logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ब्रेकिंग : दिलीप ठाकूर यांना टार्गेट करून ऑनलाइन फसवणुकीचा प्रयत्न फसला नांदेड : ऑनलाइन फसवणुकीचा एक नवा प्रकार समोर आला असून, भाजपाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सतर्कतेमुळे मोठा आर्थिक फटका बसण्यापासून बचाव झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना अधिक सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ठाकूर यांना 90399 67959 या अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरची व्यक्ती हिंदीत बोलत होती. त्याने स्वतःला सिमा चा नातेवाईक असल्याचे सांगून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. पुढे त्याने “माझा गुगल पे बंद आहे, माझा भाऊ तुमच्या नंबरवर पैसे पाठवेल, ते तुम्ही उद्या मला नगदी द्या,” असे सांगून घाईत फोन कट केला. फोन संपताच ठाकूर यांच्या मोबाईलवर राजू कुमार या नावाने ₹45,500 जमा झाल्याचा मेसेज आला. मात्र, एवढी मोठी रक्कम पाहून ठाकूर यांना संशय आला. काही वेळातच पुन्हा फोन करून संबंधित व्यक्तीने “चुकून जास्त रक्कम पाठवली गेली आहे, त्यातील 20 हजार रुपये तात्काळ परत पाठवा,” अशी मागणी केली.यावेळी ठाकूर यांनी अधिक चौकशी करत संबंधित व्यक्तीकडून स्पष्ट ओळख मागितली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तर देण्याऐवजी भावनिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. “गरीबाचे पैसे परत करा, नाहीतर शाप लागेल,” असे सांगत घाई निर्माण केली. तरीही ठाकूर यांनी ठाम भूमिका घेतली. यानंतर संबंधित व्यक्तीने शिवीगाळ करत धमक्या देण्यास सुरुवात केली. “तू कुठे आहेस सांग, मी येतो,” असे म्हणत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाकूर यांनी निर्भयपणे उत्तर देत तू येच असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने फोन बंद केला. घटनेनंतर अधिक सतर्क होत ठाकूर यांनी आपल्या खात्याची तपासणी केली असता, प्रत्यक्षात कोणतीही रक्कम जमा झाली नसून केवळ बनावट मेसेज पाठवण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा संबंधित व्यक्तीकडे व्यवहाराचा स्क्रीनशॉट मागितला असता, त्याने हसून फोन कट करून संपर्क तोडला. या प्रकारामुळे, भावनेच्या भरात पैसे परत पाठवण्याची घाई केली असती तर दिलीप ठाकूर यांना स्वतःच्या खात्यातून रक्कम गमवावी लागली असती, हे स्पष्ट झाले आहे. ठाकूर यांच्या सतर्कतेमुळे हा संभाव्य फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. अशा प्रकारच्या फोन कॉल्स किंवा मेसेजेसवर विश्वास ठेवू नये. कोणतीही रक्कम प्राप्त झाल्याचा दावा केल्यास प्रथम बँक खात्यातील व्यवहाराची खात्री करूनच पुढील निर्णय घ्यावा. ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचे ॲड. दिलीप ठाकूर यांनी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे.

on 11 April
user_Informative news
Informative news
Nanded, Maharashtra•
on 11 April
960c9263-2131-42ed-87bb-c565f423fd2f

ब्रेकिंग : दिलीप ठाकूर यांना टार्गेट करून ऑनलाइन फसवणुकीचा प्रयत्न फसला नांदेड : ऑनलाइन फसवणुकीचा एक नवा प्रकार समोर आला असून, भाजपाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सतर्कतेमुळे मोठा आर्थिक फटका बसण्यापासून बचाव झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना अधिक सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ठाकूर यांना 90399 67959 या अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरची व्यक्ती हिंदीत बोलत होती. त्याने स्वतःला सिमा चा नातेवाईक असल्याचे सांगून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. पुढे त्याने “माझा गुगल पे बंद आहे, माझा भाऊ तुमच्या नंबरवर पैसे पाठवेल, ते तुम्ही उद्या मला नगदी द्या,” असे सांगून घाईत फोन कट केला. फोन संपताच ठाकूर यांच्या मोबाईलवर राजू कुमार या नावाने ₹45,500

4f383f2f-24d7-49c0-82d5-3d3220cce855

जमा झाल्याचा मेसेज आला. मात्र, एवढी मोठी रक्कम पाहून ठाकूर यांना संशय आला. काही वेळातच पुन्हा फोन करून संबंधित व्यक्तीने “चुकून जास्त रक्कम पाठवली गेली आहे, त्यातील 20 हजार रुपये तात्काळ परत पाठवा,” अशी मागणी केली.यावेळी ठाकूर यांनी अधिक चौकशी करत संबंधित व्यक्तीकडून स्पष्ट ओळख मागितली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तर देण्याऐवजी भावनिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. “गरीबाचे पैसे परत करा, नाहीतर शाप लागेल,” असे सांगत घाई निर्माण केली. तरीही ठाकूर यांनी ठाम भूमिका घेतली. यानंतर संबंधित व्यक्तीने शिवीगाळ करत धमक्या देण्यास सुरुवात केली. “तू कुठे आहेस सांग, मी येतो,” असे म्हणत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाकूर यांनी निर्भयपणे उत्तर देत तू येच असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने फोन बंद केला. घटनेनंतर अधिक

5f852e1c-0a9d-4b81-a0ef-6d99d537e7f4

सतर्क होत ठाकूर यांनी आपल्या खात्याची तपासणी केली असता, प्रत्यक्षात कोणतीही रक्कम जमा झाली नसून केवळ बनावट मेसेज पाठवण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा संबंधित व्यक्तीकडे व्यवहाराचा स्क्रीनशॉट मागितला असता, त्याने हसून फोन कट करून संपर्क तोडला. या प्रकारामुळे, भावनेच्या भरात पैसे परत पाठवण्याची घाई केली असती तर दिलीप ठाकूर यांना स्वतःच्या खात्यातून रक्कम गमवावी लागली असती, हे स्पष्ट झाले आहे. ठाकूर यांच्या सतर्कतेमुळे हा संभाव्य फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. अशा प्रकारच्या फोन कॉल्स किंवा मेसेजेसवर विश्वास ठेवू नये. कोणतीही रक्कम प्राप्त झाल्याचा दावा केल्यास प्रथम बँक खात्यातील व्यवहाराची खात्री करूनच पुढील निर्णय घ्यावा. ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचे ॲड. दिलीप ठाकूर यांनी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • कोयंबतूरमध्ये एका निष्पाप मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या हृदयद्रावक घटनेशी संबंधित पत्रकार परिषदेत पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी हसताना दिसल्याने, समाजमाध्यमांवर त्यांच्यावर सध्या तीव्र टीका केली जात आहे.
    1
    कोयंबतूरमध्ये एका निष्पाप मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या हृदयद्रावक घटनेशी संबंधित पत्रकार परिषदेत पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी हसताना दिसल्याने, समाजमाध्यमांवर त्यांच्यावर सध्या तीव्र टीका केली जात आहे.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    11 min ago
  • नायगाव तालुक्यातील कारला गावाला अद्यापही पक्का रस्ता मिळालेला नाही, यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. गावकरी हा प्रश्न उपस्थित करत आहेत की, आमदार आणि खासदारांना मिळणारा निधी नेमका कुठे जातो. गावाला मूलभूत रस्ताच उपलब्ध नसेल तर या निधीचा उपयोग काय, असा थेट सवालही विचारण्यात आला आहे.
    1
    नायगाव तालुक्यातील कारला गावाला अद्यापही पक्का रस्ता मिळालेला नाही, यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. गावकरी हा प्रश्न उपस्थित करत आहेत की, आमदार आणि खासदारांना मिळणारा निधी नेमका कुठे जातो. गावाला मूलभूत रस्ताच उपलब्ध नसेल तर या निधीचा उपयोग काय, असा थेट सवालही विचारण्यात आला आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (पदे) येथे १७ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून तीन कुटुंबांचे संसार पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. या घटनेनंतर बाधित कुटुंबांना शासनाने तातडीने प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यच्या वतीने तहसीलदार मुखेड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही आग श्री नागोराव निवृत्ती वादे यांच्या घराला लागली आणि वेगाने शेजारील हणमंत निवृत्ती वादे व मारोती निवृत्ती वादे यांच्या घरांपर्यंत पसरली. काही क्षणांतच तिन्ही घरे जळून खाक झाली. या आगीत अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य, पत्रे, घरातील लाकडी वासे, तसेच सर्व जीवनावश्यक वस्तू भस्मसात झाल्या. विशेषतः, श्री नागोराव वादे यांनी गावालगत प्लॉट खरेदीसाठी घरात ठेवलेले सुमारे चार लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीचे सोन्याचे दागिनेही या आगीत जळून गेले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या भीषण घटनेमुळे संबंधित कुटुंबांपुढे राहण्याचा आणि उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, त्यांना केवळ अंगावरील कपड्यांवरच समाधान मानावे लागत आहे. या घटनेचा पंचनामा उंद्री (पदे) येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी गावातील पंचांसमक्ष करून तहसील कार्यालयात सादर केला आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन बाधित तिन्ही कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पुन्हा निवेदनाद्वारे करण्यात आली. हेच निवेदन पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, मुखेड यांनाही सादर करण्यात आले आहे. यावेळी स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यचे मुख्य मार्गदर्शक श्री विश्वनाथरावजी कोलमकर, प्रदेशाध्यक्ष श्री विजयराव देवडे लहानकर, प्रदेश सचिव श्री शिवाजीराव पांगरेकर, युवा प्रदेशाध्यक्ष बालाजीराव घुमलवाड, जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव विभुते, मुख्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव शिरोळे, जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय राजरवार, सोशल मीडिया प्रमुख बालाजी माधवराव चक्रधर, लोहा तालुका अध्यक्ष कपिल कानगुलकर, मुखेड तालुका अध्यक्ष तुकाराम तेलंगे, केरुर येथील माजी सरपंच प्रभाकर पठाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच माजी सरपंच माधवराव तुकाराम पाटील वडजे, सरपंच प्रतिनिधी सुधाकर गन्लेवार, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील सूर्यवंशी, रमेशराव आडबलवार, पत्रकार मारोती गणेशराव वडजे, पत्रकार बालाजी पाटील शिंदे, पत्रकार मनोज पाटील बिरादार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही बाधित कुटुंबांना न्याय मिळावा अशी तीव्र मागणी केली आहे.
    3
    मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (पदे) येथे १७ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून तीन कुटुंबांचे संसार पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. या घटनेनंतर बाधित कुटुंबांना शासनाने तातडीने प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यच्या वतीने तहसीलदार मुखेड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ही आग श्री नागोराव निवृत्ती वादे यांच्या घराला लागली आणि वेगाने शेजारील हणमंत निवृत्ती वादे व मारोती निवृत्ती वादे यांच्या घरांपर्यंत पसरली. काही क्षणांतच तिन्ही घरे जळून खाक झाली. या आगीत अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य, पत्रे, घरातील लाकडी वासे, तसेच सर्व जीवनावश्यक वस्तू भस्मसात झाल्या. विशेषतः, श्री नागोराव वादे यांनी गावालगत प्लॉट खरेदीसाठी घरात ठेवलेले सुमारे चार लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीचे सोन्याचे दागिनेही या आगीत जळून गेले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या भीषण घटनेमुळे संबंधित कुटुंबांपुढे राहण्याचा आणि उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, त्यांना केवळ अंगावरील कपड्यांवरच समाधान मानावे लागत आहे.

या घटनेचा पंचनामा उंद्री (पदे) येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी गावातील पंचांसमक्ष करून तहसील कार्यालयात सादर केला आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन बाधित तिन्ही कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पुन्हा निवेदनाद्वारे करण्यात आली. हेच निवेदन पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, मुखेड यांनाही सादर करण्यात आले आहे. यावेळी स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यचे मुख्य मार्गदर्शक श्री विश्वनाथरावजी कोलमकर, प्रदेशाध्यक्ष श्री विजयराव देवडे लहानकर, प्रदेश सचिव श्री शिवाजीराव पांगरेकर, युवा प्रदेशाध्यक्ष बालाजीराव घुमलवाड, जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव विभुते, मुख्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव शिरोळे, जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय राजरवार, सोशल मीडिया प्रमुख बालाजी माधवराव चक्रधर, लोहा तालुका अध्यक्ष कपिल कानगुलकर, मुखेड तालुका अध्यक्ष तुकाराम तेलंगे, केरुर येथील माजी सरपंच प्रभाकर पठाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच माजी सरपंच माधवराव तुकाराम पाटील वडजे, सरपंच प्रतिनिधी सुधाकर गन्लेवार, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील सूर्यवंशी, रमेशराव आडबलवार, पत्रकार मारोती गणेशराव वडजे, पत्रकार बालाजी पाटील शिंदे, पत्रकार मनोज पाटील बिरादार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही बाधित कुटुंबांना न्याय मिळावा अशी तीव्र मागणी केली आहे.
    user_मारोती  वडजे उंद्रीकर पत्रकार
    मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • परभणी शहरात तरुणांमध्ये नशा करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. न्यू मराठीचे परभणी प्रतिनिधी मोहसीन खान यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या गंभीर स्थितीवर सामाजिक कार्यकर्ते सय्यद फादर यांनी चिंता व्यक्त केली असून, त्यांनी पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
    1
    परभणी शहरात तरुणांमध्ये नशा करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. न्यू मराठीचे परभणी प्रतिनिधी मोहसीन खान यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या गंभीर स्थितीवर सामाजिक कार्यकर्ते सय्यद फादर यांनी चिंता व्यक्त केली असून, त्यांनी पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    8 min ago
  • समर्पण प्रतिष्ठानने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे सेवानिवृत्त पोलिसांना महाराष्ट्र विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
    1
    समर्पण प्रतिष्ठानने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे सेवानिवृत्त पोलिसांना महाराष्ट्र विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
  • परभणी जिल्ह्यात, दि. २५ रोजी परभणी-परळी रेल्वे दुहेरीकरण व बाह्य वळण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गंगाखेड व सुरळवाडी शिवारातील शेतकरी, प्लॉटधारक आणि कुटुंबीयांच्या विविध मागण्यांसाठी दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबाद येथील महाप्रबंधकांना एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यावेळी किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. राजन क्षीरसागर यांनी आरोप केला की, गंगाखेड उपविभागीय कार्यालयाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करून जमीन संपादनाचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन संपादन मान्य नसून, या प्रकल्पासाठी शेतकरी एक इंचही जमीन देणार नाहीत. सरकारने आपली अन्यायकारक भूमिका कायम ठेवल्यास असहकार आंदोलन छेडण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. निवेदनात बाधितांच्या अनेक प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये बाजारभावाच्या पाचपट मोबदला देणे, बाधित कुटुंबातील सदस्यांना भारतीय रेल्वेमध्ये नोकरी देणे, संयुक्त मोजणी अमान्य असल्याने करण्यात आलेले मोजमाप रद्द करणे, तसेच गुंठेवारी कायद्याअंतर्गत संपादित प्लॉटधारकांना ताबेदारीच्या आधारे योग्य मोबदला देण्याची मागणी समाविष्ट आहे. याशिवाय, वक्फ बोर्डाच्या जमिनी, झोपडपट्टीधारकांचे प्लॉट, बांधकाम पूर्ण झालेली घरे, अकृषक प्लॉट, महाराष्ट्र गुंठेवारी अधिनियम २००१ अंतर्गत बगर नोंदणी प्लॉट तसेच महाराष्ट्र इरिगेशन अॅक्ट १९७६ अंतर्गत कमांड क्षेत्रातील ओलीताच्या जमिनींसह सर्व प्रकारच्या प्रकल्पग्रस्तांना संपूर्ण मोबदला देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली. महाप्रबंधकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान बाधितांच्या समस्या व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी किसान सभेचे अध्यक्ष कॉ. राजन क्षीरसागर, जिल्हा सचिव कॉ. ओंकार पवार, भाई गोपीनाथ भोसले यांच्यासह अनेक बाधित शेतकरी व प्लॉटधारक उपस्थित होते.
    1
    परभणी जिल्ह्यात, दि. २५ रोजी परभणी-परळी रेल्वे दुहेरीकरण व बाह्य वळण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गंगाखेड व सुरळवाडी शिवारातील शेतकरी, प्लॉटधारक आणि कुटुंबीयांच्या विविध मागण्यांसाठी दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबाद येथील महाप्रबंधकांना एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. राजन क्षीरसागर यांनी आरोप केला की, गंगाखेड उपविभागीय कार्यालयाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करून जमीन संपादनाचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन संपादन मान्य नसून, या प्रकल्पासाठी शेतकरी एक इंचही जमीन देणार नाहीत. सरकारने आपली अन्यायकारक भूमिका कायम ठेवल्यास असहकार आंदोलन छेडण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

निवेदनात बाधितांच्या अनेक प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये बाजारभावाच्या पाचपट मोबदला देणे, बाधित कुटुंबातील सदस्यांना भारतीय रेल्वेमध्ये नोकरी देणे, संयुक्त मोजणी अमान्य असल्याने करण्यात आलेले मोजमाप रद्द करणे, तसेच गुंठेवारी कायद्याअंतर्गत संपादित प्लॉटधारकांना ताबेदारीच्या आधारे योग्य मोबदला देण्याची मागणी समाविष्ट आहे. याशिवाय, वक्फ बोर्डाच्या जमिनी, झोपडपट्टीधारकांचे प्लॉट, बांधकाम पूर्ण झालेली घरे, अकृषक प्लॉट, महाराष्ट्र गुंठेवारी अधिनियम २००१ अंतर्गत बगर नोंदणी प्लॉट तसेच महाराष्ट्र इरिगेशन अॅक्ट १९७६ अंतर्गत कमांड क्षेत्रातील ओलीताच्या जमिनींसह सर्व प्रकारच्या प्रकल्पग्रस्तांना संपूर्ण मोबदला देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली. महाप्रबंधकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान बाधितांच्या समस्या व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी किसान सभेचे अध्यक्ष कॉ. राजन क्षीरसागर, जिल्हा सचिव कॉ. ओंकार पवार, भाई गोपीनाथ भोसले यांच्यासह अनेक बाधित शेतकरी व प्लॉटधारक उपस्थित होते.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • आज MIM नेते वारिस पठाण यांनी बांद्रा येथील गरीब नगरच्या नागरिकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सरकारच्या एका कारवाईवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले.
    1
    आज MIM नेते वारिस पठाण यांनी बांद्रा येथील गरीब नगरच्या नागरिकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सरकारच्या एका कारवाईवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.