logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

येवला तालुक्यातील पारेगाव येथील 'झाशीची राणी' महिला बचत गटाने शेती व्यवसायात एक नवा आदर्श घालून दिला आहे. गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या या गटाने यावर्षी 'शेतकरी उत्पादक गट' सुरू करून, सर्व महिलांनी एकत्रितपणे बियाणे आणि खते खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबत अधिकृत अजित कृषी भांडार बी-बियाणे विक्रेते नितीन काबरा यांनी माहिती दिली की, त्यांनी या महिला बचत गटाला भाजीपाला आणि इतर बियाणे थेट होलसेल दरात उपलब्ध करून दिले. काबरा यांच्या मते, अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी केल्यामुळे महिलांची फसवणूक टळली असून, त्यांना दर्जेदार व सक्षम बियाणे मिळाले आहे. या एकत्रित खरेदीमुळे गटाची मोठी आर्थिक बचत झाली आहे. तसेच, गटाच्या अध्यक्षांनी विश्वास व्यक्त केला की, एकत्रित खरेदी व सामूहिक शेतीमुळे त्यांचा मजुरीचा खर्चही वाचणार आहे. पारेगावच्या या महिलांच्या प्रयोगाचे परिसरात कौतुक होत आहे. दरम्यान, नितीन काबरा यांनी तालुक्यातील इतर गावांमध्येही महिलांनी असे बचत गट स्थापन करून एकत्रित खरेदीचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले आहे.

23 hrs ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
23 hrs ago
ab237a77-29d3-4187-b280-c027bdaedb83

येवला तालुक्यातील पारेगाव येथील 'झाशीची राणी' महिला बचत गटाने शेती व्यवसायात एक नवा आदर्श घालून दिला आहे. गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या या गटाने यावर्षी 'शेतकरी उत्पादक गट' सुरू करून, सर्व महिलांनी एकत्रितपणे बियाणे आणि खते खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबत अधिकृत अजित कृषी भांडार बी-बियाणे

विक्रेते नितीन काबरा यांनी माहिती दिली की, त्यांनी या महिला बचत गटाला भाजीपाला आणि इतर बियाणे थेट होलसेल दरात उपलब्ध करून दिले. काबरा यांच्या मते, अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी केल्यामुळे महिलांची फसवणूक टळली असून, त्यांना दर्जेदार व सक्षम बियाणे मिळाले आहे. या एकत्रित खरेदीमुळे गटाची मोठी आर्थिक बचत

झाली आहे. तसेच, गटाच्या अध्यक्षांनी विश्वास व्यक्त केला की, एकत्रित खरेदी व सामूहिक शेतीमुळे त्यांचा मजुरीचा खर्चही वाचणार आहे. पारेगावच्या या महिलांच्या प्रयोगाचे परिसरात कौतुक होत आहे. दरम्यान, नितीन काबरा यांनी तालुक्यातील इतर गावांमध्येही महिलांनी असे बचत गट स्थापन करून एकत्रित खरेदीचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • रस्ता बनवला पाहिजे.
    1
    रस्ता बनवला पाहिजे.
    user_Gopal Pawar
    Gopal Pawar
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • महाराष्ट्रात वाढणाऱ्या डेटा सेंटर प्रकल्पांमुळे जलटंचाई, विजेची वाढती मागणी, हवामान बदल आणि ई-कचऱ्याचे संकट निर्माण होऊ शकते, असा महत्त्वपूर्ण मुद्दा आमदार पंकज भुजबळ यांनी पावसाळी अधिवेशनात मांडला. त्यांनी सांगितले की, राज्यात सध्या २० डेटा सेंटर कार्यरत आहेत, तर आणखी ४४ डेटा सेंटर उभारले जाणार आहेत. या प्रकल्पामुळे भविष्यात पाणी आणि वीज यांवरून संघर्ष होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या संभाव्य संकटावर तोडगा काढण्यासाठी आमदार भुजबळ यांनी शासनाकडे ‘ग्रीन डेटा सेंटर’ धोरण तातडीने लागू करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संबंधित कंपन्यांसाठी आवश्यक अटी व नियम बंधनकारक करून, ग्रीन डेटा सेंटर धोरण तयार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
    1
    महाराष्ट्रात वाढणाऱ्या डेटा सेंटर प्रकल्पांमुळे जलटंचाई, विजेची वाढती मागणी, हवामान बदल आणि ई-कचऱ्याचे संकट निर्माण होऊ शकते, असा महत्त्वपूर्ण मुद्दा आमदार पंकज भुजबळ यांनी पावसाळी अधिवेशनात मांडला. त्यांनी सांगितले की, राज्यात सध्या २० डेटा सेंटर कार्यरत आहेत, तर आणखी ४४ डेटा सेंटर उभारले जाणार आहेत. या प्रकल्पामुळे भविष्यात पाणी आणि वीज यांवरून संघर्ष होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

या संभाव्य संकटावर तोडगा काढण्यासाठी आमदार भुजबळ यांनी शासनाकडे ‘ग्रीन डेटा सेंटर’ धोरण तातडीने लागू करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संबंधित कंपन्यांसाठी आवश्यक अटी व नियम बंधनकारक करून, ग्रीन डेटा सेंटर धोरण तयार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • नाशिकमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीवर धारदार लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपी राहुल शांताराम जाधव (वय ३१, रा. महादेवनगर, सातपूर) याला गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. फिर्यादी घरासमोरील ओट्यावर बसले असताना राहुल जाधव तेथे आला. त्याने जुन्या वादातून शिवीगाळ व दमदाटी केली. फिर्यादींनी समजावण्याचा प्रयत्न करताच संतप्त झालेल्या आरोपीने आपल्या बॅगेतून धारदार लोखंडी कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यावर, हातावर, पोटावर तसेच डोळ्याजवळ सपासप वार केले. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, त्याचा शोध गुन्हे शाखा युनिट-२चे पथक घेत होते. दरम्यान, आरोपी महादेववाडी परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान राहुल जाधवने रागाच्या भरात हल्ला केल्याची कबुली दिली असून, वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुढील कारवाईसाठी सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२चे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप व त्यांच्या पथकाने केली.
    1
    नाशिकमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीवर धारदार लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपी राहुल शांताराम जाधव (वय ३१, रा. महादेवनगर, सातपूर) याला गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. फिर्यादी घरासमोरील ओट्यावर बसले असताना राहुल जाधव तेथे आला. त्याने जुन्या वादातून शिवीगाळ व दमदाटी केली. फिर्यादींनी समजावण्याचा प्रयत्न करताच संतप्त झालेल्या आरोपीने आपल्या बॅगेतून धारदार लोखंडी कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यावर, हातावर, पोटावर तसेच डोळ्याजवळ सपासप वार केले. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, त्याचा शोध गुन्हे शाखा युनिट-२चे पथक घेत होते. दरम्यान, आरोपी महादेववाडी परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान राहुल जाधवने रागाच्या भरात हल्ला केल्याची कबुली दिली असून, वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुढील कारवाईसाठी सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२चे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप व त्यांच्या पथकाने केली.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर कॉलनी परिसरात पोलिसांनी तीन भावांची दिंड काढली आहे. या घटनेत पोलिसांनी तीन भावांना जाहीरपणे फिरवून ही कारवाई केली.
    1
    छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर कॉलनी परिसरात पोलिसांनी तीन भावांची दिंड काढली आहे. या घटनेत पोलिसांनी तीन भावांना जाहीरपणे फिरवून ही कारवाई केली.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • नाशिक महापालिकेतर्फे मान्सून टास्क फोर्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली आहे. या टास्क फोर्समध्ये लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दहा ते पंधरा लोकांची एक टीम काम करणार आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने मान्सून संबंधित कामे प्रभावीपणे पार पाडण्यासाठी हा टास्क फोर्स महत्त्वाचा ठरणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
    1
    नाशिक महापालिकेतर्फे मान्सून टास्क फोर्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली आहे. या टास्क फोर्समध्ये लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दहा ते पंधरा लोकांची एक टीम काम करणार आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने मान्सून संबंधित कामे प्रभावीपणे पार पाडण्यासाठी हा टास्क फोर्स महत्त्वाचा ठरणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
    user_PRASIDDHI PRAMUKH NEWS
    PRASIDDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एका वस्तीगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या निवास व उपलब्ध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान, त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि विविध समस्यांची माहिती जाणून घेतली. वस्तीगृहातील आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
    1
    पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एका वस्तीगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या निवास व उपलब्ध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान, त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि विविध समस्यांची माहिती जाणून घेतली. वस्तीगृहातील आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
    user_Salman Fayyaz khan
    Salman Fayyaz khan
    Video editing service Aurangabad, Maharashtra•
    10 hrs ago
  • महाराष्ट्रात भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कठोर कारवाई करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रभावी उपाययोजना राबवत असून, भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कडक इशारा देण्यात आला आहे. अन्न नमुन्यांच्या चाचणी अहवालासाठी लागणारा कालावधी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यासाठी २२ खासगी प्रयोगशाळांशी करार करण्यात आला आहे. यामुळे चाचणी अहवाल मिळण्याचा कालावधी ३० ते ३५ दिवसांवर आणता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, अन्न सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी नाशिक, नागपूर आणि रायगड येथे नवीन प्रयोगशाळा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तसेच नवीन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची भरती आणि रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.
    1
    महाराष्ट्रात भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कठोर कारवाई करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रभावी उपाययोजना राबवत असून, भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कडक इशारा देण्यात आला आहे.

अन्न नमुन्यांच्या चाचणी अहवालासाठी लागणारा कालावधी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यासाठी २२ खासगी प्रयोगशाळांशी करार करण्यात आला आहे. यामुळे चाचणी अहवाल मिळण्याचा कालावधी ३० ते ३५ दिवसांवर आणता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, अन्न सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी नाशिक, नागपूर आणि रायगड येथे नवीन प्रयोगशाळा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तसेच नवीन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची भरती आणि रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • हरसुल परिसरातील अवैध दारूचा काळाबाजार करून उच्छाद मांडणाऱ्या दादा बुधर याला हरसुल पोलिसांनी मोठ्या कारवाईत जेरबंद केले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत पोलिसांनी तब्बल २३,५२० रुपयांचा दारूचा साठा जप्त केला असून, या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. काकडपाना येथील दादा बुधर आपल्या राहत्या घरातून बेकायदेशीरपणे दारूची सर्रास विक्री करत होता, याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत, हरसुल पोलिसांनी सोमवारी २३ जून रोजी धाड टाकून दादा बुधरला रंगेहात पकडले. यावेळी आरोपीच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दादा बुधर यावर यापूर्वीही विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून, गुन्हेगारीची पार्श्वभूमी असतानाही तो पुन्हा अवैध धंद्यांत सक्रिय होता. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी आता प्रशासनाकडे अशा समाजकंटकांवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई करण्याची आक्रमक मागणी केली आहे. हरसुल पोलीस ठाण्याचे एपीआय जीवन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाने अवैध दारू विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात मोहीम अधिक तीव्र केली जाईल आणि कोणाचीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. दरम्यान, हरसुल पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दादा बुधरच्या या अवैध धंद्यात आणखी कोणाचे हात आहेत, याचाही पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
    3
    हरसुल परिसरातील अवैध दारूचा काळाबाजार करून उच्छाद मांडणाऱ्या दादा बुधर याला हरसुल पोलिसांनी मोठ्या कारवाईत जेरबंद केले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत पोलिसांनी तब्बल २३,५२० रुपयांचा दारूचा साठा जप्त केला असून, या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

काकडपाना येथील दादा बुधर आपल्या राहत्या घरातून बेकायदेशीरपणे दारूची सर्रास विक्री करत होता, याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत, हरसुल पोलिसांनी सोमवारी २३ जून रोजी धाड टाकून दादा बुधरला रंगेहात पकडले. यावेळी आरोपीच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दादा बुधर यावर यापूर्वीही विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून, गुन्हेगारीची पार्श्वभूमी असतानाही तो पुन्हा अवैध धंद्यांत सक्रिय होता. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी आता प्रशासनाकडे अशा समाजकंटकांवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई करण्याची आक्रमक मागणी केली आहे. हरसुल पोलीस ठाण्याचे एपीआय जीवन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाने अवैध दारू विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात मोहीम अधिक तीव्र केली जाईल आणि कोणाचीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

दरम्यान, हरसुल पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दादा बुधरच्या या अवैध धंद्यात आणखी कोणाचे हात आहेत, याचाही पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चिंचोली येथे तातेराव भुजंग यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चिंचोली येथे तातेराव भुजंग यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.