*13 मार्च रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता वितरित प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीतील 22 वा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते दि. 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता ज्योती-बिष्णु आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र, खानापारा, गुवाहाटी (आसाम) येथून वितरित करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार मिळावा यासाठी फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य 2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाते. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत 21 हप्त्यांद्वारे सुमारे 39 हजार 300 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. सद्यस्थितीत भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँक खाते आधाराशी संलग्न करणे व ई-केवायसी प्रमाणिकरण या तीन अटी पूर्ण केलेल्या 91.19 लाख शेतकरी कुटुंबांना 13 मार्च रोजी सुमारे 1 हजार 837 कोटी रुपयांचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
*13 मार्च रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता वितरित प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीतील 22 वा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते दि. 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता ज्योती-बिष्णु आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र, खानापारा, गुवाहाटी (आसाम) येथून वितरित करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार मिळावा यासाठी फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य 2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाते. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत 21 हप्त्यांद्वारे सुमारे 39 हजार 300 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. सद्यस्थितीत भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँक खाते आधाराशी संलग्न करणे व ई-केवायसी प्रमाणिकरण या तीन अटी पूर्ण केलेल्या 91.19 लाख शेतकरी कुटुंबांना 13 मार्च रोजी सुमारे 1 हजार 837 कोटी रुपयांचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
- जय मल्हार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यापेक्षा मोठे आमच्यासाठी कोणीही नाही सर्व महापुरुष हे आमच्यासाठी आमचा मान अभिमान स्वाभिमान आणि सर्व काही आहेत आणि आज बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाची खाडाखोड होत असताना आम्ही शांत बसणार नाही अनेक समाज बांधव यांचे मला फोन आले आणि 16 तारखेच्या आंदोलनाला माझी भूमिका काय राहील हे विचारली त्यांना माझे मी मत सांगतोय की मी वैयक्तिक किंवा यशवंत संघर्ष सेना 16 तारखेला मुंबईला जाणार नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे एसटी आरक्षणाची लढाई लढत असताना हे जाणीवपूर्वक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो टाकत नाहीत, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधानामध्ये आरक्षण दिले आहे त्याच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावायला लाज वाटते उपकार विसरले छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावू शकत नाहीत स्व. बी. के. कोकरे साहेब यांना विसरले आपल्याच नेत्यांना शिव्या देणे सोशल मीडिया मध्ये काम करणाऱ्या बांधवाना शिव्या देणे फक्त स्वतःच्या स्टंटबाजीसाठी समाज बांधवांचा जीव धोक्यात घालून आपलाच फोटो टाकून मुंबईला चला आणि परत माघारी फिरा या भूमिकेमुळे1
- *धार रोड कचरा डेपोच्या जागेवर कचरा टाकने बंद करा धार रोड परिसरातील नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन*1
- ⚡ उपोषणाचा तिसरा दिवस… आणि मन हेलावून टाकणारा प्रसंग आज माझ्या उपोषण स्थळी एक ६५ वर्षांच्या आजी भेटायला आल्या. महावितरणकडून होत असलेल्या त्रासामुळे त्या अक्षरशः डोळ्यात पाणी आणून रडू लागल्या. सामान्य गोरगरीब नागरिकांना वीज बिल, कनेक्शन व इतर समस्यांमुळे किती हाल सहन करावे लागत आहेत, याचे हे जिवंत उदाहरण आहे. एमएसईबी महावितरणच्या प्रांगणातच एका वृद्ध मायेला अश्रू ढाळावे लागतात, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. जोपर्यंत गोरगरीब वीज ग्राहकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार. #Mahavitaran #Himayatnagar #Uposhan #ElectricityIssues #CommonPeople #JusticeForConsumers #NandedNews #MaharashtraNews #PublicVoice ⚡1
- Post by Nanded_71
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- Post by Ramesh Mulgir1
- शेतकरी संघर्ष यात्रा कळमनुरी ते हिंगोली या पद यात्रेत हर्ष वर्धन सपकाळ प्रदेश अध्यक्ष, लोहा ता अध्यक्ष मधुकर दिघे, लोहा ता. उपाध्यक्ष उत्तम महाबळे. या पद यात्रेत लोहा येथील कांग्रेस कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.1
- हिमायतनगर शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बांधलेल्या नालीला भगदाड पडल्याने ठेकेदाराकडून होत असलेल्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाला आहे. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून संबंधित ठेकेदाराने भगदाडावर मटेरियल टाकून घाईघाईत थातूरमातूर दुरुस्ती केल्याचा आरोप व्यापारी व नागरिकांनी केला आहे. स्थानिकांच्या मते, नाली बांधल्यानंतर मजबुतीसाठी नियमित पाणी टाकण्याची प्रक्रिया होत नसल्याने अनेक ठिकाणी तडे गेले असून तीन-चार ठिकाणी भगदाड पडले आहे. तसेच नालीवर टाकण्यात येणारे झाकणही फक्त दोन ते अडीच इंच जाडीचे असल्याने भविष्यात पहिल्याच पावसात नाली कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन दर्जेदार काम करून घ्यावे, अशी मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे. अन्यथा भविष्यात जनआक्रोश निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. #Himayatnagar #NandedNews #HighwayWork #PoorConstruction #PublicIssue #MaharashtraNews #DevelopmentWork #CitizenVoice 🚧1