Shuru
Apke Nagar Ki App…
कन्नडमधील उप विभागीय पोलीस अधिकारी, देवगाव रंगारी, पिशोर, कन्नड शहर आणि कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यांतील वाहने अत्यंत जीर्ण आणि खराब झाली आहेत. या पार्श्वभूमीवर, कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पोलीस यंत्रणेला सक्षम करण्यासाठी ५ नवीन स्कॉर्पिओ वाहने दान करण्याची तयारी दर्शवली आहे. या संदर्भात हर्षवर्धन जाधव यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांची भेट घेऊन हे दान स्वीकारण्याची विनंती केली आहे. पोलीस यंत्रणा बळकट करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असे सांगत प्रशासनाने या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
Marathi News Point
कन्नडमधील उप विभागीय पोलीस अधिकारी, देवगाव रंगारी, पिशोर, कन्नड शहर आणि कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यांतील वाहने अत्यंत जीर्ण आणि खराब झाली आहेत. या पार्श्वभूमीवर, कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पोलीस यंत्रणेला सक्षम करण्यासाठी ५ नवीन स्कॉर्पिओ वाहने दान करण्याची तयारी दर्शवली आहे. या संदर्भात हर्षवर्धन जाधव यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांची भेट घेऊन हे दान स्वीकारण्याची विनंती केली आहे. पोलीस यंत्रणा बळकट करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असे सांगत प्रशासनाने या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी सहपरिवार सहभागी होत दर्शन घेतले. सोलापूर जिल्ह्यातील खुडूस फाटा येथे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. तसेच विठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना करत राज्यात भरपूर पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या शेतात भरघोस पीक यावे आणि सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली. आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणातील त्यांच्या या सहभागाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.1
- नीट पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता नीट परीक्षेच्या निकालावरून बीडमधील सोहम गवते या विद्यार्थ्याने गंभीर आक्षेप घेतला आहे. उत्तरपत्रिकेनुसार त्याला ५२२ गुण मिळणे अपेक्षित असताना, प्रत्यक्ष स्कोअरकार्डमध्ये केवळ ९५ गुण दाखवण्यात आल्याचा दावा सोहमने केला आहे. नीट परीक्षेचा निकालच नीट नसल्याने संतापलेल्या या तरुणाने अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोहमने एनटीएकडे सात वेळा ई-मेल पाठवून आणि वारंवार फोनद्वारे तक्रार केली, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. अखेर कोणतीही दाद न मिळाल्याने त्याने औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावले आहे. या प्रकरणी याचिकाकर्त्याचे वकील ॲड. महेंद्र गंडले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.1
- अमरावती जिल्ह्यात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात युवक काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल सुरेंद्र येवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. बोगस बियाणे पुरवणाऱ्या संबंधित कंपन्यांना तात्काळ काळ्या यादीत टाकण्यात यावे, असा आग्रह देखील या निवेदनातून धरण्यात आला आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, चालू खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी एकदाच नव्हे तर दोनदा पेरणी केली. मात्र, बियाणे न उगवल्यामुळे किंवा पावसाअभावी त्यांना पुन्हा पेरणी करावी लागली, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. एका एकरासाठी सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत खर्च झाला असून, हा संपूर्ण खर्च पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी बांधव गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. जुलै महिना संपत आल्याने यंदाचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याची विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुढील शेती कशी करावी, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. या बिकट परिस्थितीचा विचार करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी युवक काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.1
- दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या मुलींनी पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी आंदोलनादरम्यान आमचे कपडे फाडले, असा थेट आरोप या आंदोलक मुलींनी केला आहे. दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांकडून अशा प्रकारचे वर्तन झाल्याचा दावा या मुलींनी केला आहे.1
- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील म्हसला खुर्द येथे एका ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे।1
- जालना शहर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे आणि सय्यद करीम बिल्डर यांच्या पुढाकाराने खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्यात फळवाटप आणि वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याद्वारे करण्यात आली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीने राज्यभरातील आपल्या सर्व कार्यकर्त्यांना अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.1
- छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेने केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. दिल्लीत नीट (NEET) परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. सोमवार, 20 जुलै रोजी युवासेनेचे विभागीय सचिव धर्मराज अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात, नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी दिल्लीत सोनम वांगचुक यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून केलेल्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला. शिवसेना उपनेते सुभाष पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत म्हटले की, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर हुकूमशाही पद्धतीने दडपशाही करणे हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे. या आंदोलनात शिवसेना उपनेते सुभाष पाटील, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, संजय मोटे, प्रमोद ठेंगडे, गोपाळ कुलकर्णी, बाळासाहेब दानवे, सुकन्या भोसले, कोमल पांढरे, दिपाली पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आणि युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.4
- अमरावती जिल्ह्यात संविधान लोकशाहीवादी जनसंघटना समन्वय समितीच्या वतीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी-युवकांच्या "रास्त व न्याय" आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांच्या नावे एक निवेदन सादर केले. या निवेदनात शिक्षण आणि रोजगार हा विद्यार्थी-युवकांचा घटनात्मक अधिकार असल्याचे ठामपणे मांडण्यात आले आहे. तसेच, शिक्षण क्षेत्रातील वाढते खासगीकरण, व्यापारीकरण, बाजारपेठीकरण आणि भ्रष्टाचारावर तीव्र चिंता व्यक्त करत यामुळे विद्यार्थ्यांचे हक्क हिरावले जात असल्याचे म्हटले आहे. शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभार, पेपरफुटी आणि गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य व आत्महत्येच्या घटना वाढत असल्याबद्दल निवेदनात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सरकारने याबाबत जबाबदारी स्वीकारून कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. समितीने NEET तसेच इतर परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली आहे. यासोबतच, शिक्षण क्षेत्रातील या संपूर्ण भ्रष्टाचाराची आणि अनागोंदी कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर डॉ. प्रकाश मानोकर, प्रा. संतोष शुक्ला, कु. मीनाताई वाठोरेकर, उपाताई पांडुरे, मायाताई वाकोडे, पंकजभाऊ वैद्य, प्रा. प्रविणजी गुल्हाने, गोविंदजी रोहनकर, विवेक वाठोरेकर, हरीश दादा, डॉ. पृथ्वीराज राजपूत, पंकज देशमुख, आशीष कडू, प्रदीप भाऊरावजी भगत, प्रभाकरराव आकोटकर, सरोजभाऊ चौफकर, सौ. प्रियाताई चौफकर, सुनील घटोळे, अंडू सुयोग माठुरकर आणि प्रदीपभाऊ पाटील यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.1