logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे बाणगंगा नदीला पूर आल्यामुळे नाशिक एअरपोर्टकडे जाणारा रस्ता सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. जानोरी ते दहावा मैल, ओझर, एअर फोर्स मार्गे प्रभुधाम मंदिर आणि तेथून जानोरी व एअरपोर्टकडे येणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी रोखण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापासून दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून परिसरातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे नदीच्या पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुराची ही स्थिती पाहता नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन तहसीलदार कांबळे यांनी केले आहे.

3 hrs ago
user_आई सत्पशृंगी
आई सत्पशृंगी
Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
3 hrs ago

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे बाणगंगा नदीला पूर आल्यामुळे नाशिक एअरपोर्टकडे जाणारा रस्ता सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. जानोरी ते दहावा मैल, ओझर, एअर फोर्स मार्गे प्रभुधाम मंदिर आणि तेथून जानोरी व एअरपोर्टकडे येणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी रोखण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापासून दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून परिसरातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे नदीच्या पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुराची ही स्थिती पाहता नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन तहसीलदार कांबळे यांनी केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या बातमीचे वृत्त धडकताच येवला शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवाची सुरुवात विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. चौफुलीवर भव्य फटाक्यांची आतिशबाजी करत शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, शहरप्रमुख लक्ष्मण गवळी, तालुकाप्रमुख छगनराव आहेर, युवा सेना तालुकाप्रमुख संतोष गोरे आणि शहरप्रमुख गणेश वडनेरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
    1
    नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या बातमीचे वृत्त धडकताच येवला शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या आनंदोत्सवाची सुरुवात विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. चौफुलीवर भव्य फटाक्यांची आतिशबाजी करत शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला.

या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, शहरप्रमुख लक्ष्मण गवळी, तालुकाप्रमुख छगनराव आहेर, युवा सेना तालुकाप्रमुख संतोष गोरे आणि शहरप्रमुख गणेश वडनेरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मालेगाव शहरातील जुना आग्रा रोडवर एकरा टूल्स या दुकानासमोर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाली असून तेथे गळती सुरू झाली आहे. सध्या या लिकेजचे प्रमाण कमी असले तरी ते कधीही वाढण्याची शक्यता आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी बुधवार २९ जुलै, गुरुवार ३० जुलै व शुक्रवार ३१ जुलै अशा तीन दिवसांचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे. शटडाऊनचे सुधारित वेळापत्रक नियोजन करून जाहीर केले जाईल. जलवाहिनी दुरुस्तीचे हे ठिकाण अत्यंत रहदारीचे आणि वर्दळीचे असल्याने कामात येणाऱ्या अडचणींमुळे दुरुस्तीसाठी अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बुधवार २९ जुलै ते शुक्रवार ३१ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत मालेगाव शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
    1
    मालेगाव शहरातील जुना आग्रा रोडवर एकरा टूल्स या दुकानासमोर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाली असून तेथे गळती सुरू झाली आहे. सध्या या लिकेजचे प्रमाण कमी असले तरी ते कधीही वाढण्याची शक्यता आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी बुधवार २९ जुलै, गुरुवार ३० जुलै व शुक्रवार ३१ जुलै अशा तीन दिवसांचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे. शटडाऊनचे सुधारित वेळापत्रक नियोजन करून जाहीर केले जाईल.

जलवाहिनी दुरुस्तीचे हे ठिकाण अत्यंत रहदारीचे आणि वर्दळीचे असल्याने कामात येणाऱ्या अडचणींमुळे दुरुस्तीसाठी अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बुधवार २९ जुलै ते शुक्रवार ३१ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत मालेगाव शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता 'टोलकरी' नितीन गडकरी यांनीही तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. देशात इथेनॉलच्या अनुषंगाने एक मोठे कांड झाले असून हे कांड करणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून मोदी सरकारमधीलच एक मंत्री असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. सर्वसामान्यांच्या वाहनांमध्ये इथेनॉलयुक्त डिझेल आणि पेट्रोल दिल्यामुळे एका बाजूला गाड्यांची पूर्ण वाट लागली असून वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला इथेनॉलची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी यातून वारेमाप पैसा कमावला आहे. हा एकीकडे भ्रष्टाचार आहे, तर दुसरीकडे नागरिकांना छळण्याचाच प्रकार आहे. या इथेनॉल घोटाळ्यामुळे गेल्या दिवसांत ज्या तमाम वाहनधारकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर क्षती झाली आहे, अशा सर्वांची मोदी यांनी माफी मागावी आणि नितीन गडकरी यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा येथे केली.
    1
    नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता 'टोलकरी' नितीन गडकरी यांनीही तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. देशात इथेनॉलच्या अनुषंगाने एक मोठे कांड झाले असून हे कांड करणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून मोदी सरकारमधीलच एक मंत्री असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.

सर्वसामान्यांच्या वाहनांमध्ये इथेनॉलयुक्त डिझेल आणि पेट्रोल दिल्यामुळे एका बाजूला गाड्यांची पूर्ण वाट लागली असून वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला इथेनॉलची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी यातून वारेमाप पैसा कमावला आहे. हा एकीकडे भ्रष्टाचार आहे, तर दुसरीकडे नागरिकांना छळण्याचाच प्रकार आहे.

या इथेनॉल घोटाळ्यामुळे गेल्या दिवसांत ज्या तमाम वाहनधारकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर क्षती झाली आहे, अशा सर्वांची मोदी यांनी माफी मागावी आणि नितीन गडकरी यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा येथे केली.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंच्या पाठिंब्यामुळे तरुणाई मोठ्या संख्येने एकत्र आली. या वेळी हातात तिरंगा फडकावत तरुणांनी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. या प्रसंगी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला. "जुलमी हुकूमशाहीला जनतेने नमवले," असे वक्तव्य करत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
    3
    शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंच्या पाठिंब्यामुळे तरुणाई मोठ्या संख्येने एकत्र आली. या वेळी हातात तिरंगा फडकावत तरुणांनी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला.

या प्रसंगी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला. "जुलमी हुकूमशाहीला जनतेने नमवले," असे वक्तव्य करत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
    user_बेधडक बातमी
    बेधडक बातमी
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर धुळे शहरात ६०० मीटर लांबीची भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून या विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
    1
    केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर धुळे शहरात ६०० मीटर लांबीची भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून या विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील सराड परिसरात २५ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजेच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. नाशिकचे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संखे, तहसीलदार रामजी राठोड आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रभावित भागांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम सराड गावात भेट देऊन जीवित अथवा वित्तहानीची माहिती घेतली आणि सर्व संबंधित यंत्रणांना आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या. प्रशासकीय दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांनी हतगडजवळील गायदरपाडा येथील अंगणवाडी व शाळेला भेट देऊन इमारतीची सुरक्षितता, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय आणि पोषण आहाराच्या व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर गारमाळ येथे एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडल्याने पीडित कुटुंबाची भेट घेऊन नुकसानाची पाहणी केली. महसूल अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून नियमानुसार मदत देण्याचे निर्देश देण्यात आले असून, नागरिकांना धोकादायक इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर देवलदरी येथे तालुका कृषी विभागाच्या 'खत वितरण बांधावर' या उपक्रमात जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी स्वतः पारंपरिक घोंगडे (इरले) परिधान करून चिखलात उतरत भातलावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी त्यांनी पावसाचे प्रमाण, भात लागवड, खत पुरवठा आणि कृषी योजनांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. दुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खते व तांत्रिक मार्गदर्शन पुरवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या दौऱ्यात तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तिखे, संजय पवार, विलास भोये, श्रीमती सहारे आणि पोलीस पाटील रेखा पवार यांच्यासह अनेक अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
    2
    नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील सराड परिसरात २५ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजेच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. नाशिकचे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संखे, तहसीलदार रामजी राठोड आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रभावित भागांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम सराड गावात भेट देऊन जीवित अथवा वित्तहानीची माहिती घेतली आणि सर्व संबंधित यंत्रणांना आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या.

प्रशासकीय दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांनी हतगडजवळील गायदरपाडा येथील अंगणवाडी व शाळेला भेट देऊन इमारतीची सुरक्षितता, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय आणि पोषण आहाराच्या व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर गारमाळ येथे एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडल्याने पीडित कुटुंबाची भेट घेऊन नुकसानाची पाहणी केली. महसूल अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून नियमानुसार मदत देण्याचे निर्देश देण्यात आले असून, नागरिकांना धोकादायक इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.

यानंतर देवलदरी येथे तालुका कृषी विभागाच्या 'खत वितरण बांधावर' या उपक्रमात जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी स्वतः पारंपरिक घोंगडे (इरले) परिधान करून चिखलात उतरत भातलावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी त्यांनी पावसाचे प्रमाण, भात लागवड, खत पुरवठा आणि कृषी योजनांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. दुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खते व तांत्रिक मार्गदर्शन पुरवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या दौऱ्यात तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तिखे, संजय पवार, विलास भोये, श्रीमती सहारे आणि पोलीस पाटील रेखा पवार यांच्यासह अनेक अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Tour Guide नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • नाशिकच्या येवला येथील खांबेकर खुंटा येथे धडपड मंचच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य देखाव्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी डॉक्टर बोळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले आणि उपस्थितांमध्ये लाडूचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, जलकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे आणि दत्तात्रेय नागडेकर सर उपस्थित होते. यांच्यासोबतच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सोहळ्याला उपस्थित होते.
    1
    नाशिकच्या येवला येथील खांबेकर खुंटा येथे धडपड मंचच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य देखाव्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी डॉक्टर बोळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले आणि उपस्थितांमध्ये लाडूचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, जलकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे आणि दत्तात्रेय नागडेकर सर उपस्थित होते. यांच्यासोबतच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सोहळ्याला उपस्थित होते.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणीची चौकशी होणे गरजेचे असल्याचे अतुल लोंढे यांनी स्पष्ट केले आहे.
    1
    विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणीची चौकशी होणे गरजेचे असल्याचे अतुल लोंढे यांनी स्पष्ट केले आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • सुसरवाडी गावापासून काही अंतरावर असलेल्या डोळखांब गावात ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे अचानक पाणी शिरले आहे. गावात पाणी शिरल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या मुसळधार पावसामुळे परिसरातील आणि ग्रामीण भागातील दैनंदिन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने तातडीने दक्षता घेत नागरिकांना मोठा आधार व मदत पुरवली आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आणि परिस्थिती सुरळीत करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत.
    3
    सुसरवाडी गावापासून काही अंतरावर असलेल्या डोळखांब गावात ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे अचानक पाणी शिरले आहे. गावात पाणी शिरल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या मुसळधार पावसामुळे परिसरातील आणि ग्रामीण भागातील दैनंदिन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

या परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने तातडीने दक्षता घेत नागरिकांना मोठा आधार व मदत पुरवली आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आणि परिस्थिती सुरळीत करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत.
    user_Nilesh Nana Dhinda
    Nilesh Nana Dhinda
    Teacher वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.