Shuru
Apke Nagar Ki App…
औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. हा तालुक्यात अशा प्रकारचा पहिलाच पुतळा असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
AKBAR SHAHA REPORTER
औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. हा तालुक्यात अशा प्रकारचा पहिलाच पुतळा असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे भीषण आग पहाटे 4 वाजेच्या सुमारास 8 ते 10 दुकाने जळून खाक छत्रपती संभाजीनगर मार्गावरील घटना किराणा दुकान, हॉटेल, टायर दुकानांसह अनेक व्यावसायिक गाळ्यांचे मोठे नुकसान शिऊर पोलिसांची घटनास्थळी धाव वैजापूर नगर परिषद आणि छत्रपती संभाजीनगर अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली आगीत अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, पुढील तपास सुरू ANC : वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. छत्रपती संभाजीनगर मार्गावरील 8 ते 10 दुकाने या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. आगीत किराणा दुकान, हॉटेल, टायर दुकानांसह अनेक व्यावसायिक गाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वैजापूर नगर परिषदेचे अग्निशामक दल आणि छत्रपती संभाजीनगर अग्निशामक विभागाला पाचारण करण्यात आले. दोन्ही विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या घटनेत अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.4
- औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. हा तालुक्यात अशा प्रकारचा पहिलाच पुतळा असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.1
- पुण्यातील हडपसरमध्ये धक्कादायक प्रकार! मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला संतप्त नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. महिलांच्या सुरक्षेबाबत नागरिक आता अधिक सतर्क झाल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.1
- न्यू मुंबई चायनीज (बिडकीन) आणि मुंबई चायनीज (फारोळा) या प्रसिद्ध उपाहारगृहांचे मालक इमरान शहा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यांना मित्र, कुटुंब आणि हितचिंतकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत.1
- महाराष्ट्रामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अनोख्या उपक्रमामुळे लहान मुलांमध्ये बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार रुजण्यास मदत होईल.1
- बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक डिझेल टँकर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीव धोक्यात घालून, कॅन-बाटल्या घेऊन डिझेल जमा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली.1
- रिकाम्या रूम असूनही रुग्णांना प्रतीक्षा; घाटीत संतापाची लाट रिकाम्या रूम असूनही रुग्णांना प्रतीक्षा; घाटीत संतापाची लाट छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील अनेक रूम रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध करून दिले जात नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. वार्ड क्रमांक 2, 8, 19 आणि 37 मध्ये रिकाम्या रूम दिसत असतानाही “बेड नाही” असे सांगितले जात असल्याने नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक मिळत असल्याचा आरोप करत, गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. काही डॉक्टर वेळेवर तपासणीसाठी येत नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला. मात्र, चालकाने शासकीय पथकाला हुलकावणी देत ट्रॅक्टर पळवला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी किरण गायकवाड नावाच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.4