नायगावा येथे वादळी पावसामूळे रब्बी पिकांचे आतोनात नुकसान दारव्हा तालुक्यातील नायगाव येथे दिनांक ३० मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीच्या अवस्थेत असलेला गहू, ज्वारी आणि तीळ या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः आडवी पडून जमिनीदोस्त झाली असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके कापणीसाठी तयार होती. मात्र, वादळी वाऱ्यामुळे पिके पडल्याने कापणी करणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात येणारा उत्पन्नाचा मुख्य आधारच डळमळीत झाला आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्यात भिजल्याने त्यांची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून बाजारभावावरही त्याचा परिणाम होणार आहे. दरम्यान, नायगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पीकविमा योजनेंतर्गतही मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
नायगावा येथे वादळी पावसामूळे रब्बी पिकांचे आतोनात नुकसान दारव्हा तालुक्यातील नायगाव येथे दिनांक ३० मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीच्या अवस्थेत असलेला गहू, ज्वारी आणि तीळ या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः आडवी पडून जमिनीदोस्त झाली असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके कापणीसाठी तयार होती. मात्र, वादळी वाऱ्यामुळे पिके पडल्याने कापणी करणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात येणारा उत्पन्नाचा मुख्य आधारच डळमळीत झाला आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्यात भिजल्याने त्यांची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून बाजारभावावरही त्याचा परिणाम होणार आहे. दरम्यान, नायगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पीकविमा योजनेंतर्गतही मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
- दारव्हा तालुक्यातील नायगाव येथे दिनांक ३० मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीच्या अवस्थेत असलेला गहू, ज्वारी आणि तीळ या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः आडवी पडून जमिनीदोस्त झाली असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके कापणीसाठी तयार होती. मात्र, वादळी वाऱ्यामुळे पिके पडल्याने कापणी करणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात येणारा उत्पन्नाचा मुख्य आधारच डळमळीत झाला आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्यात भिजल्याने त्यांची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून बाजारभावावरही त्याचा परिणाम होणार आहे. दरम्यान, नायगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पीकविमा योजनेंतर्गतही मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.1
- इसापूर येथील श्याम गायकवाड याने सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक टॉवरवर चढून विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. इसापूर ग्रामपंचायत अंतर्गत नमुना ८ चोरी गेल्याची तक्रार सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्या तक्रारीवरून काय कार्यवाही झाली, याचा खुलासा द्यावा. इसापूर येथील गावाचा नकाशा नसल्याने कोणते कोणाचे घर आहे. हे सिद्ध होत नाही. काही लोकांना नोटरीनुसार त्यांची नावे नमुना ८ मध्ये नोंद घेण्याचा नियम आहे. आपल्या घराचा नोटरीकृत असलेल्या दस्तानुसार घर नावाने करून द्यावे, एकाच मालमत्तेवर दोन वा तीन व्यक्तीची मालकी कशी याचाही खुलासा देऊन दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांना सदर आंदोलकाच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात याती व आंदोलकाला आंदोलनापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले.1
- रिसोड शहरामध्ये पावसांना दमदार हजेरी विजांच्या कडकडाट शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान! रिसोड शहर प्रतिनिधी रिसोड:-रिसोड शहरामध्ये विजांच्या कडकडात व संध्याकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गार पीट व काही ठिकाणी पाण्याने गदारोळ घातले व या पावसामुळे शेतकऱ्यांचे आठवनाथ नुकसान काही ठिकाणी झालेले आहे थोडा वारा सुद्धा त्यामध्ये होता त्यामुळे कांद्याचे ही नुकसान झालेले आहेत तरी शेतकऱ्यांना आर्थिक शासनाने मदत देऊन त्यांची हळदीचे ही सुद्धा फार प्रमाणात नुकसान झालेले काही शेतकऱ्यांच्या हार्दिक काढणे सुद्धा चालू आहे व काहींच्या काढलेल्या भिजल्या व काहींना वाळवण्यासाठी सुद्धा टाकलेले आहेत त्यामुळे त्यांना पाणीसुद्धा लागू शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले व यामध्ये शेतकरी हवालदिन झाला या अगोदर सोयाबीनच्या टायमात सुद्धा शेतकऱ्यांना एक मोठं संकट यावर्षी पाऊस जास्ती झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हळदीचे तर नुकसान झाले परंतु सोयाबीन तूर हरभरा कांदा लसन असे शेतकऱ्याचे बरेचसे पीक उध्वस्त झाले आणि त्यामध्ये शेतकरी हा अडचणीत सापडला त्यामुळे आज शेतकऱ्यांना व यामध्ये बाजारपेठ मध्ये सुद्धा ग्राहक राहिलेले नाही कारण शेतकरी जर अडचणीत असला तर पूर्ण बाजारपेठ सुद्धा अडचणीत सापडते कारण लग्नसरायच्या टायमामध्ये सुद्धा ग्राहक राहिलेले नाही कारण शेतकरी अडचणीत असल्यामुळे यावर्षी 25 ते 26 साल शेतकऱ्यांना खूप अडचणीचे गेले आणि पुढचे सध्या चालू असलेल्या विजेचा कडकडाट व सुगारपिटीच्या भीतीने शेतकऱ्यांना ताडपत्री सुद्धा खरेदी करण्यासाठी त्यांची ऐपत राहिलेली नाही त्यामुळे या सारख्या परिस्थितीमध्ये झालेले नुकसान शेतकऱ्यांना कसे भरून निघेल यासाठी आर्थिक मदत देऊन त्यांना आपले नुकसान झालेले हे सुद्धा यामध्ये भारतीय होईल व त्यांना दिलासा मिळेल अशी शासनाने मदत करावी संध्याकाळच्या टायमाला एवढी काही गारपीट व विजाता कडकडात रिसोड तालुक्यात सर्वात मोठा विजेचा कडकडाट झालेला आहे व शेतकऱ्यांना जी आर्थिक मदत मिळेल ती शासनाने द्यावी1
- धामणगाव रेल्वे येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी धामणगांव रेल्वे : जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त धामणगांव रेल्वे शहरात महावीर जयंती उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच जैन मंदिर परिसरात पूजा-अर्चा, अभिषेक, धार्मिक विधी तसेच प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीर यांच्या प्रतिमेची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जैन समाजातील महिला, पुरुष, युवक-युवती तसेच बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणाबाजी, भजन, ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले होते. मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात येत महावीर भवनपर्यंत पोहोचली. भगवान महावीर यांनी दिलेल्या अहिंसा, सत्य, करुणा व मानवतेच्या संदेशाचे आचरण जीवनात करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसाद वितरण तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महावीर जयंतीनिमित्त संपूर्ण धामणगांव रेल्वे शहरात आनंद, उत्साह आणि धार्मिक एकतेचे वातावरण पाहायला मिळाले. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- Post by Amravati News Update1
- वादळी पावसाने हिमायतनगर हादरले! सोमवारी मध्यरात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हिमायतनगर शहर व तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी विजवाहिनी तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित 🌳 झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बाधित 🌙 नागरिकांना रात्रभर अंधारात काढावी लागली 🌾 शेतीला मोठा फटका 🥭 आंबा, चिकू फळबागांचे नुकसान 🌾 उन्हाळी ज्वारी व वैरण जमीनदोस्त 🌾 काढणीस आलेले गहू धोक्यात उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. #हिमायतनगर #वादळीपाऊस #नांदेड #शेतकरी #नुकसान WeatherUpdate Maharashtra BreakingNews Farmers1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Amravati News Update1