पीरबाबा यात्रेनिमित्त सासुरवाड्यात जंगी कुस्त्यांचा आखाडा! आ.अब्दुल सत्तार यांची उपस्थिती; मित्र मंडळाकडून ११ हजारांचे बक्षीस सासुरवाडा (ता. सिल्लोड) येथील पीरवाडी येथे पीरबाबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले. या कुस्ती स्पर्धेला आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित राहून पैलवान व कुस्तीप्रेमींशी संवाद साधत त्यांच्या उत्साहाला दाद दिली. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली कुस्तीची परंपरा जपण्यासाठी ग्रामीण भागातील पैलवानांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मित्र मंडळाच्या वतीने आयोजकांकडे ११ हजार रुपयांचे बक्षीस सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, अर्जुन पा. गाढे, नानासाहेब रहाटे, सयाजीराव वाघ, अशोक सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पीरबाबा यात्रेनिमित्त झालेल्या या कुस्ती आखाड्याला कुस्तीप्रेमी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पीरबाबा यात्रेनिमित्त सासुरवाड्यात जंगी कुस्त्यांचा आखाडा! आ.अब्दुल सत्तार यांची उपस्थिती; मित्र मंडळाकडून ११ हजारांचे बक्षीस सासुरवाडा (ता. सिल्लोड) येथील पीरवाडी येथे पीरबाबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन
करण्यात आले. या कुस्ती स्पर्धेला आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित राहून पैलवान व कुस्तीप्रेमींशी संवाद साधत त्यांच्या उत्साहाला दाद दिली. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली कुस्तीची परंपरा जपण्यासाठी
ग्रामीण भागातील पैलवानांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मित्र मंडळाच्या वतीने आयोजकांकडे ११ हजार रुपयांचे बक्षीस सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे,
अर्जुन पा. गाढे, नानासाहेब रहाटे, सयाजीराव वाघ, अशोक सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पीरबाबा यात्रेनिमित्त झालेल्या या कुस्ती आखाड्याला कुस्तीप्रेमी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
- दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे चारित्र्याहनन होत आहे, हे थांबलं पाहिजे -उद्धव ठाकरे दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे चारित्र्याहनन होत आहे, हे थांबलं पाहिजे -उद्धव ठाकरे दिशा सर्व मृत्यू प्रकरणाशी आपल्या कुटुंबाचा किंवा पक्षाचा कोणताही संबंध नसल्याची उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले या प्रकरणाचा राजकीय तुम्ही वापर केला जात असल्याचा आरोप उद्योग ठाकरे यांनी केला वारंवार होणाऱ्या आरोपामुळे चारित्र्य आनंद होत असून हे थांबले पाहिजे अन्यथा कायदेशीर मार्ग ओळखण्याचा इशारा दिला पत्रकारांनाही उद्देशून या प्रकरणात कोणाचीही नाव जोडले जाऊ शकते असे त्यांनी म्हटले1
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री शहरात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे,1
- SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा। SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा।1
- ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत देशभक्तीपर वातावरणात हुतात्म्यांना अभिवादन फुलंब्री प्रतिनिधी : भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा तब्बल १३ महिने निजामाच्या जुलमी राजवटीखाली होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील मुक्ती चळवळ, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खंबीर भूमिकेमुळे आणि भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन पोलो' लष्करी कारवाईनंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाड्याची निजामाच्या राजवटीतून मुक्तता झाली. त्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ रिधोरा येथे मराठवाडा मुक्तीदिन उत्साहात साजरा करण्यात आला.सुट्टी वर आलेले सैनिक यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आजी सैनिक अर्जुन कोलते व संतोष शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच अश्विनी कोलते, ग्रामपंचायत सदस्य शरद कोलते , बाळू घागरे, अनिल देशमुख, अंगणवाडी सेविका व कर्मचारी , आशा सेविका, शिक्षक खरात सर, कासार मॅडम , पोलीस पाटील गजानन कोलते,कय्युम पठाण,राजू बंडूगे, रमेश कोलते, भाऊसाहेब शिंदे, सुनील शिंदे, बद्रीनाथ कोलते,विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या कार्याचे स्मरण करून देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात पार पडला.4
- कन्नड तालुक्यातील पिशोर येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती सोहळा उत्साहात; पाहा विशेष रिपोर्ट!1
- मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच मोकाट कुत्रे सोडले; निफाडमध्ये युवा सेनेचा निषेध निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप करत युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात कुत्रे सोडून निषेध करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी कारवाई न झाल्यास संपूर्ण शहरातील कुत्रे पकडून नगरपंचायतीत सोडण्याचा इशारा दिला.1
- पिशोर येथे वीज पडून तिघांचा मृत्यू ;तिघे गंभीर; मृतांच्या कुटुंबीयांना २४ तासांत मदत देण्याची हर्षवर्धन जाधवांची मागणी छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील पिशोर येथे वीज पडून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २४ तासांत शासकीय मदत देण्याची मागणी केली. दुर्घटनेतील कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शासनाने तत्काळ कार्यवाही करावी, असे जाधव यांनी म्हटले आहे.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीजेचा कहर सिल्लोड-कन्नड तालुक्यात दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; चार जण गंभीर जखमी छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वीज पडण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सिल्लोड आणि कन्नड तालुक्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनांमध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पावसादरम्यान वीज कोसळल्याने या घटना घडल्या असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून घटनेची नोंद घेऊन पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.1