'संविधान बचाव' आंदोलनाप्रकरणी आमदार प्रवीण दरेकर कुडाळ न्यायालयात हजर; विरोधकांचा घेतला समाचार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आज कुडाळ दिवाणी न्यायालयात हजेरी लावली. 'संविधान बचाव' आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या एका खटल्याप्रकरणी ही हजेरी होती. न्यायालयीन प्रक्रियेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राजकीय प्रश्नांपासून ते कोकणच्या विकासकामांपर्यंत विविध विषयांवर आपली रोकठोक भूमिका मांडली. 'संविधान बचाव' केस: अंतिम निकालाकडे लक्ष न्यायालयात हजेरी लावल्यानंतर दरेकर म्हणाले की, "संविधान बचाव संदर्भात आम्ही जे आंदोलन केले होते, त्यावेळची ही केस आहे. कामाच्या व्यापामुळे आम्हा सर्व आंदोलनकर्त्यांना प्रत्येक वेळी एकत्र येणे शक्य होत नव्हते. त्यामुळे न्यायालयाने आज सर्वांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आज आम्ही हजेरी लावली असून, आता ही केस अंतिम निकालासाठी आली आहे." कोकणात म्हाडा घरांचे जाळे विणणार कोकणातील म्हाडा प्रकल्पांच्या विलंबाबाबत विचारले असता दरेकरांनी सकारात्मक आश्वासन दिले. "कोकणात म्हाडाची घरे उभारण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. विशेषतः पर्यटन केंद्रांच्या (Tourist Centers) आसपास म्हाडाची घरे उभी करता येतील. या संदर्भात मी निश्चितपणे चौकशी करून, स्वतः साईटवर जाऊन पाहणी करेन. कोकणवासीयांना म्हाडाच्या माध्यमातून परवडणारी घरे कशी मिळतील, याची पूर्ण काळजी शासन घेईल," असे त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवारांवर टीका: "लोकांचे मत की तुमचे?" २०२९ च्या बारामती निवडणुकीत 'पवार विरुद्ध पवार' संघर्ष नको, असे लोकांचे मत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले होते. यावर दरेकर कडाडले. ते म्हणाले, "लोकांचे मत म्हणजे काही रोहित पवार यांचे मत नव्हे. हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. मात्र, स्वतःच्या मनातील गोष्टी लोकांच्या नावावर ढकलणे त्यांनी थांबवावे." टोलचा प्रश्न आणि वैभव नाईक यांचा समाचार मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाक्यावरून सुरू असलेल्या वादावर दरेकर म्हणाले की, "राज्यात टप्प्याटप्प्याने टोलमाफी सुरू आहे. मुंबईतील टोल बंद झाले आहेत. राज्याची एकूण आर्थिक स्थिती पाहून टोलबाबत योग्य तो निर्णय सरकार घेईल." याच वेळी आमदार वैभव नाईक यांनी नितीन गडकरींवर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, "वैभव नाईक यांनी जर टीका केली नाही, तर त्यांचे अस्तित्व आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच त्यांना अधूनमधून असे राजकीय फुत्कार सोडावे लागतात." आमदार प्रवीण दरेकर यांच्या या कुडाळ दौऱ्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचे दिसून येत आहे. म्हाडा प्रकल्पांच्या पाहणीच्या आश्वासनामुळे घरकुल इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
'संविधान बचाव' आंदोलनाप्रकरणी आमदार प्रवीण दरेकर कुडाळ न्यायालयात हजर; विरोधकांचा घेतला समाचार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आज कुडाळ दिवाणी न्यायालयात हजेरी लावली. 'संविधान बचाव' आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या एका खटल्याप्रकरणी ही हजेरी होती. न्यायालयीन प्रक्रियेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राजकीय प्रश्नांपासून ते कोकणच्या विकासकामांपर्यंत विविध विषयांवर आपली रोकठोक भूमिका मांडली. 'संविधान बचाव' केस: अंतिम निकालाकडे लक्ष न्यायालयात हजेरी लावल्यानंतर दरेकर म्हणाले की, "संविधान बचाव संदर्भात आम्ही जे आंदोलन केले होते, त्यावेळची ही केस आहे. कामाच्या व्यापामुळे आम्हा सर्व आंदोलनकर्त्यांना प्रत्येक वेळी एकत्र येणे शक्य होत नव्हते. त्यामुळे न्यायालयाने आज सर्वांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आज आम्ही हजेरी लावली असून, आता ही
केस अंतिम निकालासाठी आली आहे." कोकणात म्हाडा घरांचे जाळे विणणार कोकणातील म्हाडा प्रकल्पांच्या विलंबाबाबत विचारले असता दरेकरांनी सकारात्मक आश्वासन दिले. "कोकणात म्हाडाची घरे उभारण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. विशेषतः पर्यटन केंद्रांच्या (Tourist Centers) आसपास म्हाडाची घरे उभी करता येतील. या संदर्भात मी निश्चितपणे चौकशी करून, स्वतः साईटवर जाऊन पाहणी करेन. कोकणवासीयांना म्हाडाच्या माध्यमातून परवडणारी घरे कशी मिळतील, याची पूर्ण काळजी शासन घेईल," असे त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवारांवर टीका: "लोकांचे मत की तुमचे?" २०२९ च्या बारामती निवडणुकीत 'पवार विरुद्ध पवार' संघर्ष नको, असे लोकांचे मत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले होते. यावर दरेकर कडाडले. ते म्हणाले, "लोकांचे मत म्हणजे काही रोहित पवार यांचे मत नव्हे. हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. मात्र,
स्वतःच्या मनातील गोष्टी लोकांच्या नावावर ढकलणे त्यांनी थांबवावे." टोलचा प्रश्न आणि वैभव नाईक यांचा समाचार मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाक्यावरून सुरू असलेल्या वादावर दरेकर म्हणाले की, "राज्यात टप्प्याटप्प्याने टोलमाफी सुरू आहे. मुंबईतील टोल बंद झाले आहेत. राज्याची एकूण आर्थिक स्थिती पाहून टोलबाबत योग्य तो निर्णय सरकार घेईल." याच वेळी आमदार वैभव नाईक यांनी नितीन गडकरींवर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, "वैभव नाईक यांनी जर टीका केली नाही, तर त्यांचे अस्तित्व आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच त्यांना अधूनमधून असे राजकीय फुत्कार सोडावे लागतात." आमदार प्रवीण दरेकर यांच्या या कुडाळ दौऱ्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचे दिसून येत आहे. म्हाडा प्रकल्पांच्या पाहणीच्या आश्वासनामुळे घरकुल इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
- ओंकार हत्तीचा दोडामार्ग तालुक्यातील शिरवळ गावात निर्धास्तपणे फिरताना दिसून आला. त्यानंतर शिरवळ गावातील नदीत डुबकी मारत पाण्यात आनंद घेतानाचे हे दृश्य खरोखरच मनमोहक आहे. ओंकार हत्ती जलविहार करत असताना मनसोक्त पाण्यात डुंबताना दिसत आहे. ओंकार ज्या प्रकारे लोळतोय आणि सोंडेने पाणी उडवतोय, त्यावरून तो पाण्यात आनंद घेताना दिसतोय. मात्र ओंकार हत्तीचा लोकवस्तीत वावर वाढल्याने वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.1
- पेट्रोल 18, डिझेल 36 रुपयांनी महागणार?1
- Post by E city news network1
- कोल्हापूर ता.22 : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळयापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सुचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु करण्यात आले आहे. या नाले सफाईमधून आज अखेर 25 डंपर गाळ उठाव करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या 2 पोकलँन्ड मशीन मार्फत शहरातील कत्यानी कॉम्प्लेक्स ते नेहरुनगर, लक्ष्मीपूरी रिलायन्स मॉल मागे प्लॅस्टिक मटेरियल व गाळ काढण्योच काम सुरु आहे. महापालिकेच्यावतीने शहरामधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये 50 कर्मचाऱ्यांमार्फत व जेसीबीच्या सहाय्याने 476 नाल्यापैकी 130 लहान नाले व 20 मध्यम नाले व चॅनलची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये मुनष्यबळाद्वारे क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, बापूराम नगर, सुर्वेनगर, साळोखेनगर, मोहिते कॉलनी, हडको कॉलनी, राजेंद्रनगर संपूर्ण परिसर, हॉकी स्टेडियम परिसर, लक्ष्मीपूरी, कोंबडी बझार, राजारामपूरी जनता बझार चौक, साईस एक्सटेशन, जाधववाडी, कपूर वसाहत, शिवराज कॉलनी, कारंडे मळा, कदमवाडी, जाधववाडी रोड, भोसलेमळा, साळोखेमळा, सरदेसाई पाणंद, बुध्दविहार, समाज कल्याण ऑफिस अशा 130 नाल्यांची सफाईचे काम पुर्ण करण्यात आले आहे. तरी शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लॅस्टीक अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नये असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.1
- वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट; अवकाळी पावसाची हजेरी प्रतिनिधी : स्वाती हडकर चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात आज दुपारनंतर अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागली. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटल्याने नागरिकांची धांदल उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत धावपळ उडाली असून दुकानदारांनी साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी लगबग केली. विजांच्या कडकडाटामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामीण भागातही पावसाची जोरदार सर पडल्याची माहिती मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू तसेच भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून पुढील काही तास हवामान कसे राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे व अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.4
- गुन्हेगार सावधान! साताऱ्यात नव्या एसपींची धडाकेबाज एंट्री; अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले सातारा : जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेताच निखिल पिंगळे यांनी आपल्या आक्रमक आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीची स्पष्ट झलक दाखवून दिली. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गुन्हेगारी विश्वाला थेट इशारा देत आपल्या ‘ॲक्शन प्लॅन’ची रूपरेषा मांडली. “जिल्ह्यातील गुन्हेगारी मुळासकट उपटून टाकणार आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून, गुन्हेगारी वर्तुळात मोठी घबराट निर्माण झाली आहे. नव्या पोलीस अधीक्षकांच्या या एन्ट्रीमुळे सातारा पोलीस दलात नवचैतन्य संचारले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला. विशेषतः गुंडगिरी, टोळ्यांचे वर्चस्व आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या घटकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मटका, जुगार अड्डे, बेकायदेशीर दारू विक्री तसेच वाळू माफियांविरुद्ध लवकरच आक्रमक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. “सामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला. निखिल पिंगळे यांच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे सातारकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा लवकरच गुन्हेगारीमुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1
- आमदार निलेश राणे यांनी आज विविध प्रकरणांच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजेरी लावली. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्यावरील केसेसची माहिती दिली, तसेच आमदार वैभव नाईक आणि रोहित पवार यांच्या वक्तव्यावर परखड भाष्य केले. न्यायालयात तीन वेगवेगळ्या प्रकरणांवर सुनावणी आज न्यायालयात आमदार निलेश राणे यांच्याशी संबंधित तीन महत्त्वाच्या प्रकरणांवर तारखा होत्या. याबद्दल माहिती देताना राणे म्हणाले की, "आज एकूण तीन विषयांवर न्यायालयात सुनावणी होती. यात प्रामुख्याने हायवेवर करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षणा संदर्भातील आंदोलन, आम्ही काढलेली 'संविधान रॅली' आणि मालवण येथे माझ्यावर दाखल झालेली वैयक्तिक केस यांचा समावेश होता. मालवणच्या केसची आज पहिलीच तारीख होती आणि ती आज 'स्टँड' झाली आहे." वैभव नाईक आणि टोल नाका: "पैसे काढण्याची ही जुनी स्टाईल" कणकवली ओसरगाव येथील टोल नाक्याच्या मुद्द्यावरून निलेश राणे यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. टोलचे बांधकाम नितीन गडकरींच्या आगमनामुळे झालेले नसून ते दीड-दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वैभव नाईकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राणे म्हणाले: "टोल नाक्याच्या कामावर त्यांचा डोळा आहे. आंदोलनाची धमकी द्यायची, पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि कॉन्ट्रॅक्टर घाबरला की त्याला जवळ करायचे, ही वैभव नाईकांची जुनी स्टाईल आहे. एकदा का कॉन्ट्रॅक्टरकडून 'तडजोड' झाली की उद्या वैभव नाईक स्वतःहून टोल हवा आहे असे सांगतील. त्यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही." रोहित पवारांच्या विधानावर सावध प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता, निलेश राणे यांनी सावध भूमिका घेतली. "मी त्यांचे नेमके स्टेटमेंट अद्याप बघितलेले नाही. ते कोणत्या संदर्भात आणि काय बोलले आहेत, याची पूर्ण माहिती नसल्यामुळे मी त्यावर सध्या कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. 3