logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

देगलूर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र बॅंकेसमोर दिव्यांगाना शंभर टक्के विमा द्या - उपोषण देगलूर तालुक्यातील हणेगाव सुभाषनगर (कामाजीवाडी) येथील एका दिव्यांग व्यक्तीने १०० टक्के अपंग विमा मंजुर करण्यात यावे. या मागणीसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा देगलूर बॅकेसमोर उद्धव काळे यांनी दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी पत्नी व लहान मुलांसह आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या भेटीसाठी व जाहीर पाठिंबा देण्यासाठी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने नांदेड उपजिल्हाप्रमुख महेश पाटील अल्लापुरकर, प्रहारचे तालुका प्रमुख दिपक रेड्डी, , मनसेचे अध्यक्ष मन्मथ परबते खानापूरकर, प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष हाणमंत कोकणे, शहापूरकर, प्रहार तालुका सचिव मधुकर पाटील वन्नाळीकर, मरतोळीचे सरपंच वैभव पाटील, भाजपचे प्रविण इनामदार, मुखेड भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नामदेव पाटील जाहुरकर, माधव शिंदे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

15 hrs ago
user_जयपाल दावनगीरकर
जयपाल दावनगीरकर
Social worker देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
15 hrs ago
427ba42e-311e-446b-9e79-d45edb1e6269

देगलूर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र बॅंकेसमोर दिव्यांगाना शंभर टक्के विमा द्या - उपोषण देगलूर तालुक्यातील हणेगाव सुभाषनगर (कामाजीवाडी) येथील एका दिव्यांग व्यक्तीने १०० टक्के अपंग विमा मंजुर करण्यात यावे. या मागणीसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा देगलूर बॅकेसमोर उद्धव काळे यांनी दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी पत्नी व लहान मुलांसह आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या भेटीसाठी व जाहीर पाठिंबा देण्यासाठी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने नांदेड उपजिल्हाप्रमुख महेश पाटील अल्लापुरकर, प्रहारचे तालुका प्रमुख दिपक रेड्डी, , मनसेचे अध्यक्ष मन्मथ परबते खानापूरकर, प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष हाणमंत कोकणे, शहापूरकर, प्रहार तालुका सचिव मधुकर पाटील वन्नाळीकर, मरतोळीचे सरपंच वैभव पाटील, भाजपचे प्रविण इनामदार, मुखेड भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नामदेव पाटील जाहुरकर, माधव शिंदे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुखेड येथे आयचर टेम्पोला अचानकणे आग लागून प्रचंड नुकसान; मुखेड अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे जिवितहाणी टळली. हैदराबादहून मुखेडकडे पाणीपुरवठ्याच्या कामाचे पाईप घेऊन येत असलेल्या आयचर क्रमांक एम.एच.२६ सी.एच.१५१८ या टेम्पोला भगनूर फाट्याजवळ मंगळवार दि.२४ ऑगष्ट २०२६ रोजी रात्री २:३० ते २:४५ च्या सुमारास  अचानकपणे आग लागून त्यामध्ये असलेले संपूर्ण पाईप व आयचर टेम्पोचे संपूर्ण नुकसान झाले मात्र अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. सदर गाडी ही मुखेडला रात्री उशिरा पोहोचली म्हणून टेम्पो गावाकडे नेवून थांबवण्यासाठी गावाकडे जात असताना  भगनूर फाट्याजवळ अचानकपणे आग लागली आणि आग लागल्यानंतर मुखेड नगर परिषद अग्निशमन विभागाचे प्रमुख बलभीम शेंडगे यांना दूरध्वनीवरून गाडी मालक सचिन बालाजी गवते यांचा फोन आला असता बलभीम शेंडगे यांनी तात्काळ आदेशित केल्याप्रमाणे अग्निशमन विभागाचे वाहन चालक अभिजित सोनकांबळे व फायरमॅन दत्ता गझलवाड यांनी रात्री ३ वाजता घटनास्थळी पोहोचून आग विझवली व पुन्हा सकाळी सुद्धा आगीने पेट घेतल्याचे गाडी मालक सचिन गवते यांनी फोनद्वारे कळविले असता विभागप्रमुख शेंडगे यांनी पुन्हा सकाळी सुद्धा वाहनचालक अभिजित सोनकांबळे व फायरमॅन दत्ता गझलवाड या दोघांना  घटनास्थळी पाठवून आग विझविण्यात यश मिळविले परंतू या आगीत सर्व पाईपसह आयचर टेम्पोही जळून प्रचंड आर्थिक नुकसान झाले परंतू अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही त्याबद्दल मुखेड नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    2
    मुखेड येथे आयचर टेम्पोला अचानकणे आग लागून प्रचंड नुकसान; मुखेड अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे जिवितहाणी टळली.
हैदराबादहून मुखेडकडे पाणीपुरवठ्याच्या कामाचे पाईप घेऊन येत असलेल्या आयचर क्रमांक एम.एच.२६ सी.एच.१५१८ या टेम्पोला भगनूर फाट्याजवळ मंगळवार दि.२४ ऑगष्ट २०२६ रोजी रात्री २:३० ते २:४५ च्या सुमारास  अचानकपणे आग लागून त्यामध्ये असलेले संपूर्ण पाईप व आयचर टेम्पोचे संपूर्ण नुकसान झाले मात्र अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
सदर गाडी ही मुखेडला रात्री उशिरा पोहोचली म्हणून टेम्पो गावाकडे नेवून थांबवण्यासाठी गावाकडे जात असताना  भगनूर फाट्याजवळ अचानकपणे आग लागली आणि आग लागल्यानंतर मुखेड नगर परिषद अग्निशमन विभागाचे प्रमुख बलभीम शेंडगे यांना दूरध्वनीवरून गाडी मालक सचिन बालाजी गवते यांचा फोन आला असता बलभीम शेंडगे यांनी तात्काळ आदेशित केल्याप्रमाणे अग्निशमन विभागाचे वाहन चालक अभिजित सोनकांबळे व फायरमॅन दत्ता गझलवाड यांनी रात्री ३ वाजता घटनास्थळी पोहोचून आग विझवली व पुन्हा सकाळी सुद्धा आगीने पेट घेतल्याचे गाडी मालक सचिन गवते यांनी फोनद्वारे कळविले असता विभागप्रमुख शेंडगे यांनी पुन्हा सकाळी सुद्धा वाहनचालक अभिजित सोनकांबळे व फायरमॅन दत्ता गझलवाड या दोघांना  घटनास्थळी पाठवून आग विझविण्यात यश मिळविले परंतू या आगीत सर्व पाईपसह आयचर टेम्पोही जळून प्रचंड आर्थिक नुकसान झाले परंतू अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही त्याबद्दल मुखेड नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    user_Milind Manohar Kamble
    Milind Manohar Kamble
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • दुचाकी स्वरांनी हेल्मेट वापरण्याच्या संदर्भामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्याचे आवाहन अन्न... वस्त्र... निवारा... आणि हेल्मेट! हेल्मेट ही आता काळाची गरज; स्वतःसह कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरण्याचे लातूर पोलिसांचे आवाहन. लातूर (प्रतिनिधी) मानवाच्या जीवनातील अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा मानल्या जातात. मात्र काळ बदलला, जीवनशैली बदलली आणि वाहतुकीचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात बदलले. आजच्या वेगवान युगात रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या आणि त्यासोबत वाढणारे अपघात पाहता ‘हेल्मेट’ हीदेखील जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी काळाची अत्यावश्यक गरज बनली आहे. लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे यामुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे. या अपघातांमध्ये अनेक कुटुंबांतील कर्ते व्यक्ती आपला जीव गमावत आहेत, तर अनेक जण गंभीर जखमी होऊन कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे जात आहेत. त्यामुळे रस्ता सुरक्षा हा केवळ वाहतूक विभागाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी आणि संपूर्ण कुटुंबाच्या भवितव्याशी निगडित सामाजिक प्रश्न आहे. *हेल्मेट दंडापासून बचावासाठी नव्हे, तर जीव वाचविण्यासाठी!* दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट म्हणजे केवळ वाहतूक नियमांचे पालन करण्याची वस्तू नाही, तर अपघाताच्या वेळी डोक्याचे संरक्षण करणारे अत्यंत महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे. अपघात कोणाला आणि कधी होईल, हे सांगता येत नाही. मात्र अपघाताच्या वेळी योग्य दर्जाचे हेल्मेट वापरलेले असल्यास डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीचा धोका कमी करण्यास मोठी मदत होते.त्यामुळे ‘पोलीस कारवाई होईल म्हणून हेल्मेट घालायचे’ हा दृष्टिकोन बदलून ‘माझे जीवन आणि माझ्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्मेट घालायचे’ हा सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वीकारणे आवश्यक आहे. *१ सप्टेंबरपासून हेल्मेट वापर अनिवार्य.* लातूर जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दिनांक १ सप्टेंबर २०२६ पासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.हा निर्णय नागरिकांवर बंधन लादण्यासाठी नसून नागरिकांचे प्राण वाचविणे आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करणे या व्यापक उद्देशाने घेण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी या निर्णयाकडे केवळ नियम किंवा कारवाईच्या दृष्टिकोनातून न पाहता, स्वतःच्या सुरक्षिततेसाठीची सामाजिक जबाबदारी म्हणून पाहावे, असे आवाहन लातूर पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे. *समाजाभिमुख पोलीसिंगचा केंद्रबिंदू — नागरिकांची सुरक्षितता.* पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या दूरदृष्टीतून लातूर पोलीस दलाकडून कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच ‘समाजाभिमुख पोलीसिंग’ या संकल्पनेला प्राधान्य देण्यात येत आहे. पोलिसांचे काम केवळ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे एवढ्यापुरते मर्यादित नसून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, अपघातांना प्रतिबंध करणे आणि नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे हेदेखील पोलिसांचे महत्त्वाचे सामाजिक दायित्व आहे.याच भावनेतून हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनीही पोलिसांच्या या प्रयत्नांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. *‘मी हेल्मेट वापरेन’... एवढाच संकल्प पुरेसा नाही!* प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वतः हेल्मेट वापरण्याबरोबरच आपल्या घरातील प्रत्येक दुचाकीस्वाराला हेल्मेट वापरण्यासाठी प्रोत्साहित करावे. पालकांनी आपल्या मुलांना हेल्मेटचे महत्त्व समजावून सांगावे. मित्रांनी मित्राला, सहकाऱ्याने सहकाऱ्याला आणि प्रत्येक नागरिकाने आपल्या परिचितांना हेल्मेट वापरण्यासाठी प्रवृत्त करावे. लातूर पोलीस दलाचे आवाहन आहे की, १ सप्टेंबरपासून हेल्मेट वापरण्याची सक्ती लागू होण्याची वाट न पाहता आजपासूनच हेल्मेट वापरण्याची सवय लावा. स्वतः हेल्मेट वापरा, आपल्या कुटुंबीयांना हेल्मेट वापरायला सांगा आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करा. चला... नियमांसाठी नव्हे, तर आपल्या जीवनासाठी हेल्मेट वापरूया! चला... सुरक्षित प्रवासाची संस्कृती निर्माण करूया! चला... अपघातमुक्त आणि सुरक्षित लातूरसाठी हातात हात घालूया!
    1
    दुचाकी स्वरांनी हेल्मेट वापरण्याच्या संदर्भामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्याचे आवाहन
अन्न... वस्त्र... निवारा... आणि हेल्मेट!
हेल्मेट ही आता काळाची गरज; स्वतःसह कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरण्याचे लातूर पोलिसांचे आवाहन.
लातूर (प्रतिनिधी)     मानवाच्या जीवनातील अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा मानल्या जातात. मात्र काळ बदलला, जीवनशैली बदलली आणि वाहतुकीचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात बदलले. आजच्या वेगवान युगात रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या आणि त्यासोबत वाढणारे अपघात पाहता ‘हेल्मेट’ हीदेखील जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी काळाची अत्यावश्यक गरज बनली आहे.
लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे यामुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे. या अपघातांमध्ये अनेक कुटुंबांतील कर्ते व्यक्ती आपला जीव गमावत आहेत, तर अनेक जण गंभीर जखमी होऊन कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे जात आहेत. त्यामुळे रस्ता सुरक्षा हा केवळ वाहतूक विभागाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी आणि संपूर्ण कुटुंबाच्या भवितव्याशी निगडित सामाजिक प्रश्न आहे.
*हेल्मेट दंडापासून बचावासाठी नव्हे, तर जीव वाचविण्यासाठी!*
दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट म्हणजे केवळ वाहतूक नियमांचे पालन करण्याची वस्तू नाही, तर अपघाताच्या वेळी डोक्याचे संरक्षण करणारे अत्यंत महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे. अपघात कोणाला आणि कधी होईल, हे सांगता येत नाही. मात्र अपघाताच्या वेळी योग्य दर्जाचे हेल्मेट वापरलेले असल्यास डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीचा धोका कमी करण्यास मोठी मदत होते.त्यामुळे ‘पोलीस कारवाई होईल म्हणून हेल्मेट घालायचे’ हा दृष्टिकोन बदलून ‘माझे जीवन आणि माझ्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्मेट घालायचे’ हा सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वीकारणे आवश्यक आहे.
*१ सप्टेंबरपासून हेल्मेट वापर अनिवार्य.*
लातूर जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दिनांक १ सप्टेंबर २०२६ पासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.हा निर्णय नागरिकांवर बंधन लादण्यासाठी नसून नागरिकांचे प्राण वाचविणे आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करणे या व्यापक उद्देशाने घेण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी या निर्णयाकडे केवळ नियम किंवा कारवाईच्या दृष्टिकोनातून न पाहता, स्वतःच्या सुरक्षिततेसाठीची सामाजिक जबाबदारी म्हणून पाहावे, असे आवाहन लातूर पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
*समाजाभिमुख पोलीसिंगचा केंद्रबिंदू — नागरिकांची सुरक्षितता.*
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या दूरदृष्टीतून लातूर पोलीस दलाकडून कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच ‘समाजाभिमुख पोलीसिंग’ या संकल्पनेला प्राधान्य देण्यात येत आहे. पोलिसांचे काम केवळ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे एवढ्यापुरते मर्यादित नसून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, अपघातांना प्रतिबंध करणे आणि नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे हेदेखील पोलिसांचे महत्त्वाचे सामाजिक दायित्व आहे.याच भावनेतून हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनीही पोलिसांच्या या प्रयत्नांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
*‘मी हेल्मेट वापरेन’... एवढाच संकल्प पुरेसा नाही!*
प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वतः हेल्मेट वापरण्याबरोबरच आपल्या घरातील प्रत्येक दुचाकीस्वाराला हेल्मेट वापरण्यासाठी प्रोत्साहित करावे. पालकांनी आपल्या मुलांना हेल्मेटचे महत्त्व समजावून सांगावे. मित्रांनी मित्राला, सहकाऱ्याने सहकाऱ्याला आणि प्रत्येक नागरिकाने आपल्या परिचितांना हेल्मेट वापरण्यासाठी प्रवृत्त करावे.
लातूर पोलीस दलाचे आवाहन आहे की, १ सप्टेंबरपासून हेल्मेट वापरण्याची सक्ती लागू होण्याची वाट न पाहता आजपासूनच हेल्मेट वापरण्याची सवय लावा. स्वतः हेल्मेट वापरा, आपल्या कुटुंबीयांना हेल्मेट वापरायला सांगा आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करा.
चला... नियमांसाठी नव्हे, तर आपल्या जीवनासाठी हेल्मेट वापरूया!
चला... सुरक्षित प्रवासाची संस्कृती निर्माण करूया!
चला... अपघातमुक्त आणि सुरक्षित लातूरसाठी हातात हात घालूया!
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मी बालाजी अर्जुन शिंदे व माझे पाहुणे गजानन रत्नाकर नळगे, दोघे मिळून दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०० वाजता लोहा तहसील कार्यालयात ७/१२ उताऱ्यावरील २ आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित महसूल शाखेत गेलो होतो. सदर बाबत आम्ही शाखा क्र. १ चे अव्वल कारकून श्री. अजित केदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हाला योग्य माहिती न देता, "हे आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही तहसीलदारांना जाऊन विचारा," अशा प्रकारे उत्तर दिले. तसेच सदर विषय शाखा क्र. १ शी संबंधित असतानाही आम्हाला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार महसूल शाखा क्र. १ श्री. राजेश पाठक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही आमच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलून, "मी इथलाच आहे, तुझ्याने काय करायचे ते कर," अशा प्रकारे धमकी दिली. तसेच सदर प्रसंगी आम्हाला शर्टाला धरून तहसील कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. शासकीय कार्यालयात आमच्यासोबत अशा प्रकारे वर्तन करून आम्हाला धमकावणे व अपमानित करणे हा गंभीर प्रकार आहे. सदर घटनेच्या वेळी तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यास, त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झालेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजताच्या सुमाराचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सुरक्षित ठेवून तपासण्यात यावे. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचे जबाब नोंदवावेत.
    1
    मी बालाजी अर्जुन शिंदे व माझे पाहुणे गजानन रत्नाकर नळगे, दोघे मिळून दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०० वाजता लोहा तहसील कार्यालयात ७/१२ उताऱ्यावरील २ आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित महसूल शाखेत गेलो होतो. सदर बाबत आम्ही शाखा क्र. १ चे अव्वल कारकून श्री. अजित केदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हाला योग्य माहिती न देता, "हे आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही तहसीलदारांना जाऊन विचारा," अशा प्रकारे उत्तर दिले.

तसेच सदर विषय शाखा क्र. १ शी संबंधित असतानाही आम्हाला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार महसूल शाखा क्र. १ श्री. राजेश पाठक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही आमच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलून, "मी इथलाच आहे, तुझ्याने काय करायचे ते कर," अशा प्रकारे धमकी दिली. तसेच सदर प्रसंगी आम्हाला शर्टाला धरून तहसील कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. शासकीय कार्यालयात आमच्यासोबत अशा प्रकारे वर्तन करून आम्हाला धमकावणे व अपमानित करणे हा गंभीर प्रकार आहे.

सदर घटनेच्या वेळी तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यास, त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झालेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजताच्या सुमाराचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सुरक्षित ठेवून तपासण्यात यावे. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचे जबाब नोंदवावेत.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • 🚨 नांदेडच्या वसरणीत ५ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात! 📍नांदेडच्या वसरणी परिसरात ५ किलो ५० ग्रॅम गांजासह दोघांना अटक करण्यात आली. कारवाईत गांजा आणि मोटारसायकल असा ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, गांजा लातूर येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedCrime #NandedNews #NandedPolice #NandedUpdates #Ganja #DrugCrime #NDPS #MaharashtraNews #NandigramTimes
    1
    🚨 नांदेडच्या वसरणीत ५ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात!

📍नांदेडच्या वसरणी परिसरात ५ किलो ५० ग्रॅम गांजासह दोघांना अटक करण्यात आली. कारवाईत गांजा आणि मोटारसायकल असा ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, गांजा लातूर येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा!
#NandedCrime #NandedNews #NandedPolice #NandedUpdates #Ganja #DrugCrime #NDPS #MaharashtraNews #NandigramTimes
    user_Shaikh Jahur Dudhadkar
    Shaikh Jahur Dudhadkar
    Newspaper publisher Nanded, Maharashtra•
    18 hrs ago
  • 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट
    1
    🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!”
 शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू,
📍 वसमत, जि. हिंगोली
शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली—
🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!”
असा स्पष्ट इशारा!
✊ जमीन आमची — निर्णय आमचा!
🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द!
#शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट
    user_Ramprasad Magar news reporter
    Ramprasad Magar news reporter
    Local News Reporter बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन. निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026. स्वच्छता निरीक्षकांच्या नियुक्ती, पदोन्नती व सेवा नियमांमधील चौकशीबाबत दिलेल्या निवेदनावर महिनाभर उलटूनही प्रशासनाने लेखी उत्तर न दिल्याने, रिपब्लिकन सेनेने आज लातूर महानगरपालिकेत अनोखे 'गांधीगिरी' आंदोलन केले. निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आस्थापना प्रमुख अभिमन्यू पाटील यांना थेट पुष्पहार घालून प्रशासनाच्या संथ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. रिपब्लिकन सेनेने ३० जुलै २०२६ रोजी प्रशासनाला हे निवेदन दिले होते. परंतु, महिनाभराचा कालावधी उलटूनही महापालिकेकडून कोणतेही लेखी स्पष्टीकरण न मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या व संघटनांच्या निवेदनांना प्रशासनाने वेळेत उत्तर देणे बंधनकारक असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे लातूर जिल्हाध्यक्ष रामभाऊ कोरडे, युवक जिल्हाध्यक्ष पंकज गायकवाड, शहराध्यक्ष वैभव सुरवसे, शहर सचिव लखनजी कांबळे, सिद्धार्थ जाकते, अमित गायकवाड आणि सल्लागार पप्पूजी कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या निवेदनावर तात्काळ नियमानुसार कार्यवाही न झाल्यास येणाऱ्या काळात अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
    1
    निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन.
निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026. 
स्वच्छता निरीक्षकांच्या नियुक्ती, पदोन्नती व सेवा नियमांमधील चौकशीबाबत दिलेल्या निवेदनावर महिनाभर उलटूनही प्रशासनाने लेखी उत्तर न दिल्याने, रिपब्लिकन सेनेने आज लातूर महानगरपालिकेत अनोखे 'गांधीगिरी' आंदोलन केले. निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आस्थापना प्रमुख अभिमन्यू पाटील यांना थेट पुष्पहार घालून प्रशासनाच्या संथ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.
रिपब्लिकन सेनेने ३० जुलै २०२६ रोजी प्रशासनाला हे निवेदन दिले होते. परंतु, महिनाभराचा कालावधी उलटूनही महापालिकेकडून कोणतेही लेखी स्पष्टीकरण न मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या व संघटनांच्या निवेदनांना प्रशासनाने वेळेत उत्तर देणे बंधनकारक असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे लातूर जिल्हाध्यक्ष रामभाऊ कोरडे, युवक जिल्हाध्यक्ष पंकज गायकवाड, शहराध्यक्ष वैभव सुरवसे, शहर सचिव लखनजी कांबळे, सिद्धार्थ जाकते, अमित गायकवाड आणि सल्लागार पप्पूजी कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या निवेदनावर तात्काळ नियमानुसार कार्यवाही न झाल्यास येणाऱ्या काळात अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • रस्त्यावरच महिलेची प्रसूती जिल्हा रुग्णालय स्टाफ नर्सचा प्रसुती साठी नकार बुलढाणा मेहकर ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० ते १०० मीटर अंतरावरच एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला प्रसूतीच्या वेदनांनी रस्त्यावर तडफडत असताना ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्सने मदतीसाठी घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप होत आहे. शेवटी एका खाजगी नर्सच्या मदतीने रस्त्यावर या महिलेची सुखरुप प्रसुती करण्यात आली.आज सकाळी सहा वाजता अचानक प्रसव वेदना सुरु झाल्या. त्या महिलेचे पोट दुखू लागल्याने आणि महिलेला रुग्णालयात नेण्याकरिता घरात कोणीच नव्हते आणि महिला जेव्हा चालत आली तेव्हा ती ओट्यावर पडली. अर्भकाचा काही भाग बाहेर आणि काही भाग आत होता.
    1
    रस्त्यावरच महिलेची प्रसूती जिल्हा रुग्णालय स्टाफ नर्सचा प्रसुती साठी नकार 
बुलढाणा मेहकर ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० ते १०० मीटर अंतरावरच एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला प्रसूतीच्या वेदनांनी रस्त्यावर तडफडत असताना ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्सने मदतीसाठी घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप होत आहे. शेवटी एका खाजगी नर्सच्या मदतीने रस्त्यावर या महिलेची सुखरुप प्रसुती करण्यात आली.आज सकाळी सहा वाजता अचानक प्रसव वेदना सुरु झाल्या. त्या महिलेचे पोट दुखू लागल्याने आणि महिलेला रुग्णालयात नेण्याकरिता घरात कोणीच नव्हते आणि महिला जेव्हा चालत आली तेव्हा ती ओट्यावर पडली. अर्भकाचा काही भाग बाहेर आणि काही भाग आत होता.
    user_Santosh Dhanure S D news
    Santosh Dhanure S D news
    लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • मोटरसायकली चोरून भंगार करायचा, भंगाराचे साहित्य विकून पैसे कमवायचे मोटारसायकल चोरीचा छडा; चोरीच्या दुचाकींची तोडफोड करून भंगारात विक्री करणारा आरोपी जेरबंद. १२ गुन्हे उघडकीस लातूर (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोटारसायकल चोरी करून त्यांची तोडफोड करत सुट्टे पार्ट करून भंगारात विक्री करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून चोरीच्या दोन मोटारसायकली, मोटार सायकलीचे सुट्टे पार्ट, नंबर प्लेट, विक्रीतून मिळालेली रोकड तसेच मोटारसायकली तोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण २ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी पथकाने हत्ते नगर परिसरातील एका घरावर कारवाई केली. तेथे तौसिफ बादल शेख (वय २६ वर्षे, रा. इस्लामपूरा, लातूर. सध्या राहणार हत्ते नगर गल्ली नंबर ५, लातूर) हा चोरीच्या मोटारसायकलींची तोडफोड करून त्यांचे सुट्टे पार्ट तयार करून फिरस्ती भंगारवाल्यांना विक्री करत असल्याचे आढळून आले. आरोपीच्या ताब्यातून विविध मोटार सायकलींचे सुट्टे पार्ट, नंबर प्लेट तसेच चोरीच्या दोन मोटरसायकल, मोटार सायकलींचे पार्ट विक्री करून मिळालेली २ लाख ५७ हजारांची रोकड, मोटारसायकली तोडण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात आरोपीने लातूर शहरातील गांधी चौक, शिवाजीनगर, लातूर ग्रामीण तसेच चाकूर व कासारशिरसी परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गांधी चौक पोलीस ठाण्याचे ८, शिवाजीनगरचे १, लातूर ग्रामीणचे १, चाकूरचे १ आणि कासारशिरसीचे १, असे एकूण १२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त मुद्देमालामध्ये होंडा युनिकॉर्न, हिरो स्प्लेंडर, होंडा शाईन, हिरो पॅशन, बजाज पल्सर, हिरो पॅशन प्रो, हिरो एचएफ डिलक्स आदी मोटारसायकलींचे सुट्टे पार्ट, पेट्रोल टाक्या, सायलेन्सर, हँडल, चाके, इंजिनचे भाग, चेसिस, नंबर प्लेट तसेच करवत, नट-बोल्ट, पाना, स्क्रुड्रायव्हर, हातोडी, छन्नी, पक्कड आदी साहित्याचा समावेश आहे. सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि पांडुरंग माने, पोलीस अंमलदार नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे, तुराबखान पठाण, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, प्रदीप स्वामी, गणेश साठे, पाराजी पुट्टेवाड, प्रेम राठोड, शैलेष सुडे, श्रीनिवास जांभळे, हरी पतंगे, रामदास बाचीफळे यांनी केले आहे. आरोपी तौसिफ बादल शेख यास पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीसाठी गांधी चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याकडून आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस तपास सुरू आहे.
    1
    मोटरसायकली चोरून भंगार करायचा, भंगाराचे साहित्य विकून पैसे कमवायचे
मोटारसायकल चोरीचा छडा; चोरीच्या दुचाकींची तोडफोड करून भंगारात विक्री करणारा आरोपी जेरबंद.  १२ गुन्हे उघडकीस
लातूर  (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोटारसायकल चोरी करून त्यांची तोडफोड करत सुट्टे पार्ट करून भंगारात विक्री करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून चोरीच्या दोन मोटारसायकली, मोटार सायकलीचे सुट्टे पार्ट, नंबर प्लेट, विक्रीतून मिळालेली रोकड तसेच मोटारसायकली तोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण २ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी पथकाने हत्ते नगर परिसरातील एका घरावर कारवाई केली. तेथे तौसिफ बादल शेख (वय २६ वर्षे, रा. इस्लामपूरा, लातूर. सध्या राहणार हत्ते नगर गल्ली नंबर ५, लातूर) हा चोरीच्या मोटारसायकलींची तोडफोड करून त्यांचे सुट्टे पार्ट तयार करून फिरस्ती भंगारवाल्यांना विक्री करत असल्याचे आढळून आले. आरोपीच्या ताब्यातून विविध मोटार सायकलींचे सुट्टे पार्ट, नंबर प्लेट तसेच चोरीच्या दोन मोटरसायकल, मोटार सायकलींचे पार्ट विक्री करून मिळालेली २ लाख ५७ हजारांची रोकड, मोटारसायकली तोडण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात आरोपीने लातूर शहरातील गांधी चौक, शिवाजीनगर, लातूर ग्रामीण तसेच चाकूर व कासारशिरसी परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गांधी चौक पोलीस ठाण्याचे ८, शिवाजीनगरचे १, लातूर ग्रामीणचे १, चाकूरचे १ आणि कासारशिरसीचे १, असे एकूण १२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
जप्त मुद्देमालामध्ये होंडा युनिकॉर्न, हिरो स्प्लेंडर, होंडा शाईन, हिरो पॅशन, बजाज पल्सर, हिरो पॅशन प्रो, हिरो एचएफ डिलक्स आदी मोटारसायकलींचे सुट्टे पार्ट, पेट्रोल टाक्या, सायलेन्सर, हँडल, चाके, इंजिनचे भाग, चेसिस, नंबर प्लेट तसेच करवत, नट-बोल्ट, पाना, स्क्रुड्रायव्हर, हातोडी, छन्नी, पक्कड आदी साहित्याचा समावेश आहे.
सदर कारवाई  वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि पांडुरंग माने,  पोलीस अंमलदार नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे, तुराबखान पठाण, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, प्रदीप स्वामी, गणेश साठे, पाराजी पुट्टेवाड, प्रेम राठोड, शैलेष सुडे, श्रीनिवास जांभळे, हरी पतंगे, रामदास बाचीफळे यांनी केले आहे. 
आरोपी तौसिफ बादल शेख यास पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीसाठी गांधी चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याकडून आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस तपास सुरू आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.