Shuru
Apke Nagar Ki App…
मनमाड जवळील दहेगाव परिसरात भीषण अपघात; भररस्त्यात आयशर टेम्पो उलटला, वाहतूक ठप्प मनमाडजवळील दहेगाव परिसरामध्ये एक भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. रस्त्यावरून धावणारा एक आयशर टेम्पो (ट्रक) थेट मध्यभागातच पलटी झाला. हा अपघात इतका विचित्र होता की ट्रक रस्त्याच्या मधोमध एका बाजूला पूर्णपणे आडवा झाला आहे.स्थानिक नागरिकांची मदतीसाठी धावअपघात घडताच आजूबाजूचे वाहनधारक, प्रवासी आणि स्थानिक गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. टेम्पोमध्ये अडकलेल्या चालकाला आणि सहकाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली असून प्रत्यक्षदर्शींकडून बचावकार्य आणि मदतकार्य सुरू आहे.
Janardhan nitin jadhav
मनमाड जवळील दहेगाव परिसरात भीषण अपघात; भररस्त्यात आयशर टेम्पो उलटला, वाहतूक ठप्प मनमाडजवळील दहेगाव परिसरामध्ये एक भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. रस्त्यावरून धावणारा एक आयशर टेम्पो (ट्रक) थेट मध्यभागातच पलटी झाला. हा अपघात इतका विचित्र होता की ट्रक रस्त्याच्या मधोमध एका बाजूला पूर्णपणे आडवा झाला आहे.स्थानिक नागरिकांची मदतीसाठी धावअपघात घडताच आजूबाजूचे वाहनधारक, प्रवासी आणि स्थानिक गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. टेम्पोमध्ये अडकलेल्या चालकाला आणि सहकाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली असून प्रत्यक्षदर्शींकडून बचावकार्य आणि मदतकार्य सुरू आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे येवल्यात दिमाखात लोकार्पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी येवला शहरात उभारण्यात आलेल्या 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारका'चे लोकार्पण राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. हे स्मारक केवळ वास्तू नसून सामाजिक न्याय, समता आणि श्रमिकांच्या सन्मानाची प्रेरणाभूमी ठरेल, असे प्रतिपादन मंत्री भुजबळ यांनी केले. लोकार्पण सोहळ्यात बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, "पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे," हा अण्णाभाऊंचा विचार आजही दिशादर्शक आहे. अण्णाभाऊंनी आपल्या ज्वलंत शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गाजवली आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनमानसात पोहोचवले. त्यांचे 'माझी मैना गावावर राहिली' हे गीत मराठी अस्मितीचे प्रतीक आहे. तसेच, ३५ हून अधिक कादंबऱ्या लिहून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या प्रसिद्ध 'फकिरा' कादंबरीचा रशियन भाषेतील अनुवाद हा मराठी साहित्याचा जागतिक सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रमुख उपस्थिती: या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जि.प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- करंजवण धरण 90 टक्के भरले.. :- नाशिकच्या दिंडोरीमध्ये कोसळत असलेल्या मुसळदार पावसाने करंजवण धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने धरणाने 90 टक्क्याचा टप्पा भर केला असून,धरणातून 19 हजार क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. करंजवन धरण भरल्याने नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या मनमाड शहराचा पिण्याचा पाण्याचा मिटला. आ. सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून करंजवण - करंजवण थेट पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्याने मनमाडकर नागरिकांनी समाधान व्यक्त की. तर शेती सिंचनाचा पाण्याचा प्रश्नही मार्गी लागली..1
- ट्रक चालकाने वैतागून रस्त्यावर ओतत इथेनॉल मिश्रित डिझेलचा पर्दाफाश केला1
- काळ्या बाजारातील १९ लाखांचा युरिया जप्त; दोघांना अटक...... निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात काळ्या बाजारात विक्रीसाठी आणलेला सुमारे १९ लाख रुपये किमतीचा युरिया लासलगाव पोलिसांनी आणि जिल्हास्तरीय भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विंचूर परिसरात युरियाचा साठा अवैधरित्या विक्रीसाठी आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लासलगाव पोलीस आणि जिल्हास्तरीय भरारी पथकाने संयुक्त सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान सुमारे १९ लाख रुपये किमतीचा युरिया जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या अवैध व्यवहारामागील इतर संबंधितांचा शोधही पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे कृषी निविष्ठांच्या काळ्या बाजाराला मोठा आळा बसल्याचे बोलले जात आहे.4
- Post by लोखंडे संभाजी नगर पत्रकार1
- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी राहुरी फॅक्टरी, प्रतिनिधी : लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देवळाली प्रवरा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्री. देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या व पेन देण्यात आले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक नंदूभाऊ उल्हारे, शहराध्यक्ष शरदभाऊ लोखंडे, उपशहराध्यक्ष सुनीलभाऊ रोकडे, सेक्रेटरी सागरभाऊ उल्हारे तसेच सदस्य करण लोंढे, संदीप तोडमल, प्रफुल शिंदे उपस्थित होते. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेब लोखंडे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा संघटक नंदूभाऊ उल्हारे यांच्या वतीने गरजू दोन विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश भेट देण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षण, सामाजिक समता आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.1
- येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला: येवला शहरातील विंचूर चौफुली पोलीस चौकीसमोर रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकच्या धडकेत निर्मला बाळासाहेब भिसे (वय ५०, रा. पैलवान गल्ली, येवला) या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विंचूर चौफुली ते फत्तेबुरुज नाका परिसरात रस्त्यावर एकही दिशाफलक (Signboard) लावण्यात आलेला नाही. परिणामी, चालकांना अचानक ब्रेक मारावे लागतात किंवा वाहने मागे-पुढे करावी लागतात, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच एका निष्पाप महिलेचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, चौफुलीवर तातडीने दिशाफलक बसवण्याची जोरदार मागणी होत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- हाभामटाराहुरीफैक्ट्रीचाआहेअविनाशकोल्हेआहेआईसोबतसेक्सकरतो हाभामटाराहुरीफैक्ट्रीचाआहेअविनाशकोल्हेआहेआईसोबसेक्सकरतोयाचीआईयाचाबुलाघेतीटोडामधी1