दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कार दुकानात घुसली झाराप-पत्रादेवी बायपासवर मळगाव सर्कलवर अपघातात तीन युवक जखमी स्टॉल मालक जेवायला गेल्याने अनर्थ टळला; वाहनाचे व दुकानाचे मोठे नुकसान मुंबई -गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवर मळगाव सुतारवाडी सर्कल येथे आज दुपारी एक मोठा अपघात घडला. मळगाव सुतारवाडी सर्कलवर रस्ता ओलांडणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात पर्यटकांची कार थेट रस्त्यालगतच्या काजू विक्रीच्या स्टॉलमध्ये घुसली. या अपघातात कारमधील तीन युवक किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने स्टॉल मालक जेवण्यासाठी घरी गेले असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका खाजगी कंपनीत नोकरीला असलेले आणि मूळचे उज्जैन (मध्य प्रदेश) येथील चार युवक सुट्टीनिमित्त गोव्यात पर्यटनासाठी आले होते. ते आपल्या ताब्यातील होंडा अमेझ कार (23 BH 8533 A) मधून गोव्याहून मुंबईच्या दिशेने परतत होते. दुपारी मळगाव सुतारवाडी सर्कलजवळ आले असता, एक दुचाकीस्वार अचानक महामार्ग ओलांडू लागला. त्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाने अचानक ब्रेक मारला. यामुळे चालकाचा ताबा सुटून कार प्रथम दुभाजकावर आदळली आणि महामार्गावर उलट दिशेने फिरून रस्त्याच्या बाजूला असलेल्या काजूगर विक्रीच्या स्टॉलवर जाऊन जोरात धडकली. हा काजू विक्रीचा स्टॉल मळगाव पिंपळवाडी येथील रहिवासी मंगेश राऊळ यांच्या मालकीचा आहे. अपघात झाला त्या वेळी राऊळ हे योगायोगाने जेवण करण्यासाठी घरी गेले होते. ते जेवण करून पुन्हा दुकानाच्या दिशेने येत असताना त्यांच्या डोळ्यांदेखत हा अपघात झाला. जर ते त्या वेळी दुकानात असते, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. या अपघातात दुकानाचे आणि साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातात कारमधील तीन युवक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने सावंतवाडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ गजानन सामंत, सुभाष राऊळ, सतीश राऊळ, महादेव राऊळ, दीपक जोशी, श्यामसुंदर राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार मनोज राऊत, दीपक शिंदे, ट्राफिक पोलीस गुरुनाथ नाईक, चालक मयूर निरवडेकर आणि पोलीस पाटील साईश केरकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताबाबत पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार किंवा खबर नोंदवण्यात आली नव्हती.
दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कार दुकानात घुसली झाराप-पत्रादेवी बायपासवर मळगाव सर्कलवर अपघातात तीन युवक जखमी स्टॉल मालक जेवायला गेल्याने अनर्थ टळला; वाहनाचे व दुकानाचे मोठे नुकसान मुंबई -गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवर मळगाव सुतारवाडी सर्कल येथे आज दुपारी एक मोठा अपघात घडला. मळगाव सुतारवाडी सर्कलवर रस्ता ओलांडणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात पर्यटकांची कार थेट रस्त्यालगतच्या काजू विक्रीच्या स्टॉलमध्ये घुसली. या अपघातात कारमधील तीन युवक किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने स्टॉल मालक जेवण्यासाठी घरी गेले असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका खाजगी कंपनीत नोकरीला असलेले आणि मूळचे उज्जैन (मध्य प्रदेश) येथील चार युवक सुट्टीनिमित्त गोव्यात पर्यटनासाठी आले होते. ते आपल्या ताब्यातील होंडा अमेझ कार (23 BH 8533 A) मधून गोव्याहून मुंबईच्या दिशेने परतत होते. दुपारी मळगाव सुतारवाडी सर्कलजवळ आले असता, एक दुचाकीस्वार अचानक महामार्ग ओलांडू लागला. त्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाने अचानक ब्रेक मारला. यामुळे चालकाचा ताबा सुटून कार प्रथम दुभाजकावर आदळली आणि महामार्गावर उलट दिशेने फिरून रस्त्याच्या बाजूला असलेल्या काजूगर विक्रीच्या स्टॉलवर जाऊन जोरात धडकली.
हा काजू विक्रीचा स्टॉल मळगाव पिंपळवाडी येथील रहिवासी मंगेश राऊळ यांच्या मालकीचा आहे. अपघात झाला त्या वेळी राऊळ हे योगायोगाने जेवण करण्यासाठी घरी गेले होते. ते जेवण करून पुन्हा दुकानाच्या दिशेने येत असताना त्यांच्या डोळ्यांदेखत हा अपघात झाला. जर ते त्या वेळी दुकानात असते, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. या अपघातात दुकानाचे आणि साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातात कारमधील तीन युवक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने सावंतवाडी येथील खाजगी रुग्णालयात
दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ गजानन सामंत, सुभाष राऊळ, सतीश राऊळ, महादेव राऊळ, दीपक जोशी, श्यामसुंदर राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार मनोज राऊत, दीपक शिंदे, ट्राफिक पोलीस गुरुनाथ नाईक, चालक मयूर निरवडेकर आणि पोलीस पाटील साईश केरकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताबाबत पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार किंवा खबर नोंदवण्यात आली नव्हती.
- मुंबई -गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवर मळगाव सुतारवाडी सर्कल येथे आज दुपारी एक मोठा अपघात घडला. मळगाव सुतारवाडी सर्कलवर रस्ता ओलांडणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात पर्यटकांची कार थेट रस्त्यालगतच्या काजू विक्रीच्या स्टॉलमध्ये घुसली. या अपघातात कारमधील तीन युवक किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने स्टॉल मालक जेवण्यासाठी घरी गेले असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका खाजगी कंपनीत नोकरीला असलेले आणि मूळचे उज्जैन (मध्य प्रदेश) येथील चार युवक सुट्टीनिमित्त गोव्यात पर्यटनासाठी आले होते. ते आपल्या ताब्यातील होंडा अमेझ कार (23 BH 8533 A) मधून गोव्याहून मुंबईच्या दिशेने परतत होते. दुपारी मळगाव सुतारवाडी सर्कलजवळ आले असता, एक दुचाकीस्वार अचानक महामार्ग ओलांडू लागला. त्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाने अचानक ब्रेक मारला. यामुळे चालकाचा ताबा सुटून कार प्रथम दुभाजकावर आदळली आणि महामार्गावर उलट दिशेने फिरून रस्त्याच्या बाजूला असलेल्या काजूगर विक्रीच्या स्टॉलवर जाऊन जोरात धडकली. हा काजू विक्रीचा स्टॉल मळगाव पिंपळवाडी येथील रहिवासी मंगेश राऊळ यांच्या मालकीचा आहे. अपघात झाला त्या वेळी राऊळ हे योगायोगाने जेवण करण्यासाठी घरी गेले होते. ते जेवण करून पुन्हा दुकानाच्या दिशेने येत असताना त्यांच्या डोळ्यांदेखत हा अपघात झाला. जर ते त्या वेळी दुकानात असते, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. या अपघातात दुकानाचे आणि साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातात कारमधील तीन युवक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने सावंतवाडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ गजानन सामंत, सुभाष राऊळ, सतीश राऊळ, महादेव राऊळ, दीपक जोशी, श्यामसुंदर राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार मनोज राऊत, दीपक शिंदे, ट्राफिक पोलीस गुरुनाथ नाईक, चालक मयूर निरवडेकर आणि पोलीस पाटील साईश केरकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताबाबत पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार किंवा खबर नोंदवण्यात आली नव्हती.4
- Post by E city news network1
- कोल्हापूर, ता. 26 : महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी आज सकाळी 7.30 वाजता हॉकी स्टेडियम, गांधीनगर व कसबा बावडा येथील विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. प्रथम आयुक्तांनी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील टर्फची पाहणी करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश शहर अभियंत्यांना दिले. तसेच हॉकी स्टेडियम परिसरातील गाळे दुरुस्त करून सुस्थितीत ठेवावेत व ते लिलाव पद्धतीने भाड्याने देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना इस्टेट ऑफिसर यांना दिल्या. परिसरातील स्वच्छता राखावी तसेच झाडांच्या फांद्या छाटण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.स्वाती दुधाने, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, इस्टेट ऑफिसर सतीश साळोखे, सहा.अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे, प्रमोद बराले आदी उपस्थित होते. यानंतर त्यांनी गांधीनगरमधील महापालिकेच्या हद्दीतील चालू असलेल्या मिळकतींचा सर्व्हेची जागेवर पाहणी करुन माहिती घेतली. आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी सर्व्हेचे काम पूर्ण झाल्यानंतर ॲनलेसेचे काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये महापालिका क्षेत्रात किती बांधकामे आहेत, याचे क्षेत्रफळ किती आहे. यामध्ये किती बांधकामे रिजर्व्हेशनमध्ये आहेत व किती ब्यु लाईन मध्ये आहेत याची सविस्तर माहिती सोमवारी देण्याचे आदेश उपशहर रचनाकार एन.एस.पाटील व त्यांच्या पथकास दिले. यावेळी उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, उपशहर अभियंता निवास पोवार, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लवाड, परवाना अधिक्षक अशोक यादव, पाच थकातील कनिष्ठ अभियंता व कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी कसबा बावडा येथील 76 एम एल डी, 4 एलएलडी व अमृत-2 मधील 15 एलएलडीच्या चालू असलेल्या नविन कामाची माहिती घेतली. अमृत-2 मधील 15 एलएलडीचे चालू असलेले काम जलद गतीने व दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये जी कामे राहिलेले आहेत ते सुस्थितीत करा. तसेच एसटीपी प्लॅन्ट रेग्युलर व सुस्थितीत ठेवण्याचे आदेश जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना दिले. यावेळी उप-आयुक्त परितोष कंकाळ, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबंरे, सहा.अभियंता सुरेश पाटील, कन्संलटंट सुहास पाटील, प्रसाद पाटील, सागर दळवी, सह्याद्रीचे समीर देसाई उपस्थित होते. 000000000003
- कोल्हापूर, ता. 26 : महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी आज सकाळी 7.30 वाजता हॉकी स्टेडियम, गांधीनगर व कसबा बावडा येथील विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. प्रथम आयुक्तांनी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील टर्फची पाहणी करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश शहर अभियंत्यांना दिले. तसेच हॉकी स्टेडियम परिसरातील गाळे दुरुस्त करून सुस्थितीत ठेवावेत व ते लिलाव पद्धतीने भाड्याने देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना इस्टेट ऑफिसर यांना दिल्या. परिसरातील स्वच्छता राखावी तसेच झाडांच्या फांद्या छाटण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.स्वाती दुधाने, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, इस्टेट ऑफिसर सतीश साळोखे, सहा.अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे, प्रमोद बराले आदी उपस्थित होते. यानंतर त्यांनी गांधीनगरमधील महापालिकेच्या हद्दीतील चालू असलेल्या मिळकतींचा सर्व्हेची जागेवर पाहणी करुन माहिती घेतली. आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी सर्व्हेचे काम पूर्ण झाल्यानंतर ॲनलेसेचे काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये महापालिका क्षेत्रात किती बांधकामे आहेत, याचे क्षेत्रफळ किती आहे. यामध्ये किती बांधकामे रिजर्व्हेशनमध्ये आहेत व किती ब्यु लाईन मध्ये आहेत याची सविस्तर माहिती सोमवारी देण्याचे आदेश उपशहर रचनाकार एन.एस.पाटील व त्यांच्या पथकास दिले. यावेळी उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, उपशहर अभियंता निवास पोवार, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लवाड, परवाना अधिक्षक अशोक यादव, पाच थकातील कनिष्ठ अभियंता व कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी कसबा बावडा येथील 76 एम एल डी, 4 एलएलडी व अमृत-2 मधील 15 एलएलडीच्या चालू असलेल्या नविन कामाची माहिती घेतली. अमृत-2 मधील 15 एलएलडीचे चालू असलेले काम जलद गतीने व दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये जी कामे राहिलेले आहेत ते सुस्थितीत करा. तसेच एसटीपी प्लॅन्ट रेग्युलर व सुस्थितीत ठेवण्याचे आदेश जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना दिले. यावेळी उप-आयुक्त परितोष कंकाळ, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबंरे, सहा.अभियंता सुरेश पाटील, कन्संलटंट सुहास पाटील, प्रसाद पाटील, सागर दळवी, सह्याद्रीचे समीर देसाई उपस्थित होते.1
- वन विभागाच्या निष्काळजीपणाची किंमत एका जीवाने चुकवली!1
- Post by Vls Patil1
- हि एक धोक्याची घंटा आहे. जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राहील:- राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले.1
- मालवण शहरातील देऊळवाडा येथे चालत्या टीव्हीएस विगो दुचाकीने मागच्या बाजूने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. दुचाकीने पेट घेतल्याचा प्रकार दुचाकीच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या लक्षात आला. त्याने वेळीच दुचाकी चालकास सांगून दुचाकी थांबवली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला अथक परिश्रमांनतर आग आटोक्यात आली मात्र, दुचाकी जळाल्याने मोठे नुकसान झाले, सुदैवाने दुचाकी चालकास कोणतीही दुखापत झाली नाही. मालवण देऊळवाडा रस्त्यावरून दुपारी एक दुचाकी चालक त्याच्या ताब्यातील टीव्हीएस कंपनीची विगो दुचाकी घेऊन जात असताना दुचाकीच्या मागील बाजूस अचानक आग लागली. ही आग मागील बाजूने येणाऱ्या दुचाकी चालकाच्या लक्षात येताच त्याने त्वरित दुचाकी चालकास सांगितल्याने त्याने दुचाकी थांबवली. ही आग वाढतच जाऊन दुचाकीचा मागील भाग व सीटचा भाग अगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यावेळी स्थानिक नागरिकांनी माती, पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र भडकलेली आग विझेपर्यंत दुचाकीचे मोठे नुकसान झाले होते. ही आग दुचाकीच्या मागील बाजूस असलेल्या पेट्रोलच्या टाकीला लागल्याचा प्राथमिक अंदाज उपस्थितांनी व्यक्त केला जात आहे.2