Shuru
Apke Nagar Ki App…
सिद्धेश्वर तलावातील माशांचा मृत्यू, अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रहारची मागणी सोलापूर : सोलापूर येथील सिद्धेश्वर तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी केली आहे. सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी मागणी केली आहे.
Rahul S
सिद्धेश्वर तलावातील माशांचा मृत्यू, अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रहारची मागणी सोलापूर : सोलापूर येथील सिद्धेश्वर तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी केली आहे. सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी मागणी केली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सोलापूर : सोलापूर येथील सिद्धेश्वर तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी केली आहे. सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी मागणी केली आहे.1
- मोहोळ :- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा शिवाय बसवल्यानंतर प्रशासनाने तणावाचे वातावरण निर्माण केले. महापुरुषांच्या पुतळा व स्मारक परवानगीसाठी शासनाकडे महाराष्ट्रात असंख्य फायली पडून आहेत परंतु त्या पाहिजे वर कुठलाही निर्णय होत नाही परिणामी महापुरुषांचा पुतळा बसवण्यास वर्षानुवर्ष परवानगी दिली जात नाही म्हणून मोहोळ येथे परवानगी शिवाय पुतळा बसण्याची दुर्दैवी वेळ आल्याची माहिती. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी बुधवारी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याप्रसंगी त्यांनी महाराष्ट्रातील पुतळा परवानगी ला विलंब झाल्याची उदाहरणे सभागृहासमोर मांडली. त्यामुळे पुतळा व स्मारकाचे परवानगी सुलभ करून ताबडतोब परवानगी देण्यात याव्यात अशी मागणी सभागृहात केली. दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार का.? मोहोळ येथे परवानगी शिवाय बसवल्यामुळे अज्ञात व्यक्तीवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात चौकशी होऊन. संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एका बाजूला प्रशासन परवानगी देण्यास विलंब करते तर दुसऱ्या बाजूला संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातात. दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार का.? असा एक यक्ष प्रश्न महाराष्ट्रातील शिवप्रेमी समोर आहे.1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- जनसंघर्ष न्युज नटवर्क अंबड : तालुक्यातील गरजू व वंचित लाभार्थ्यांचा शोध घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ घरपोच पोहोचवण्याचा उपक्रम सातत्याने राबवित असताना तहसीलदार विजय चव्हाण यांच्या टीमला आज अत्यंत हृदयस्पर्शी अनुभव आला. पोलीस पाटील यांच्या माध्यमातून मूकबधिर व परीतक्त्या दिव्यांग व्यक्तीचा शोध घेऊन तिला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तत्काळ लाभ देण्यात आला. दररोजप्रमाणे आजही गावपातळीवर लाभार्थी शोध मोहीम सुरू होती. यावेळी संबंधित व्यक्तीची प्रतिकूल परिस्थिती पाहून अधिकारी व कर्मचारी भावूक झाले. संवाद साधण्यास अडचणी असूनही संयमाने प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. प्रशासनाच्या तत्परतेमुळे लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान उपस्थितांना भारावून गेले. तहसील कार्यालयाने यापूर्वीही विविध योजनांअंतर्गत अशा लाभार्थ्यांचा शोध घेऊन मदत केली आहे. “शासनाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे,” असे मत तहसीलदारांनी व्यक्त केले. पुढील काळातही ही मोहीम अधिक वेगाने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.1
- नवी मुंबई महानगरपालिका एच प्रभाग समिती, दिघा येथे सुरू असलेल्या तथाकथित “बंधु शिरोसे–ऐश्वर्या टनल” या कामाबाबत गंभीर भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता व अधिकाऱ्यांच्या संगनमताची तीव्र शंका व्यक्त होत आहे. ज्या प्रकारे देशात “अटल टनल” राष्ट्रीय हितासाठी उभारण्यात आली, त्याच नावाची आड घेऊन दिघा मुकुंद गेट, ईश्वर नगर परिसरात केवळ अंदाजे १० फूट लांबीचा टनल उभारण्याचा दिखावा करून एका विशिष्ट कंत्राटदार कंपनीला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच, संबंधित अभियंता श्री. बंधु शिरोसे यांच्यावर इतर एका प्रकरणात गंभीर आरोप माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत, आरोपांच्या छायेत असलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असल्याने संपूर्ण कामकाजावर संशयाची छाया निर्माण झाली आहे. जनतेच्या कराच्या पैशातून राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पामध्ये पारदर्शकता व जबाबदारी अपेक्षित असताना, संशयास्पद पद्धतीने काम सुरू ठेवणे हे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. महानगरपालिका ही जनतेची संस्था आहे; ती काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या व कंत्राटदारांच्या फायद्यासाठी वापरली जाऊ नये. मी, त्रिभुवन सिंह ठाकूर, विरोधी पक्षनेता, एच प्रभाग समिती दिघा, या संशयास्पद टनल प्रकल्पाचा आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध करतो. या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, प्रकल्पाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही आमची ठाम मागणी आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर जनहितासाठी व्यापक जनआंदोलन उभारले जाईल. जनतेच्या हक्कांसाठी रस्त्यावरून ते न्यायालयापर्यंत लढा दिला जाईल. भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, सत्य बाहेर येईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.1
- आ. रोहित पवार संतापले कार्यकर्ता ला सांगितले एकच दादा बस नाहीतर बाहेर जा असं सुनावले म्हणताच पुन्हा एकच दादा अजितदादा च्या घोषणा कार्यकर्ते देऊ लागले बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळाली.1
- AJITDADA PLANE CRASH : आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद संपताच कार्यकर्त्यांची घोषणा.. संतापलेल्या रोहित पवारांनी ए वेडाय का म्हणत केली ही कृती.. नेमकं काय घडलं पहा व्हिडीओ.. #AjitPawar #rohitpawar #politics #planecrash #baramatikar #maharashtra #ajitdada #viralvideo #AjitPawarSpeaks #MaharashtraPolitics #viralpost1
- पंढरपूर : राज्यातील मराठा व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या सारथी, बार्टी व महाज्योती या संस्थांच्या निधीवाटपाबाबत तसेच शिष्यवृत्ती योजनांच्या भवितव्याबाबत विधानसभेत आमदार अभिजीत पाटील यांनी ठाम व आक्रमक भूमिका मांडली. आमदार पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या सारथी, बार्टी आणि महाज्योती या संस्थांसाठी प्रत्येकी किमान एक हजार कोटी रुपयांचे बजेट अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ३०० कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना दिलेल्या पत्राला २१ मे २०२५ रोजी उत्तर मिळाले असून अर्थसंकल्पात ३०० कोटींची तरतूद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र मंत्री महोदयांच्या लेखी उत्तरानुसार त्यापैकी आतापर्यंत केवळ ९० कोटी रुपयांचेच वितरण झाल्याचे वास्तव समोर आले असल्याचे त्यांनी सभागृहात निदर्शनास आणले.1