सोशल मीडियाच्यामदतीने चार_दिवसांच्या प्रयत्नांनंतर आजोबा सुखरूप कुटुंबीयांच्या सुपूर्त अक्कलकोट शहरातील घाडगे दूध डेअरीसमोर रस्त्याच्या कडेला आढळलेल्या नामदेव बलभीम ठाकरे (रा. कोरफळे, ता. बार्शी) यांची माहिती घाडगे दूध डेअरीचे मालक उत्तम घाटगे यांनी दिली त्यांच्या तत्परतेमुळे आम्हाला त्या आजोबांपर्यंत पोहोचता आले आणि त्यांची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली पोस्ट व्हायरल होताच अवघ्या अर्ध्या तासात त्यांच्या नातेवाईकांचा शोध लागला. यानंतर नातेवाईकांशी सातत्याने संपर्क साधण्यात आला. प्रतिसाद मिळण्यात विलंब होत असल्याने संजय ठेगळे साहेब तसेच आसिफ शेख साहेब यांच्या माध्यमातून कुटुंबीय व गावातील पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून आजोबांना घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दरम्यान आजोबा चार दिवस होते त्या परिसरातील नागरिकांनी माणुसकी जपत चार दिवस जेवण, बिस्किटे व पाण्याची व्यवस्था केली. ज्या ठिकाणी आजोबा चार दिवस होते, त्या ठिकाणच्या समोरील घरातील दोन महिलांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता चारही दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवले, त्यांना जेवण दिले आणि ते पडल्यास त्यांना उचलून सुरक्षित ठिकाणी बसवले. या दोन महिलांची निस्वार्थ माणुसकी या संपूर्ण घटनेतील अत्यंत महत्त्वाची बाजू ठरली. अखेर आज दि.१५ सप्टेंबर रोजी अक्कलकोट पोलीस ठाण्यात आजोबांचे पुत्र व त्यांच्या मित्राला बोलावून घेण्यात आले आणि नामदेव बलभीम ठाकरे यांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. या कार्यात पोलीस निरीक्षक अविनाश जी पवार साहेब,संजय ठेगळे साहेब,आसिफ शेख साहेब,सुतार साहेब,रशीद किस्तके, सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास, आलीम किस्तके तसेच घाडगे दूध डेअरीचे मालक, त्या दोन महिला आणि परिसरातील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सोशल मीडियाच्यामदतीने चार_दिवसांच्या प्रयत्नांनंतर आजोबा सुखरूप कुटुंबीयांच्या सुपूर्त अक्कलकोट शहरातील घाडगे दूध डेअरीसमोर रस्त्याच्या कडेला आढळलेल्या नामदेव बलभीम ठाकरे (रा. कोरफळे, ता. बार्शी) यांची माहिती घाडगे दूध डेअरीचे मालक उत्तम घाटगे यांनी दिली त्यांच्या तत्परतेमुळे आम्हाला त्या आजोबांपर्यंत पोहोचता आले आणि त्यांची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली पोस्ट व्हायरल होताच अवघ्या अर्ध्या तासात त्यांच्या नातेवाईकांचा शोध लागला. यानंतर नातेवाईकांशी सातत्याने संपर्क साधण्यात आला. प्रतिसाद मिळण्यात विलंब होत असल्याने संजय ठेगळे साहेब तसेच आसिफ शेख साहेब यांच्या माध्यमातून कुटुंबीय व गावातील पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून आजोबांना घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दरम्यान आजोबा चार दिवस होते त्या परिसरातील नागरिकांनी माणुसकी जपत चार दिवस जेवण, बिस्किटे व पाण्याची व्यवस्था केली. ज्या ठिकाणी आजोबा चार दिवस होते, त्या ठिकाणच्या समोरील घरातील दोन महिलांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता चारही दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवले, त्यांना जेवण दिले आणि ते पडल्यास त्यांना उचलून सुरक्षित ठिकाणी बसवले. या दोन महिलांची निस्वार्थ माणुसकी या संपूर्ण घटनेतील अत्यंत महत्त्वाची बाजू ठरली. अखेर आज दि.१५ सप्टेंबर रोजी अक्कलकोट पोलीस ठाण्यात आजोबांचे पुत्र व त्यांच्या मित्राला बोलावून घेण्यात आले आणि नामदेव बलभीम ठाकरे यांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. या कार्यात पोलीस निरीक्षक अविनाश जी पवार साहेब,संजय ठेगळे साहेब,आसिफ शेख साहेब,सुतार साहेब,रशीद किस्तके, सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास, आलीम किस्तके तसेच घाडगे दूध डेअरीचे मालक, त्या दोन महिला आणि परिसरातील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
- अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हा दुष्काळ जाहीर करणेबाबत निवेदन देण्यात आले. मा. राजसाहेबांच्या आदेशाने, मनसे नेते दिलीबापू धोत्रे, जिल्हा संपर्क अध्यक्ष ऍड किशोर शिंदे, ऍड सुधीर पाटसकर, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हामध्ये भयंकर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पेरणी केलेली विविध पिके पाऊस न आल्यामुळे करपली आहेत.आणि प्रत्येक गावं, वाडी -वस्तीवर, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही, लोकांना रोजगार नाही. शेतकरी यांच्या मुलांना शाळा, कॉलेजमध्ये, पेपर व शिकवणीचे फी देणेसाठी पैसे नाहीत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलून ज्या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी पिकांचे पंचनामे करणेसाठी व जनावरांना चारा छावणी तात्काळ मंजूर करावे म्हणून तहसीलदार साहेब व जिल्हाअधिकारी साहेबांना आदेश देऊन तात्काळ मदत जाहीर करावे.सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे शेतकरीकडे काही एक दमडी नाही.आता श्री गणपतीचे आगमन झाले आहे. आणि दसरा, दिवाळी सण जवळ येत आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी मिळून जनतेला आधार दिला पाहिजे.निवेदन देताना मनसे ता. अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, गट अध्यक्ष किणी काशिनाथ मरतुरे, ता. उपाध्यक्ष मल्लिनाथ घंटे, शहर संपर्क अध्यक्ष आदर्श मळगी, शहर उपाध्यक्ष शामराव पाटील, मनसे किणी ढब्बू जाधव, दुधनी शाखा अध्यक्ष मनोज राठोड, बोरीउमरगे शाखा अध्यक्ष काशिनाथ पाटील, कोन्हाळी शाखा उपाध्यक्ष दत्ता घंटे व शेतकरी राचय्या बसय्या स्वामी, परमेश्वरp साखरे, उमेश देडे, नीलकंठ धनशेट्टी, अंदप्पा माळगे, तिप्पणा नागरसे, विकास जाधव, राजू अंगडीकर, कुमार जाधव असे अनेक मनसैनिक व शेतकरी लोक निवेदन देताना तहसील कार्यालयामध्ये उपस्थित होते.या राज्यातील सरकार 8 दिवसाच्या आत जर दुष्काळ तात्काळ जाहीर नाही केल्यास सर्व शेतकरी यांना सोबत घेऊन प्रत्येक तालुके व प्रत्येक जिह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी.1
- महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026. लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.1
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगोला पोलिसांचा शहरात रूट मोर्चा1
- मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका! मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.1
- परळी येथील बौद्ध विहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद1
- माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...3
- लातूरच्या लाडक्या बहिणी लागल्या तयारीला.. #चलो_मुंबई..1
- लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ1