logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ब्रेकिंग : दिलीप ठाकूर यांना टार्गेट करून ऑनलाइन फसवणुकीचा प्रयत्न फसला नांदेड : ऑनलाइन फसवणुकीचा एक नवा प्रकार समोर आला असून, भाजपाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सतर्कतेमुळे मोठा आर्थिक फटका बसण्यापासून बचाव झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना अधिक सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ठाकूर यांना 90399 67959 या अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरची व्यक्ती हिंदीत बोलत होती. त्याने स्वतःला सिमा चा नातेवाईक असल्याचे सांगून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. पुढे त्याने “माझा गुगल पे बंद आहे, माझा भाऊ तुमच्या नंबरवर पैसे पाठवेल, ते तुम्ही उद्या मला नगदी द्या,” असे सांगून घाईत फोन कट केला. फोन संपताच ठाकूर यांच्या मोबाईलवर राजू कुमार या नावाने ₹45,500 जमा झाल्याचा मेसेज आला. मात्र, एवढी मोठी रक्कम पाहून ठाकूर यांना संशय आला. काही वेळातच पुन्हा फोन करून संबंधित व्यक्तीने “चुकून जास्त रक्कम पाठवली गेली आहे, त्यातील 20 हजार रुपये तात्काळ परत पाठवा,” अशी मागणी केली.यावेळी ठाकूर यांनी अधिक चौकशी करत संबंधित व्यक्तीकडून स्पष्ट ओळख मागितली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तर देण्याऐवजी भावनिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. “गरीबाचे पैसे परत करा, नाहीतर शाप लागेल,” असे सांगत घाई निर्माण केली. तरीही ठाकूर यांनी ठाम भूमिका घेतली. यानंतर संबंधित व्यक्तीने शिवीगाळ करत धमक्या देण्यास सुरुवात केली. “तू कुठे आहेस सांग, मी येतो,” असे म्हणत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाकूर यांनी निर्भयपणे उत्तर देत तू येच असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने फोन बंद केला. घटनेनंतर अधिक सतर्क होत ठाकूर यांनी आपल्या खात्याची तपासणी केली असता, प्रत्यक्षात कोणतीही रक्कम जमा झाली नसून केवळ बनावट मेसेज पाठवण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा संबंधित व्यक्तीकडे व्यवहाराचा स्क्रीनशॉट मागितला असता, त्याने हसून फोन कट करून संपर्क तोडला. या प्रकारामुळे, भावनेच्या भरात पैसे परत पाठवण्याची घाई केली असती तर दिलीप ठाकूर यांना स्वतःच्या खात्यातून रक्कम गमवावी लागली असती, हे स्पष्ट झाले आहे. ठाकूर यांच्या सतर्कतेमुळे हा संभाव्य फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. अशा प्रकारच्या फोन कॉल्स किंवा मेसेजेसवर विश्वास ठेवू नये. कोणतीही रक्कम प्राप्त झाल्याचा दावा केल्यास प्रथम बँक खात्यातील व्यवहाराची खात्री करूनच पुढील निर्णय घ्यावा. ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचे ॲड. दिलीप ठाकूर यांनी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे.

on 11 April
user_Informative news
Informative news
Nanded, Maharashtra•
on 11 April
960c9263-2131-42ed-87bb-c565f423fd2f

ब्रेकिंग : दिलीप ठाकूर यांना टार्गेट करून ऑनलाइन फसवणुकीचा प्रयत्न फसला नांदेड : ऑनलाइन फसवणुकीचा एक नवा प्रकार समोर आला असून, भाजपाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सतर्कतेमुळे मोठा आर्थिक फटका बसण्यापासून बचाव झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना अधिक सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ठाकूर यांना 90399 67959 या अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरची व्यक्ती हिंदीत बोलत होती. त्याने स्वतःला सिमा चा नातेवाईक असल्याचे सांगून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. पुढे त्याने “माझा गुगल पे बंद आहे, माझा भाऊ तुमच्या नंबरवर पैसे पाठवेल, ते तुम्ही उद्या मला नगदी द्या,” असे सांगून घाईत फोन कट केला. फोन संपताच ठाकूर यांच्या मोबाईलवर राजू कुमार या नावाने ₹45,500

4f383f2f-24d7-49c0-82d5-3d3220cce855

जमा झाल्याचा मेसेज आला. मात्र, एवढी मोठी रक्कम पाहून ठाकूर यांना संशय आला. काही वेळातच पुन्हा फोन करून संबंधित व्यक्तीने “चुकून जास्त रक्कम पाठवली गेली आहे, त्यातील 20 हजार रुपये तात्काळ परत पाठवा,” अशी मागणी केली.यावेळी ठाकूर यांनी अधिक चौकशी करत संबंधित व्यक्तीकडून स्पष्ट ओळख मागितली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तर देण्याऐवजी भावनिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. “गरीबाचे पैसे परत करा, नाहीतर शाप लागेल,” असे सांगत घाई निर्माण केली. तरीही ठाकूर यांनी ठाम भूमिका घेतली. यानंतर संबंधित व्यक्तीने शिवीगाळ करत धमक्या देण्यास सुरुवात केली. “तू कुठे आहेस सांग, मी येतो,” असे म्हणत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाकूर यांनी निर्भयपणे उत्तर देत तू येच असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने फोन बंद केला. घटनेनंतर अधिक

5f852e1c-0a9d-4b81-a0ef-6d99d537e7f4

सतर्क होत ठाकूर यांनी आपल्या खात्याची तपासणी केली असता, प्रत्यक्षात कोणतीही रक्कम जमा झाली नसून केवळ बनावट मेसेज पाठवण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा संबंधित व्यक्तीकडे व्यवहाराचा स्क्रीनशॉट मागितला असता, त्याने हसून फोन कट करून संपर्क तोडला. या प्रकारामुळे, भावनेच्या भरात पैसे परत पाठवण्याची घाई केली असती तर दिलीप ठाकूर यांना स्वतःच्या खात्यातून रक्कम गमवावी लागली असती, हे स्पष्ट झाले आहे. ठाकूर यांच्या सतर्कतेमुळे हा संभाव्य फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. अशा प्रकारच्या फोन कॉल्स किंवा मेसेजेसवर विश्वास ठेवू नये. कोणतीही रक्कम प्राप्त झाल्याचा दावा केल्यास प्रथम बँक खात्यातील व्यवहाराची खात्री करूनच पुढील निर्णय घ्यावा. ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचे ॲड. दिलीप ठाकूर यांनी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना महत्त्वपूर्ण आवाहन करत सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जनगणनेचे महत्त्व, प्रशासनाची तयारी आणि नागरिकांची भूमिका यावर प्रकाश टाकला. जिल्हाधिकारी म्हणाले की, जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध योजना, निधी वाटप, तसेच सामाजिक व आर्थिक धोरणांची आखणी ही जनगणनेच्या अचूक आकडेवारीवर आधारित असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे आणि अचूक माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाच्या तयारीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, जनगणनेसाठी जिल्ह्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर दिला जात आहे. तसेच, नागरिकांनी कोणतीही भीती किंवा गैरसमज न ठेवता जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, याची हमीही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जनगणना ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून त्यातूनच जिल्ह्याचा आणि देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. त्यामुळे “माझी जनगणना, माझी जबाबदारी” या भावनेतून सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार असून, ग्रामीण व शहरी भागात जनगणनेविषयी जागरूकता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
    1
    आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना महत्त्वपूर्ण आवाहन करत सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जनगणनेचे महत्त्व, प्रशासनाची तयारी आणि नागरिकांची भूमिका यावर प्रकाश टाकला.
जिल्हाधिकारी म्हणाले की, जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध योजना, निधी वाटप, तसेच सामाजिक व आर्थिक धोरणांची आखणी ही जनगणनेच्या अचूक आकडेवारीवर आधारित असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे आणि अचूक माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रशासनाच्या तयारीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, जनगणनेसाठी जिल्ह्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर दिला जात आहे.
तसेच, नागरिकांनी कोणतीही भीती किंवा गैरसमज न ठेवता जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, याची हमीही त्यांनी दिली.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जनगणना ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून त्यातूनच जिल्ह्याचा आणि देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. त्यामुळे “माझी जनगणना, माझी जबाबदारी” या भावनेतून सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार असून, ग्रामीण व शहरी भागात जनगणनेविषयी जागरूकता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
    user_MUKRAMABAD MDL
    MUKRAMABAD MDL
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • परभणी (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील लोहगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आग लागली तेव्हा सर्व दुकानदार गावातील एका लग्नसमारंभासाठी गेले होते, त्यामुळे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लोहगावातील बाजारपेठ परिसरात अचानक दुपारच्या च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आग लहान स्वरूपाची होती, मात्र काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले आणि शेजारील चार दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.
    1
    परभणी (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील लोहगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आग लागली तेव्हा सर्व दुकानदार गावातील एका लग्नसमारंभासाठी गेले होते, त्यामुळे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहगावातील बाजारपेठ परिसरात अचानक दुपारच्या च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आग लहान स्वरूपाची होती, मात्र काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले आणि शेजारील चार दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Shaikh irfan Shaikh isa
    1
    Post by Shaikh irfan Shaikh isa
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाच्या तक्रारींकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला. मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत त्यांनी संताप व्यक्त केला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोषी अधिकारी आणि संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच, ड्रोनच्या माध्यमातून सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी आणि तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद ठेवावे, अशीही मागणी पुढे करण्यात आली. या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
    1
    प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन
मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाच्या तक्रारींकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला. मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत त्यांनी संताप व्यक्त केला.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोषी अधिकारी आणि संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच, ड्रोनच्या माध्यमातून सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी आणि तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद ठेवावे, अशीही मागणी पुढे करण्यात आली.
या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    24 min ago
  • हातात पिस्तूल घेतलेला पिस्तुल्या महाराज कोट्यावधी रुपये घेऊन फरार. वारकऱ्यांच्या गंभीर आरोपांनी खळबळ. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026. लातूर शहरात खंडापूर गावात हरिनाम सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास भाविक भक्तांनी केलेल्या दानाची रक्कम कोट्यावधी रुपयाने जमा झाली असताना ही रक्कम किशोर शिवनीकर या महाराजांच्या ताब्यात होती ही रक्कम घेऊन फरार झाल्याची बातमी न्यूज 18 मराठी चॅनलने प्रसारित केली आहे.
    1
    हातात पिस्तूल घेतलेला पिस्तुल्या महाराज कोट्यावधी रुपये घेऊन फरार.
वारकऱ्यांच्या गंभीर आरोपांनी खळबळ. 
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर.
मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026.
लातूर शहरात खंडापूर गावात हरिनाम सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास भाविक भक्तांनी केलेल्या दानाची रक्कम कोट्यावधी रुपयाने जमा झाली असताना ही रक्कम किशोर शिवनीकर या महाराजांच्या ताब्यात होती ही रक्कम घेऊन फरार झाल्याची बातमी न्यूज 18 मराठी चॅनलने प्रसारित केली आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • अप्पर तहसील कार्यालय मागणीसाठी शेवली कडकडीत बंद आठवडी बाजारही बंद ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
    1
    अप्पर तहसील कार्यालय मागणीसाठी शेवली कडकडीत बंद आठवडी बाजारही बंद ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
    user_Suresh D Dawane Patil
    Suresh D Dawane Patil
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • RCC band kam jila V final kar kar milega quality mein kam aur medium Dam
    1
    RCC band kam jila V final kar kar milega quality mein kam aur medium Dam
    user_Shahrukh Inamdar
    Shahrukh Inamdar
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • लातूर शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही शेतकऱ्याला शेत रस्त्यांची अडचण येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी अत्यंत दक्ष राहून ही मोहीम राबवावी, रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावे, या सर्वच रस्त्यांना क्रमांक द्यावेत अशा सूचना अशा सूचना आमदार अमित देशमुख यांनी दिल्या. आमदार अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची बैठक झाली. यावेळी लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, लातूर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक साहेबराव नरवाडे, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, २१ शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, भूमीअभिलेख अधिकारी अशोकराव चव्हाण, वनपरीमंडळ अधिकारी लातूर निलेश बिराजदार, नायब तहसीलदार परमेश्वर कांबळे, नायब तहसीलदार सुधीर देशमुख, आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी सर्व मंडळ अधिकारी उपस्थित होते.आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते पाच प्रगतीशील शेतकरी सादुराम मस्के, शंकर कुलकर्णी, लक्ष्मण सपाटे, राहुल पवार, लक्ष्मण मोरे यांना मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सर्व नियुक्त झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.हाती घेतलेली कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, सर्व शेत/ पानंद रस्त्यांची नोंद नकाशावर राहील हे पाहावे, या रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावे, या सर्वच रस्त्यांना क्रमांक द्यावेत अशा सूचना या बैठकीदरम्यान दिल्या आहेत.
    1
    लातूर शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही शेतकऱ्याला शेत रस्त्यांची अडचण येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी अत्यंत दक्ष राहून ही मोहीम राबवावी,  रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावे, या सर्वच रस्त्यांना क्रमांक द्यावेत अशा सूचना अशा सूचना  आमदार अमित  देशमुख यांनी दिल्या. आमदार अमित  देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली  सोमवारी मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची बैठक   झाली.  यावेळी लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत  बैले, लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, लातूर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक साहेबराव नरवाडे, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, २१ शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, भूमीअभिलेख अधिकारी अशोकराव चव्हाण,  वनपरीमंडळ अधिकारी लातूर निलेश बिराजदार, नायब तहसीलदार परमेश्वर कांबळे, नायब तहसीलदार सुधीर देशमुख,  आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी  सर्व मंडळ अधिकारी उपस्थित होते.आमदार अमित  देशमुख यांच्या हस्ते पाच प्रगतीशील शेतकरी सादुराम मस्के, शंकर कुलकर्णी, लक्ष्मण सपाटे, राहुल पवार, लक्ष्मण मोरे यांना मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सर्व नियुक्त झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.हाती घेतलेली कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, सर्व शेत/ पानंद रस्त्यांची नोंद नकाशावर राहील हे पाहावे, या रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावे, या सर्वच रस्त्यांना क्रमांक द्यावेत अशा सूचना या बैठकीदरम्यान दिल्या आहेत.
    user_Latur 24
    Latur 24
    Local News Reporter शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.