Shuru
Apke Nagar Ki App…
देबी दयाल परिहार
More news from महाराष्ट्र and nearby areas
- संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत1
- भोंदु बाबा व नागरिक , भोंदु बाबांना आरती म्हणता येत नाही.. भोंदु महाराज खेड तालुक्यातील घटना ...1
- बुलढाणा जिल्ह्याचे वैभव आणि चिखली शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री रेणुका माता मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाचा मंगलमय प्रारंभ झाला आहे. आज पहाटे पारंपरिक विधीवत पूजा आणि घटस्थापनेने या नऊ दिवसांच्या उत्सवाला सुरुवात झाली. २ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात यंदा भाविकांसाठी विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्ती, शक्ती आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम असलेल्या चिखली नगरीत आजपासून नवरात्रोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. पहाटेच्या मंगल मुहूर्तावर रेणुका माता संस्थानच्या वतीने विधिवत घटस्थापना करण्यात आली. आईच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला असून, देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत.यंदाचा नवरात्रोत्सव विशेष ठरणार आहे. संस्थानच्या वतीने २ एप्रिलपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज सकाळी महापूजा, अभिषेक, दुपारी आरती आणि सायंकाळी विविध भजनांचे कार्यक्रम रंगणार आहेत. भाविकांना दर्शनासाठी कोणताही त्रास होऊ नये, यासाठी संस्थानच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षा रक्षक आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.उत्सव कालावधी | १० दिवस (समाप्ती २ एप्रिल) | | मुख्य विधी | घटस्थापना, महापूजा, अखंड दीप प्रज्वलन | | विशेष आयोजन | भजन, कीर्तन आणि धार्मिक प्रवचने | | भक्त सोय | महाप्रसाद आणि दर्शन रांगेचे नियोजन चिखलीचे हे शक्तिपीठ केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण विदर्भाचे श्रद्धास्थान आहे. येत्या नऊ दिवसांत याठिकाणी श्रद्धेचा मोठा महाकुंभ भरणार असून, प्रशासनानेही या गर्दीचे नियोजन करण्यासाठी कंबर कसली आहे.1
- बुलढाणा शहरात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी; 'जिओ और जीने दो'च्या संदेशासह विविध कार्यक्रमांचे आयोजन1
- Post by Amravati News Update1
- दारव्हा तालुक्यातील नायगाव येथे दिनांक ३० मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीच्या अवस्थेत असलेला गहू, ज्वारी आणि तीळ या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः आडवी पडून जमिनीदोस्त झाली असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके कापणीसाठी तयार होती. मात्र, वादळी वाऱ्यामुळे पिके पडल्याने कापणी करणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात येणारा उत्पन्नाचा मुख्य आधारच डळमळीत झाला आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्यात भिजल्याने त्यांची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून बाजारभावावरही त्याचा परिणाम होणार आहे. दरम्यान, नायगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पीकविमा योजनेंतर्गतही मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.1
- तहसीलदाराला उदविण्याचा प्रयत्न अखेर रेती माफियांवर कारवाई रेती माफिया यांचे धाबे दणाणले?1
- Post by Amravati News Update1
- इसापूर येथील श्याम गायकवाड याने सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक टॉवरवर चढून विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. इसापूर ग्रामपंचायत अंतर्गत नमुना ८ चोरी गेल्याची तक्रार सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्या तक्रारीवरून काय कार्यवाही झाली, याचा खुलासा द्यावा. इसापूर येथील गावाचा नकाशा नसल्याने कोणते कोणाचे घर आहे. हे सिद्ध होत नाही. काही लोकांना नोटरीनुसार त्यांची नावे नमुना ८ मध्ये नोंद घेण्याचा नियम आहे. आपल्या घराचा नोटरीकृत असलेल्या दस्तानुसार घर नावाने करून द्यावे, एकाच मालमत्तेवर दोन वा तीन व्यक्तीची मालकी कशी याचाही खुलासा देऊन दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांना सदर आंदोलकाच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात याती व आंदोलकाला आंदोलनापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले.1