कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सव 2026 चे आयोजन.... उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले मिलेट्स व त्याचे पदार्थ तसेच विविध फळांची विक्री होण्यासाठी महोत्सवाच आयोजन करण्यात आलेले आहे. सदर महोत्सव दिनांक २२ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीमध्ये, भारत हाऊसिंग सोसायटी हॉल, राजारामपुरी, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर महोत्सवाचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मा. डॉ. राजेंद्र भारूड भाप्रसे यांचे शुभ हस्ते बुधवार, दिनांक २२ एप्रिल, २०२६ रोजी, सायंकाळी चार वाजता होणार आहे. याप्रसंगी मा. सुनील फुलारी(भा.पो.से.), विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र तसेच माननीय डॉ. जस्मिन मॅडम(भा. प्र. से. ) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर कृषी उत्पन्न मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम सरव्यवस्थापक विनायक कोकरे, विभागीय सहनिबंधक महेश कदम, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा उप निबंधक नीलकंठ करे, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगारे इत्यादी उपस्थित राहणार आहेत. सदर महोत्सवामध्ये राज्यातील विविध प्रकारच्या मिलेटचे उत्पादन घेणारे शेतकरी तसेच आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू इत्यादी विविध प्रकारचे फळ उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत सदर महोत्सवाचा वेळ सकाळी ०९ ते रात्री ०९ असा आहे. तसेच विविध प्रकारचे तृनधाण्य व विविध प्रकारचे फळे पाहावयास मिळणार आहेत, त्याचप्रमाणे मानवी आरोग्याच्या दृष्टीने मिलेटचे महत्व याबाबत डॉ.सदिप पाटील, डॉ. अहिल्या वाघमोडे. डॉ.योगेस बन व डॉ. प्रतिभा थोंबरे इ. आहारतज्ञांची व्याख्याने आयोजित केलेली आहेत. तसेच मिलेट्सचे विविध पदार्थ व त्यापासून बनविण्यात येणार्या पाककृती याकरीता कोल्हापूर शहरातील महिलांकरीता मिलेट्सच्या पाककृती स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. रायपूर (छत्तीसगढ) येथील मिलेट आहार तज्ञ श्री. कृष्ण मोहन यांचे मिलेटचे विविध पदार्थ तयार करणेबाबत प्रभोदनपर रविवार दि.२६ एप्रिल रोजी सायंकाळी ६-८ कार्यक्रम असणार आहे. तरी सर्व करवीर वासियांनी सदर महोत्सवास भेट देऊन खरेदी करावी आणि मिलेट व फळ उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले.
कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सव 2026 चे आयोजन.... उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले मिलेट्स व त्याचे पदार्थ तसेच विविध फळांची विक्री होण्यासाठी महोत्सवाच आयोजन करण्यात आलेले आहे. सदर महोत्सव दिनांक २२ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीमध्ये, भारत हाऊसिंग सोसायटी हॉल, राजारामपुरी, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर महोत्सवाचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मा. डॉ. राजेंद्र भारूड भाप्रसे यांचे शुभ हस्ते बुधवार, दिनांक २२ एप्रिल, २०२६ रोजी, सायंकाळी चार वाजता होणार आहे. याप्रसंगी मा. सुनील फुलारी(भा.पो.से.), विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र तसेच माननीय डॉ. जस्मिन मॅडम(भा. प्र. से. ) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर कृषी उत्पन्न मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम सरव्यवस्थापक विनायक कोकरे, विभागीय सहनिबंधक महेश कदम, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा उप निबंधक नीलकंठ करे, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगारे इत्यादी उपस्थित राहणार आहेत. सदर महोत्सवामध्ये राज्यातील विविध प्रकारच्या मिलेटचे उत्पादन घेणारे शेतकरी तसेच आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू इत्यादी विविध प्रकारचे फळ उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत सदर महोत्सवाचा वेळ सकाळी ०९ ते रात्री ०९ असा आहे. तसेच विविध प्रकारचे तृनधाण्य व विविध प्रकारचे फळे पाहावयास मिळणार आहेत, त्याचप्रमाणे मानवी आरोग्याच्या दृष्टीने मिलेटचे महत्व याबाबत डॉ.सदिप पाटील, डॉ. अहिल्या वाघमोडे. डॉ.योगेस बन व डॉ. प्रतिभा थोंबरे इ. आहारतज्ञांची व्याख्याने आयोजित केलेली आहेत. तसेच मिलेट्सचे विविध पदार्थ व त्यापासून बनविण्यात येणार्या पाककृती याकरीता कोल्हापूर शहरातील महिलांकरीता मिलेट्सच्या पाककृती स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. रायपूर (छत्तीसगढ) येथील मिलेट आहार तज्ञ श्री. कृष्ण मोहन यांचे मिलेटचे विविध पदार्थ तयार करणेबाबत प्रभोदनपर रविवार दि.२६ एप्रिल रोजी सायंकाळी ६-८ कार्यक्रम असणार आहे. तरी सर्व करवीर वासियांनी सदर महोत्सवास भेट देऊन खरेदी करावी आणि मिलेट व फळ उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले.
- कोल्हापुरात भीषण दुर्घटना! भिंत कोसळून प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जुने घर जेसीबीने पाडत असताना भिंत अचानक कोसळली आणि त्या ठिकाणाहून जात असलेल्या प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार आणि विद्यार्थिनी वैष्णवी भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत ललीता भोसले गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना परिसरात शोककळा पसरवणारी ठरली आहे.1
- Shiv Jayanti 2026 Kolhapur Shiv Jayanti Shivaji Maharaj Jayanti Chhatrapati Shivaji Maharaj Shiv Jayanti Celebration Kolhapur Festival Maharashtra Festivalकोल्हापुरात शिवजयंतीचा जल्लोष | छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2026s Shivaji Maharaj Status Shivaji Maharaj Video Shiv Jayanti Kolhapur 2026 Maharashtra Culture Dhol Tasha Pathak Shiv Jayanti Utsav Kolhapur News Shivaji Maharaj Jayanti Celebration1
- सिंधुदुर्ग गेल्या अनेक वर्षांपासून मानपान, वाद आणि मतभेदांमुळे बंद अवस्थेत असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरे आता पुन्हा एकदा उघडणार आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाने सुरू केलेल्या विशेष अभियानामुळे हे सकारात्मक चित्र पाहायला मिळत असून, दोन दशकांपासून कुलूपबंद असलेली काही मंदिरे आता भक्तांसाठी खुली झाली आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक संजय जोशी यांनी सिंधुदुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी जिल्हयातील मंदिरांच्या सद्यस्थितीवर आणि महासंघाच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. प्राथमिक सर्वेक्षणात जिल्ह्यातील सुमारे २५ मंदिरे वादांमुळे बंद किंवा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे. महासंघाने गेल्या दोन वर्षांत गावपातळीवर बैठका घेऊन, दोन गटांमधील मतभेद मिटवून सामंजस्य घडवून आणण्याचे काम केले आहे. आतापर्यंत १० मंदिरांच्या विश्वस्तांशी संपर्क साधण्यात आला असून, त्यापैकी ४ मंदिरे पूर्णपणे पूर्ववत सुरू झाली आहेत. यात देऊळ आणि माडखोल येथील मंदिरांचा प्रामुख्याने समावेश आहे. केवळ मंदिर उघडणेच नव्हे, तर बंद पडत चाललेल्या धार्मिक प्रथा आणि परंपरा पुन्हा सुरू करण्यावरही महासंघाने भर दिला आहे. महाराष्ट्रासमोर नवा आदर्श संजय जोशी यांनी यावेळी सांगितले की, "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिर विश्वस्तांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकोप्याने काम करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श आहे." त्यांनी आवाहन केले की, राज्यातील इतर जिल्ह्यांतही जिथे मंदिरे बंद आहेत, तिथल्या विश्वस्तांनी एकत्र येऊन समाजाला मंदिरांचा 'ऊर्जास्त्रोत' पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.1
- एसपी तुषार दोशी यांची सांगलीला बदली; निखील पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक सातारा, दि. २० सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात महत्त्वाचा बदल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी निखील पिंगळे यांची साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर साताऱ्यातील पोलीस यंत्रणा चर्चेत आली होती. धक्काबुक्की, अटक आणि मतदान प्रक्रियेतील हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे हा मुद्दा विधानमंडळातही गाजला. दोशी यांच्या निलंबनाची मागणी, त्यानंतरचे आदेश आणि त्यावरून निर्माण झालेले वाद यामुळे प्रशासनावर लक्ष केंद्रीत झाले होते. या पार्श्वभूमीवर दोशी काही दिवस अर्जित रजेवरही होते. दरम्यान, राज्य सरकारने प्रशासनिक पातळीवर निर्णय घेत त्यांची बदली केली आहे. त्यामुळे झेडपी निवडीनंतर सुरू झालेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. नवे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांना विविध जिल्ह्यांतील कामाचा अनुभव आहे. त्यांनी पंढरपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, गडचिरोली येथे राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक, तसेच लातूर आणि गोंदिया येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील असून प्रशासकीय अनुभवामुळे त्यांच्याकडून साताऱ्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे हाताळली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. साताऱ्यातील अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पिंगळे यांच्यासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच राजकीय तणावाचे व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.4
- मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.२१ मोहरी खुर्द (ता.भोर) येथे सकल हिंदू समाज गुंजन मावळ खोरे यांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,या संमेलनात गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजाने उपस्थिती दाखवून एकतेचे दर्शन घडवले,कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली,हिंदू जनजागृती समितीच्या डॉ.ज्योती काळे यांनी मातृशक्ती वर मार्गदर्शन केले,ह.भ.प.नवनाथ महाराज गाडे यांनी भारताचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर मांडला,हिंदुत्ववादी वक्ते सर्वेश मेहेंदळे यांनी माता-भगिनींना येणाऱ्या संकटांपासून सावध राहण्याचे आवाहन केले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश आंबेकर यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले, संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक आयोजन समिती आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेले संमेलन गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजासाठी एक ऊर्जा स्रोत ठरले.2
- BT News शी बोलताना जय पवारांनी प्रचारात गाव भेटीत लोकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला यावेळेस ते बोलताना दादाच्या आठवणी व मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आवाहन करण्यात आले.1
- अजितदादांच्या स्टाईलमध्येच युवा नेते जय पवारांनी सोडवला शाळेचा प्रश्न..! बारामती मतदारसंघात गावभेट दौऱ्यावर असताना युवा नेते जय अजितदादा पवार यांनी भिकोबा नगर येथील एका शाळेला भेट दिली. शाळेच्या अगदी शेजारी महावितरणच्या विद्युत लाईनचे खांब असल्यामुळे शॉर्टसर्किट होण्याचा धोका निर्माण झाला होता. कमी खर्चात कंटेनरच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या शाळेसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत होती. याबाबत शाळेच्या प्राचार्यांनी जय पवार यांच्याकडे समस्या मांडताच त्यांनी तत्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जय पवार यांनी शाळेच्या कंटेनरमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच अनाथ मुलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.1
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरात भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी सध्या चर्चेत असलेल्या ‘खरात प्रकरणा’वर टीकात्मक भाष्य करणारा देखावा विशेष लक्षवेधी ठरला. अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीला बळी पडू नका, असा ठाम संदेश या देखाव्यातून नागरिकांना देण्यात आला. सामाजिक जागरूकतेचा हा अनोखा प्रयत्न नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.1