Shuru
Apke Nagar Ki App…
Sharad Dayedar
More news from महाराष्ट्र and nearby areas
- महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालू विविध कर्मचारी संघटनांचा सहभाग1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Amravati News Update1
- मातृशक्तीचा गौरव, तरुणांसाठी प्रेरणेचा दीप! कनारखेड येथे ‘नारी सन्मान पुरस्कार’ सोहळ्यात समाजोपयोगी उपक्रमांची मेजवानी शेगाव (प्रतिनिधी): “तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज आहे,” असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण लिगाडे यांनी करत सूर्यतेज बहुउद्देशीय संस्था, कनारखेडच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. दि. २४ एप्रिल २०२६ रोजी कनारखेड येथे सूर्यतेज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित ‘नारी सन्मान पुरस्कार गुणगौरव सोहळा’ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. शासकीय सेवेत रुजू झालेल्या पाल्यांच्या मातांचा सन्मान, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, पक्ष्यांसाठी पाणीपात्र वितरण, एलईडी लाईट वाटप, ट्रीगार्ड, सिमेंट बेंच आणि संस्थेच्या नामफलकाचे लोकार्पण अशा बहुआयामी उपक्रमांनी कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची झळाळी मिळाली. संस्थेचे अध्यक्ष शिवाजी महादेव निळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण लिगाडे, गटशिक्षणाधिकारी मो. सलीम, दैनिक सकाळचे समन्वयक संपादक राजेश चौधरी, प्रदीप अनासने, पोलीस पाटील निलेश वाकोडे, मुख्याध्यापक जी.टी. धनोकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मातांच्या संघर्षाला सलाम… ‘नारी सन्मान पुरस्कार’ने गौरव गावातील शासकीय सेवेत रुजू झालेल्या पाल्यांच्या मातांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन ‘नारी सन्मान पुरस्कार’ प्रदान करून विशेष गौरव करण्यात आला. विमलताई शिंदे, मिराताई निळे, सुनंदाताई वाकोडे, कल्पना निळे, सप्तशिला वाकोडे, आशाताई वाकोडे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच देवराव बाबन वाकोडे यांच्या दोनही पाल्यांची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याने त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. समाजोपयोगी उपक्रमांनी वेधले लक्ष उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मातीचे पाणीपात्र, उजेडाचे प्रतीक म्हणून एलईडी लाईट, पर्यावरण संवर्धनासाठी ट्रीगार्ड, तसेच बसण्यासाठी सिमेंट बेंच वाटप व लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमांनी सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले. विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा खजिना संकल्प स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक प्रा. विष्णू निळे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. स्पर्धा परीक्षेची तयारी, मोबाईलचा योग्य वापर, बालसंस्कार यावर प्रवीण लिगाडे यांनी मार्गदर्शन करत तरुणाईला प्रेरणेचा संदेश दिला. गटशिक्षणाधिकारी मोहम्मद सलीम यांनी “मराठी शाळा टिकविण्याचे मोठे आव्हान आहे” असे सांगत शैक्षणिक बांधिलकी अधोरेखित केली. तर राजेश चौधरी यांनी “उत्तम समाज घडविण्यासाठी अशा उपक्रमांची आज गरज आहे,” असे मत व्यक्त केले. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद निळे, विष्णू निळे, शिवशंकर निळे, शिवचरण निळे, पुरुषोत्तम निळे यांच्यासह राजे मित्र मंडळ, भीम जयंती मित्र मंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. महिला, विद्यार्थी व गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय लाव्हरे, प्रास्ताविक रूपाली निळे तर आभार प्रदर्शन अंबिका निळे यांनी केले. कनारखेडच्या मातृशक्तीचा सन्मान आणि तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश देणारा हा सोहळा गावाच्या सामाजिक इतिहासात ठसा उमटवून गेला.1
- खामगाव: गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरामध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. वाढत्या उष्णतेसोबतच शहरात आगीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली असून, आज दुपारी खामगाव-शेगाव रोडवरील SSDV शाळेच्या मागे असलेल्या एका भंगार दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. उन्हाची तीव्रता अधिक असताना आज अचानक शेगाव रोडवर आगीच्या ज्वाला दिसू लागल्या. भंगार साहित्यामध्ये प्लास्टिक आणि इतर ज्वालाग्राही वस्तू असल्याने काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचे लोट इतके भीषण होते की, त्याचे काळे ढग संपूर्ण शहरातून दिसून येत होते. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच खामगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीची भीषणता पाहता एकामागोमाग एक अशा एकूण ४ गाड्यांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे ही आग शेजारील वस्ती किंवा इतर दुकानांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. या भीषण आगीत दुकानातील भंगार साहित्य जळून खाक झाले असले, तरी सुदैवाने वेळीच सावधगिरी बाळगल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की उन्हाच्या तीव्रतेमुळे, याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. वाढत्या उन्हामुळे आणि कोरड्या हवामानामुळे शहरात आगीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे.1
- Post by JKV NEWS 241
- जाचक अटीमुळे मनरेगाचे काम हे ठप्प झाले आहे. बांधण्यात आलेल्या विहिरीचे पैसे शेतक-यांना मिळत नसल्याची ओरड होत आहे. रखडलेले मनरेगा योजनेचे काम त्वरित सुरु करण्यात यावे अशी मागणी शेतक-यांनी केली आहे आणि तश्या प्रकारचे निवेदन घाटंजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.1
- Post by Amravati News Update1