Shuru
Apke Nagar Ki App…
LIVE || पाथरी नगराध्य्क्ष आसेफ खान, व , उपनगराध्य्क्ष आलोक चौदरी यांची पत्रकार परिषद.
Max Parbhani Live
LIVE || पाथरी नगराध्य्क्ष आसेफ खान, व , उपनगराध्य्क्ष आलोक चौदरी यांची पत्रकार परिषद.
More news from Maharashtra and nearby areas
- नांदेड येथील श्याम नगर रुग्णालयात महिलांच्या सोनोग्राफी पुरुष कर्मचारी करत असल्याचा विरोध आज उमटला. दैनिक कलमवीर नांदेड ब्युरो शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक ५ फेब्रुवारी 2026रोजी नांदेड येथील श्याम नगर रुग्णालयात महिलांच्या सोनोग्राफीसाठी पुरुष कर्मचारी असल्याचा विरोध स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तेजपाल सिंघ खेड यांनी व त्यांच्या सहकार्याने जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य अधिकारी संजय पेरके यांना तक्रारी निवेदन देत श्याम नगर रुग्णालयातील महिला च्या सोनोग्राफी करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यास तात्काळ हटवण्याची मागणी करत तथा महिलांच्या सर्वच चाचण्या या फक्त महिला कर्मचाऱ्यांनी कराव्या याची मागणी करत रुग्णालयात होत असलेले असे प्रकार लक्षात घेता रुग्णालयातील सर्वच सोयी सुविधा योग्यरित्या मिळत नसल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य महिला व इतर रुग्णांना मोठ्या प्रमाणात सुविधा होत असल्याचे दिसून आले आहे opd मधील सुविधा देखील अतिशय मंद गतीने तथा कुठल्याही प्रकारे योग्य त्या पद्धतीने होत नसताना सुद्धा दिसत आहे. अपुऱ्या सोयी सुविधा असल्यामुळे सर्वसामान्यांचे आरोग्या विषयी अनेक समस्या आहेत. असे प्रतिपादन नांदेड येथील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते तेजपाल सिंघ खेड यांनी सर्व माहिती देताना व्यक्त केले आहे. या सर्व गंभीर प्रकरणावर तात्काळ योग्य ती कारवाई करून रुग्णालयाच्या कारभारावर लक्ष देण्याची देखील मागणी करण्यासाठी आज बांधवांकडून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके यांना निवेदनाद्वारे केली. तसेच लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी व सर्वसामान्य रुग्णांना योग्य त्या पूरक सोयी सुविधा यावेळी सांगण्यात आले.4
- विकसित भारताच्या दिशेने ठोस पाऊल रोजगार, उद्योग व शेतीला चालना देणारा अर्थसंकल्प – खा.माजी.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण नांदेड : प्रतिनिधी नांदेड, दि. ५ फेब्रुवारी – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या वेगवान आर्थिक प्रगतीला चालना देणारा, सर्वसमावेशक विकासाला बळ देणारा आणि विकसित भारताच्या संकल्पनेला गती देणारा असल्याचे मत खासदार अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. चव्हाण म्हणाले की, या अर्थसंकल्पात युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवत महिला, शेतकरी, उद्योजक, गरीब व वंचित घटकांसाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. आर्थिक वाढीला वेग देणे, जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणे आणि ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर आधारित सर्वसमावेशक विकास साधणे या तीन प्रमुख कर्तव्यांवर हा अर्थसंकल्प आधारित आहे. उद्योगवाढ आणि रोजगारनिर्मितीसाठी बायोफार्मा शक्ती योजना, इंडिया सेमीकंडक्टर मिशन-२, केमिकल पार्क, पारंपरिक औद्योगिक क्लस्टर पुनरुज्जीवन, एमएसएमईला प्रोत्साहन तसेच १२.२ लाख कोटी रुपयांच्या सार्वजनिक भांडवली खर्चाची तरतूद ही अर्थसंकल्पातील महत्त्वाची वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी सांगितले.1
- *लातूरच्या महापौर पदी जयश्री सोनकांबळे तर उपमहापौर पदी डॉ स्नेहल उटगे यांची नियुक्ती काॅंग्रेस पक्षाने केली जाहिर* https://youtu.be/FwqFBiGBm_02
- सत्यम शिवम सुंदरम भक्तीगीत1
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- खाडगांवमध्ये सरपंचासह त्यांच्या कुटुंबाचे मतदार यादीत नावे वेगळी1
- वायरल न्यूज...... जिल्हाधिकाऱ्याने शाळकरी मुलांना दिल्या धमक्या.....! शिक्षणासंदर्भात मागणी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता मागणीला जोर दे त शाळकरी मुलं व त्यांच्या समवेत शिक्षक वर्ग यांच्या वतीने मागणी संदर्भात घोषणा दिल्या त्यांच्या दालनामध्ये मागणीसाठी शाळकरी मुलांनी जाऊन या समस्या अडचणी आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करत असताना जिल्हाधिकाऱ्यांचा राग अनावरण झाला. त्यांनी शिक्षक वर्गासह शाळकरी मुलांवर रोष व्यक्त करत दमदाटी करून धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.1
- 🌧️ अवकाळी वातावरणाचा तूर पिकावर घाला 🌾 खरीप–रब्बी दोन्ही हंगाम शेतकऱ्यांसाठी अडचणीचे नांदेड जिल्ह्यात सध्या तूर पिकाच्या काढणीला वेग आला असला तरी बदलते व ढगाळ वातावरण शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता अनेक ठिकाणी घाईगडबडीत तूर काढणी सुरू आहे. यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने आधीच मोठे नुकसान सहन करावे लागले. उरलेल्या तुरीकडून शेतकऱ्यांना आशा होती; मात्र प्रत्यक्षात उतारा घटल्याने उत्पादनात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे खरीपातील नुकसान भरून काढणे कठीण बनले आहे. तूर पेरणीपासून काढणी, मळणी, वाळवणे व वाहतुकीपर्यंत प्रति क्विंटल सुमारे ६ हजार रुपये खर्च येत आहे. मात्र सध्या बाजारात मिळणारा कमी दर पाहता खर्चही निघत नसून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता शेतकऱ्यांची भिस्त रब्बी पिकांवर असली तरी ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा, करडई आदी पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही अडचणीचा ठरण्याची चिन्हे आहेत. 🚜 हवामानातील अनिश्चितता, उत्पादन घट व बाजारभावातील घसरण यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून 📢 शासनाने तातडीने हमीभाव, नुकसानभरपाई व बाजार हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. #नांदेड #तूर_पीक #अवकाळी_पाऊस #शेतकरी_संकट #खरीप_रब्बी कृषी_समस्या हमीभाव नुकसानभरपाई बाजारभाव शेतकरी_आवाज 🚜🌾 https://www.instagram.com/reel/DUX4LU5DF_D/?igsh=MmNtY3U3b2Y2bWQx1
- Post by गंगाधर जक्कुलवार1