logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार आहेत. या अभिनव उपक्रमामुळे बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार मुलांमध्ये रुजण्यास मदत होईल.

4 hrs ago
user_शुरु रिपोर्टर
शुरु रिपोर्टर
Voice of people सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
4 hrs ago

मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार आहेत. या अभिनव उपक्रमामुळे बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार मुलांमध्ये रुजण्यास मदत होईल.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विजेच्या तारांवर अडकून घडली थरारक घटना लग्नाच्या मंडपाला आग; कंडारी येथे लग्नाच्या मंडपाला आग; विजेच्या तारांवर अडकून घडली थरारक घटना कंडारी येथे भर लग्नसमारंभात थरारक घटना घडली. जोरदार वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप उडून वरच्या विद्युत तारांवर अडकला. यानंतर शॉर्टसर्किट होऊन मंडपाला भीषण आग लागली. ही घटना नांदुरा तालुक्यातील कंडारी गावात घडली असून, भर उन्हाळ्यातील बदलत्या हवामानामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीत संपूर्ण मंडप जळून खाक झाला. तसेच मंडपाखाली उभ्या असलेल्या काही दुचाक्यांनाही आग लागून त्या जळाल्या. घटनेनंतर परिसरात एकच धावपळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बदलत्या हवामानामुळे लग्नसराईत अशा घटनांचे प्रमाण वाढत असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
    1
    विजेच्या तारांवर अडकून घडली थरारक घटना लग्नाच्या मंडपाला आग;
कंडारी येथे लग्नाच्या मंडपाला आग; विजेच्या तारांवर अडकून घडली थरारक घटना
कंडारी येथे भर लग्नसमारंभात थरारक घटना घडली. जोरदार वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप उडून वरच्या विद्युत तारांवर अडकला. यानंतर शॉर्टसर्किट होऊन मंडपाला भीषण आग लागली.
ही घटना नांदुरा तालुक्यातील कंडारी गावात घडली असून, भर उन्हाळ्यातील बदलत्या हवामानामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीत संपूर्ण मंडप जळून खाक झाला. तसेच मंडपाखाली उभ्या असलेल्या काही दुचाक्यांनाही आग लागून त्या जळाल्या.
घटनेनंतर परिसरात एकच धावपळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बदलत्या हवामानामुळे लग्नसराईत अशा घटनांचे प्रमाण वाढत असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • महसूल पथकाला हुलकावणी देत माटरगावयेथे ट्रॅक्टरसह चालक फरार शासकीय वाहनालाच अडवून जीवघेणा पाठलाग, चालकावर गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर मंडळातील माटरगाव शिवारात महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडला. तरीही चालकाने चलाखीने ट्रॅक्टर पळवला. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या - प्रकरणी सुलतानपूर मंडळ अधिकारी अनुना कावळे यांनी खुलताबाद ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून किरण गायकवाड (रा. सुलतानपूर वर गुन्हा दाखल झाला. मंडळ अधिकारी कावळे यांना ८ मे रोजी फुलमस्ता नदीपात्रातून काही जण अवैधरित्या वाळूचे उत्खनन, वाहतूक करत असल्याचे सांगण्यात आले. ९ मे पहाटे महसूल पथक कारवाईसाठी रवाना झाले.तपासणी सुरू असताना तेथे दुधाची गाडी आली. त्या वाहनाला रस्ता देण्याच्या बहाण्याने चालकाने ट्रॅक्टर बाजूला घेतल्याचे भासवत सुलतानपूरच्या दिशेने धूम ठोकली. पथकाने पाठलाग केला. मात्र ट्रॅक्टरने ओव्हरटेक करू दिले नाही.पथकात अनुना कावळे, शेख मोयुनोदिन, सविता वाहटुळे होते. यावेळी ट्रॅक्टर चालकाने माझ्याकडे परवाना नाही. काय करायचे ते करून घ्या, असे म्हणाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
    4
    महसूल पथकाला हुलकावणी देत माटरगावयेथे ट्रॅक्टरसह चालक फरार

शासकीय वाहनालाच अडवून जीवघेणा पाठलाग, चालकावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग 
खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर मंडळातील माटरगाव शिवारात महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडला. तरीही चालकाने चलाखीने ट्रॅक्टर पळवला. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या - प्रकरणी सुलतानपूर मंडळ अधिकारी अनुना कावळे यांनी खुलताबाद ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून किरण गायकवाड (रा. सुलतानपूर वर गुन्हा दाखल झाला. मंडळ अधिकारी कावळे यांना ८ मे रोजी फुलमस्ता नदीपात्रातून काही जण अवैधरित्या वाळूचे उत्खनन, वाहतूक करत असल्याचे सांगण्यात आले. ९ मे पहाटे महसूल पथक कारवाईसाठी रवाना झाले.तपासणी सुरू असताना तेथे दुधाची गाडी आली. त्या वाहनाला रस्ता देण्याच्या बहाण्याने चालकाने ट्रॅक्टर बाजूला घेतल्याचे भासवत सुलतानपूरच्या दिशेने धूम ठोकली. पथकाने पाठलाग केला. मात्र ट्रॅक्टरने ओव्हरटेक करू दिले नाही.पथकात अनुना कावळे, शेख मोयुनोदिन, सविता वाहटुळे होते. यावेळी ट्रॅक्टर चालकाने माझ्याकडे परवाना नाही. काय करायचे ते करून घ्या, असे म्हणाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • बुलडाणा जिल्ह्यातील धरणगावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.
    1
    बुलडाणा जिल्ह्यातील धरणगावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • घाटी रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर नातेवाईकांचा संताप रिकाम्या रूम असूनही रुग्णांना बेड नाही. घाटी रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर नातेवाईकांचा संताप रिकाम्या रूम असूनही रुग्णांना बेड नाही; डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप नागरिकांनी केले आहे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : घाटी रुग्णालयातील वार्ड क्रमांक 2, 8, 19 आणि 37 मध्ये अनेक रूम रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड व रूम उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टर व त्यांच्या नातेवाईकांसाठीच या रूम राखीव ठेवण्यात आल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, रुग्ण गंभीर अवस्थेत असतानाही “बेड उपलब्ध नाही”, “रूम खाली नाही” अशी उत्तरे दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात अनेक रूम रिकाम्या दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत विचारणा केल्यावर काही कर्मचाऱ्यांनी “आम्हाला शिकवू नका”, “कोणाला रूम द्यायची हे आम्हाला माहिती आहे”, असे उद्धट उत्तर दिल्याचाही आरोप करण्यात आला.रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले की, घाटी रुग्णालयात गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी गादी, बेड किंवा योग्य उपचार व्यवस्था नसल्याने रुग्णांना जमिनीवर किंवा जिथे जागा मिळेल तिथे थांबावे लागत आहे. “घाटी हे फक्त नावापुरते गरीबांचे रुग्णालय आहे का?” असा सवाल संतप्त नातेवाईकांनी उपस्थित केला. याशिवाय, डॉक्टर वेळेवर रुग्ण तपासण्यासाठी येत नसल्याचा तसेच काही डॉक्टर सतत मोबाईलवर व्यस्त असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचे जीव धोक्यात येत असल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली. तक्रार करण्यासाठी पुढे गेलेल्या काही नातेवाईकांना सुरक्षा रक्षकांकडून दमदाटी व मारहाण करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराला कंटाळून काही नातेवाईकांनी आपल्या रुग्णांना घाटीतून हलवून हेगडेवार रुग्णालयात दाखल केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे घाटी रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
    1
    घाटी रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर नातेवाईकांचा संताप रिकाम्या रूम असूनही रुग्णांना बेड नाही.
घाटी रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर नातेवाईकांचा संताप रिकाम्या रूम असूनही रुग्णांना बेड नाही; डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप
नागरिकांनी केले आहे 
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : घाटी रुग्णालयातील वार्ड क्रमांक 2, 8, 19 आणि 37 मध्ये अनेक रूम रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड व रूम उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टर व त्यांच्या नातेवाईकांसाठीच या रूम राखीव ठेवण्यात आल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, रुग्ण गंभीर अवस्थेत असतानाही “बेड उपलब्ध नाही”, “रूम खाली नाही” अशी उत्तरे दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात अनेक रूम रिकाम्या दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत विचारणा केल्यावर काही कर्मचाऱ्यांनी “आम्हाला शिकवू नका”, “कोणाला रूम द्यायची हे आम्हाला माहिती आहे”, असे उद्धट उत्तर दिल्याचाही आरोप करण्यात आला.रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले की, घाटी रुग्णालयात गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी गादी, बेड किंवा योग्य उपचार व्यवस्था नसल्याने रुग्णांना जमिनीवर किंवा जिथे जागा मिळेल तिथे थांबावे लागत आहे. “घाटी हे फक्त नावापुरते गरीबांचे रुग्णालय आहे का?” असा सवाल संतप्त नातेवाईकांनी उपस्थित केला.
याशिवाय, डॉक्टर वेळेवर रुग्ण तपासण्यासाठी येत नसल्याचा तसेच काही डॉक्टर सतत मोबाईलवर व्यस्त असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचे जीव धोक्यात येत असल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली. तक्रार करण्यासाठी पुढे गेलेल्या काही नातेवाईकांना सुरक्षा रक्षकांकडून दमदाटी व मारहाण करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकाराला कंटाळून काही नातेवाईकांनी आपल्या रुग्णांना घाटीतून हलवून हेगडेवार रुग्णालयात दाखल केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे घाटी रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    55 min ago
  • न्यू मुंबई चायनीज (बिडकीन) आणि मुंबई चायनीज (फारोळा) या प्रसिद्ध उपाहारगृहांचे मालक इमरान शहा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यांना मित्र, कुटुंब आणि हितचिंतकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत.
    1
    न्यू मुंबई चायनीज (बिडकीन) आणि मुंबई चायनीज (फारोळा) या प्रसिद्ध उपाहारगृहांचे मालक इमरान शहा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यांना मित्र, कुटुंब आणि हितचिंतकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत.
    user_Isak Shaha
    Isak Shaha
    Media Consultant Paithan, Aurangabad•
    16 hrs ago
  • बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक डिझेल टँकर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीव धोक्यात घालून, कॅन-बाटल्या घेऊन डिझेल जमा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली.
    1
    बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक डिझेल टँकर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीव धोक्यात घालून, कॅन-बाटल्या घेऊन डिझेल जमा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • हरियाणामुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आज पश्चिम बंगालला भेट दिली. यावेळी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भूमीला नमन करत नवीन सरकारच्या स्थापनेबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील 'विकसित भारता'च्या संकल्पात पश्चिम बंगाल महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी नमूद केले.
    1
    हरियाणामुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आज पश्चिम बंगालला भेट दिली. यावेळी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भूमीला नमन करत नवीन सरकारच्या स्थापनेबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील 'विकसित भारता'च्या संकल्पात पश्चिम बंगाल महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी नमूद केले.
    user_शुरु रिपोर्टर
    शुरु रिपोर्टर
    Voice of people Sillod•
    21 hrs ago
  • औरंगाबादच्या वाळूज पोलीस स्टेशनजवळ भीषण अपघात झाला, ज्यात एक महिला गंभीर जखमी झाली. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदत केली.
    1
    औरंगाबादच्या वाळूज पोलीस स्टेशनजवळ भीषण अपघात झाला, ज्यात एक महिला गंभीर जखमी झाली. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदत केली.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • अतिक्रमण कारवाईची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार दिव्यांग महिला माठ विक्रेती नाही तर भिक्षेकरी छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मधील सेव्हन हिल्स ते शाहनूरमियाँ दर्गा दरम्यान झालेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेनंतर, प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्यासाठी एका दिव्यांग महिलेचा खोटा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी या प्रकरणाची प्रत्यक्ष चौकशी केली. तेव्हा व्हिडिओत दिसणाऱ्या दिव्यांग महिलेचा माठ विक्री व्यवसायाशी कोणताही संबंध नाही. काही समाजकंटकांनी प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण करण्यासाठी तिचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
    2
    अतिक्रमण कारवाईची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार
दिव्यांग महिला माठ विक्रेती नाही तर भिक्षेकरी
छत्रपती संभाजीनगर 
छत्रपती संभाजीनगर मधील सेव्हन हिल्स ते शाहनूरमियाँ दर्गा दरम्यान झालेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेनंतर, प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्यासाठी एका दिव्यांग महिलेचा खोटा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी या प्रकरणाची प्रत्यक्ष चौकशी केली. तेव्हा व्हिडिओत दिसणाऱ्या दिव्यांग महिलेचा माठ विक्री व्यवसायाशी कोणताही संबंध नाही. काही समाजकंटकांनी प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण करण्यासाठी तिचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.