब्बू बारामतीत आली आहे.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • महाराष्ट्रात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले असून, या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.
    1
    महाराष्ट्रात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले असून, या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.
    user_Digital media.
    Digital media.
    Photographer माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थी दिल्लीत जंतर-मंतरवर धडकले असून तेथे महाराष्ट्राचा आवाज जोरदारपणे घुमला आहे. हे सर्व विद्यार्थी जंतर-मंतर येथे वेगवेगळ्या घोषणा देत आहेत. या विद्यार्थ्यांच्या विविध घोषणांनी संपूर्ण जंतर-मंतर परिसर अक्षरशः दणाणून गेला आहे।
    1
    महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थी दिल्लीत जंतर-मंतरवर धडकले असून तेथे महाराष्ट्राचा आवाज जोरदारपणे घुमला आहे. हे सर्व विद्यार्थी जंतर-मंतर येथे वेगवेगळ्या घोषणा देत आहेत. या विद्यार्थ्यांच्या विविध घोषणांनी संपूर्ण जंतर-मंतर परिसर अक्षरशः दणाणून गेला आहे।
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. लोकशाही असलेल्या भारतात स्वतःची मागणी मांडता येत नाही का, असा संतप्त सवाल या कारवाईनंतर उपस्थित करण्यात आला आहे. देशात लाखो विद्यार्थ्यांचे पेपर लीक होत असून, २५ लाख विद्यार्थी वर्षानुवर्षे या परीक्षांची तयारी करत आहेत. सर्व परीक्षांचे पेपर खाजगी एजन्सीमार्फत तयार केले जात असल्यामुळे, १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात शिक्षक वर्ग आपल्या विद्यार्थ्यांसाठी पेपर काढण्यास सक्षम नाही का, असा प्रश्न विचारला गेला आहे. सध्या संपूर्ण देश खाजगी भांडवलदार संस्थांच्या हातात सोपवला जात असून खाजगीकरणामुळे सरकारी नोकऱ्या संपवल्या जात आहेत. पेपर लीकच्या चक्रात अडकल्यामुळे गरीब कुटुंबातील मुले वारंवार तयारी करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहत नाहीत, परीक्षा देण्यापूर्वीच ती कर्जात बुडतात आणि याच कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागत आहे. भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर सतत संघर्ष करावा लागेल आणि सरकारला शांततेच्या मार्गाने प्रश्न विचारत राहावे लागेल. आज ७५ वर्षांनंतर देश मानसिक गुलामगिरीकडे जात असून त्याला गुलाम बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. ऐतिहासिक दाखला देत म्हटले आहे की, १९८९ मध्ये चीनमध्ये लोकशाहीसाठी विद्यार्थ्यांनी ६ महिने आंदोलन केले, जे कम्युनिस्ट सरकारने चिरडून टाकले आणि तिथे एकपक्षीय सत्ता आणली. रशियातही अशीच परिस्थिती असून भारतातही त्याच धोरणाने काम सुरू आहे. भारतात 'एक देश एक निवडणूक' या माध्यमातून लहान प्रादेशिक पक्ष संपवून अमेरिकेप्रमाणे द्विपक्षीय धोरण आणले जाईल आणि देशावर भांडवलदारांचा पूर्ण ताबा प्रस्थापित होईल.
    1
    राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. लोकशाही असलेल्या भारतात स्वतःची मागणी मांडता येत नाही का, असा संतप्त सवाल या कारवाईनंतर उपस्थित करण्यात आला आहे.

देशात लाखो विद्यार्थ्यांचे पेपर लीक होत असून, २५ लाख विद्यार्थी वर्षानुवर्षे या परीक्षांची तयारी करत आहेत. सर्व परीक्षांचे पेपर खाजगी एजन्सीमार्फत तयार केले जात असल्यामुळे, १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात शिक्षक वर्ग आपल्या विद्यार्थ्यांसाठी पेपर काढण्यास सक्षम नाही का, असा प्रश्न विचारला गेला आहे. सध्या संपूर्ण देश खाजगी भांडवलदार संस्थांच्या हातात सोपवला जात असून खाजगीकरणामुळे सरकारी नोकऱ्या संपवल्या जात आहेत. पेपर लीकच्या चक्रात अडकल्यामुळे गरीब कुटुंबातील मुले वारंवार तयारी करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहत नाहीत, परीक्षा देण्यापूर्वीच ती कर्जात बुडतात आणि याच कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागत आहे.

भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर सतत संघर्ष करावा लागेल आणि सरकारला शांततेच्या मार्गाने प्रश्न विचारत राहावे लागेल. आज ७५ वर्षांनंतर देश मानसिक गुलामगिरीकडे जात असून त्याला गुलाम बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. ऐतिहासिक दाखला देत म्हटले आहे की, १९८९ मध्ये चीनमध्ये लोकशाहीसाठी विद्यार्थ्यांनी ६ महिने आंदोलन केले, जे कम्युनिस्ट सरकारने चिरडून टाकले आणि तिथे एकपक्षीय सत्ता आणली. रशियातही अशीच परिस्थिती असून भारतातही त्याच धोरणाने काम सुरू आहे. भारतात 'एक देश एक निवडणूक' या माध्यमातून लहान प्रादेशिक पक्ष संपवून अमेरिकेप्रमाणे द्विपक्षीय धोरण आणले जाईल आणि देशावर भांडवलदारांचा पूर्ण ताबा प्रस्थापित होईल.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    27 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.