logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांचे स्वस्त धान्य दुकानदारांना कडक इशारा, नंदुरबार: जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांचे जिल्हाभरातील स्वस्त धान्य दुकानदारांना कडक इशारा दिला असून यापुढे शिधापत्रिका धारकांना भेसळयुक्त व खराब धान्याचे वाटप करण्यात येऊ नये. पुरवठा विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

53 min ago
user_नव दर्पण
नव दर्पण
Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
53 min ago

जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांचे स्वस्त धान्य दुकानदारांना कडक इशारा, नंदुरबार: जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांचे जिल्हाभरातील स्वस्त धान्य दुकानदारांना कडक इशारा दिला असून यापुढे शिधापत्रिका धारकांना भेसळयुक्त व खराब धान्याचे वाटप करण्यात येऊ नये. पुरवठा विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांचे स्वस्त धान्य दुकानदारांना कडक इशारा, नंदुरबार: जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांचे जिल्हाभरातील स्वस्त धान्य दुकानदारांना कडक इशारा दिला असून यापुढे शिधापत्रिका धारकांना भेसळयुक्त व खराब धान्याचे वाटप करण्यात येऊ नये. पुरवठा विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
    1
    जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांचे  स्वस्त धान्य दुकानदारांना कडक इशारा,
नंदुरबार: जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांचे जिल्हाभरातील स्वस्त धान्य दुकानदारांना कडक इशारा दिला असून यापुढे शिधापत्रिका धारकांना भेसळयुक्त व खराब धान्याचे वाटप करण्यात येऊ नये. पुरवठा विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    53 min ago
  • शिवसेनेच्या नगरसेवकांचे मनपा उपमहापौर दालनाबाहेर रणकंदन, टिपूचा फोटो काढा अन्यथा दालन तोडून फोटो काढू शिवसेनेच्या नगरसेवकांचे मनपा उपमहापौर दालनाबाहेर रणकंदन पाहवयास मिळाले. टिपू सुलतानचा फोटो काढा, अन्यथा दालन तोडून फोटो काढू .. असा ईशारा यावेळी त्यांनी दिला. सत्ताधारी व विरोधकांमधील वादावादीमुळे नगरसचिवांची मात्र कोंडी झाली.
    1
    शिवसेनेच्या नगरसेवकांचे मनपा उपमहापौर दालनाबाहेर रणकंदन, टिपूचा फोटो काढा अन्यथा दालन तोडून फोटो काढू 
शिवसेनेच्या नगरसेवकांचे मनपा उपमहापौर दालनाबाहेर रणकंदन पाहवयास मिळाले. टिपू सुलतानचा फोटो काढा, अन्यथा दालन तोडून फोटो काढू ..
असा ईशारा यावेळी त्यांनी दिला.
सत्ताधारी व विरोधकांमधील वादावादीमुळे नगरसचिवांची मात्र कोंडी झाली.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो
    1
    मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो
मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो
    user_SACH TAK TV NEWS MALEGAON
    SACH TAK TV NEWS MALEGAON
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • पत्रकारावरही गुन्हा; माध्यमस्वातंत्र्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा आरोप पुणे | प्रतिनिधी पुण्यातील प्रतिष्ठित सी ओ पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहातील वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून सुरू झालेल्या या प्रकरणात विद्यार्थी संघटनांमधील संघर्षानंतर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आणि आता ए बी पी माझाचे पुणे प्रतिनिधी पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातही तक्रार गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने पत्रकाराने परवानगीशिवाय वसतिगृह परिसरात प्रवेश केल्याचा आरोप करत कायदेशीर तक्रार केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने तीव्र नाराजी व्यक्त करत पत्रकारांवर अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करून माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. सी ओ पी परिसरातील घटनेनंतर पोलिसांनी आधी ए बी व्ही पी सदस्याच्या तक्रारीवरून एन एस यु आय आणि युवक काँग्रेसशी संबंधित ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार मंदार गोंजारी यांनी सी ओ पी परिसरातील विद्यार्थ्यांच्या कथित प्रश्नांबाबत केलेले वृत्तांकनही चर्चेत आले आहे. एबीपी माझाच्या अधिकृत संकेतस्थळावर गोंजारी यांच्या नावाने सी ओ पी प्रकरणावरील वृत्त प्रकाशित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने वृत्तांकन करणे हा पत्रकारितेचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्याचा भाग आहे. एखाद्या पत्रकाराने नियमांचे उल्लंघन केले असल्यास कायदा आपले काम करेल; मात्र पत्रकाराने केलेल्या वृत्तांकनामुळे प्रशासन किंवा सत्ताधारी अस्वस्थ झाले म्हणून पत्रकाराविरोधात कारवाई होत असेल, तर हा माध्यमस्वातंत्र्यासाठी गंभीर इशारा आहे, अशी भूमिका व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने व्यक्त केली आहे. सी ओ पी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या शुल्क, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवरून वाद निर्माण झाल्याचे विविध वृत्तांतून समोर आले आहे. एका विद्यार्थिनीने सुरुवातीला कॉलेजकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे सांगितले होते; त्यानंतर तिने दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्यावर दबाव निर्माण झाल्याचे सांगत राजकीय वादात आपल्याला ओढू नये, असे आवाहन केले. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत, त्यावर प्रशासनाची भूमिका काय आहे, विद्यार्थी संघटनांमध्ये नेमका संघर्ष कशामुळे झाला आणि पत्रकाराविरोधातील तक्रारीमागील वास्तविक कारण काय आहे, हे स्पष्टपणे समोर येणे गरजेचे आहे. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. म्हस्के म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने बातमी केली म्हणून पत्रकाराला गुन्ह्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा केवळ एका पत्रकाराचा प्रश्न राहात नाही; हा संपूर्ण माध्यमविश्वाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न बनतो. “पत्रकार चुकीचा असेल तर कायदा तपास करेल, पुरावे असतील तर न्यायालयीन प्रक्रिया होईल. मात्र पत्रकाराने प्रश्न उपस्थित केले म्हणून त्याच्यावर दबाव निर्माण करणे, त्याला घाबरवणे किंवा गुन्ह्याच्या माध्यमातून त्याची लेखणी रोखण्याचा प्रयत्न करणे कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या माध्यमांकडे संशयाने पाहिले जात असेल, तर ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचेही म्हस्के यांनी नमूद केले. “महाराष्ट्रातील पत्रकार निर्भयपणे काम करतील. माध्यमांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” असा इशाराही त्यांनी दिला. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनीही सी ओ पी प्रकरणातील पत्रकाराविरोधातील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला. चोरडिया म्हणाले की, पत्रकार हा समाजातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणारा महत्त्वाचा दुवा आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या समोर आणणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे. “पत्रकाराने बातमी केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. पत्रकारितेवर दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न महाराष्ट्रातील पत्रकार सहन करणार नाहीत. पत्रकाराच्या लेखणीला घाबरवण्याऐवजी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” अशी भूमिका चोरडिया यांनी मांडली. सी ओ पी प्रकरणात पत्रकाराविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि पत्रकाराला केवळ त्याच्या व्यावसायिक कर्तव्यामुळे लक्ष्य केले जात नाही ना, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सी ओ पी प्रकरण आता केवळ विद्यार्थी संघटनांमधील संघर्षापुरते मर्यादित राहिलेले नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यापीठ प्रशासनाची भूमिका, राजकीय हस्तक्षेप, विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष आणि आता पत्रकाराविरोधातील कायदेशीर कारवाई या सर्व मुद्द्यांमुळे प्रकरण अधिक व्यापक झाले आहे. पोलिसांनी सी ओ पी परिसरात राजकीय व्यक्ती आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर तसेच राजकीय कार्यक्रमांवर काही काळ निर्बंधही लागू केले होते. मात्र प्रश्न असा आहे की, विद्यार्थ्यांचे प्रश्न नेमके काय आहेत? त्यांची उत्तरे कोण देणार? आणि ते प्रश्न जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकाराचे संरक्षण कोण करणार? व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने स्पष्ट केले आहे की, पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर संघटना पत्रकारांच्या घटनात्मक अधिकारांच्या बाजूने ठामपणे उभी राहील. “पत्रकारांवर दबाव टाकून प्रश्न सुटणार नाहीत. उलट दबाव वाढला की प्रश्न अधिक तीव्रतेने जनतेसमोर येतील. विद्यार्थ्यांना न्याय आणि पत्रकारांना निर्भयपणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळणे, हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे,” अशी भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे. दरम्यान, पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातील तक्रारीसह सी ओ पी प्रकरणातील सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आणि विद्यार्थी, विद्यापीठ प्रशासन, विद्यार्थी संघटना तसेच पत्रकार,सर्वांची बाजू ऐकून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यावर पुढची भूमिका घेणार आहे.
    1
    पत्रकारावरही गुन्हा; माध्यमस्वातंत्र्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा आरोप
पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील प्रतिष्ठित सी ओ पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहातील वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून सुरू झालेल्या या प्रकरणात विद्यार्थी संघटनांमधील संघर्षानंतर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आणि आता ए बी पी माझाचे पुणे प्रतिनिधी पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातही तक्रार गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने पत्रकाराने परवानगीशिवाय वसतिगृह परिसरात प्रवेश केल्याचा आरोप करत कायदेशीर तक्रार केली आहे. 
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने तीव्र नाराजी व्यक्त करत पत्रकारांवर अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करून माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
सी ओ पी परिसरातील घटनेनंतर पोलिसांनी आधी ए बी व्ही पी सदस्याच्या तक्रारीवरून एन एस यु आय आणि युवक काँग्रेसशी संबंधित ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. 
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार मंदार गोंजारी यांनी सी ओ पी  परिसरातील विद्यार्थ्यांच्या कथित प्रश्नांबाबत केलेले वृत्तांकनही चर्चेत आले आहे. एबीपी माझाच्या अधिकृत संकेतस्थळावर गोंजारी यांच्या नावाने सी ओ पी प्रकरणावरील वृत्त प्रकाशित झाले आहे. 
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने वृत्तांकन करणे हा पत्रकारितेचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्याचा भाग आहे. एखाद्या पत्रकाराने नियमांचे उल्लंघन केले असल्यास कायदा आपले काम करेल; मात्र पत्रकाराने केलेल्या वृत्तांकनामुळे प्रशासन किंवा सत्ताधारी अस्वस्थ झाले म्हणून पत्रकाराविरोधात कारवाई होत असेल, तर हा माध्यमस्वातंत्र्यासाठी गंभीर इशारा आहे, अशी भूमिका व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने व्यक्त केली आहे.
सी ओ पी  प्रकरणात विद्यार्थ्यांच्या शुल्क, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवरून वाद निर्माण झाल्याचे विविध वृत्तांतून समोर आले आहे. एका विद्यार्थिनीने सुरुवातीला कॉलेजकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे सांगितले होते; त्यानंतर तिने दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्यावर दबाव निर्माण झाल्याचे सांगत राजकीय वादात आपल्याला ओढू नये, असे आवाहन केले. 
म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत, त्यावर प्रशासनाची भूमिका काय आहे, विद्यार्थी संघटनांमध्ये नेमका संघर्ष कशामुळे झाला आणि पत्रकाराविरोधातील तक्रारीमागील वास्तविक कारण काय आहे, हे स्पष्टपणे समोर येणे गरजेचे आहे.
व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.
म्हस्के म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने बातमी केली म्हणून पत्रकाराला गुन्ह्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा केवळ एका पत्रकाराचा प्रश्न राहात नाही; हा संपूर्ण माध्यमविश्वाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न बनतो.
“पत्रकार चुकीचा असेल तर कायदा तपास करेल, पुरावे असतील तर न्यायालयीन प्रक्रिया होईल. मात्र पत्रकाराने प्रश्न उपस्थित केले म्हणून त्याच्यावर दबाव निर्माण करणे, त्याला घाबरवणे किंवा गुन्ह्याच्या माध्यमातून त्याची लेखणी रोखण्याचा प्रयत्न करणे कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या माध्यमांकडे संशयाने पाहिले जात असेल, तर ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचेही म्हस्के यांनी नमूद केले.
“महाराष्ट्रातील पत्रकार निर्भयपणे काम करतील. माध्यमांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” असा इशाराही त्यांनी दिला.
व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनीही सी ओ पी  प्रकरणातील पत्रकाराविरोधातील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला.
चोरडिया म्हणाले की, पत्रकार हा समाजातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणारा महत्त्वाचा दुवा आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या समोर आणणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे.
“पत्रकाराने बातमी केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. पत्रकारितेवर दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न महाराष्ट्रातील पत्रकार सहन करणार नाहीत. पत्रकाराच्या लेखणीला घाबरवण्याऐवजी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” अशी भूमिका चोरडिया यांनी मांडली.
सी ओ पी  प्रकरणात पत्रकाराविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि पत्रकाराला केवळ त्याच्या व्यावसायिक कर्तव्यामुळे लक्ष्य केले जात नाही ना, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
सी ओ पी  प्रकरण आता केवळ विद्यार्थी संघटनांमधील संघर्षापुरते मर्यादित राहिलेले नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यापीठ प्रशासनाची भूमिका, राजकीय हस्तक्षेप, विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष आणि आता पत्रकाराविरोधातील कायदेशीर कारवाई या सर्व मुद्द्यांमुळे प्रकरण अधिक व्यापक झाले आहे.
पोलिसांनी सी ओ पी  परिसरात राजकीय व्यक्ती आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर तसेच राजकीय कार्यक्रमांवर काही काळ निर्बंधही लागू केले होते. 
मात्र प्रश्न असा आहे की, विद्यार्थ्यांचे प्रश्न नेमके काय आहेत? त्यांची उत्तरे कोण देणार? आणि ते प्रश्न जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकाराचे संरक्षण कोण करणार?
व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने स्पष्ट केले आहे की, पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर संघटना पत्रकारांच्या घटनात्मक अधिकारांच्या बाजूने ठामपणे उभी राहील.
“पत्रकारांवर दबाव टाकून प्रश्न सुटणार नाहीत. उलट दबाव वाढला की प्रश्न अधिक तीव्रतेने जनतेसमोर येतील. विद्यार्थ्यांना न्याय आणि पत्रकारांना निर्भयपणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळणे, हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे,” अशी भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे.
दरम्यान, पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातील तक्रारीसह सी ओ पी  प्रकरणातील सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आणि विद्यार्थी, विद्यापीठ प्रशासन, विद्यार्थी संघटना तसेच पत्रकार,सर्वांची बाजू ऐकून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यावर पुढची भूमिका घेणार आहे.
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • बंजारा समाजाची समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी अशा सांस्कृतिक उत्सवांचे महत्त्व मोठे आहे. सातकुंड-तेलवाडी येथे झालेल्या तिज महोत्सवातूनही याच सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले. सातकुंड-तेलवाडी येथे बंजारा समाजाचा तिज महोत्सव उत्साहात सातकुंड-तेलवाडी : बंजारा समाजाच्या वतीने पारंपरिक तिज महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. समाजातील महिला, युवक व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत बंजारा समाजाची पारंपरिक संस्कृती, लोकपरंपरा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले. तिज महोत्सव हा बंजारा समाजाच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडलेला महत्त्वाचा उत्सव मानला जातो. या उत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीने तिजची पूजा, पारंपरिक गीते व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महिला व युवतींनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. सातकुंड-तेलवाडी परिसरातील बंजारा समाजबांधवांनी एकत्र येत आपल्या संस्कृतीचे जतन आणि पुढील पिढीपर्यंत परंपरांचा वारसा पोहोचविण्याचा संदेश दिला. तिज महोत्सवाच्या माध्यमातून समाजातील महिला व युवकांचा सहभाग वाढविण्यासोबतच सामाजिक एकता आणि बंधुभाव मजबूत करण्यावर भर देण्यात आला. यावेळी पारंपरिक गीते, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे उत्सवाचे वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले. लहान मुले, महिला, युवक तसेच ज्येष्ठ समाजबांधवांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. बंजारा समाजाची समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी अशा सांस्कृतिक उत्सवांचे महत्त्व मोठे आहे. सातकुंड-तेलवाडी येथे झालेल्या तिज महोत्सवातूनही याच सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले.
    1
    बंजारा समाजाची समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी अशा सांस्कृतिक उत्सवांचे महत्त्व मोठे आहे. सातकुंड-तेलवाडी येथे झालेल्या तिज महोत्सवातूनही याच सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले.


सातकुंड-तेलवाडी येथे बंजारा समाजाचा तिज महोत्सव उत्साहात
सातकुंड-तेलवाडी : बंजारा समाजाच्या वतीने पारंपरिक तिज महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. समाजातील महिला, युवक व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत बंजारा समाजाची पारंपरिक संस्कृती, लोकपरंपरा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले.
तिज महोत्सव हा बंजारा समाजाच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडलेला महत्त्वाचा उत्सव मानला जातो. या उत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीने तिजची पूजा, पारंपरिक गीते व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महिला व युवतींनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
सातकुंड-तेलवाडी परिसरातील बंजारा समाजबांधवांनी एकत्र येत आपल्या संस्कृतीचे जतन आणि पुढील पिढीपर्यंत परंपरांचा वारसा पोहोचविण्याचा संदेश दिला. तिज महोत्सवाच्या माध्यमातून समाजातील महिला व युवकांचा सहभाग वाढविण्यासोबतच सामाजिक एकता आणि बंधुभाव मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी पारंपरिक गीते, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे उत्सवाचे वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले. लहान मुले, महिला, युवक तसेच ज्येष्ठ समाजबांधवांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
बंजारा समाजाची समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी अशा सांस्कृतिक उत्सवांचे महत्त्व मोठे आहे. सातकुंड-तेलवाडी येथे झालेल्या तिज महोत्सवातूनही याच सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले.
    user_Sandip Aaling
    Sandip Aaling
    Agricultural service कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काढले रेल्वे अडवणाऱ्या शेतकरी पुत्राचे कांद्यावर तैलचित्र लासलगाव येथे रेल्वे अडवल्यानंतर गणेश निंबाळकर यांचे कांद्यावर चित्र काढून त्यांना पाठिंबा वअभिनंदन करण्यासाठी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटले कांद्यावरच गणेश निंबाळकर यांचे चित्र
    1
    शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काढले रेल्वे अडवणाऱ्या शेतकरी पुत्राचे कांद्यावर तैलचित्र
लासलगाव येथे रेल्वे अडवल्यानंतर गणेश निंबाळकर यांचे कांद्यावर चित्र काढून त्यांना पाठिंबा वअभिनंदन करण्यासाठी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटले कांद्यावरच गणेश निंबाळकर यांचे चित्र
    user_सुनिलआण्णा सोनवणे
    सुनिलआण्णा सोनवणे
    Farmer देवळा, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Dhule News | धुळे: व्याघ्र कक्ष (Tiger Cell) समितीची मासिक बैठक संपन्न; वन्यजीव संरक्षण आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी 10 महत्त्वाचे निर्णय... - धुळे (दि. 27/08/2026): पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे येथे आज सकाळी 11.00 वाजता पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद (भापोसे) यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हास्तरीय व्याघ्र कक्ष (Tiger Cell) समितीची मासिक बैठक पार पडली. Dhule News | धुळे: व्याघ्र कक्ष (Tiger Cell) समितीची मासिक बैठक संपन्न; वन्यजीव संरक्षण आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी 10 महत्त्वाचे निर्णय... - धुळे (दि. 27/08/2026): पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे येथे आज सकाळी 11.00 वाजता पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद (भापोसे) यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हास्तरीय व्याघ्र कक्ष (Tiger Cell) समितीची मासिक बैठक पार पडली. - 1) संयुक्त गस्त व नाकाबंदी: पोर्णिमा दरम्यान वनक्षेत्र व संशयास्पद मार्गावर पोलीस व वन विभागाची संयुक्त गस्त, नाकाबंदी आणि वाहन तपासणीचे नियोजन करणे. 2) वन कर्मचाऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण: वन विभागातील क्षेत्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार पोलीस दलातर्फे शस्त्र प्रशिक्षण आयोजित करणे. 3) अतिक्रमण निर्मूलन: वनक्षेत्रातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर कडक कारवाई करुन अतिक्रमण निर्मूलन करणे. 4) मानव-वन्यजीव संघर्ष नियंत्रण: वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीकडे वाढलेला ओघ लक्षात घेता नागरिक व प्राण्यांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना करणे. 5) मांस विक्रीवर प्रतिबंध: धुळे शहर व परिसरात काळवीट तसेच इतर वन्यप्राण्यांच्या मांसाच्या बेकायदेशीर विक्रीवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करणे. 6) एअर गनने शिकार करणाऱ्यांचा शोध: लळींग परिसरात Air Gun च्या सहाय्याने शिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करणे. 7) गांजा लागवडीस प्रतिबंध: शिरपूर व परिसरात वनक्षेत्रात गांजा लागवडीस पुर्णपणे प्रतिबंध करण्यासाठी पोलीस व वन विभागाची संयुक्त कारवाई आयोजित करणे. 8) सर्पप्रदर्शनावर बंदी व पोलीस मदत: शिरपूर परिसरात सर्पमित्रांकडुन करण्यात येणारे सर्वांचे बेकायदेशीर प्रयोग/प्रदर्शन रोखण्यासाठी स्थानिक पोलीसांची मदत घेऊन संयुक्त कारवाई करणे. 9) ग्राम सुरक्षा दल व जनजागृती: गांजा लागवड किंवा अवैध वन्यजीव शिकार यासारख्या घटनांची माहिती त्वरीत मिळण्यासाठी स्थानिक पोलीस पाटील यांची मदत घेणे तसेच ग्राम सुरक्षा दल स्थापन करुन माहिती संकलित करणे. 10) रस्ता सुरक्षा उपाययोजना: महामार्ग व वनक्षेत्रातील रस्त्यांवर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी Underpass (भुयारी मार्ग) आणि Sign Board (सुचना फलक) उभारण्याबाबत संबंधित कंत्राटदारांना सुचना देणे. - #DhulePolice #TigerCell #VishalAnand #WildlifeProtection #DhuleNews
    1
    Dhule News | धुळे: व्याघ्र कक्ष (Tiger Cell) समितीची मासिक बैठक संपन्न; वन्यजीव संरक्षण आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी 10 महत्त्वाचे निर्णय...
-
धुळे (दि. 27/08/2026): पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे येथे आज सकाळी 11.00 वाजता पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद (भापोसे) यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हास्तरीय व्याघ्र कक्ष (Tiger Cell) समितीची मासिक बैठक पार पडली.
Dhule News | धुळे: व्याघ्र कक्ष (Tiger Cell) समितीची मासिक बैठक संपन्न; वन्यजीव संरक्षण आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी 10 महत्त्वाचे निर्णय...
-
धुळे (दि. 27/08/2026): पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे येथे आज सकाळी 11.00 वाजता पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद (भापोसे) यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हास्तरीय व्याघ्र कक्ष (Tiger Cell) समितीची मासिक बैठक पार पडली.
-
1) संयुक्त गस्त व नाकाबंदी: पोर्णिमा दरम्यान वनक्षेत्र व संशयास्पद मार्गावर पोलीस व वन विभागाची संयुक्त गस्त, नाकाबंदी आणि वाहन तपासणीचे नियोजन करणे.
2) वन कर्मचाऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण: वन विभागातील क्षेत्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार पोलीस दलातर्फे शस्त्र प्रशिक्षण आयोजित करणे.
3) अतिक्रमण निर्मूलन: वनक्षेत्रातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर कडक कारवाई करुन अतिक्रमण निर्मूलन करणे.
4) मानव-वन्यजीव संघर्ष नियंत्रण: वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीकडे वाढलेला ओघ लक्षात घेता नागरिक व प्राण्यांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना करणे.
5) मांस विक्रीवर प्रतिबंध: धुळे शहर व परिसरात काळवीट तसेच इतर वन्यप्राण्यांच्या मांसाच्या बेकायदेशीर विक्रीवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करणे.
6) एअर गनने शिकार करणाऱ्यांचा शोध: लळींग परिसरात Air Gun च्या सहाय्याने शिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करणे.
7) गांजा लागवडीस प्रतिबंध: शिरपूर व परिसरात वनक्षेत्रात गांजा लागवडीस पुर्णपणे प्रतिबंध करण्यासाठी पोलीस व वन विभागाची संयुक्त कारवाई आयोजित करणे.
8) सर्पप्रदर्शनावर बंदी व पोलीस मदत: शिरपूर परिसरात सर्पमित्रांकडुन करण्यात येणारे सर्वांचे बेकायदेशीर प्रयोग/प्रदर्शन रोखण्यासाठी स्थानिक पोलीसांची मदत घेऊन संयुक्त कारवाई करणे.
9) ग्राम सुरक्षा दल व जनजागृती: गांजा लागवड किंवा अवैध वन्यजीव शिकार यासारख्या घटनांची माहिती त्वरीत मिळण्यासाठी स्थानिक पोलीस पाटील यांची मदत घेणे तसेच ग्राम सुरक्षा दल स्थापन करुन माहिती संकलित करणे.
10) रस्ता सुरक्षा उपाययोजना: महामार्ग व वनक्षेत्रातील रस्त्यांवर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी Underpass (भुयारी मार्ग) आणि Sign Board (सुचना फलक) उभारण्याबाबत संबंधित कंत्राटदारांना सुचना देणे.
-
#DhulePolice #TigerCell #VishalAnand #WildlifeProtection #DhuleNews
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Dhule Accident News | धुळे: मुंबई-आग्रा महामार्गावर तापी पुलाजवळ भीषण अपघात; 6 जण जखमी, एका महिलेचा हात तुटून वेगळा... धुळे: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दभाषी येथील तापी पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात घडला. शिरपूरहून धुळ्याकडे जाणारी आर्टिगा कार तांत्रिक बिघाड झाल्याने महामार्गावर बंद पडली होती. कार सुरू करण्यासाठी शिरपूरहून नातेवाईक मोटारसायकलने घटनास्थळी आले होते. ते महामार्गावरच कार सुरू करण्याचा प्रयत्न करत असतानाच भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने उभ्या असलेल्या आर्टिगा कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कंटेनरने कारला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. या अपघातात आर्टिगा मधील प्रवासी आणि मदतीसाठी आलेले नातेवाईक असे एकूण 6 जण गंभीर जखमी झाले. या अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून, तिचा एक हात तुटून शरीरापासून वेगळा झाला आहे. सर्व जखमींना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. या प्रकरणी शिरपूर पोलीस पुढील तपास करत आहेत. - #DhuleNews #ShirpurAccident #MumbaiAgraHighway #DhulePolice #RoadAccident
    1
    Dhule Accident News | धुळे: मुंबई-आग्रा महामार्गावर तापी पुलाजवळ भीषण अपघात; 6 जण जखमी, एका महिलेचा हात तुटून वेगळा...
धुळे: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दभाषी येथील तापी पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात घडला.
शिरपूरहून धुळ्याकडे जाणारी आर्टिगा कार तांत्रिक बिघाड झाल्याने महामार्गावर बंद पडली होती. कार सुरू करण्यासाठी शिरपूरहून नातेवाईक मोटारसायकलने घटनास्थळी आले होते. ते महामार्गावरच कार सुरू करण्याचा प्रयत्न करत असतानाच भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने उभ्या असलेल्या आर्टिगा कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, कंटेनरने कारला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. या अपघातात आर्टिगा मधील प्रवासी आणि मदतीसाठी आलेले नातेवाईक असे एकूण 6 जण गंभीर जखमी झाले.
या अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून, तिचा एक हात तुटून शरीरापासून वेगळा झाला आहे.
सर्व जखमींना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. या प्रकरणी शिरपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
-
#DhuleNews #ShirpurAccident #MumbaiAgraHighway #DhulePolice #RoadAccident
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.