Shuru
Apke Nagar Ki App…
पाटोदा येथील ह.भ.प.रामकृष्ण रंधवे बापू यांच्या विठ्ठल गड येथील सप्ताह सांगताला आ. सुरेश आण्णा धस यांनी भेट दिली
Sominath Kolhe
पाटोदा येथील ह.भ.प.रामकृष्ण रंधवे बापू यांच्या विठ्ठल गड येथील सप्ताह सांगताला आ. सुरेश आण्णा धस यांनी भेट दिली
- Sominath Kolheआष्टी, बीड, महाराष्ट्रजय हरी7 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Sominath Kolhe1
- Post by कर्जत लाईव्ह1
- घरफोडीचा ‘पहिला वर्धापन दिन’ साजरा; तपास रखडल्याने पीडित कुटुंबाचा संतप्त इशारा पाथर्डी | प्रतिनिधी तालुक्यातील माळीबाभुळगाव येथील वाळके वस्तीवरील घरफोडी प्रकरणाचा तपास एक वर्ष उलटूनही लागला नसल्याने पीडित कुटुंबाने संतप्त भावना व्यक्त करत आपल्या घरफोडीचा “पहिला वर्धापन दिन” साजरा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अनोख्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाच्या तपास प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. श्री भाऊसाहेब नाना वाळके, रा. माळीबाभुळगाव (वाळके वस्ती), ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, दि. २७ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी मोठी घरफोडी केली होती. या घटनेत कष्टाने जमवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. विशेष म्हणजे हे घर पाथर्डी पोलीस ठाण्यापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असूनही एवढी मोठी चोरी होणे आणि त्यानंतर तब्बल एक वर्ष उलटूनही तपासाचा ठोस निष्कर्ष न लागणे, यामुळे पीडित कुटुंब हताश झाले आहे. दि. २७ एप्रिल २०२६ रोजी या चोरीला एक वर्ष पूर्ण झाल्याने वाळके यांनी उपरोधिक पद्धतीने “पहिला वर्धापन दिन” साजरा केल्याचे जाहीर केले. या निमित्ताने त्यांनी जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रशासन, पोलीस अधिकारी, तपास यंत्रणा आणि संबंधित पदाधिकाऱ्यांचे “मनःपूर्वक अभिनंदन” करत तीव्र नाराजी व्यक्त केली. वाळके यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, चोरीचा तपास तातडीने लावून गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा. अन्यथा स्वतःवर व कुटुंबावर आमरण उपोषण तसेच आत्मदहनाची वेळ येऊ शकते, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास वेळेत न लागल्यास जनतेचा विश्वास ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर दोषींना गजाआड करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: ९४२००२५३९५ / ८०१०११६११५ #दैनिक_जनता_जागृती1
- फटाफट खबरें: 2 मिनट में 20 बड़ी खबरें | 26 अप्रैल 2026 | आज की ताजा खबरें | बीड न्यूज़ आपतक1
- Post by मन्सूर शेख1
- Post by Digital media.1
- गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरातील आरापूर–सुलतानाबाद एमआयडीसी संदर्भात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी, २५ एप्रिल रोजी गवळीशिवरा येथील सप्ताह मैदानात पार पडली. या बैठकीला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.एमआयडीसी प्रकल्प, जमीन अधिग्रहण, स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होत असताना आमदार बंब यांनी शिक्षण व्यवस्थेबाबतही कठोर भूमिका मांडली.1
- Post by मन्सूर शेख1