Shuru
Apke Nagar Ki App…
नळणीबुद्रुक शिवारात झालेल्या दुचाकीच्या भीषण अपघातात तिघा जणांच्या जागीच मृत्यू एकजन गंभीर
Jansagar 9 Marathi
नळणीबुद्रुक शिवारात झालेल्या दुचाकीच्या भीषण अपघातात तिघा जणांच्या जागीच मृत्यू एकजन गंभीर
More news from Jalna and nearby areas
- Post by Jansagar 9 Marathi1
- भोकरदन नगरपरिषदेचा निर्दयी कारभार! १५ वर्षांपासून 'वनवास', रस्ता झाला, पाईपलाईन आली, पण पाणी मिळेना भोकरदन: एकीकडे देश डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारत असताना, जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातून प्रशासकीय अनास्थेचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील कन्या शाळेच्या पाठीमागे राहणाऱ्या नागरिकांना गेल्या १५ वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. रस्ते झाले, पाईपलाईनही टाकली गेली, पण नळाला पाणी मात्र आलेच नाही. अखेर या 'तहानलेल्या' वस्तीतील महिलांचा संयम सुटला असून, नगरपरिषदेच्या ढिम्म कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाईपलाईन असूनही पाणी का नाही? मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात नागरी सुविधांच्या नावाखाली कागदावर घोडे नाचवले जात आहेत. रस्ता आणि पाईपलाईनची कामे पूर्ण झाली असली, तरी केवळ नगरपरिषदेच्या नियोजित दुर्लक्षामुळे या पाईपलाईनमध्ये पाणी सोडले जात नाहीये. परिणामी, इथल्या कष्टकरी नागरिकांना गेल्या दीड दशकापासून दररोज पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. महागाईच्या काळात पाण्यासाठी खिशातून पैसे मोजताना सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. प्रशासन निर्दयी, नगरसेवक 'कुंभकर्ण' झोपेत? या भागातील महिलांनी पाण्यासाठी आजवर अनेकवेळा नगरपरिषदेवर 'हंडा मोर्चा' काढला. प्रशासनाच्या दारात रिकामे हंडे वाजवून आपला रोष व्यक्त केला. मात्र, प्रत्येक वेळी आश्वासनापलीकडे नागरिकांच्या हाती काहीही लागले नाही. यावरून भोकरदन नगरपरिषदेचे प्रशासन किती 'निर्दयी' झाले आहे, याची प्रचिती येते. विशेष म्हणजे, ज्यांच्यावर प्रभागाच्या विकासाची जबाबदारी आहे, ते नगरसेवक जणू कुंभकर्णाच्या झोपेत असल्याची टीका आता स्थानिक नागरिक उघडपणे करत आहेत. "आम्ही पंधरा वर्षे झाली पाणी विकत घेतोय. निवडून येण्यापूर्वी हात जोडणारे लोकप्रतिनिधी आता आमचा आवाज ऐकायला तयार नाहीत. नगरपरिषदेला आमच्या हालअपेष्टांचे काहीच देणेघेणे उरले नाहीये का?" — संतप्त महिला रहिवासी नागरिकांचा इशारा जर येत्या काही दिवसांत या परिसरात नियमित पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर केवळ मोर्चावर न थांबता तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. आता तरी या कुंभकर्ण झोपेत असलेल्या प्रशासनाला जाग येणार की नागरिक पुन्हा तहानेने व्याकुळ राहणार, हाच मोठा प्रश्न आहे.1
- रमाई नगर कुंभारी येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना,नालंदा बुद्ध विहाराचे उद्धघाट्न Bharat 24taas News1
- चाळीसगाव घाटात मृत्यूचा थरार! झाड धावून आले म्हणून 'ते' वाचले; प्रशासन झोपलेय की मेलेय? प्रतिनिधी: गौतम हिवराळे रविवार, २६ एप्रिल २०२६ चाळीसगाव-कन्नड घाट: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! रविवारी मध्यरात्री चाळीसगाव घाटातील त्या 'खुनी' वळणाने पुन्हा एकदा एका कुटुंबाचा घास घेण्याचा प्रयत्न केला. भरधाव वेगातील कार १०० फूट खोल दरीत झेपावली, मृत्यू समोर उभा होता, पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. एका झाडाने या कारला आपल्या बाहूत घेतले आणि मृत्यूला हुलकावणी देत पाच प्रवाशांचे प्राण वाचले. पण या घटनेनंतर आता संतापाचा वणवा पेटला आहे—हा अपघात होता की प्रशासनाने रचलेला मृत्यूचा सापळा? १. कठड्यांचे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात? घाटातील संरक्षक कठडे हे प्रवाशांच्या रक्षणासाठी आहेत की निव्वळ ठेकेदारांची घरे भरण्यासाठी? कार आदळताच हे कठडे पत्त्यांसारखे का कोसळले? २. प्रशासनाला अजून किती बळी हवेत? नऊ नंबरचे वळण 'डेथ झोन' झाले असताना तिथे कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाहीत? प्रत्येक अपघातानंतर फक्त पंचनामा करून प्रशासन हात झटकणार का? ३. रात्रीचा प्रवास म्हणजे आत्महत्याच का? घाटात ना विजेचे दिवे, ना रेडियमचे चमकणारे फलक. डोळ्यांना पट्टी बांधून प्रवाशांनी प्रवास करायचा का? ४. मदतकार्य की नशिबाचा खेळ? घाटात मोबाईल रेंज नाही, सीसीटीव्ही नाहीत. जर त्या झाडाने कार अडकवली नसती आणि सकाळी कुणाला गाडी दिसलीच नसती, तर त्या मृतदेहांचा शोध तरी लागला असता का? घटनेचा थरार: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! ती काळरात्र. वैजापूर येथील हे प्रवासी आपल्या कारने कन्नडहून चाळीसगावच्या दिशेने येत होते. मध्यरात्रीचा सुमार, घाटातील ते जीवघेणे 'नऊ नंबर'चे वळण आणि अचानक चालकाचा ताबा सुटला. कारने संरक्षक कठडा अक्षरशः उडवला आणि थेट दरीत झेप घेतली. क्षणभर वाटले की आता सर्व संपले! पण १०० फुटांवर असलेल्या एका वटवृक्षाने 'देवदूत' बनून कारला अडकवले. मृत्यूच्या दाढेतून सुटका: कार झाडात अडकल्यामुळे झालेल्या आवाजाने घाटातील इतर प्रवाशांचे लक्ष गेले. तातडीने रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी दोरखंडाच्या साहाय्याने दरीत उतरून जखमींना बाहेर काढले. कारचा चक्काचूर झाला आहे, पण प्रवासी गंभीर जखमी अवस्थेत बचावले आहेत. सध्या त्यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जळजळीत वास्तव: आता तरी जागे व्हा! हा केवळ अपघात नाही, तर यंत्रणेच्या नाकर्तेपणाचा पुरावा आहे. आज झाड वाचवायला आले, उद्या प्रत्येक वेळी झाड नसेल! सार्वजनिक बांधकाम विभागाने या 'ब्लॅक स्पॉट'वर तातडीने कडक कारवाई न केल्यास, संतप्त नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. "आज झाड होते म्हणून जीव वाचले, उद्या प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे कुणाचा संसार उघड्यावर पडला, तर त्याला जबाबदार कोण? सार्वजनिक बांधकाम विभाग की टोल घेणारी यंत्रणा?" 1
- Ek Hi Mard Nazar Aa Raha’ 🤣 — Owaisi ka viral savage moment 🔥1
- चारा घेन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग, हर्सूल-जटवाडा मार्गावरील थरार.... चालत्या ट्रकला आग लागल्याचे कळताच ड्रायव्हरने काय डेअरिंग केली बघा...1
- बदनापूर जिल्हा जालना बदनापूर येथील कॅनरा बँकेत बँक अधिकाऱ्यांनी चोरी केली व 22 लोकांनी बनावट सोने गहाण ठेऊन फसवणूक केली त्या बावीस लोकांची चौकशी करून त्यांना अटक केली जाणार असल्याची शक्यता असून नियमानुसार त्यांना अटक अटळ असल्याचे बोलले जाते.1
- Owaisi Ne Media Ko Lagayi Class! Anjana Ke Samne Teekha Jawab 🔥1