Shuru
Apke Nagar Ki App…
ऋषी पंचमीसाठी गेलेल्या भंडाऱ्याच्या महिलांच्या वाहनाला मध्यप्रदेशात अपघात bhandara :- भंडाऱ्यातील सावरी येथील महिला भक्तांच्या झायलो वाहनाला मध्यप्रदेशातील पांढुर्णा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे.ऋषी पंचमी निमित्त 7 ते 8 महिला सौसर येथे गेल्या होत्या. आज पहाटे तीनच्या सुमारास तीनखेडा परिसरात त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या दुर्घटनेत वाहन चालक आदित्य सुनील मांढरे, वय 24 वर्षे, यांचा मृत्यू झाला असून चार महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने सौसर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगला ठवकर, रेणा चौधरी, जयश्री झंझाळ आणि शिला तितीरमारे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
A K
ऋषी पंचमीसाठी गेलेल्या भंडाऱ्याच्या महिलांच्या वाहनाला मध्यप्रदेशात अपघात bhandara :- भंडाऱ्यातील सावरी येथील महिला भक्तांच्या झायलो वाहनाला मध्यप्रदेशातील पांढुर्णा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे.ऋषी पंचमी निमित्त 7 ते 8 महिला सौसर येथे गेल्या होत्या. आज पहाटे तीनच्या सुमारास तीनखेडा परिसरात त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या दुर्घटनेत वाहन चालक आदित्य सुनील मांढरे, वय 24 वर्षे, यांचा मृत्यू झाला असून चार महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने सौसर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगला ठवकर, रेणा चौधरी, जयश्री झंझाळ आणि शिला तितीरमारे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- साकरीटोला येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये गणित शिक्षिका नसल्याने 'तालाठोको' आंदोलन; पालकांच्या तीव्र रोषानंतर मार्ग निघाला नमस्कार, 'सत्य को जानो न्यूज' मध्ये आपले स्वागत आहे. सालेकसा / साकरीटोला : सातगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साकरीटोला येथील जिल्हा परिषद हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात गणित विषयाच्या शिक्षिका धुवाधपाडे मॅडम यांची चार महिन्यांपूर्वी अन्यत्र बदली करण्यात आली होती. त्यानंतर शाळेत नियमित गणित शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. आगामी १५ दिवसांत प्रथम सत्र परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या विरोधात आज संतप्त विद्यार्थी, पालक, शाळा सुधार समिती व व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेला कुलूप लावून 'तालाठोको' आंदोलन पुकारण्यात आले. प्रतिक्रिया व भूमिका: वंदनाताई काळे (जिल्हा परिषद सदस्य, कारूटोला क्षेत्र): आंदोलनादरम्यान प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई काळे म्हणाल्या की, धुवाधपाडे मॅडम या साकरीटोला शाळेत ९ वी आणि १० वीच्या गणित विषयासाठी कार्यरत असताना त्यांना नियमबाह्यरीत्या जाम्यातिम्या हायस्कूल येथे नेण्यात आले. शिक्षण सेवकाने किमान तीन वर्षे एका ठिकाणी सेवा देणे बंधनकारक असताना अवघ्या काही महिन्यांत अशी तदर्थ बदली करणे नियमबाह्य आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या आदेशाचीही शाळेच्या मुख्याध्यापकांनी अंमलबजावणी न केल्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षण अधिकारी, पंचायत समिती कार्यालय सालेकसा: या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, साकरीटोला शाळेत पालक व व्यवस्थापन समितीने आंदोलन करून शाळा बंद केल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली. धुवाधपाडे मॅडम यांची सेवा यापूर्वी जाम्यातिम्या येथील हायस्कूलमध्ये संलग्न करण्यात आली होती, परंतु पालकांच्या तीव्र मागणीनुसार त्यांचे ते आदेश रद्द करण्यात आले असून, त्या लवकरच साकरीटोला शाळेत पुन्हा रुजू होणार आहेत. पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे मनोगत: आंदोलनानंतर प्रशासनाकडून तात्काळ दखल घेतल्यामुळे आणि पालकांच्या व शाळा समितीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या गणित विषयाच्या शिक्षक नियुक्तीची मागणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. याबद्दल पालक वर्ग व शाळा समितीच्या वतीने समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानण्यात आले. – अमगाव तालुका प्रतिनिधी, स्वराज्यदूत / संपादक, सत्य को जानो न्यूज1
- भजियापार टोला येथे गणेशोत्सवानिमित्त समाजप्रबोधनातून एकतेचा संदेश गोंदिया आमगांव:भजियापार टोला, ता. आमगाव, जि. गोंदिया : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त भजियापार टोला येथील भजियापार नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने विविध सार्वजनिक व समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये एकता, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा संदेश देण्यात आला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा मजबूत करण्यासोबतच विविध सामाजिक विषयांवर नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष गौरव रहांगडाले, उपाध्यक्ष मोहित रहांगडाले, सचिव आदित्य रहांगडाले यांच्यासह गावातील ज्येष्ठ नेते राधेलाल रहांगडाले, शितल चौधरी, तीलकचंद कटरे, मेघराज चौधरी ,केशरी रहांगडाले तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘एकता आणि सामाजिक जनजागृती’ हा संदेश देण्याचा मंडळाचा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला.1
- भोलेनाथ नगर की बदहाली पर सवाल! आखिर कब जागेंगे जनप्रतिनिधि और प्रशासन? Rok Tok Hindustan news imran shaikh [16/09, 22:03] Imran Shaikh: भोलेनाथ नगर में बदहाल स्थिति को लेकर नागरिक परेशान हैं। आखिर जनप्रतिनिधि और प्रशासन कब इस समस्या पर ध्यान देंगे? जनता की समस्याओं का समाधान कब होगा? [16/09, 22:03] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #BholenathNagar #ThaneNews #CivicIssues @TMCaTweet @ThaneCityPolice @CMOMaharashtra @DGPMaharashtra1
- वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली. सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .1
- वर्धा ट्राफिक टीम आर्वी दाखल 18 वयापेक्षा कमी गाडी चालवणारे यांना चालन1
- पोंभुर्ण्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती! ‘सेवा संकल्प अभियान’ाचा शुभारंभ | Chandrapur Nagari पोंभुर्ण्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती! ‘सेवा संकल्प अभियान’ाचा शुभारंभ | Chandrapur Nagari1
- लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाविरोधात तीव्र लढा! उद्योग परवानगी रद्द करण्याची राजेश बेले यांची आक्रमक मागणी; मुंबईत आत्मदहनाचा इशारा चंद्रपूर नगरी जिल्हा प्रतिनिधी विशेष वृत्त लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाविरोधात तीव्र लढा! उद्योग परवानगी रद्द करण्याची राजेश बेले यांची आक्रमक मागणी; मुंबईत आत्मदहनाचा इशारा चंद्रपूर: एमआयडीसी घुग्घुस परिसरातील ‘मेसर्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’ या कारखान्यामुळे परिसराचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचा गंभीर आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वारलुजी बेले यांनी केला आहे. या उद्योगाची पर्यावरण परवानगी तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, कारवाई न झाल्यास थेट मुंबईत आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनातील मुख्य मुद्दे व घडामोडी रासायनिक कचऱ्याचे प्रदर्शन: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयासमोर रासायनिक घनकचरा आणि सांडपाणी आणून अनोखा निषेध नोंदवण्यात आला. शेतीचे नुकसान: १८ ऑगस्ट २०२६ रोजी उसगाव नाल्यात रासायनिक द्रव्य सोडल्यामुळे सुमारे १०० एकर शेती प्रभावित झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दहा गंभीर आरोप: ईएसपी डस्ट (डोलाचार) ची नियमबाह्य वाहतूक व विक्री, हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवणे आणि पर्यावरण मंजुरीपेक्षा जास्त उत्पादनाचे आरोप. MPCB अधिकाऱ्यांवर गंभीर संशय: पर्यावरण मंडळाच्या काही अधिकाऱ्यांवर व्यवस्थापनाशी संधान साधल्याचे आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. २५ सप्टेंबरला मुंबईत आत्मदहनाचा इशारा कारखान्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास आगामी २५ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथील मुख्यमंत्री निवास ‘वर्षा’ समोर आत्मदहन करण्याचा इशारा उसगाव येथील खालील नागरिकांनी दिला आहे: मोहनदास धोंडूजी राजूरकर वामन बापूजी राजूरकर बंडू धोंडूजी राजूरकर रामरतन बापूजी राजूरकर सुधाकर मल्हारी ठाकरे नितेश पांडुरंग ठाकरे महत्त्वाचे: प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जल व मृद नमुन्यांची वैज्ञानिक तपासणी करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी आर्त हाक परिसरातील नागरिकांमधून दिली जात आहे. © चंद्रपूर नगरी | सर्व हक्क सुरक्षित1
- १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;1
- वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान पात्र वनपट्टेधारकांना ‘७/१२ ई’ उतारे देण्यास शासनाची कालबद्ध मोहीम; २ ऑक्टोबरपर्यंत दावे निकाली काढण्याचे उद्दिष्ट मुंबई : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वनहक्क दाव्यांच्या निपटाऱ्याला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यभर विशेष अभियान हाती घेतले आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत पात्र वनहक्कधारकांना वनहक्क अभिलेख उपलब्ध करून देण्यासह संबंधित नोंदी अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे. वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची अधिकृत नोंद मिळावी, तसेच प्रलंबित दाव्यांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा व्हावा, यासाठी महसूल यंत्रणेला विशेष कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वनपट्टेधारकांच्या जमिनीशी संबंधित अभिलेख दुरुस्ती आणि हक्क नोंदणीच्या प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विशेष अभियानाचा निर्णय घेतला आहे. अभियानाच्या कालावधीत संबंधित विभागांकडून प्रलंबित वनहक्क प्रकरणांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक अभिलेख उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. या मोहिमेमुळे वनहक्कधारकांना आपल्या जमिनीवरील हक्काची अधिकृत कागदोपत्री नोंद मिळण्याचा मार्ग सुकर होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील वनहक्कधारकांसाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.1