डोंबिवली शहरात वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर डोंबिवली वाहतूक शाखेने धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विजय अहिरे साहेब आणि त्यांच्यासोबत कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कसुरदार स्कूल बस चालक, मोटारसायकल, कार आणि रिक्षा चालकांवर विविध कलमांन्वये ही कारवाई केली आहे. विशेषतः डोंबिवलीतील प्रख्यात ओंकार स्कूल, रॉयल स्कूल आणि साऊथ स्कूल या शाळांच्या वाहनचालकांनी युनिफॉर्म न घालता, सीट बेल्ट न वापरता, परवाना (लायसेन्स) जवळ न बाळगता बेफिक्रपणे वाहने चालवून कायद्याचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी वाहतूक शाखेने ठोस कारवाई केलीच आहे, पण या मनमानी करणाऱ्या वाहनचालकांवर संबंधित शाळांच्या कर्मचाऱ्यांनी आणि प्रशासनानेही कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
डोंबिवली शहरात वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर डोंबिवली वाहतूक शाखेने धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विजय अहिरे साहेब आणि त्यांच्यासोबत कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कसुरदार स्कूल बस चालक, मोटारसायकल, कार आणि रिक्षा चालकांवर विविध कलमांन्वये ही कारवाई
केली आहे. विशेषतः डोंबिवलीतील प्रख्यात ओंकार स्कूल, रॉयल स्कूल आणि साऊथ स्कूल या शाळांच्या वाहनचालकांनी युनिफॉर्म न घालता, सीट बेल्ट न वापरता, परवाना (लायसेन्स) जवळ न बाळगता बेफिक्रपणे वाहने चालवून कायद्याचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी वाहतूक शाखेने ठोस कारवाई केलीच आहे, पण या मनमानी करणाऱ्या वाहनचालकांवर संबंधित शाळांच्या कर्मचाऱ्यांनी आणि प्रशासनानेही कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
- डोंबिवली शहरात वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर डोंबिवली वाहतूक शाखेने धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विजय अहिरे साहेब आणि त्यांच्यासोबत कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कसुरदार स्कूल बस चालक, मोटारसायकल, कार आणि रिक्षा चालकांवर विविध कलमांन्वये ही कारवाई केली आहे. विशेषतः डोंबिवलीतील प्रख्यात ओंकार स्कूल, रॉयल स्कूल आणि साऊथ स्कूल या शाळांच्या वाहनचालकांनी युनिफॉर्म न घालता, सीट बेल्ट न वापरता, परवाना (लायसेन्स) जवळ न बाळगता बेफिक्रपणे वाहने चालवून कायद्याचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी वाहतूक शाखेने ठोस कारवाई केलीच आहे, पण या मनमानी करणाऱ्या वाहनचालकांवर संबंधित शाळांच्या कर्मचाऱ्यांनी आणि प्रशासनानेही कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.2
- दिल्लीमध्ये नीट परीक्षेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांनी शांततापूर्ण निदर्शने केली. आलापल्ली येथील वीर बाबूराव शेडमाके मुख्य चौकात मोठ्या संख्येने एकत्र येत प्रदर्शनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. मुख्य चौकात काही वेळ निदर्शने केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत रॅली काढली. केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांमुळे विद्यार्थी आणि सामान्य जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेल्या मुद्द्यांवर सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. निदर्शनानंतर शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी/ठाणेदारांमार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा न दिल्यास आणि योग्य पावले न उचलल्यास येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता आणि हे आंदोलन शांततेत पार पडले.1
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे पोहोचून आंदोलक अभिजीत दीपके यांची भेट घेतली आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. या भेटीदरम्यान त्यांनी आंदोलनाच्या मागण्यांवर चर्चा करत सर्व प्रदर्शनकर्त्यांसोबत आपली एकजुटता दर्शवली. या भेटीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला आवाहन केले की, सरकारने विद्यार्थी आणि तरुणांचा आवाज ऐकावा तसेच त्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करावा.1
- ठाण्याच्या मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या बाहेर उघडपणे गुटख्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. स्टेशन परिसरात सर्रासपणे गुटखा विक्रीचा व्यवसाय चालवला जात असून यावर आता प्रशासन आणि संबंधित यंत्रणेकडून कडक कारवाई केली जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.1
- कर्जत येथील नेरळ एमएसईबीची (MSEB) परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. नेरळ एमएसईबीच्या कनिष्ठ अभियंत्याच्या भीषण निष्काळजीपणामुळे परिसरात रोज ५ ते ६ तास वीज गायब राहत असून संपूर्ण वीज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. या सततच्या आणि मोठ्या वीज खंडामुळे स्थानिक नागरिक प्रचंड हैराण झाले असून परिसरात त्राहीमाम उडाला आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे आणि अभियंत्याच्या व्यापक हलगर्जीपणामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.1
- दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या घटनेचे उल्हासनगरात तीव्र पडसाद उमटले असून या कारवाईचा जोरदार निषेध करण्यात आला आहे. या घटनेच्या विरोधात प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि पोलिसांना निवेदन देऊन आपला तीव्र रोष व्यक्त करण्यात आला आहे.1