Shuru
Apke Nagar Ki App…
Sharad Dayedar
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Santosh Dhakulkar2
- Post by Sharad Dayedar1
- वाशिम जिल्हा अंतर्गत येत असलेल्या अमानी गावामध्ये संत परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान येथे नुकताच भागवत सप्ताह, शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यात दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, तर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा (ता. मालेगाव) येथील विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हरिपाठ दरम्यान त्यांनी फुगडी आणि पावली सादर करत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. या विद्यार्थिनींना शाळेचे शिक्षक श्री भगवानराव गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली. एकूणच, या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अमानी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी सारनाथ अवचार यांचा रिपोर्ट1
- Post by Ahem Raza1
- Post by Ashish ingle1
- अकोला: विदर्भात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, अकोला जिल्ह्यात आज ४५°C तापमानाची नोंद झाली आहे. हंगामातील हे उच्चांकी तापमान असून वाढत्या उन्हामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. सकाळपासूनच सुरू होणाऱ्या उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळी जिल्ह्यासह ग्रामीण भागात जणू 'संचारबंदी' असल्यासारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी 'कर्फ्यू' सदृश शांतता वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अकोला जिल्ह्यासह ग्रामीण भागातील महत्त्वाचे रस्ते आणि बाजारपेठा दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत पूर्णपणे ओस पडल्याचे चित्र आहे. एरवी गजबजलेल्या असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा उन्हाची ही लाट पाहता आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा (Heat stroke) धोका वाढला असून, पुरेसे पाणी पिणे, डोक्याला रुमाल किंवा टोपी वापरणे आणि थंड ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पिकांना फटका, पाण्याची टंचाई तीव्र उन्हाचा परिणाम केवळ मानवावरच नाही, तर शेतीवरही होत आहे. तापमानातील या वाढीमुळे फळबागा आणि उन्हाळी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची मोठी ओढाताण होत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावल्याने पाणी टंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. येत्या काही दिवसांत तापमानाचा हा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, अकोलेकरांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे.1
- Post by Amravati News Update1
- Post by Sharad Dayedar1