शेतकऱ्यांना अक्षरशः किडनी विकण्याची वेळ येत आहे विशेष प्रतिनिधी मुंबई/ चंद्रपूर: महाराष्ट्रात सावकार पाशामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः किडनी विकण्याची वेळ येत आहे, याहून मोठं दुर्दैव काय? ही केवळ बातमी नाही, तर महाराष्ट्राच्या अंतरात्म्याला हादरून टाकणारी घटना आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे या शेतकऱ्याने फक्त १ लाखांच्या कर्जासाठी तब्बल ७४ लाख रुपये सावकाराला दिले. ट्रॅक्टर गेला, शेती गेली,तरी कर्ज फिटेना. शेवटी कुटुंब वाचवण्यासाठी किडनी विकण्याचा निर्णय घ्यावा लागला. हे आपल्या व्यवस्थेचं अपयश आहे, असं माझं ठाम मत आहे. मी स्वतः पुढाकार घेऊन या शेतकऱ्याला परदेशातून मायदेशी परत आणले. पण प्रश्न आहे की अशा रॅकेट्सना संरक्षण कोण देत आहे? दिल्लीपासून दक्षिण भारतापर्यंत पसरलेल्या या किडनी रॅकेटमध्ये एका पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉक्टराचा सहभाग असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सरकार त्या डॉक्टरला अटक करण्याचे धाडस दाखवणार का?, असा प्रश्न आज विधिमंडळात उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सहभागी सावकारांवर Maharashtra Control of Organised Crime Act (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई झालीच पाहिजे. संघटित गुन्हेगारीला साध्या कलमांनी नाही, तर कठोर कायद्यानेच उत्तर द्यावे लागेल. ज्यांच्या घरातील कर्ता पुरुष किडनी गमावून बसला, ते कुटुंब आज उघड्यावर आहे. त्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून किमान १० लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर झाली पाहिजे. शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. त्याला सावकारांच्या पाशात ढकलणाऱ्या व्यवस्थेविरोधात आमचा लढा आहे.
शेतकऱ्यांना अक्षरशः किडनी विकण्याची वेळ येत आहे विशेष प्रतिनिधी मुंबई/ चंद्रपूर: महाराष्ट्रात सावकार पाशामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः किडनी विकण्याची वेळ येत आहे, याहून मोठं दुर्दैव काय? ही केवळ बातमी नाही, तर महाराष्ट्राच्या अंतरात्म्याला हादरून टाकणारी घटना आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे या शेतकऱ्याने फक्त १ लाखांच्या कर्जासाठी तब्बल ७४ लाख रुपये सावकाराला दिले. ट्रॅक्टर गेला, शेती गेली,तरी कर्ज फिटेना. शेवटी कुटुंब वाचवण्यासाठी किडनी विकण्याचा निर्णय घ्यावा लागला. हे आपल्या व्यवस्थेचं अपयश आहे, असं माझं ठाम मत आहे. मी स्वतः पुढाकार घेऊन या शेतकऱ्याला परदेशातून मायदेशी परत आणले. पण प्रश्न आहे की अशा रॅकेट्सना संरक्षण कोण देत आहे? दिल्लीपासून दक्षिण भारतापर्यंत पसरलेल्या या किडनी रॅकेटमध्ये एका पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉक्टराचा सहभाग असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सरकार त्या डॉक्टरला अटक करण्याचे धाडस दाखवणार का?, असा प्रश्न आज विधिमंडळात उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सहभागी सावकारांवर Maharashtra Control of Organised Crime Act (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई झालीच पाहिजे. संघटित गुन्हेगारीला साध्या कलमांनी नाही, तर कठोर कायद्यानेच उत्तर द्यावे लागेल. ज्यांच्या घरातील कर्ता पुरुष किडनी गमावून बसला, ते कुटुंब आज उघड्यावर आहे. त्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून किमान १० लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर झाली पाहिजे. शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. त्याला सावकारांच्या पाशात ढकलणाऱ्या व्यवस्थेविरोधात आमचा लढा आहे.
- सध्या गरज आहे राज्याला विचार करण्याची1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- Post by Irshad Alam1
- ० नियोजन विभागाचा निधी वाटपात असमतोल ० नागरी व अन्नपुरवठा विभागातील गोंधळ ० विकासाच्या घोषणा व जाहीरात बाजी आदि प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडले. उमरेड (प्रतिनिधी ) राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमरेड विधानसभेचे आक्रमक आणि अभ्यासू आमदार संजय मेश्राम यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरत सभागृहात जोरदार हल्लाबोल चढवला. मुंबई येथील विधिमंडळात मध्ये पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा आणि नियोजन विभागाच्या कारभारावर थेट आणि कठोर शब्दांत टीका केली. आजच्या कामकाजात तिन्ही विभागांच्या कपात सूचनांवर चर्चा पार पडत असताना आमदार मेश्राम यांनी लेखी स्वरूपात कपात सूचना अध्यक्षांकडे सादर केल्या आपल्या भाषणाची सुरुवात करताना मेश्राम यांनी उमरेड मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप केला. ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची रिक्त पदे औषधांचा तुटवडा उपकरणांची कमतरता रुग्णांना मिळणारी अपुरी सेवा या सर्व मुद्द्यांचा पाढा वाचत त्यांनी सरकारला प्रश्न विचारला “आरोग्य हा मूलभूत हक्क असताना नागरिकांना मूलभूत सुविधा का मिळत नाहीत?” त्यांनी ठामपणे सांगितले की, केवळ कागदोपत्री योजना जाहीर करून जनतेची फसवणूक केली जात आहे. निधी मंजूर होतो, पण प्रत्यक्ष काम मात्र होत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला अन्नधान्य वितरणातील गोंधळ, रेशनकार्डधारकांना वेळेवर धान्य न मिळणे, अपात्रांना लाभ आणि पात्रांना वंचित ठेवण्याच्या तक्रारी यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अन्न व नागरी पुरवठा विभागा सार्वजनिक वितरण व्यवस्थेत, रेशन दुकाने पारदर्शकता नसल्याचा आरोप करत त्यांनी गोर गरीब जनता मोफत धान्य योजनेपासून वंचित राहत आहे.चौकशीची मागणी केली. भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली. नियोजन विभागाच्या निधी वाटपातील असमतोल आणि उमरेड मतदारसंघाकडे होणारे दुर्लक्ष यावर मेश्राम यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. या सर्व मुद्द्यांचा उल्लेख करत त्यांनी सरकारला जाब विचारला. “विकासाच्या घोषणा केवळ जाहिरातीपुरत्या आहेत का?” असा सवाल करत त्यांनी सरकारला कठोर शब्दांत सुनावले. सभागृहात तापले वातावरण मेश्राम यांच्या आक्रमक आणि मुद्देसूद भाषणामुळे सभागृहात काही काळ वातावरण तापले. सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्या आरोपांना विरोध करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी ठाम भूमिका घेत सरकारकडून ठोस उत्तरांची मागणी केली. त्यांच्या ठाम आणि लढाऊ भूमिकेमुळे उमरेडमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.1
- आंभोरा पुलावर तीन दिवसांत दुसरी आत्महत्या; नागरिकांमध्ये तीव्र चिंता कुही जि.नागपुर(शरद शहारे) कुही तालुक्यातील आंभोरा येथील पुलावरून उडी घेऊन तीन दिवसांत दुसऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सलग घटनांमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन मुरलीधर ढोबळे (वय ३३, रा. नरसाळा, नागपूर) यांनी घरगुती तणावातून आंभोरा येथील पुलावरून उडी घेत जीवन संपविले. चेतन यांना वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर रेल्वे विभागात नोकरी मिळाली होती. मात्र सुमारे तीन वर्षांपूर्वी पत्नीशी झालेल्या घटस्फोटानंतर ते मानसिक तणावात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य राबवून मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, याच पुलावरून २३ फेब्रुवारी रोजी प्रज्वल सोम ढेंगे (वय २५, रा. परसोडी) या तरुणानेही उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी शोधमोहीम राबवूनही अद्याप त्याचा मृतदेह सापडलेला नाही. सलग दोन घटनांमुळे आंभोरा पुलिया हा आत्महत्येचा ‘स्पॉट’ बनत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुलावर संरक्षक जाळी बसविणे, सतत पोलीस गस्त वाढविणे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अशा घटनांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.1
- Post by Nitin Yadav2
- अगामी 28/02/2025 को जजुआर हाई स्कूल के मैदान में बाल बिबाह को लेकर खास आयोजना रखा गया है। #bihar #BiharNews #viralvideo #news #Muzaffarpur #virals #aakashpriyadarshi #worldbiharnews1
- विशेष प्रतिनिधी मुंबई/ चंद्रपूर: महाराष्ट्रात सावकार पाशामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः किडनी विकण्याची वेळ येत आहे, याहून मोठं दुर्दैव काय? ही केवळ बातमी नाही, तर महाराष्ट्राच्या अंतरात्म्याला हादरून टाकणारी घटना आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे या शेतकऱ्याने फक्त १ लाखांच्या कर्जासाठी तब्बल ७४ लाख रुपये सावकाराला दिले. ट्रॅक्टर गेला, शेती गेली,तरी कर्ज फिटेना. शेवटी कुटुंब वाचवण्यासाठी किडनी विकण्याचा निर्णय घ्यावा लागला. हे आपल्या व्यवस्थेचं अपयश आहे, असं माझं ठाम मत आहे. मी स्वतः पुढाकार घेऊन या शेतकऱ्याला परदेशातून मायदेशी परत आणले. पण प्रश्न आहे की अशा रॅकेट्सना संरक्षण कोण देत आहे? दिल्लीपासून दक्षिण भारतापर्यंत पसरलेल्या या किडनी रॅकेटमध्ये एका पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉक्टराचा सहभाग असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सरकार त्या डॉक्टरला अटक करण्याचे धाडस दाखवणार का?, असा प्रश्न आज विधिमंडळात उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सहभागी सावकारांवर Maharashtra Control of Organised Crime Act (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई झालीच पाहिजे. संघटित गुन्हेगारीला साध्या कलमांनी नाही, तर कठोर कायद्यानेच उत्तर द्यावे लागेल. ज्यांच्या घरातील कर्ता पुरुष किडनी गमावून बसला, ते कुटुंब आज उघड्यावर आहे. त्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून किमान १० लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर झाली पाहिजे. शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. त्याला सावकारांच्या पाशात ढकलणाऱ्या व्यवस्थेविरोधात आमचा लढा आहे.1