हनुमान जयंतीनिमित्त वानरसेनेला अनोखा पाहुणचार. शिस्तीत पंगतीत बसून माकडांनी मारला मिष्टान्नांवर ताव... अकोला जिल्ह्यातल्या बार्शिटाकळी तालूक्यातील कोथळी बु. गावात हनुमान जयंतीनिमित्त जयंतीच्या तीन दिवसांत गेल्या कित्येक वर्षांपासून एक अनोखी पंगत पार पडते, आणि ही अनोखी पंगत देण्यात येतेय ती वानर सेनेला... या गावातील मुंगसाजी महाराज संस्थानच्या वतीनं माकडांना त्यांना आवडणाऱ्या मिष्टान्नाची पंगत देण्यात येते आणि विशेष म्हणजे माकडंही अगदी शिस्तीत पंगतीत बसून या मिष्टान्नांवर ताव मारतात... या घनदाट जंगलात असलेल्या हनुमान मंदिरात गेल्या 20 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे....सुरुवातीला संस्थांसमोर जेवणाचं ताट वाढण्यात आल आणि पुढं निमंत्रणाचा मानापमान न ठेवता माकडे थेट झाडावरून खाली उतरले आणि येऊन रांगेत बसलेत..हनुमान जयंतीनिमित्त वानरसेनेचा हा अनोखा पाहुणचार पाहून आणि ही शिस्तीतील पंगत माणसांनाही लाजविणारी आहे....
हनुमान जयंतीनिमित्त वानरसेनेला अनोखा पाहुणचार. शिस्तीत पंगतीत बसून माकडांनी मारला मिष्टान्नांवर ताव... अकोला जिल्ह्यातल्या बार्शिटाकळी तालूक्यातील कोथळी बु. गावात हनुमान जयंतीनिमित्त जयंतीच्या तीन दिवसांत गेल्या कित्येक वर्षांपासून एक अनोखी पंगत पार पडते, आणि ही अनोखी पंगत देण्यात येतेय ती वानर सेनेला... या गावातील मुंगसाजी महाराज संस्थानच्या वतीनं माकडांना त्यांना आवडणाऱ्या मिष्टान्नाची पंगत देण्यात येते आणि विशेष म्हणजे माकडंही अगदी शिस्तीत पंगतीत बसून या मिष्टान्नांवर ताव मारतात... या घनदाट जंगलात असलेल्या हनुमान मंदिरात गेल्या 20 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे....सुरुवातीला संस्थांसमोर जेवणाचं ताट वाढण्यात आल आणि पुढं निमंत्रणाचा मानापमान न ठेवता माकडे थेट झाडावरून खाली उतरले आणि येऊन रांगेत बसलेत..हनुमान जयंतीनिमित्त वानरसेनेचा हा अनोखा पाहुणचार पाहून आणि ही शिस्तीतील पंगत माणसांनाही लाजविणारी आहे....
- हनुमान जयंतीनिमित्त वानरसेनेला अनोखा पाहुणचार. शिस्तीत पंगतीत बसून माकडांनी मारला मिष्टान्नांवर ताव... अकोला जिल्ह्यातल्या बार्शिटाकळी तालूक्यातील कोथळी बु. गावात हनुमान जयंतीनिमित्त जयंतीच्या तीन दिवसांत गेल्या कित्येक वर्षांपासून एक अनोखी पंगत पार पडते, आणि ही अनोखी पंगत देण्यात येतेय ती वानर सेनेला... या गावातील मुंगसाजी महाराज संस्थानच्या वतीनं माकडांना त्यांना आवडणाऱ्या मिष्टान्नाची पंगत देण्यात येते आणि विशेष म्हणजे माकडंही अगदी शिस्तीत पंगतीत बसून या मिष्टान्नांवर ताव मारतात... या घनदाट जंगलात असलेल्या हनुमान मंदिरात गेल्या 20 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे....सुरुवातीला संस्थांसमोर जेवणाचं ताट वाढण्यात आल आणि पुढं निमंत्रणाचा मानापमान न ठेवता माकडे थेट झाडावरून खाली उतरले आणि येऊन रांगेत बसलेत..हनुमान जयंतीनिमित्त वानरसेनेचा हा अनोखा पाहुणचार पाहून आणि ही शिस्तीतील पंगत माणसांनाही लाजविणारी आहे....1
- आमच्या रक्तात बेइमानी नाही! गद्दारांना आणि विरोधकांना आ.संजय गायकवाडांचे चोख प्रत्युत्तर.*1
- रविवार ठरला मृत्यूचा वार!; हर्सूल तलावात बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू छत्रपती संभाजीनगर, दि. ५ : शहरातील हर्सूल परिसरात असलेल्या तलावात रविवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारच्या सुमारास काही तरुण हर्सूल तलावात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खोल भागात गेल्यामुळे ते बुडू लागले. सोबत असलेल्या इतरांनी मदतीसाठी आरडाओरड केली. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचाव कार्य सुरू करून सर्वांना बाहेर काढण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर चौघांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. सूचना: उन्हाळ्याच्या काळात तलाव, धरण किंवा खोल पाण्यात पोहण्यासाठी जाताना आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.1
- सिल्लोड तालुक्यातील भवन येथे छोट्या भावाने वहिनीचा विनयभंग करत असताना महिलेचा पती आरोपीचा भाऊ याला मारहाण करीत भावाने गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यू कारणीभूत ठरला म्हणून दोन आरोपी विरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे1
- निर्भीड पत्रकार तथा दैनिक बुलंद शक्ती चे संपादक मा. रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, त्यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात दरेकर हे निर्भीड, पुराव्यानिशी पत्रकारिता करणारे व जनहितासाठी सातत्याने लढणारे पत्रकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, राज्यातील शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानानंतर दरेकर यांनी संबंधितांच्या मालमत्तेबाबत सखोल व पुराव्यानिशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे प्रकरण क्रमांक 167/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आला असला, तरी तो महसूलमंत्री यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या प्रभावाखाली दाखल करण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. रामेश्वर दरेकर यांनी यापूर्वीही विविध प्रकरणांमध्ये पोलिसांच्या कथित भ्रष्टाचाराचे व्हिडिओ व पुरावे समोर आणणे, लाचलुचपत प्रकरणांमध्ये पाठपुरावा करणे तसेच अवैध धंदे व प्रशासनातील त्रुटी जनतेसमोर मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळेच सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या प्रकरणाला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात असल्याचे नमूद करत, गुन्ह्याची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून तो तात्काळ रद्द करावा, संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी तसेच दरेकर यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.1
- राजपूत वाडीत खळबळीनंतर महावितरणचे स्पष्टीकरण; बिघाड दुरुस्त, परिस्थिती नियंत्रणात जालना शहरातील राजपूत वाडी परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या ‘लाव्हा सदृश’ पदार्थ बाहेर येण्याच्या रहस्यमय घटनेचा अखेर उलगडा झाला असून ही घटना विद्युत गळतीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास विद्युत खांबाजवळील जमिनीतून गरम व चिकट पदार्थ बाहेर येताना दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. काहींनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहून त्याचे व्हिडिओही चित्रीत केले. तत्काळ महावितरण विभागाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या महावितरणच्या पथकाने तपास सुरू केला असता, ११ केव्ही सॅटेलाइट फीडरचा कंडक्टर खराब पिन इन्सुलेटरमुळे V-क्रॉस आर्म आणि RSJ पोलच्या संपर्कात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे विद्युतप्रवाह थेट जमिनीत गेल्याने (इलेक्ट्रोक्यूशन) तीव्र उष्णता निर्माण झाली. परिसरातील खडकाळ जमिनीमुळे या उष्णतेचा परिणाम म्हणून जमिनीतील खडक वितळून ‘लाव्हा सदृश’ स्वरूपात बाहेर येताना दिसले. त्यामुळे हा प्रकार नैसर्गिक नसून तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेत सुमारे दुपारी ४.४५ वाजेपर्यंत बिघाड दूर केला. त्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून सध्या परिसरातील परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अशा घटना आढळल्यास तात्काळ संबंधित विभागाला माहिती देण्याचे सांगितले आहे.1
- सोयगाव तालुक्यातील शिवारामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांची नुकसानग्रस्त शेती ची पाहणी, पाऊस वारा गारपिट मुळे पिकाचे नुकसान झाले आहेत आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याची सूचना दिली.1
- बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी महिलांच्या पारंपरिक श्रृंगाराबाबत केलेल्या एका विधानामुळे नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी चिखलीतील महिला आता आक्रमक झाल्या आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी चिखलीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एक खळबळजनक विधान केले. आपण पक्ष सोडणार नाही हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी चक्क महिलांच्या कुंकू आणि मंगळसूत्राचा आधार घेतला. बोंद्रे म्हणाले की, "ज्या महिलेला मी पतिव्रता आहे असं दाखवायचं असतं, तीच महिला मोठं कुंकू लावते आणि मोठं मंगळसूत्र घालते." त्यांच्या या विधानानंतर चिखली शहरात संतापाची लाट उसळली.राहुल बोंद्रे यांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होताच चिखलीतील महिलांनी रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला. संतप्त महिलांनी राहुल बोंद्रे यांच्या फोटोला चपला मारल्या आणि जोरदार घोषणाबाजी केली. इतकेच नाही तर, त्यांच्या फोटोवर कुंकू आणि मंगळसूत्र रेखाटून महिलांनी अनोख्या पद्धतीने आपला संताप व्यक्त केला.यावेळी स्थानिक महिला प्रतिनिधी आणि महिला बालकल्याण सभापती सुषमा चव्हाण यांनी बोंद्रे यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, "हा जिल्हा राष्ट्रमाता जिजाऊ आणि रेणुका मातेचा आहे. कुंकू आणि मंगळसूत्र हे महिलांच्या अस्मितेचे आणि सौभाग्याचे लेणे आहे. सुशिक्षित म्हणवणाऱ्या नेत्याला अशा प्रकारची विधाने करणे शोभत नाहीमहिलांनी राहुल बोंद्रे यांनी या विधानाबद्दल समस्त स्त्री शक्तीची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आता या वादग्रस्त वक्तव्याचा काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो आणि राहुल बोंद्रे यावर काय स्पष्टीकरण देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.." बिरो रिपोर्ट चिखली1