Shuru
Apke Nagar Ki App…
साकोली तालुक्यातील खैरलांजी येथे पाण्याची तीव्र टंचाई महिलांना एक ते दोन किलोमीटर वरून आणावे लागते पाणी पाण्यासाठी केले आंदोलन ग्रामपंचायत ,पाणीपुरवठा विभाग, पोलीस प्रशासन यांनी घटनास्थळी घेतली
मनिषा विजय काशीवार
साकोली तालुक्यातील खैरलांजी येथे पाण्याची तीव्र टंचाई महिलांना एक ते दोन किलोमीटर वरून आणावे लागते पाणी पाण्यासाठी केले आंदोलन ग्रामपंचायत ,पाणीपुरवठा विभाग, पोलीस प्रशासन यांनी घटनास्थळी घेतली
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by मनिषा विजय काशीवार4
- Post by Ashlesh Made1
- महागावात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा तडाखा जनजीवन विस्कळीत महागाव : महागाव परिसरात सोमवारी (ता.30) रोजी सायंकाळी अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. दुपारपासून वाढलेला प्रचंड उकाडा आणि दमट वातावरण यानंतर सायंकाळी काळे ढग दाटून आले आणि काही क्षणातच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसासोबतच विजांचा कडकडाट इतका तीव्र होता की नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी वीज खंडित झाली असून काही भागात ट्रान्सफॉर्मरवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विजांच्या सततच्या कडकडाटामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत होते. या मुसळधार पावसामुळे महागावातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथक सतर्क झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी वादळी वाऱ्यामुळे काही पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे, झाडाखाली उभे न राहण्याचे आणि विजेपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महागावमध्ये अचानक आलेल्या या नैसर्गिक बदलामुळे जनजीवन काही काळासाठी ठप्प झाले असून, पुढील काही तास हवामान असेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.3
- प्रतापपुर शिवारात वाघाचा धुमाकूळ, दररोज गाय-वासरांची शिकार वेलतूर(शरद शहारे) वेलतूरलगतच्या प्रतापपुर शिवारात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून, दररोज, बकरी, बैल, गाय-वासरांची शिकार त्याने आरंभीली आहे. वेलतूर वनपरीक्षेत्रातील वेलतूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रतापपुर रिठी गावात पोहरा गावानंतर आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवड्यापुर्वी पोहरा येथे एका इसमाला जखमी केले होते तर दोन दिवसांपूर्वी वेलतूरच्या प्रतापपूर शिवारात महिलेला ठार केले होते. वनपरीक्षेत्रात आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी शेतकरी व शेतमजुरांसमोर शेतीची कामे करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. प्राप्त माहितीनुसार, वनपरिक्षेत्रत मागील आठवड्यापासून 2 ते 3 वाघांनी धुमाकूळ घातला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. गावालगतच्या परिसरात दिवसाढवळ्या शेतात चराई करीत असलेल्या जनावरांवर वाघ हल्ला करीत असल्याने पशुपालक शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. टेकेपार येथील पंकज लांजेवार यांच्या शेतातील 2 शेळ्या, पंकज शेंडे यांच्या शेतातील एक वासरू व दुधाळ गायीवर दिवसाढवळ्या हल्ला करीत जखमी केले. आता उन्हाळा सुरु झालेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी उन्हाळी व खरीप हंगामासाठी दिवसभर शेतात राबराब राबत आहेत. अशा स्थितीत परिसरात वाघाचा धुमाकूळ असताना आता शेती करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. या संपूर्ण घटनाक्रमाची वनविभागाला माहिती देण्यात आली. क्षेत्रसहाय्यक व बिट वनरक्षक यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागामार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती क्षेत्र सहाय्यक यांनी माध्यमांना दिली आहे. गावकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, रात्रीच्या सुमारास शौचास घराबाहेर पडू नये, हातात काठीचा वापर करावा जनावरे मोकळ्या ठिकाणी न बांधता गोठ्यात बांधावे, अशा सूचनाही वनविभागामार्फत नागरिकांना दिल्या आहेत या वाघाला बेशुद्ध करून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. आज पुन्हा दिसली वाघाची हालचाल वाघांचा दिवसेंदिवस वाढता धुमाकूळ सगळ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. घटनास्थळावरून सुमारे 200 ते 300 मीटर परिसरात माकडे जोरजोरात ओरडत होते. याचा अर्थ वाघ याच परिसरात थांबला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. हे सर्व वास्तविक असतानाच रूयाड गावालगत असलेल्या शेत व नाला परिसरात वाघ दिसल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ दुसरा परिसर गाठला असता वनविभागाचे काही कर्मचारी व गावकरी त्या ठिकाणी दिसून आले. वाघ याच परिसरात होता, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. सामाजिक व राजकीय पदाधिकारी यांनी या संपूर्ण घटनेची माहिती तालूका वनपरिक्षेत्र अधिकारी, तहसीलदार , पोलिस अधिकारी यांना दिली असता त्यांनी वनविभागाची टीम घटनास्थळी रवाना केली. वनविभाग कर्मचाऱ्यांनी परिसरात बंदुकीने आवाज करीत वाघाला परिसराबाहेर जंगलाच्या का वळवू नये असाही सवाल भयभीत परीसर वासी आता करत आहेत. मात्र, वाघ पुन्हा या परिसरातच असल्याने गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.2
- उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.1
- सुप्रसिद्ध बालाजी मंदिर ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील दर्शन व शैक्षणिक सहल1
- Post by Samachar king digital1
- Post by मनिषा विजय काशीवार3