Shuru
Apke Nagar Ki App…
शिरपूर: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; आयशरने रिक्षाला चिरडले, महिलेसह दोघांचा मृत्यू शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आरती हॉटेलजवळ भीषण अपघात घडला असून आयशर वाहनाने रिक्षाला चिरडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात महिलेसह एक युवक जागीच ठार झाले असून पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. मनीषा राजेंद्र पाटील आणि बंटी किसन जाधव अशी मृतांची नावे असून या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Dhule News 24
शिरपूर: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; आयशरने रिक्षाला चिरडले, महिलेसह दोघांचा मृत्यू शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आरती हॉटेलजवळ भीषण अपघात घडला असून आयशर वाहनाने रिक्षाला चिरडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात महिलेसह एक युवक जागीच ठार झाले असून पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. मनीषा राजेंद्र पाटील आणि बंटी किसन जाधव अशी मृतांची नावे असून या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- धुळे तालुक्यातील कापडणे शिवारात जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि महसूल तसेच रेल्वे प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र वाद उफाळून आला. योग्य मोबदला मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जमिनीचा ताबा देण्यास नकार देत आक्रमक भूमिका घेतली.1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- चांदवडच्या जेआरजी विद्यालयात श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान श्रीमंत कोकाटे शिव शाहु फुले आंबेडकर साहित्याचे व्याख्याते2
- “स्कॅनर घोटाळ्यावर न्याय मागण्यासाठी आयुक्त कार्यालय गाठले; मंगेश साबळे आक्रमक”1
- ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी रोहित पवारांचे जंगी स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी नुकताच येवला दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. एडवोकेट माणिकराव शिंदे आणि प्रसिद्ध मका व्यापारी गोरख आबा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात पवारांचे स्वागत केले. या दौऱ्यातील मुख्य कार्यक्रम माणिकराव शिंदे यांच्या ‘रायगड’ निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी रोहित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा केली. मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवर आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी माणिकराव शिंदे आणि गोरख आबा पवार यांनी रोहित पवारांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. रोहित पवारांच्या या दौऱ्यामुळे येवला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शरद पवार गटाने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- aap ki kya ray hai1
- पुणे जिल्ह्यातील मारुंजी आणि लगतच्या परिसरात (हिंजवडी, आयटी पार्क परिसर) उकाड्यापासून सुटका: गेल्या काही दिवसांपासून पुणेकर 38°C ते 40°C तापमानाचा सामना करत होते. या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा स्थानिकांसाठी वरदान ठरला आहे. आयटी हबमध्ये चैतन्य: कामाच्या व्यापात आणि ट्रॅफिकच्या कचाट्यात असलेल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नोकरदारांना या मृदगंधामुळे मोठा मानसिक दिलासा मिळाला. तात्पुरता दिलासा: जरी हा पाऊस तात्पुरता असला, तरी वाढत्या उष्णतेच्या लाटेला त्याने काही काळ लगाम घातला आहे.2
- धुळे शहरातील देवपूर भागात जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील आयटीआय कॉलेजसमोर मुख्य रस्त्यावर असलेल्या विद्युत डीपीला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. कडाक्याच्या उन्हामुळे डीपीने क्षणार्धात पेट घेतल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.1