Shuru
Apke Nagar Ki App…
शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंच्या पाठिंब्यामुळे तरुणाई मोठ्या संख्येने एकत्र आली. या वेळी हातात तिरंगा फडकावत तरुणांनी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. या प्रसंगी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला. "जुलमी हुकूमशाहीला जनतेने नमवले," असे वक्तव्य करत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
बेधडक बातमी
शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंच्या पाठिंब्यामुळे तरुणाई मोठ्या संख्येने एकत्र आली. या वेळी हातात तिरंगा फडकावत तरुणांनी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. या प्रसंगी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला. "जुलमी हुकूमशाहीला जनतेने नमवले," असे वक्तव्य करत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- उल्हासनगर येथील टाऊन हॉलमध्ये 'जे.के.सी. मानवाधिकार संरक्षण आणि भ्रष्टाचार निर्मूलन समिती'चा पदग्रहण, नियुक्तीपत्र व ओळखपत्र वितरण सोहळा अत्यंत दिमाखदार व उत्साही वातावरणात पार पडला. थोर पुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दीपक साठे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक (ए.पी.आय.) शितल बामणे मॅडम, ज्येष्ठ साहित्यिक बाळासाहेब नेटके सर, अशोक चव्हाण सर, ठाण्यातील नाट्य अभिनेते बाळासाहेब तोरस्कर आणि संतोष रामचंद्र जाधव आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक कार्यकारिणीची घोषणा करून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे प्रदान करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणीत यमुताई अवकाळे (राष्ट्रीय उपाध्यक्ष), शिल्पा खांडेकर (राष्ट्रीय व्यवस्थापक), प्रणव जांबोलीकर (राष्ट्रीय सचिव), समाधान प्रधान (राष्ट्रीय कोषाध्यक्ष) आणि अविनाश औटी (राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी) यांची निवड झाली. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी राजेश माने, प्रदेश उपाध्यक्षपदी हरी चंदर आल्हाट, कल्याण शहर अध्यक्षपदी रागिणी सिंह, उल्हासनगर शहर अध्यक्षपदी योगेश साळवी यांच्यासह अनेक स्थानिक व जिल्हा पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या. तसेच कायदेविषयक सल्लागार म्हणून ॲड. रेणुका गायकवाड व ॲड. भीमा धामी यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमप्रसंगी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष हरी चंदर आल्हाट यांनी जबाबदाऱ्यांची सविस्तर दिशा दाखवली, तर प्रदेश सल्लागार रमेश मारुती पाटील यांनी पदापेक्षा समाजासाठी केलेले कार्य अधिक महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रीय कोषाध्यक्ष समाधान प्रधान यांनी हे ओळखपत्र अन्यायाविरुद्ध लढण्याचे शस्त्र असल्याचे सांगत भ्रष्टाचार नष्ट करण्याचा संकल्प व्यक्त केला. या सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन दिनेश साठे व सारा थोरात यांनी केले आणि 'साठे क्लासेस'च्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेऊन व्यवस्थापन सांभाळले. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय अध्यक्ष मा. दीपक साठे सर व जे.के.सी. टीमच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.1
- शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंच्या पाठिंब्यामुळे तरुणाई मोठ्या संख्येने एकत्र आली. या वेळी हातात तिरंगा फडकावत तरुणांनी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. या प्रसंगी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला. "जुलमी हुकूमशाहीला जनतेने नमवले," असे वक्तव्य करत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.3
- SIR कामात मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा समोर आला असून, शाळेचे मुख्याध्यापक असिस्टंट बीएलओ (Assistant BLO) पाठवत नसल्याची बाब समोर आली आहे. या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत मुंब्रा एएमसीने (AMC) थेट मोठी कारवाई केली आहे.1
- सीजेपी प्रमुख अभिजीत दीपके यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर जोरदार निशाणा साधत पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. जनहितासाठी गरज पडल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपवर भडकलेल्या अभिजीत दीपके यांनी आक्रमक भूमिका घेत म्हटले की, हे आंदोलन आत्ताही होऊ शकते. तसेच "मला तुरुंगात जाण्याची अजिबात भीती वाटत नाही," असे ठाम वक्तव्यही त्यांनी केले आहे.1
- मुंबईतील दादरमध्ये सध्या एकच नाव आणि हजारो आवाजांचा गजर पाहायला मिळत आहे. संपूर्ण परिसरात केवळ 'ठाकरे! ठाकरे! ठाकरे!' याच एका नावाचा जोरदार जयघोष सुरू आहे.1
- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मेळाव्यात अलोट जनसागर लोटला आहे. या विजय रॅलीदरम्यान रस्त्यांवर लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.1
- मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.1