महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा व एकपात्री प्रयोग : साकोली , स्थानिक बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भूमी साकोली (जि. भंडारा ) येथे बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती, साकोली यांच्या वतीने महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय स्मिता मेश्राम होत्या.प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय इंजिनिअर महेंद्र मेश्राम होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंचावरील उपस्थित सर्व सन्माननीय अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . याप्रसंगी ' महात्मा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य आणि भारताचे संविधान ' या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्व वयोगटातील एकूण ३५ स्त्री पुरुषांनी आणि मुलामुलींनी सहभाग घेतला. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना क्रमाक्रमाने ' महात्मा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य आणि भारताचे संविधान ' या विषयावर प्रा. डॉ. शंकर बागडे यांनी प्रश्न विचारले. प्रश्नाचे योग्य उत्तर देणाऱ्या स्पर्धकांना गुण देण्यात आले.या प्रश्नमंजुषा स्पर्धेत भारताचे संविधान आणि महात्मा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत एकूण १०५ प्रश्न विचारले होते. यापैकी ज्या स्पर्धकांनी अधिकाधिक प्रश्नांची उत्तरे दिली. अशा चार स्पर्धकांना विजयी घोषित करण्यात आले. यामध्ये पुरुष गटातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रविंद्र राऊत यांना बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समितीचे अध्यक्ष सन्माननीय दिपक साखरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्त्रियांच्या गटातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अमावस्या नागदेवे यांना बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समितीच्या सचिव अॅड. स्मिता मेश्राम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्त्रियांच्या गटातील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक नाजुका मेश्राम यांना प्रा. डॉ. शंकर बागडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तर मुलामुलींच्या गटातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तक्ष साखरे यांना इंजिनिअर महेंद्र मेश्राम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे चारही विजेत्यांना पारितोषिके डॉ. शंकर बागडे यांच्याकडून देण्यात आली. यावेळी क्रांतीबा जोतीबा फुले हा एकपात्री प्रयोग प्रा. डॉ. रेवाराम खोब्रागडे, लाखनी यांनी उत्तम रीतीने सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शंकर बागडे यांनी केले.गुणदानाचे कार्य व आभारप्रदर्शन सन्माननीय अशोकजी रंगारी यांनी केले. याप्रसंगी साकोली येथील स्त्री पुरुषांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती साकोलीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा व एकपात्री प्रयोग : साकोली , स्थानिक बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भूमी साकोली (जि. भंडारा ) येथे बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती, साकोली यांच्या वतीने महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय स्मिता मेश्राम होत्या.प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय इंजिनिअर महेंद्र मेश्राम होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंचावरील उपस्थित सर्व सन्माननीय अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .
याप्रसंगी ' महात्मा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य आणि भारताचे संविधान ' या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्व वयोगटातील एकूण ३५ स्त्री पुरुषांनी आणि मुलामुलींनी सहभाग घेतला. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना क्रमाक्रमाने ' महात्मा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य आणि भारताचे संविधान ' या विषयावर प्रा. डॉ. शंकर बागडे यांनी प्रश्न विचारले. प्रश्नाचे योग्य उत्तर देणाऱ्या स्पर्धकांना गुण देण्यात आले.या प्रश्नमंजुषा स्पर्धेत भारताचे संविधान आणि महात्मा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत एकूण १०५ प्रश्न विचारले होते. यापैकी ज्या स्पर्धकांनी अधिकाधिक
प्रश्नांची उत्तरे दिली. अशा चार स्पर्धकांना विजयी घोषित करण्यात आले. यामध्ये पुरुष गटातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रविंद्र राऊत यांना बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समितीचे अध्यक्ष सन्माननीय दिपक साखरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्त्रियांच्या गटातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अमावस्या नागदेवे यांना बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समितीच्या सचिव अॅड. स्मिता मेश्राम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्त्रियांच्या गटातील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक नाजुका मेश्राम यांना प्रा. डॉ. शंकर बागडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तर मुलामुलींच्या गटातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तक्ष साखरे यांना इंजिनिअर महेंद्र
मेश्राम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे चारही विजेत्यांना पारितोषिके डॉ. शंकर बागडे यांच्याकडून देण्यात आली. यावेळी क्रांतीबा जोतीबा फुले हा एकपात्री प्रयोग प्रा. डॉ. रेवाराम खोब्रागडे, लाखनी यांनी उत्तम रीतीने सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शंकर बागडे यांनी केले.गुणदानाचे कार्य व आभारप्रदर्शन सन्माननीय अशोकजी रंगारी यांनी केले. याप्रसंगी साकोली येथील स्त्री पुरुषांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती साकोलीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
- Post by मनिषा विजय काशीवार1
- 14 एप्रिल... बाबासाहेब यांची जयंती. तरुण वर्गात उत्साहाचे वातावरण.. DJ च्या भीम गीतावर बेधुंद होऊन नाचणारी आजची पिढी..1
- सौंदड : येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि. १४ एप्रिल २०२६ रोजी महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम संस्थेचे संस्थापक तथा संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथील रक्तकेंद्र विभागाच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी डॉ. रिफत गजाला (रक्त संक्रमण अधिकारी), कुमारी सीमा निर्वाण (समुपदेशक), मिर्झा बेग (अधिपरीचारक), नवीन करोसिया (प्रयोगशाळा सहाय्यक) व हिमानी मेश्राम (प्रयोगशाळा सहाय्यक) यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय मार्गदर्शनात मा. जगदीश लोहिया यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता व बंधुतेच्या संदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी रक्तदान हे एक प्रभावी माध्यम आहे. या प्रसंगी सचिव पंकज लोहिया, उपाध्यक्ष आ. न. घाटबांधे, सरपंच हर्ष मोदी, प्राचार्या उमा बाच्छल, मुख्याध्यापक मनोज शिंदे तसेच उपसरपंच रोशन शिवणकर, प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे व इतर मान्यवर उपस्थित होते. शिबिरात रोशन शिवणकर, हेमराज लाडे, ज्ञानेश्वर दरवडे, समाधान बडोले, हर्षिद मांडरकर, सचिन लाडे, मोहन निंबेकर, महेश फुंडे, आरिफ शेख, बबन निंबेकर, मयूर चुटे, आशिष जनबंधु, मनीष कापगते, दिवेश ढोमने, तुषार शहारे, शुभम राऊत, गीता रहांगडाले, मंगेश शिवणकर, प्रकाश हटकर, हरिशकुमार मेश्राम, अजय कापगते आदींसह एकूण २२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. वैद्यकीय पथकाने सर्व रक्तदात्यांची तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्तसंकलन केले. संकलित रक्तसाठा गरजू रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगी ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी सर्व रक्तदाते, स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आभार मानले. समाजात जागरूकता निर्माण करून गरजूंचे प्राण वाचवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.2
- TOWN NEWS 24 📢गोंदिया जिले के नवेगांव-नागझिरा टाइगर रिजर्व के बफर जोन में एक बेहद दर्दनाक घटना सामने आई है। 11 अप्रैल 2026 को तिरोड़ा वनपरिक्षेत्र के कोडेलोहारा इलाके में एक टाइगर खुले, बिना सुरक्षा वाले कुएं में गिर गया… और तड़प-तड़प कर उसकी मौत हो गई। यह सिर्फ एक हादसा नहीं… यह सवाल है पूरे सिस्टम पर! 👉 क्या वन विभाग को इन खुले कुओं की जानकारी नहीं थी? 👉 क्यों नहीं हुआ पहले सर्वे? 👉 आखिर कब तक ऐसे ही मरते रहेंगे वन्यजीव? अब मांग उठ रही है कि ✔️ सभी खुले कुओं को तुरंत कवर किया जाए ✔️ जिम्मेदार अधिकारियों पर सख्त कार्रवाई हो ✔️ पूरे बफर जोन की जांच की जाए 👉 क्या हर बार एक जान जाने के बाद ही सिस्टम जागेगा? #Gondia #Nagzira #TigerDeath #SaveTiger #Wildlife #ForestDepartment #Negligence #BreakingNews #GroundReport #SystemFailure #ViralNews #MaharashtraNews #TigerReserve #AnimalRights #वनविभाग #लापरवाही #जंगलीजीव #बड़ीखबर ⚡1
- नहामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती रॅली काढुन स्वछता अभियान गावातील नागरीक तसेच उपासक तथा उपासिक् सरपंच भागेश्वरजी भुते, पोलीस पाटील गजाननजी जिभकाटे, तंटामुक्ती अधक्ष विकास वाघमारे, सदस्य विलास कावळे, विशाल मते, शांताराम कामठे, शिवम पंचबुधे, बंडु कामठे, विद्या तितरमारे, शहारे ताई, मेश्राम ताई , लक्ष्मण शहारे, वसंता कामठे, रुपचंद उके, हिरामण बोरकर, ज्ञानेश्वर उके उपासक तथा उपासीका मोठ्या संख्येने रॅलीत उपस्थीत होते2
- *९४*रक्तदात्यांनी केले रक्तदान* उमरेड (प्रतिनिधी ) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणुसकीने वागविण्याचा सल्ला दिला.अगदी तोच सल्ला शिरोधार्थ मानत त्यांच्या जयंती दिनी काही तरी सत्कर्म हातून घडावे म्हणून उमरेड शहरात १३५ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिरात महिला पुरुष एकूण *९४* रक्तदात्यांनी रक्तदान करीत महामानवाला अभिवादन केले. स्थानिक साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ भवन येथे उमरेड युथ फाउंडेशन, इंडिया पॉवर जिम, ओम साई स्पोर्टिंग क्लब, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. उन्हाचा तडाखा असताना सुद्धा यामध्ये पुरुष व महिला रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासून राष्ट्रकार्यात सहभागी झाले.प्रसंगी डॉ.हर्षल रेवतकर, डॉ.जितेश चव्हाण,संस्थेचे संस्थापक अनिलकुमार गोविंदानी, संयोजक सचिन कुहीकर, संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार,अध्यक्ष मनीष बालपांडे ,पूर्वाध्यक्ष संजय मौदेकर,दीपक पटले,ओम साई स्पोर्टिंग क्लब चे रितेश राऊत, रिलायबल कोचिंग चे संचालक सुबोध धनविजय,नगरसेविका शालिनी गवळी,इंडिया पॉवर जिम चे किशोर आदमने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.रक्तपेढी लाईफ लाइन ब्लड बँक नागपूर चे डॉ.अविनाश बभारे,प्रवीण साठवणे यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांनी संस्थेचे अध्यक्ष यांना स्मृती चिन्ह भेट अभिनंदन केले.कार्यक्रम संयोजक किशोर आदमने यांच्या उपस्थितीत शिबिर यशस्वीरीत्या पार पडला.यशस्वीतेसाठी आशिष वंजारी,विशाल बावणे,मुकेश गौतम,अक्षय श्रीखंडे,नरेंद्र बालपांडे,दिनेश ढेबूदास,प्रवीण लाडेकर,सतीश चकोले,समीर वैद्य,प्रांजल डहाके,रोशन पोकळे,उज्वल चिंदमवार,तोसिफ शेख,मुकेश गौतम,हितेश गडबोरीकर,शुभम सिर्सिकर,सतीश तांबेकर ,सचिन जोधे ,राजू चाचरकर,संदीप दांडेकर,आदींचे योगदान लाभले.1
- हिंगणा येथील मुख्य बाजार चौकात गुप्ताजी हॉटेलसमोर प्रचंड ट्रॅफिक जाम नागपूर :- हिंगणा येथील मुख्य बाजार चौकात मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दररोज सकाळी व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांची लांबलचक रांग लागते, ज्यामुळे प्रवासाला उशीर होतो आणि अपघाताचा धोका देखील वाढला आहे. स्थानिकांच्या मते, रस्त्यावर अनियमित पार्किंग, फेरीवाले आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव ही मुख्य कारणे आहेत. अनेकदा आपत्कालीन वाहनांनाही मार्ग काढणे कठीण जाते, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली असून, वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून ट्रॅफिक सुरळीत करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जर याकडे दुर्लक्ष झाले, तर येणाऱ्या काळात समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.1
- Post by मनिषा विजय काशीवार2