दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात ऑनलाईन तृतीय वर्ष विज्ञान इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात ऑनलाईन तृतीय वर्ष विज्ञान इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे ऑनलाईन “तृतीय वर्ष विज्ञान इलेक्ट्रॉनिक्स (NEP-2020) अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे आयोजन दि. ८ मे २०२६ रोजी करण्यात आले. ही कार्यशाळा क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील Electronics & Instrumentation अभ्यास मंडळाच्या सहकार्याने संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . संध्या एम. सोनवणे ह्या उपस्थित होत्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनुषंगाने विद्यार्थी-केंद्रित, कौशल्याधारित व उद्योगाभिमुख अभ्यासक्रम तयार करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेमध्ये Artificial Intelligence, IoT, Advanced Communication Systems यांसारख्या आधुनिक व उदयोन्मुख तंत्रज्ञानांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यशाळेच्या प्रास्ताविकामध्ये इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. कुणाल गायकवाड यांनी महाविद्यालयास NAAC मध्ये प्राप्त A+ मानांकन तसेच क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक लेखापरीक्षणामध्ये तीन जिल्ह्यांमध्ये प्राप्त A+ श्रेणीबद्दल माहिती देत, उद्योगाभिमुख व भविष्यकालीन गरजांनुसार अभ्यासक्रम तयार करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. संध्या एम. सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना रोजगाराभिमुख व व्यावहारिक शिक्षणावर भर देणाऱ्या अभ्यासक्रमाची गरज व्यक्त केली. तसेच अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी अभ्यासक्रम रचना, शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक व विषयतज्ज्ञांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अभ्यासक्रम अधिक परिणामकारक व भविष्याभिमुख करण्यासाठी मौल्यवान सूचना मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. एल. बी. पाटील यांनी केले. कार्यशाळेचे आयोजन इलेक्ट्रॉनिक्स विभागामार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक बंधू भगिनी ऑनलाइन उपस्थित होते.
दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात ऑनलाईन तृतीय वर्ष विज्ञान इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात ऑनलाईन तृतीय वर्ष विज्ञान इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे ऑनलाईन “तृतीय वर्ष विज्ञान इलेक्ट्रॉनिक्स (NEP-2020) अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे आयोजन दि. ८ मे २०२६ रोजी करण्यात आले. ही कार्यशाळा क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील Electronics & Instrumentation अभ्यास मंडळाच्या सहकार्याने संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . संध्या एम. सोनवणे ह्या उपस्थित होत्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनुषंगाने विद्यार्थी-केंद्रित, कौशल्याधारित व उद्योगाभिमुख अभ्यासक्रम तयार करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेमध्ये Artificial Intelligence, IoT, Advanced Communication Systems यांसारख्या आधुनिक व उदयोन्मुख तंत्रज्ञानांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यशाळेच्या प्रास्ताविकामध्ये इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. कुणाल गायकवाड यांनी महाविद्यालयास NAAC मध्ये प्राप्त A+ मानांकन तसेच क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक लेखापरीक्षणामध्ये तीन जिल्ह्यांमध्ये प्राप्त A+ श्रेणीबद्दल माहिती देत, उद्योगाभिमुख व भविष्यकालीन गरजांनुसार अभ्यासक्रम तयार करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. संध्या एम. सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना रोजगाराभिमुख व व्यावहारिक शिक्षणावर भर देणाऱ्या अभ्यासक्रमाची गरज व्यक्त केली. तसेच अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी अभ्यासक्रम रचना, शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक व विषयतज्ज्ञांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अभ्यासक्रम अधिक परिणामकारक व भविष्याभिमुख करण्यासाठी मौल्यवान सूचना मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. एल. बी. पाटील यांनी केले. कार्यशाळेचे आयोजन इलेक्ट्रॉनिक्स विभागामार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक बंधू भगिनी ऑनलाइन उपस्थित होते.
- रिकाम्या रूम असूनही रुग्णांना प्रतीक्षा; घाटीत संतापाची लाट रिकाम्या रूम असूनही रुग्णांना प्रतीक्षा; घाटीत संतापाची लाट छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील अनेक रूम रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध करून दिले जात नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. वार्ड क्रमांक 2, 8, 19 आणि 37 मध्ये रिकाम्या रूम दिसत असतानाही “बेड नाही” असे सांगितले जात असल्याने नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक मिळत असल्याचा आरोप करत, गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. काही डॉक्टर वेळेवर तपासणीसाठी येत नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.1
- मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार आहेत. या अभिनव उपक्रमामुळे बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार मुलांमध्ये रुजण्यास मदत होईल.1
- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील चौबारी गावाच्या विकासाकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पंचायत समितीच्या अनास्थेमुळे गावातील अनेक मूलभूत सोयीसुविधांची कामे रखडली असून नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.4
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.1
- वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे भीषण आग पहाटे 4 वाजेच्या सुमारास 8 ते 10 दुकाने जळून खाक छत्रपती संभाजीनगर मार्गावरील घटना किराणा दुकान, हॉटेल, टायर दुकानांसह अनेक व्यावसायिक गाळ्यांचे मोठे नुकसान शिऊर पोलिसांची घटनास्थळी धाव वैजापूर नगर परिषद आणि छत्रपती संभाजीनगर अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली आगीत अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, पुढील तपास सुरू ANC : वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. छत्रपती संभाजीनगर मार्गावरील 8 ते 10 दुकाने या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. आगीत किराणा दुकान, हॉटेल, टायर दुकानांसह अनेक व्यावसायिक गाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वैजापूर नगर परिषदेचे अग्निशामक दल आणि छत्रपती संभाजीनगर अग्निशामक विभागाला पाचारण करण्यात आले. दोन्ही विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या घटनेत अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.4
- येवला/येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप1
- औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. हा तालुक्यात अशा प्रकारचा पहिलाच पुतळा असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.1
- विजेच्या तारांवर अडकून घडली थरारक घटना लग्नाच्या मंडपाला आग; कंडारी येथे लग्नाच्या मंडपाला आग; विजेच्या तारांवर अडकून घडली थरारक घटना कंडारी येथे भर लग्नसमारंभात थरारक घटना घडली. जोरदार वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप उडून वरच्या विद्युत तारांवर अडकला. यानंतर शॉर्टसर्किट होऊन मंडपाला भीषण आग लागली. ही घटना नांदुरा तालुक्यातील कंडारी गावात घडली असून, भर उन्हाळ्यातील बदलत्या हवामानामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीत संपूर्ण मंडप जळून खाक झाला. तसेच मंडपाखाली उभ्या असलेल्या काही दुचाक्यांनाही आग लागून त्या जळाल्या. घटनेनंतर परिसरात एकच धावपळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बदलत्या हवामानामुळे लग्नसराईत अशा घटनांचे प्रमाण वाढत असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.1