Shuru
Apke Nagar Ki App…
इंदापूर शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मार्गी: खडकवासल्याचं उन्हाळी आवर्तन जाहीर इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातील आपल्या हक्काचे आवर्तन मिळावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते भगवानराव खारतोडे यांच्या नेतृत्वाखाली सिंचन भवन पुणे गेटसमोर शेतकऱ्यां सोबत अमरण उपोषण सुरू केल्यानंतर प्रशासनाकडून त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून दि.१२ मे रोजी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.
Sanjay Chandgude
इंदापूर शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मार्गी: खडकवासल्याचं उन्हाळी आवर्तन जाहीर इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातील आपल्या हक्काचे आवर्तन मिळावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते भगवानराव खारतोडे यांच्या नेतृत्वाखाली सिंचन भवन पुणे गेटसमोर शेतकऱ्यां सोबत अमरण उपोषण सुरू केल्यानंतर प्रशासनाकडून त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून दि.१२ मे रोजी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.
More news from Pune and nearby areas
- इंदापूरच्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी; प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची पिकं खडकवासला कॅनॉल चे उन्हाळी आवर्तन न सुटल्याने अक्षरशा जळू लागल्याने सामाजिक कार्यकर्ता भगवानराव खारतोडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सिंचन भवन पुणे येथील गेटसमोर अमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आला. यामध्ये कलम १४४ रद्द, १२ मे रोजी पाणी सोडणे, कोयता दहशत संपुष्टात आणणे इत्यादी निर्णय घेण्यात आले आहेत.1
- पंतप्रधान मोदींनी नागरिकांना 'गरज असेल तेव्हाच इंधन वापरा' असे आवाहन केले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत महत्त्वाचा सल्ला दिला.1
- जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आंब्यांची सुंदर सजावट करण्यात आली. यासाठी तब्बल १५१ डझन आंब्यांचा वापर करत आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.1
- सांगली पोलिसांनी नागठाणे परिसरातून एका अट्टल गुन्हेगाराला देशी बनावटीच्या पिस्तूलसह अटक केली आहे. तपासणीत त्याच्याकडे कोणताही परवाना नसून त्याने हे पिस्तूल जत येथील एका व्यक्तीकडून घेतल्याचे समोर आले. याप्रकरणी पुढील तपास 'जत कनेक्शन'च्या दिशेने सुरू असून आरोपीला पोलीस कोठडी मिळाली आहे.2
- पिंपळे धुमाळ येथे एकाच वेळेस दोन बिबटे जेरबंद त्यात अंदाजे पाच वर्षाची बिबट मादी व तीच्या दीड वर्षाच्या पिल्लूचा समावेश तर संविदणे येथे एक बिबटया असे एकूण तीन बिबटे जे्रबंद शिरूर : { डेली न्यूज पोस्ट टीम 24}मागील दोन दिवसात तीन बिबटे जे्र बंद करण्यात वनविभागास यश आले आहे. त्यातील पिंपळे धुमाळ येथील पिंजऱ्यात एकाच वेळेस दोन बिबटे जेरबंद झाले. त्यात अंदाजे पाच वर्षाची बिबट मादी व तीच्या दीड वर्षाच्या पिल्लूचा समावेश असून संविदणे येथे एक बिबटया असे एकूण तीन बिबटे जे्रबंद झाले आहेत. शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांत काही नागरिकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मानव व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ५० हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून, सर्व बिबट्यांची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली असल्याचे तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले. . या कारवाईमुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वन विभागाची सतर्कता अद्याप कायम आहे. दरम्यान आज पहाटे(११ मे) साडेपाच च्या दरम्यान दरम्यान पिंपळे धुमाळ येथील शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे ५ वर्षे वयाची बिबट मादी आणि १.५ वर्षाचे तिचे पिल्लू अडकले. दोघांची जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे रवानगी करण्यात आली. शनिवार दिनांक ९ मे रोजी संविदणे येथे अशोक मुलानी यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे ७-८ वर्षे वयाची बिबट मादी अडकली. तिला जुन्नर येथे माणिकडोह निवारा केंद्र येथे पाठविण्यात आले असल्याचे तालुका वनाधिकरी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले. दरम्यान यापूर्वी ४ एप्रिल २०२६ रोजी पिंपळसुटी येथे एकाच वेळी दोन बिबट जेरबंद झाले होते. . त्यातील नर बिबटया व मादी बिबट्या दीड वर्षाचे होते. बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारा मानवी संघर्ष लक्षात घेता, नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा मोकळ्या परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी.3
- धाराशिव: तुळजापूर मध्ये जे घाणीचं साम्राज्य आणि नगरपालिकेने बांधलेली स्वच्छालय चालू का नाहीत?: माजी नगरसेवक नागनाथ(भाऊ) भांजी1
- डॅशिंग महिला तहसीलदार यांची बेधडक कारवाई, वाळू तस्करांचे धाबे दणाणले देशमुखवाडी (ता. आटपाडी) परिसरातील माण नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने पुन्हा एकदा कठोर कारवाई केली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास तहसीलदार शीतल बंडगर यांच्या नेतृत्वाखाली महसूल आणि पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक छापा टाकून वाळू उत्खननासाठी वापरला जाणारा जेसीबी जप्त केला. जप्त केलेले वाहन पुढील कार्यवाहीसाठी आटपाडी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या निर्देशानुसार आणि प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत. देशमुखवाडी परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी महसूल विभागाकडे वारंवार येत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही नियोजनबद्ध कारवाई केली. शनिवारी मध्यरात्रीनंतर महसूल विभागाचे पथक माण नदीपात्रात दाखल झाले. यावेळी नदीपात्रात वाळू उपशासाठी वापरला जाणारा जेसीबी आढळून आला. प्रशासनाचे वाहन दिसताच चालकाने जेसीबी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, महसूल कर्मचारी आणि पोलिसांनी काही अंतर पाठलाग करून हे वाहन ताब्यात घेतले. या मोहिमेत ग्राम महसूल अधिकारी विनायक पाटील, विनायक बालटे, नितीन नाईक, नितीन सानप, प्रशांत जाधव तसेच पोलिस कॉन्स्टेबल कोळेकर यांनी सहभाग घेतला. तस्करांचे धाबे दणाणले तहसीलदार शीतल बंडगर यांनी पदभार स्वीकारल्यापासून तालुक्यातील अवैध वाळू उपसा आणि अनधिकृत गौण खनिज वाहतुकीवर कठोर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे वाळू तस्करांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. तालुक्यात कुठेही अवैध गौण खनिज उत्खनन किंवा वाहतूक आढळल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, तसेच अशा धडक मोहिमा भविष्यातही सुरूच राहतील, असा इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे.1
- युवा नेते जय पवार यांनी बारामती येथे 'जनता दरबार' आयोजित केला. या माध्यमातून त्यांनी जनसेवेची परंपरा कायम ठेवत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.1