Shuru
Apke Nagar Ki App…
vision submit 2026 semi conductor exhibition at Bangalore ಭಾರತೀಯ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಮತ್ತು ಸೆಮಿಕಂಡಕ್ಟರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ - IESA ವಿಷನ್ ಸಮ್ಮಿಟ್
SSV TV NEWS
vision submit 2026 semi conductor exhibition at Bangalore ಭಾರತೀಯ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಮತ್ತು ಸೆಮಿಕಂಡಕ್ಟರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ - IESA ವಿಷನ್ ಸಮ್ಮಿಟ್
More news from महाराष्ट्र and nearby areas
- 27 फेब्रुवारीनंतर सीसीआय खरेदी बंद; कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत हिंगणघाट..वर्धा यंदाच्या अतिवृष्टीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आता आणखी एक मोठे संकट ओढवले आहे. २७ फेब्रुवारीपासून Cotton Corporation of India (सीसीआय) कापूस खरेदी बंद होणार असल्याच्या अल्टिमेटममुळे शेतकरी पूर्णतः संकटात सापडला आहे. वर्धा जिल्हा हा प्रमुख कापूस उत्पादक पट्टा असून जिल्ह्यासह राज्यभरात खरेदी थांबणार असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी व उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या पावसामुळे सुरुवातीला कापूस वेचणीला उशीर झाला. मात्र जानेवारीच्या अखेरीपासून आणि फेब्रुवारीत मोठ्या प्रमाणात कापूस निघू लागला असून अजूनही शेतात मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे. याच काळात चण्याची कापणी सुरू झाल्याने शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक शेतं अक्षरशः पांढरी पडली आहेत. दरम्यान, सीसीआयकडे आधारभूत दराने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत नोंदणी केली होती. काहींना मंजुरी मिळाली, तर काहींना त्रुटी दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र २७ फेब्रुवारीची अंतिम मुदत जाहीर होताच चार दिवस आधीपासून स्लॉट बुकिंग बंद करण्यात आल्याने नव्याने नोंदणी अथवा विक्री करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात कापूस विकण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील व राज्यातील नामांकित कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट व व कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर येथे शेतकऱ्यांनी सीसीआय खरेदीची मुदत किमान ३१ मार्चपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील सर्व कापूस खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आर्थिक संकट अधिक तीव्र होईल, असा इशारा शेतकरी वर्गातून दिला जात आहे.1
- ० नियोजन विभागाचा निधी वाटपात असमतोल ० नागरी व अन्नपुरवठा विभागातील गोंधळ ० विकासाच्या घोषणा व जाहीरात बाजी आदि प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडले. उमरेड (प्रतिनिधी ) राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमरेड विधानसभेचे आक्रमक आणि अभ्यासू आमदार संजय मेश्राम यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरत सभागृहात जोरदार हल्लाबोल चढवला. मुंबई येथील विधिमंडळात मध्ये पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा आणि नियोजन विभागाच्या कारभारावर थेट आणि कठोर शब्दांत टीका केली. आजच्या कामकाजात तिन्ही विभागांच्या कपात सूचनांवर चर्चा पार पडत असताना आमदार मेश्राम यांनी लेखी स्वरूपात कपात सूचना अध्यक्षांकडे सादर केल्या आपल्या भाषणाची सुरुवात करताना मेश्राम यांनी उमरेड मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप केला. ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची रिक्त पदे औषधांचा तुटवडा उपकरणांची कमतरता रुग्णांना मिळणारी अपुरी सेवा या सर्व मुद्द्यांचा पाढा वाचत त्यांनी सरकारला प्रश्न विचारला “आरोग्य हा मूलभूत हक्क असताना नागरिकांना मूलभूत सुविधा का मिळत नाहीत?” त्यांनी ठामपणे सांगितले की, केवळ कागदोपत्री योजना जाहीर करून जनतेची फसवणूक केली जात आहे. निधी मंजूर होतो, पण प्रत्यक्ष काम मात्र होत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला अन्नधान्य वितरणातील गोंधळ, रेशनकार्डधारकांना वेळेवर धान्य न मिळणे, अपात्रांना लाभ आणि पात्रांना वंचित ठेवण्याच्या तक्रारी यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अन्न व नागरी पुरवठा विभागा सार्वजनिक वितरण व्यवस्थेत, रेशन दुकाने पारदर्शकता नसल्याचा आरोप करत त्यांनी गोर गरीब जनता मोफत धान्य योजनेपासून वंचित राहत आहे.चौकशीची मागणी केली. भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली. नियोजन विभागाच्या निधी वाटपातील असमतोल आणि उमरेड मतदारसंघाकडे होणारे दुर्लक्ष यावर मेश्राम यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. या सर्व मुद्द्यांचा उल्लेख करत त्यांनी सरकारला जाब विचारला. “विकासाच्या घोषणा केवळ जाहिरातीपुरत्या आहेत का?” असा सवाल करत त्यांनी सरकारला कठोर शब्दांत सुनावले. सभागृहात तापले वातावरण मेश्राम यांच्या आक्रमक आणि मुद्देसूद भाषणामुळे सभागृहात काही काळ वातावरण तापले. सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्या आरोपांना विरोध करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी ठाम भूमिका घेत सरकारकडून ठोस उत्तरांची मागणी केली. त्यांच्या ठाम आणि लढाऊ भूमिकेमुळे उमरेडमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.1
- सध्या गरज आहे राज्याला विचार करण्याची1
- आंभोरा पुलावर तीन दिवसांत दुसरी आत्महत्या; नागरिकांमध्ये तीव्र चिंता कुही जि.नागपुर(शरद शहारे) कुही तालुक्यातील आंभोरा येथील पुलावरून उडी घेऊन तीन दिवसांत दुसऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सलग घटनांमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन मुरलीधर ढोबळे (वय ३३, रा. नरसाळा, नागपूर) यांनी घरगुती तणावातून आंभोरा येथील पुलावरून उडी घेत जीवन संपविले. चेतन यांना वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर रेल्वे विभागात नोकरी मिळाली होती. मात्र सुमारे तीन वर्षांपूर्वी पत्नीशी झालेल्या घटस्फोटानंतर ते मानसिक तणावात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य राबवून मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, याच पुलावरून २३ फेब्रुवारी रोजी प्रज्वल सोम ढेंगे (वय २५, रा. परसोडी) या तरुणानेही उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी शोधमोहीम राबवूनही अद्याप त्याचा मृतदेह सापडलेला नाही. सलग दोन घटनांमुळे आंभोरा पुलिया हा आत्महत्येचा ‘स्पॉट’ बनत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुलावर संरक्षक जाळी बसविणे, सतत पोलीस गस्त वाढविणे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अशा घटनांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- चंद्रपूर - महाराज प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव, चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. अविनाशभाऊ वारजुकर, जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, शंकरपूर ग्रामपंचायत चे सरपंच साईश वारजूकर यांचा चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या मार्गदर्शनात भाजपचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितित आज मुंबईत रीतसर केला भाजपात प्रवेश.1
- 'ಕುಸುಮ ಸಂಜೀವಿನಿ' ಹಿಮೋಫೀಲಿಯ ರೋಗಿಗಳಿಗೆ ರೋಗ ನಿರೋಧಕ ಚಿಕಿತ್ಸೆ1
- ० नागपूर , चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील नागरीक याठिकाणी रविवारी पर्यटनाला येतात ० ० येथे स्वयंपाक करून वन्य भोजना चा अस्वाद घेतात ० ० वनविभागाकडून रविवारला पर्यटका साठी जाण्याची सुविधा मिळते. ० राजु जांभुळे (उमरेड ) भिवापूर पासून १० किमी अंतरावर असलेल्या भंडारा जिल्हयातील पवनी तालुक्यात येणाऱ्या रानाळा हे निसर्गरम्य पर्यटन सहलीचे केंद्र व रानाई माता परिसरतील भाविकांचे श्रध्देचे स्थान आहे. परंतु हे ठिकाण उमरेड - कऱ्हांडला अभयरण्यात येत असल्याने येथे ये -जा करण्यास वनविभागाची मनाई आहे. परंतु शारदीय व चैत्र नवरात्रोत्सवात भाविकांची दर्शना एकच गर्दी पहावयास मिळते. तसेच पर्यटक रविवारला पिकनिक म्हणून हमखास याठिकाणी भेटी देतात. तसेच वन्यभोजन करण्यासाठी हे ठिकाण ओळखले जातात. रनाला म्हणून सर्वदूर परिचित असलेला या परिसराची नोंद राजस्व व वनविभागाच्या दप्तरी जोगीखेडा (हमेशी ) या रिठी गावाच्या नावाने आहे. सदर स्थळ वनविभागाच्या अतर्गत येत असल्याने येथे वन्य प्राण्याचा वावर असल्याने हे पर्यटन स्थळ उपेक्षित होते. परंतु रानाई मातेची जागृत स्थळ बघता काही भाविकांनी एकत्र 2018 ला रानाई माता बहुउद्देशीय सेवा समिती जोगीखेडा ( आमगाव ) ता. पवनी या नावाने ट्रस्ट ची नोंदणी केली असून या माध्यमातून देवस्थानाचा कारभार चालतो. पुर्वी रानाई मातेचे झाडाखाली मुर्ती होती. आता देवस्थान कमेटीच्या वतीने भव्य मंदिराचे स्वरूप देण्यात आले आहे. लगतच अनेक देव देवताच्या दगडी मुर्ती आहेत. परिसरात काही हेक्टर सरकारी तर काही मालगुजारी जंगल आहे. लगतच डॉ. भिवापूरकर यांची वनराई असून आंब्यांचे झाड, चिकू, पेरू, खिरणी चे झाडे होती. रानाळा हे एकेकाळी घनदाट अरण्य होते.1
- विशेष प्रतिनिधी मुंबई/ चंद्रपूर: महाराष्ट्रात सावकार पाशामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः किडनी विकण्याची वेळ येत आहे, याहून मोठं दुर्दैव काय? ही केवळ बातमी नाही, तर महाराष्ट्राच्या अंतरात्म्याला हादरून टाकणारी घटना आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे या शेतकऱ्याने फक्त १ लाखांच्या कर्जासाठी तब्बल ७४ लाख रुपये सावकाराला दिले. ट्रॅक्टर गेला, शेती गेली,तरी कर्ज फिटेना. शेवटी कुटुंब वाचवण्यासाठी किडनी विकण्याचा निर्णय घ्यावा लागला. हे आपल्या व्यवस्थेचं अपयश आहे, असं माझं ठाम मत आहे. मी स्वतः पुढाकार घेऊन या शेतकऱ्याला परदेशातून मायदेशी परत आणले. पण प्रश्न आहे की अशा रॅकेट्सना संरक्षण कोण देत आहे? दिल्लीपासून दक्षिण भारतापर्यंत पसरलेल्या या किडनी रॅकेटमध्ये एका पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉक्टराचा सहभाग असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सरकार त्या डॉक्टरला अटक करण्याचे धाडस दाखवणार का?, असा प्रश्न आज विधिमंडळात उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सहभागी सावकारांवर Maharashtra Control of Organised Crime Act (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई झालीच पाहिजे. संघटित गुन्हेगारीला साध्या कलमांनी नाही, तर कठोर कायद्यानेच उत्तर द्यावे लागेल. ज्यांच्या घरातील कर्ता पुरुष किडनी गमावून बसला, ते कुटुंब आज उघड्यावर आहे. त्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून किमान १० लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर झाली पाहिजे. शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. त्याला सावकारांच्या पाशात ढकलणाऱ्या व्यवस्थेविरोधात आमचा लढा आहे.1