पोलीस दलातील चालकांचा चालक दिनाच्या निमित्ताने सत्कार संपन्न चालक दिनानिमित्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडून चालकांच्या कार्याचा गौरव लातूर (प्रतिनिधी) दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या मोटार परिवहन विभागातील चालकांना पुष्प देऊन शुभेच्छा पोलीस दलाच्या कार्यक्षमते मध्ये वाहनचालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, दिवस-रात्र कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या चालकांच्या कार्याचा गौरव करणे आवश्यक आहे. याच भावनेतून चालक दिनानिमित्त लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील मोटार परिवहन विभागाच्या चालकांचे कौतुक करून त्यांना पुष्प देत मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आज पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर चालक दिनाचे औचित्य साधून कार्यालयात उपस्थित असलेल्या मोटार परिवहन विभागातील चालकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी चालकांच्या दैनंदिन कामकाजाचे, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि पोलीस विभागाच्या कार्यात असलेल्या योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले. पोलीस दलामध्ये अधिकारी व अंमलदार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध प्रकारची कर्तव्ये पार पाडत असतात. या सर्व कामकाजामध्ये पोलीस वाहनचालकांची भूमिका ही पडद्यामागील, परंतु अत्यंत महत्त्वाची असते. पोलीस अधिकारी व अंमलदारांना वेळेत आणि सुरक्षितपणे घटनास्थळी पोहोचविणे, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वाहन उपलब्ध करून देणे, तसेच विविध तपास व कारवाईसाठी पोलीस पथकांना आवश्यक त्या ठिकाणी घेऊन जाणे, ही जबाबदारी चालक सातत्याने पार पाडत असतात. *आरोपीच्या मागावर जाण्यापासून आपत्कालीन परिस्थितीपर्यंत महत्त्वाची भूमिका* पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी चालकांच्या कार्याचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, पोलीस विभागामध्ये कर्तव्य बजावत असताना कोणत्याही वेळी अचानक एखाद्या आरोपीच्या मागावर जाण्याची वेळ येऊ शकते. अनेकदा रात्रीच्या वेळी किंवा प्रतिकूल परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचणे आवश्यक असते. अशा वेळी पोलीस वाहनचालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. दिवस असो वा रात्र, कोणत्याही वेळी कर्तव्याची हाक आली की तत्परतेने वाहन घेऊन रवाना होणे, वाहनाची योग्य देखभाल करणे आणि पोलीस पथकाला सुरक्षितपणे गंतव्यस्थळी पोहोचविणे, या जबाबदाऱ्या चालकांकडून पार पाडल्या जातात. लातूर पोलीस विभागाच्या मोटार परिवहन विभागातील सर्व चालक आपली ही जबाबदारी अत्यंत चोखपणे बजावत असल्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी नमूद केले. *चालकांच्या कार्याचे विशेष कौतुक* पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी मोटार परिवहन विभागातील चालकांच्या कार्याचे विशेष कौतुक करून पोलीस दलाच्या कामकाजात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या कर्तव्याला गतिमानता देण्यामध्ये चालकांचा मोठा वाटा असतो. पोलीस पथकांना वेळेत घटनास्थळी पोहोचविणे, आपत्कालीन परिस्थितीत तत्पर सेवा देणे आणि वाहनांची जबाबदारीने देखभाल करणे, या सर्व बाबी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेशी संबंधित आहेत. यावेळी पोलीस अधीक्षकांनी उपस्थित सर्व चालकांना पुष्प देऊन चालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून भविष्यातही त्याच तत्परतेने, जबाबदारीने आणि कर्तव्यनिष्ठेने काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. चालक दिनाच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या उपक्रमामुळे मोटार परिवहन विभागातील चालकांच्या कार्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. पोलीस दलाच्या दैनंदिन कामकाजात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या चालकांच्या कर्तव्याचा गौरव करून त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
पोलीस दलातील चालकांचा चालक दिनाच्या निमित्ताने सत्कार संपन्न चालक दिनानिमित्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडून चालकांच्या कार्याचा गौरव लातूर (प्रतिनिधी) दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या मोटार परिवहन विभागातील चालकांना पुष्प देऊन शुभेच्छा पोलीस दलाच्या कार्यक्षमते मध्ये वाहनचालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, दिवस-रात्र कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या चालकांच्या कार्याचा गौरव करणे आवश्यक आहे. याच भावनेतून चालक दिनानिमित्त लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील मोटार परिवहन विभागाच्या चालकांचे कौतुक करून त्यांना पुष्प देत मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आज पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर चालक दिनाचे औचित्य साधून कार्यालयात उपस्थित असलेल्या मोटार परिवहन विभागातील चालकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी चालकांच्या दैनंदिन कामकाजाचे, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि पोलीस विभागाच्या कार्यात असलेल्या योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले. पोलीस दलामध्ये अधिकारी व अंमलदार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध प्रकारची कर्तव्ये पार पाडत असतात. या सर्व कामकाजामध्ये पोलीस वाहनचालकांची भूमिका ही पडद्यामागील, परंतु अत्यंत महत्त्वाची असते. पोलीस अधिकारी व अंमलदारांना वेळेत आणि सुरक्षितपणे घटनास्थळी पोहोचविणे, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वाहन उपलब्ध करून देणे, तसेच विविध तपास व कारवाईसाठी पोलीस पथकांना आवश्यक त्या ठिकाणी घेऊन जाणे, ही जबाबदारी चालक सातत्याने पार पाडत असतात. *आरोपीच्या मागावर जाण्यापासून आपत्कालीन परिस्थितीपर्यंत महत्त्वाची भूमिका* पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी चालकांच्या कार्याचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, पोलीस विभागामध्ये कर्तव्य बजावत असताना कोणत्याही वेळी अचानक एखाद्या आरोपीच्या मागावर जाण्याची वेळ येऊ शकते. अनेकदा रात्रीच्या वेळी किंवा प्रतिकूल परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचणे आवश्यक असते. अशा वेळी पोलीस वाहनचालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. दिवस असो वा रात्र, कोणत्याही वेळी कर्तव्याची हाक आली की तत्परतेने वाहन घेऊन रवाना होणे, वाहनाची योग्य देखभाल करणे आणि पोलीस पथकाला सुरक्षितपणे गंतव्यस्थळी पोहोचविणे, या जबाबदाऱ्या चालकांकडून पार पाडल्या जातात. लातूर पोलीस विभागाच्या मोटार परिवहन विभागातील सर्व चालक आपली ही जबाबदारी अत्यंत चोखपणे बजावत असल्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी नमूद केले. *चालकांच्या कार्याचे विशेष कौतुक* पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी मोटार परिवहन विभागातील चालकांच्या कार्याचे विशेष कौतुक करून पोलीस दलाच्या कामकाजात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या कर्तव्याला गतिमानता देण्यामध्ये चालकांचा मोठा वाटा असतो. पोलीस पथकांना वेळेत घटनास्थळी पोहोचविणे, आपत्कालीन परिस्थितीत तत्पर सेवा देणे आणि वाहनांची जबाबदारीने देखभाल करणे, या सर्व बाबी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेशी संबंधित आहेत. यावेळी पोलीस अधीक्षकांनी उपस्थित सर्व चालकांना पुष्प देऊन चालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून भविष्यातही त्याच तत्परतेने, जबाबदारीने आणि कर्तव्यनिष्ठेने काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. चालक दिनाच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या उपक्रमामुळे मोटार परिवहन विभागातील चालकांच्या कार्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. पोलीस दलाच्या दैनंदिन कामकाजात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या चालकांच्या कर्तव्याचा गौरव करून त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
- दिव्यांग व्यक्ती तपासणीची होत आहे गैरसोय.!! तपासणीसाठी उपकरणे,विशेषतज्ञ लातूरला मग तपासणी देखावे येथे कशाला?? निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींची होत आहे गैरसोय..!! तपासणी टीम चे वेळ निश्चित नाही!! महिन्यातून दोन दिवस निलंगा तालुक्यातील दिव्यांगाना तपासाला यायला सुद्धा विशेषतज्ञाना वेळ नाही?1
- नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. नांदेड रोडवरील कृपासदन शाळा परिसरात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावरून जात असलेल्या एका चालत्या कारवर अचानक रस्त्याच्या कडेला असलेले जुने वडाचे झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारचालक यातून सुखरूप बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रोडवरील कृपासदन परिसराकडून एक कार (क्रमांक एमएच 02 इझेड 2579) शहराच्या दिशेने जात होती. कार कृपासदन शाळेजवळ आली असता, अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले एक भलेमोठे वडाचे झाड चालत्या कारच्या पुढील भागावर कोसळले. झाड पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. झाड थेट कारच्या बोनेटवर व टपाच्या समोरील भागावर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहतूक विस्कळीत. मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्यामुळे नांदेड रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले. क्रेन आणि कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जुनी झाडे हटवण्याची मागणी या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे अत्यंत जुनी व धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची त्वरित पाहणी करून ती हटवावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुनरावृत्त होणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.4
- एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात; जिल्हास्तरीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात; जिल्हास्तरीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ येथील एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित सोहळ्यात सोनपेठचे नगरसेवक मा.अब्दुल रहेमान सौदागर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण अत्यंत सन्मानपूर्वक संपन्न झाले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.याच कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुकास्तरीय बुद्धीबळ आणि कॅरम स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले खेळाडू जान्हवी अशोक रोडे, निनाद गोविंद वाकणकर, दिप उद्धव भोसले, अलफिया अतिक सय्यद, अर्शिया फारूक सय्यद, श्रेयस सतीश काटे, सार्थक संजय फपाळ, अनन्या रामेश्वर गव्हाणे.या सर्व विजेत्यांचे हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष मा.परमेश्वर भैय्या कदम, कोषाध्यक्ष मा. रामेश्वर कदम, उपाध्यक्षा सौ.ज्योतीताई कदम, संपादक किरण रमेश स्वामी व मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत व कौतुक करण्यात आले.या सोहळ्याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.पल्लवी यादव, प्राचार्य श्री. प्रशांत कांबळे, किड्स विभागाच्या प्राचार्या सौ.अनिता कंदे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.3
- ST आरक्षणासाठी परभणीत महामोर्चाची हाक; धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुरेश भुमरे ST आरक्षणासाठी परभणीत महामोर्चाची हाक; धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुरेश भुमरे1
- पीक नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार - पालकमंत्री नरहरी झिरवाळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी केली पीक पाहणी हिंगोली :जिल्ह्यात मागील 20 ते 25 दिवसांपासून पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, सोयाबीन, कापूस व तूर पिकांवर ओलावा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. पिकांच्या नुकसानीसाठी शासन स्तरावर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधिक्षक श्रेणीक लोढा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सेनगाव तालुक्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या सोयाबीन पीक शेंगा लागणे व दाणे भरणे या उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत आहे. मात्र, या कालावधीत पावसाचा खंड पडल्याने पिकांमध्ये तीव्र ओलावा ताण निर्माण झाला आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ खुंटलेली, पाने फिकट पडलेली, पिके कोमेजलेली तसेच काही ठिकाणी पाने करपण्याच्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सेनगाव तालुक्यातील शेषेराव मोतीराम मोरे, शेख जाफर शेख दाउद, शेख मुजीब, शेख वाजीद शेख कौसर आणि सुभाष दत्तराम पारिस्कर या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थिती व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा. शासन त्यांच्या पाठीशी आहे,” असे सांगत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. जिल्ह्यातील प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या पीक परिस्थितीचा संपूर्ण अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांना दिल्या.1
- आमदार संतोष बांगर यांनी केली साळणा शिवारात वाळलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी गेल्या एका महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यात पाऊस पडला नसल्याने सोयाबीन कापूस तूर हळद यासारखी खरीप पिके हातची गेली आहेत,या पार्श्वभूमीवर कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी बुधवारी विधानसभा क्षेत्रातील साळणा शिवारात जाऊन तेथील पाण्याअभावी वाळत असलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली आहे . वाळलेल्या पिकाची बिकट परिस्थिती पाहून त्यांनी या संदर्भात हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे सांगितले .शासन लवकरच कोरडा दुष्काळ जाहीर करेल असे त्यांनी ग्वाही दिली .याप्रसंगी त्यांच्या समवेत शिवसेना कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .1
- सर्व समाज बांधवांना विनंती आहे की उद्या परभणी येथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती महाराष्ट्रातील सर्व तमाम धनगर समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे उद्या 17 सप्टेंबर या दिवशी परभणी येथे धनगर एसटी आरक्षण संदर्भामध्ये यलगार मोर्चाची नियोजन केले आहे तरी आपण सर्वांनी सकाळी ठीक दहा वाजता परभणी येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती1
- लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. हॉटेलमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या छातीत सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील उस्मानपुरा/इस्लामपुरा भागातील हॉटेल उमेरासमोर घडली. बाबा अली शेख (वय ३८, रा. परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळीतील नगरसेवक खालेद शेख याच्यासह तीन मित्रांवर संशय असून, घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथून बाबा अली शेख, नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर हे चौघे जण लातूरला आले होते. बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली रस्त्यावरील हॉटेल उमेरा येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास जेवत असताना त्यांच्यात तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. तेथे तिघांनी मिळून बाबा अली यांच्या छातीत तीक्ष्ण चाकू खुपसला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नियोजनबद्ध कटाचा संशय. बाबा अली शेख आणि आरोपींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद होता. त्यामुळेच नियोजनबद्ध कट रचून खून करण्याच्या हेतूने त्याला परळीहून लातुरात आणले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पालकमंत्री शहरात असतानाच थरार. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे शहरात मुक्कामी होते. हा खुनाचा थरार घडला, नेमक्या त्याच वेळी पालकमंत्री घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील एका गणेश मंडळात आरती करत होते. शहरात कडक पोलीस बंदोबस्त असतानाही भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे लातूर व परळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा तीव्र शोध घेत आहेत.1