आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे टाळ-मृदंगाच्या गजरात आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात आगमन झाले. याप्रसंगी ग्रामविकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन, पुष्पहार अर्पण करत पालखीचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि पालकमंत्री स्वतः टाळ-मृदंगाच्या गजरात पालखीसोबत चालले. यावेळी धर्मपुरी पालखीतळावर वारकरी भाविक व ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. संपूर्ण परिसर 'राम कृष्ण हरी' आणि 'ज्ञानोबा माऊली, तुकाराम' च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता, तर पोलीस बँड पथकाने भक्तीमय धून वाजवून पालखीचे स्वागत केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह. भ. प. श्री भावार्थ देखणे महाराज यांचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड आणि तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील संबंधित अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखीच्या स्वागतासाठी धर्मपुरी पालखीतळावर जिल्हा प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. येथे पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय पथक, वीज, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने वारकरी भाविकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात असून, जिल्हा परिषदेच्या वतीने हिरकणी कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच, भाविकांच्या पायांना आराम मिळण्यासाठी फूट मसाज मशीनची सोय करण्यात आली असून हजारो भाविक याचा लाभ घेत आहेत. यासोबतच वारकऱ्यांच्या तातडीच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य दूत आणि आरोग्य बाईक तैनात करण्यात आल्या आहेत.
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे टाळ-मृदंगाच्या गजरात आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात आगमन झाले. याप्रसंगी ग्रामविकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन, पुष्पहार अर्पण करत पालखीचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि पालकमंत्री स्वतः टाळ-मृदंगाच्या गजरात पालखीसोबत चालले. यावेळी धर्मपुरी पालखीतळावर वारकरी भाविक व ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. संपूर्ण परिसर 'राम कृष्ण हरी' आणि 'ज्ञानोबा माऊली, तुकाराम' च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता, तर पोलीस बँड पथकाने भक्तीमय धून वाजवून पालखीचे स्वागत केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह. भ. प. श्री भावार्थ देखणे महाराज यांचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड आणि तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील संबंधित अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखीच्या स्वागतासाठी धर्मपुरी पालखीतळावर जिल्हा प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. येथे पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय पथक, वीज, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने वारकरी भाविकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात असून, जिल्हा परिषदेच्या वतीने हिरकणी कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच, भाविकांच्या पायांना आराम मिळण्यासाठी फूट मसाज मशीनची सोय करण्यात आली असून हजारो भाविक याचा लाभ घेत आहेत. यासोबतच वारकऱ्यांच्या तातडीच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य दूत आणि आरोग्य बाईक तैनात करण्यात आल्या आहेत.
- महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी थेट मंत्रालयावर धडक मारण्याची घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन केले जाणार असून, या आंदोलनाबाबत रविराज साबळे यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली आहे.1
- जंतर-मंतरवर सध्या युवकांचा तीव्र आक्रोश पाहायला मिळत आहे. सरकारविरोधात हा संपूर्ण युवा वर्ग कमालीचा आक्रमक झाला असून त्यांच्यामध्ये मोठा संताप दिसून येत आहे.1
- उपराकार लक्ष्मण माने यांनी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या आठवणी सांगितल्या आहेत.1
- कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील 'सुरेश काका सराफ अँड सन्स' या दुकानातून खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी महिलांनी हातचलाखी करत १ लाख ६९ हजार ६७१ रुपये किमतीचे १२ जोड चांदीचे पैंजण लंपास केले आहेत. सोमवारी दिवसा घडलेली ही चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या महिलांनी खरेदीचा बहाणा करत दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित केले आणि अवघ्या दोन मिनिटांत ७२२ ग्रॅम वजनाचे पैंजण चोरून नेले. याप्रकरणी ओम सचिन कुलथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे।2
- तुळजापूर पंचायत समितीच्या बिडिओ (गटविकास अधिकारी) यांच्या आश्वासनानंतर ग्रामपंचायतीसमोर सुरू असलेले आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे.1
- इचलकरंजी येथे शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३ एसआयआर (SIR) चे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी शिवसेना शहर प्रमुख भाऊसाहेब आवळे, प्रसाद इंगवले, प्रभाकर भोळ आणि सागर पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांचे फॉर्म भरून घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला. चांगदेव पाटील चौक, गणेशनगर येथील नगरसेवक योगेश पाटील यांच्या कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे फॉर्म भरून घेण्याचे काम सुरू आहे.1
- कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान एका मोठ्या धक्कादायक बातमीने हादरले आहे. या देवस्थानात तब्बल ६० कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा संशय असून, याप्रकरणी देवस्थानच्या विश्वस्तांसह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ६० कोटींच्या या कथित महाघोटाळ्याच्या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.1
- दिल्लीमधील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन करण्यात येत आहे.1
- कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील 'सुरेश काका सराफ अँड सन्स' या सराफ दुकानातून दोन अनोळखी महिलांनी १ लाख ६९ हजार ६७१ रुपये किमतीचे १२ जोड चांदीचे पैंजण हातचलाखीने लंपास केले आहेत. सोमवारी दिवसा घडलेली ही चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. खरेदीचा बहाणा करून आलेल्या या महिलांनी दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित केले आणि अवघ्या दोन मिनिटांत ७२२ ग्रॅम वजनाचे पैंजण चोरून नेले. याप्रकरणी ओम सचिन कुलथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोन्ही महिलांचा शोध घेत आहेत.1