logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

६ वर्षांची चिमुरडी आणि ७९ वर्षीय वृद्धेची घरात शिरून हत्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

2 hrs ago
user_विशेष तपास न्युज
विशेष तपास न्युज
पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago

६ वर्षांची चिमुरडी आणि ७९ वर्षीय वृद्धेची घरात शिरून हत्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ६ वर्षांची चिमुरडी आणि ७९ वर्षीय वृद्धेची घरात शिरून हत्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
    1
    ६ वर्षांची चिमुरडी आणि ७९ वर्षीय वृद्धेची घरात शिरून हत्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Maharashtra 18 news
    1
    Post by Maharashtra 18 news
    user_Maharashtra 18 news
    Maharashtra 18 news
    Pimpri Chanchwad, Pune•
    23 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दुपारी ०२:१४ ते सायंकाळी ०७:२५ या कालावधीत विविध आपत्कालीन घटनांची नोंद झाली आहे.सदर कालावधीत ०१ इलेक्ट्रिकल डी.पी.ला आग लागल्याची घटना, तसेच झाड पडण्याच्या एकूण १७ घटना आणि रावेत परिसरात सीमा भिंत कोसळल्याची ०१ घटना नोंदविण्यात आली आहे. सुदैवाने, झाड पडण्याच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापतीची नोंद अद्याप झालेली नाही. मात्र काही ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर झाडे पडल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे यांच्या नेतृत्वाखाली दलाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून, घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी १० अग्निशमन वाहने, ०२ रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे ८० जवान कार्यरत आहेत.... #पिंपरीचिंचवड #पाऊस #झाडपड #वादळीवारे #अग्निशमनदल #आपत्कालीनघटना #वाहननुकसान #महानगरपालिका #रावेत #पुणेबातम्या #PimpriChinchwad #HeavyRain #TreeFall #StormDamage #FireBrigade #EmergencyResponse #VehicleDamage #CivicNews #Ravet #PuneNews
    1
    पिंपरी चिंचवड : - 
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दुपारी ०२:१४ ते सायंकाळी ०७:२५ या कालावधीत विविध आपत्कालीन घटनांची नोंद झाली आहे.सदर कालावधीत ०१ इलेक्ट्रिकल डी.पी.ला आग लागल्याची घटना, तसेच झाड पडण्याच्या एकूण १७ घटना आणि रावेत परिसरात सीमा भिंत कोसळल्याची ०१ घटना नोंदविण्यात आली आहे.
सुदैवाने, झाड पडण्याच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापतीची नोंद अद्याप झालेली नाही. मात्र काही ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर झाडे पडल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे यांच्या नेतृत्वाखाली दलाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून, घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी १० अग्निशमन वाहने, ०२ रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे ८० जवान कार्यरत आहेत....
#पिंपरीचिंचवड #पाऊस #झाडपड #वादळीवारे #अग्निशमनदल #आपत्कालीनघटना #वाहननुकसान #महानगरपालिका #रावेत #पुणेबातम्या
#PimpriChinchwad #HeavyRain #TreeFall #StormDamage #FireBrigade #EmergencyResponse #VehicleDamage #CivicNews #Ravet #PuneNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पाकिट संस्कृतीमुळे पुणे बुडाले का? मोठा प्रश्न!
    1
    पाकिट संस्कृतीमुळे पुणे बुडाले का? मोठा प्रश्न!
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी हडपसर येथे 5 एप्रिल 2026 या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! सभेच्या प्रचारासाठी 3 एप्रिलला हडपसर येथे भव्य वाहनफेरी ! विक्रम शिंदे (भोर )दि.3 पुणे : आज गोहत्या, लव्ह जिहाद, जिहादी आतंकवाद, देवतांचे विडंबन करणे यांसारखी असंख्य संकटे हिंदूंवर वारंवार येत आहेत. पुण्यातील बांगलादेशी घुसखोरांचे वाढते प्रमाण आपल्या सुरक्षिततेसमोर मोठे आव्हान उभे करत आहे.आपले शहर आणि संस्कृती आज धोक्यात आली आहे. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाज्वल्य स्वाभिमान मनात जागृत करून या सर्व अन्यायकारक संकटांना 'हिंदु संघटन' हेच एकमेव चोख उत्तर आहे. हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 5 एप्रिल 2026 या दिवशी सायंकाळी 6 वाजता मारुतीराव काळे शाळेचे मैदान, काळे पडळ, हडपसर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी हिंदुत्वाची बुलंद तोफ भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हे मान्यवर उपस्थित हिंदूंना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती श्री. पराग गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, श्री. सुनील घनवट, सी.ए. श्री. सर्वेश मेहेंदळे, वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, श्री. पराग गोखले, रुद्रतेज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमित गायकवाड उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना श्री. सुनील घनवट म्हणाले की, हिंदू धर्मविरोधी कथानक रचून 'हलाल जिहाद'सारख्या माध्यमांतून एक समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. विविध प्रकारचे जिहाद, देशाची सुरक्षा आणि 'वक्फ बोर्डा'च्या माध्यमातून अद्यापही ताब्यात असलेल्या मंदिरांच्या जमिनी, तसेच वर्तमान काळात भारताला 'हिंदु राष्ट्र' घोषित करणे या मुख्य मागण्यांविषयी सभेमध्ये सर्वांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी नमूद केले की, अशा सभांच्या माध्यमातून समाजात मोठ्या प्रमाणावर जागृती होत असून सर्वांनी धर्मकार्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. समाज धर्मशिक्षित व्हावा, हाच संस्थेचा उद्देश असून सर्व हिंदूंनी या सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सी.ए.श्री.सर्वेश मेहेंदळे यांनी सांगितले की, आज देश आणि धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी संघटन हाच एकमेव मार्ग आहे. आम्ही सर्व संघटना यामध्ये सक्रिय असून सर्व हिंदुत्ववाद्यांनी पूर्ण ताकदीनिशी या सभेला उपस्थित रहावे. सभेच्या नियोजनाविषयी माहिती देताना श्री. पराग गोखले यांनी सांगितले की, सभेच्या ठिकाणी क्रांतिकारक, राष्ट्रपुरुष, गोरक्षण आणि हिंदूंवरील अत्याचारांविषयी माहिती देणारे फलक प्रदर्शन लावण्यात येणार आहे. तसेच युवकांसाठी आणि मुलांसाठी बालसंस्कार कक्षासह विविध धर्मग्रंथ व आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शनही कार्यक्रमस्थळी असेल. सभेच्या निमित्ताने आतापर्यंत पुणे शहरासह बारामती, दौंड, सासवड, जुन्नर, यवत, पारगाव अशा 100 हून अधिक गावांमध्ये व्यापक प्रसार करण्यात आला आहे. विविध तरुण मंडळे, महिला गट आणि ग्रामस्थांच्या शेकडो बैठका, रामनवमी उत्सव, हस्तपत्रके, होर्डिंग्ज आणि सामाजिक माध्यमांच्या द्वारे सभेचा संदेश घराघरांत पोहोचवण्यात आला आहे. सभेच्या निमित्ताने जनमानसात जागृती व्हावी या उद्देशाने समितीच्या वतीने 3 एप्रिल या दिवशी सायंकाळी 4.30 वाजता भव्य वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेरी भेकराईनगर PMT बस डेपो येथून प्रारंभ होऊन पापडेवस्ती, काळेपडळ, ससाणेनगर, पुरोहित स्वीट चौक मार्गे जाऊन मारुतीराव काळे विद्यालयाच्या मैदानावर विसर्जित होईल.
    1
    ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी हडपसर येथे 5 एप्रिल 2026 या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
सभेच्या प्रचारासाठी 3 एप्रिलला हडपसर येथे भव्य वाहनफेरी !
विक्रम शिंदे  (भोर )दि.3 पुणे : आज गोहत्या, लव्ह जिहाद, जिहादी आतंकवाद, देवतांचे विडंबन करणे यांसारखी असंख्य संकटे हिंदूंवर वारंवार येत आहेत. पुण्यातील बांगलादेशी घुसखोरांचे वाढते प्रमाण आपल्या सुरक्षिततेसमोर मोठे आव्हान उभे करत आहे.आपले शहर आणि संस्कृती आज धोक्यात आली आहे. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाज्वल्य स्वाभिमान मनात जागृत करून या सर्व अन्यायकारक संकटांना 'हिंदु संघटन' हेच एकमेव चोख उत्तर आहे. हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 5 एप्रिल 2026 या दिवशी सायंकाळी 6 वाजता मारुतीराव काळे शाळेचे मैदान, काळे पडळ, हडपसर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. 
या सभेसाठी हिंदुत्वाची बुलंद तोफ भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हे मान्यवर उपस्थित हिंदूंना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती श्री. पराग गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, श्री. सुनील घनवट, सी.ए. श्री. सर्वेश मेहेंदळे, वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, श्री. पराग गोखले, रुद्रतेज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमित गायकवाड उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना श्री. सुनील घनवट म्हणाले की, हिंदू धर्मविरोधी कथानक रचून 'हलाल जिहाद'सारख्या माध्यमांतून एक समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. विविध प्रकारचे जिहाद, देशाची सुरक्षा आणि 'वक्फ बोर्डा'च्या माध्यमातून अद्यापही ताब्यात असलेल्या मंदिरांच्या जमिनी, तसेच वर्तमान काळात भारताला 'हिंदु राष्ट्र' घोषित करणे या मुख्य मागण्यांविषयी सभेमध्ये सर्वांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. 
सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी नमूद केले की, अशा सभांच्या माध्यमातून समाजात मोठ्या प्रमाणावर जागृती होत असून सर्वांनी धर्मकार्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. समाज धर्मशिक्षित व्हावा, हाच संस्थेचा उद्देश असून सर्व हिंदूंनी या सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 
सी.ए.श्री.सर्वेश मेहेंदळे यांनी सांगितले की, आज देश आणि धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी संघटन हाच एकमेव मार्ग आहे. आम्ही सर्व संघटना यामध्ये सक्रिय असून सर्व हिंदुत्ववाद्यांनी पूर्ण ताकदीनिशी या सभेला उपस्थित रहावे.
सभेच्या नियोजनाविषयी माहिती देताना श्री. पराग गोखले यांनी सांगितले की, सभेच्या ठिकाणी क्रांतिकारक, राष्ट्रपुरुष, गोरक्षण आणि हिंदूंवरील अत्याचारांविषयी माहिती देणारे फलक प्रदर्शन लावण्यात येणार आहे. तसेच युवकांसाठी आणि मुलांसाठी बालसंस्कार कक्षासह विविध धर्मग्रंथ व आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शनही कार्यक्रमस्थळी असेल. सभेच्या निमित्ताने आतापर्यंत पुणे शहरासह बारामती, दौंड, सासवड, जुन्नर, यवत, पारगाव अशा 100 हून अधिक गावांमध्ये व्यापक प्रसार करण्यात आला आहे. विविध तरुण मंडळे, महिला गट आणि ग्रामस्थांच्या शेकडो बैठका, रामनवमी उत्सव, हस्तपत्रके, होर्डिंग्ज आणि सामाजिक माध्यमांच्या द्वारे सभेचा संदेश घराघरांत पोहोचवण्यात आला आहे.
सभेच्या निमित्ताने जनमानसात जागृती व्हावी या उद्देशाने समितीच्या वतीने 3 एप्रिल या दिवशी सायंकाळी 4.30 वाजता भव्य वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेरी भेकराईनगर PMT बस डेपो येथून प्रारंभ होऊन पापडेवस्ती, काळेपडळ, ससाणेनगर, पुरोहित स्वीट चौक मार्गे जाऊन मारुतीराव काळे विद्यालयाच्या मैदानावर विसर्जित होईल.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • रायगड- अमुलकुमार जैन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला असून, नागोठणे जवळील सुकेळी खिंडीत ट्रॅव्हल्स बस पलटल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर तब्बल 38 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघालेली खाजगी ट्रॅव्हल्स बस सुकेळी खिंडीतून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस अचानक पलटली. वळणदार रस्ता आणि वेग यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघात इतका भीषण होता की, बसमधील प्रवाशांमध्ये एकच आरडाओरडा उडाला आणि अनेकजण जखमी अवस्थेत अडकून पडले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले. पोलीस प्रशासनही काही वेळातच दाखल झाले. विशेष म्हणजे, या अपघातात एक महिला बसच्या खाली अडकली होती. स्थानिक नागरिक, पोलीस आणि SVRSS बचाव पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून तिला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. बचाव पथकाने जखमींना बाहेर काढणे, प्राथमिक उपचार देणे आणि रुग्णालयात हलवणे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या अपघातातील आठ ते नऊ प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी नवी मुंबई व मुंबई येथील रुग्णालयांत हलवण्यात आले आहे. इतर जखमींना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुकेळी खिंड हा धोकादायक टप्पा मानला जात असून, येथे योग्य खबरदारी न घेतल्यास अपघाताची शक्यता वाढते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या भीषण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून, पुढील तपास सुरु आहे.
    3
    रायगड- अमुलकुमार जैन 
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला असून, नागोठणे जवळील सुकेळी खिंडीत ट्रॅव्हल्स बस पलटल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर तब्बल 38 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघालेली खाजगी ट्रॅव्हल्स बस सुकेळी खिंडीतून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस अचानक पलटली. वळणदार रस्ता आणि वेग यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघात इतका भीषण होता की, बसमधील प्रवाशांमध्ये एकच आरडाओरडा उडाला आणि अनेकजण जखमी अवस्थेत अडकून पडले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले. पोलीस प्रशासनही काही वेळातच दाखल झाले. विशेष म्हणजे, या अपघातात एक महिला बसच्या खाली अडकली होती. स्थानिक नागरिक, पोलीस आणि SVRSS बचाव पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून तिला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. बचाव पथकाने जखमींना बाहेर काढणे, प्राथमिक उपचार देणे आणि रुग्णालयात हलवणे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
या अपघातातील आठ ते नऊ प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी नवी मुंबई व मुंबई येथील रुग्णालयांत हलवण्यात आले आहे. इतर जखमींना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुकेळी खिंड हा धोकादायक टप्पा मानला जात असून, येथे योग्य खबरदारी न घेतल्यास अपघाताची शक्यता वाढते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या भीषण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून, पुढील तपास सुरु आहे.
    user_Raigad news
    Raigad news
    अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.