logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कराड येथे आयोजित एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आणि आंदोलनाला विद्यार्थी, पालक व नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थित राहून न्याय्य मागण्यांना आपला ठाम पाठिंबा दिला. दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना यावेळी खंबीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या आंदोलनात आदिशक्ती महासंघाच्या अश्विनीताई वेताळ पाटील, कृपा हादवे, सविता काशिद व सर्व विद्यार्थी वर्ग सहभागी झाला होता.

5 hrs ago
user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
5 hrs ago

कराड येथे आयोजित एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आणि आंदोलनाला विद्यार्थी, पालक व नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थित राहून न्याय्य मागण्यांना आपला ठाम पाठिंबा दिला. दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना यावेळी खंबीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या आंदोलनात आदिशक्ती महासंघाच्या अश्विनीताई वेताळ पाटील, कृपा हादवे, सविता काशिद व सर्व विद्यार्थी वर्ग सहभागी झाला होता.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पंढरपूर येथील आषाढी एकादशी वारीच्या निमित्ताने आयोजित शासकीय पूजा महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली आहे. या पूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील मानाचे वारकरी माने दांपत्य यांना मिळाला असून त्यांच्या हस्ते ही शासकीय पूजा पार पडली.
    1
    पंढरपूर येथील आषाढी एकादशी वारीच्या निमित्ताने आयोजित शासकीय पूजा महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली आहे. या पूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील मानाचे वारकरी माने दांपत्य यांना मिळाला असून त्यांच्या हस्ते ही शासकीय पूजा पार पडली.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • ऑलंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या ७४ व्या पदक दिन समारंभाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले असून हा सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला आहे.
    1
    ऑलंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या ७४ व्या पदक दिन समारंभाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले असून हा सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला आहे.
    user_E city news network
    E city news network
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर शहरात आणि रुक्मिणी मंदिरामध्ये करण्यात आलेल्या रोषणाईचे छायाचित्र ड्रोनद्वारे टिपण्यात आले आहे. आषाढी वारीनिमित्त रुक्मिणी मंदिर परिसर व पंढरपूर शहरात ही विशेष रोषणाई करण्यात आली असून, ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने या रोषणाईची दृश्ये कॅमेऱ्यात टिपण्यात आली आहेत.
    1
    आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर शहरात आणि रुक्मिणी मंदिरामध्ये करण्यात आलेल्या रोषणाईचे छायाचित्र ड्रोनद्वारे टिपण्यात आले आहे. आषाढी वारीनिमित्त रुक्मिणी मंदिर परिसर व पंढरपूर शहरात ही विशेष रोषणाई करण्यात आली असून, ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने या रोषणाईची दृश्ये कॅमेऱ्यात टिपण्यात आली आहेत.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • फलटण-सातारा मार्गावरील तडवळे फाटा ते वाठार निंबाळकर रस्त्याचे काम गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने अनेक अपघात होत आहेत. रस्त्याचे काम सुरू असतानाही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच गेल्या १५ दिवसांपूर्वी कापशी आळजापूर येथील पुलाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी जुना पूल पूर्ण न काढताच त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढ करण्यात आली आहे. तसेच पुलावर कामाचा राडारोडा तसाच राहिल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील अर्धवट आणि धोकादायक कामे संबंधित ठेकेदाराने त्वरित पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.
    1
    फलटण-सातारा मार्गावरील तडवळे फाटा ते वाठार निंबाळकर रस्त्याचे काम गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने अनेक अपघात होत आहेत. रस्त्याचे काम सुरू असतानाही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच गेल्या १५ दिवसांपूर्वी कापशी आळजापूर येथील पुलाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

या ठिकाणी जुना पूल पूर्ण न काढताच त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढ करण्यात आली आहे. तसेच पुलावर कामाचा राडारोडा तसाच राहिल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील अर्धवट आणि धोकादायक कामे संबंधित ठेकेदाराने त्वरित पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.
    user_LOKSHAKATI RAKASHAK
    LOKSHAKATI RAKASHAK
    Video Creator सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • NEET पेपर लीक प्रकरणावरून दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पाऊल उचलले आहे. 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) द्वारे आयोजित दिल्लीतील मार्च आणि आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्यांनी २३ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर) येथील वाडिया पार्कच्या गांधी स्मारकावर २ तासांचे 'मौन आंदोलन' केले. या दरम्यान अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईबद्दल दुःख व्यक्त केले आहे. लोकशाहीत दडपशाहीऐवजी संवादाचा मार्ग अवलंबला पाहिजे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. याशिवाय जंतर-मंतरवर उपोषणाला बसलेले हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी बळजबरीने हटवल्याबद्दल अण्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून सरकारने त्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असा इशारा दिला आहे. वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या प्रमुख आंदोलनांमध्ये २०११ मधील ऐतिहासिक जन लोकपाल भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आणि जुलै २०२६ मधील NEET पेपर लीक विवादावरून देशव्यापी छात्र आंदोलनाच्या समर्थनात केलेल्या 'मौन आंदोलना'चा समावेश आहे.
    1
    NEET पेपर लीक प्रकरणावरून दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पाऊल उचलले आहे. 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) द्वारे आयोजित दिल्लीतील मार्च आणि आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्यांनी २३ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर) येथील वाडिया पार्कच्या गांधी स्मारकावर २ तासांचे 'मौन आंदोलन' केले.

या दरम्यान अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईबद्दल दुःख व्यक्त केले आहे. लोकशाहीत दडपशाहीऐवजी संवादाचा मार्ग अवलंबला पाहिजे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. याशिवाय जंतर-मंतरवर उपोषणाला बसलेले हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी बळजबरीने हटवल्याबद्दल अण्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून सरकारने त्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असा इशारा दिला आहे.

वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या प्रमुख आंदोलनांमध्ये २०११ मधील ऐतिहासिक जन लोकपाल भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आणि जुलै २०२६ मधील NEET पेपर लीक विवादावरून देशव्यापी छात्र आंदोलनाच्या समर्थनात केलेल्या 'मौन आंदोलना'चा समावेश आहे.
    user_Digambar Yadav
    Digambar Yadav
    Voice of people भुदरगड, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    57 min ago
  • आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण पंढरपूर नगरी विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला भक्तीचा अथांग महासागर चंद्रभागेच्या वाळवंटात अवतरला आहे. 'माऊली-माऊली', 'विठ्ठल विठ्ठल' आणि 'जय जय राम कृष्ण हरी'च्या गजरात लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पायी चालत आलेले दिंड्यांचे ताफे, हातात भगव्या पताका, डोक्यावर तुळशीवृंदावन आणि टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन झालेले लाखो वारकरी पंढरपुरात पोहोचले आहेत. देवाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या लांबलचक रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर अत्यंत भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. मुख्य मंदिरासमोरील श्री संत नामदेव पायरीचा परिसर फुलांच्या विलोभनीय सजावटीने आणि आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे. जात-पात आणि भेदभावाच्या पलीकडे जाऊन समतेचा संदेश देणारी ही वारी परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाची साक्ष देत आहे.
    1
    आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण पंढरपूर नगरी विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला भक्तीचा अथांग महासागर चंद्रभागेच्या वाळवंटात अवतरला आहे. 'माऊली-माऊली', 'विठ्ठल विठ्ठल' आणि 'जय जय राम कृष्ण हरी'च्या गजरात लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पायी चालत आलेले दिंड्यांचे ताफे, हातात भगव्या पताका, डोक्यावर तुळशीवृंदावन आणि टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन झालेले लाखो वारकरी पंढरपुरात पोहोचले आहेत.

देवाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या लांबलचक रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर अत्यंत भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. मुख्य मंदिरासमोरील श्री संत नामदेव पायरीचा परिसर फुलांच्या विलोभनीय सजावटीने आणि आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे. जात-पात आणि भेदभावाच्या पलीकडे जाऊन समतेचा संदेश देणारी ही वारी परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाची साक्ष देत आहे.
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    34 min ago
  • तासगाव येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अधिकराव लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. तासगावात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पोलीस प्रशासन आणि ज्येष्ठ नेत्यांनी अधिकराव लोखंडे यांचा विशेष सत्कार केला.
    2
    तासगाव येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अधिकराव लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. तासगावात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पोलीस प्रशासन आणि ज्येष्ठ नेत्यांनी अधिकराव लोखंडे यांचा विशेष सत्कार केला.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • कराड येथे आयोजित एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आणि आंदोलनाला विद्यार्थी, पालक व नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थित राहून न्याय्य मागण्यांना आपला ठाम पाठिंबा दिला. दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना यावेळी खंबीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या आंदोलनात आदिशक्ती महासंघाच्या अश्विनीताई वेताळ पाटील, कृपा हादवे, सविता काशिद व सर्व विद्यार्थी वर्ग सहभागी झाला होता.
    1
    कराड येथे आयोजित एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आणि आंदोलनाला विद्यार्थी, पालक व नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थित राहून न्याय्य मागण्यांना आपला ठाम पाठिंबा दिला.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना यावेळी खंबीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या आंदोलनात आदिशक्ती महासंघाच्या अश्विनीताई वेताळ पाटील, कृपा हादवे, सविता काशिद व सर्व विद्यार्थी वर्ग सहभागी झाला होता.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.