logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात मांडळ-किन्ही-शिवणी-कुजबा रस्त्यावर होणाऱ्या जनक्षोभाचा आवाज जोर धरू लागला आहे. वर्षभरातच लाखो रुपये खर्च करून बनवलेल्या या रस्त्यावरून डांबर गायब झाले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सरकारी पैशांची उधळपट्टी आणि अधिकाऱ्यांची भ्रष्ट वृत्ती याचा जिवंत पुरावा म्हणजे हा रस्ता! वर्षभरापूर्वीच बनवलेला हा रस्ता आज शोधूनही सापडत नाही. रस्त्यावरून डांबर गायब झाले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता आहे की मृत्यूची दरी? असा संताप आता नागरिक व्यक्त करत आहेत. कंत्राटदार-अधिकारी साखळीचा भांडाफोड: वर्षभरात रस्ता उखडतोच कसा? निकृष्ट दर्जाची खडी आणि नावापुरते डांबर वापरून लाखो रुपयांचा निधी हडप करण्यात आला आहे. बांधकाम विभागाच्या मेहेरबानीमुळेच कंत्राटदाराचे उखडले पांढरे झाले असून सामान्य जनतेला मात्र धुळीचे आणि खड्ड्यांचे साम्राज्य सहन करावे लागत आहे. प्रवाशांच्या जिवाशी खेळ: या रस्त्यावरून रोज हजारो शेतकरी, शाळकरी मुले आणि नागरिक प्रवास करतात. खड्ड्यांमुळे दररोज गाड्यांचे अपघात होत असून निष्पाप लोक जखमी होत आहेत. एखादा मोठा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल विचारला जात आहे. अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करा: या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा स्पष्ट संशय आहे. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) कसून चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी प्रहार जनशक्ती पक्ष, शिवसेना व त्रस्त ग्रामस्थांनी केली आहे. ७ दिवसांत काम नाही तर 'ठिय्या' आंदोलन! सार्वजनिक बांधकाम विभागाने गाढ झोपेतून जागे व्हावे. येत्या ७ दिवसांच्या आत या रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने सुरू झाले नाही, तर PWD कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यालयाचे कामकाज ठप्प केले जाईल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. ग्रामस्थांचा सवाल: "जनतेचा कर रूपाने आलेला पैसा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जात असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. ७ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर PWD अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्ड्यांत बसवून जाब विचारू!"

3 hrs ago
user_Sanjay bhagawan atkari
Sanjay bhagawan atkari
Mechanic कुही, नागपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात मांडळ-किन्ही-शिवणी-कुजबा रस्त्यावर होणाऱ्या जनक्षोभाचा आवाज जोर धरू लागला आहे. वर्षभरातच लाखो रुपये खर्च करून बनवलेल्या या रस्त्यावरून डांबर गायब झाले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सरकारी पैशांची उधळपट्टी आणि अधिकाऱ्यांची भ्रष्ट वृत्ती याचा जिवंत पुरावा म्हणजे हा रस्ता! वर्षभरापूर्वीच बनवलेला हा रस्ता आज शोधूनही सापडत नाही. रस्त्यावरून डांबर गायब झाले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता आहे की मृत्यूची दरी? असा संताप आता नागरिक व्यक्त करत आहेत. कंत्राटदार-अधिकारी साखळीचा भांडाफोड: वर्षभरात रस्ता उखडतोच कसा? निकृष्ट दर्जाची खडी आणि नावापुरते डांबर वापरून लाखो रुपयांचा निधी हडप करण्यात आला आहे. बांधकाम विभागाच्या मेहेरबानीमुळेच कंत्राटदाराचे उखडले पांढरे झाले असून सामान्य जनतेला मात्र धुळीचे आणि खड्ड्यांचे साम्राज्य सहन करावे लागत आहे. प्रवाशांच्या जिवाशी खेळ: या रस्त्यावरून रोज हजारो शेतकरी, शाळकरी मुले आणि नागरिक प्रवास करतात. खड्ड्यांमुळे दररोज गाड्यांचे अपघात होत असून निष्पाप लोक जखमी होत आहेत. एखादा मोठा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल विचारला जात आहे. अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करा: या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा स्पष्ट संशय आहे. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) कसून चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी प्रहार जनशक्ती पक्ष, शिवसेना व त्रस्त ग्रामस्थांनी केली आहे. ७ दिवसांत काम नाही तर 'ठिय्या' आंदोलन! सार्वजनिक बांधकाम विभागाने गाढ झोपेतून जागे व्हावे. येत्या ७ दिवसांच्या आत या रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने सुरू झाले नाही, तर PWD कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यालयाचे कामकाज ठप्प केले जाईल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. ग्रामस्थांचा सवाल: "जनतेचा कर रूपाने आलेला पैसा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जात असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. ७ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर PWD अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्ड्यांत बसवून जाब विचारू!"

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विदर्भाच्या पंढरीत आषाढी एकादशीला मोठ्या संख्येने भक्त जमा झाले आहेत. हा उत्सव ३० जुलैला मुख्य सोहळ्याने साजरा केला जाईल. नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे विशेषत: या उत्सवाला मोठा उत्साह आहे. या प्रसंगी, भक्तांनी मंदिरात विशेष पूजा केली आणि देवतांचे दर्शन घेतले. उत्सवाचा भाग म्हणून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. या उत्सवामुळे स्थानिक अर्थव्यवस्था देखील बळकट होते, कारण मोठ्या संख्येने भक्त येतात आणि तेथील दुकानदार, होटेल आणि वाहतुकीच्या साधनांचा वापर करतात.
    1
    विदर्भाच्या पंढरीत आषाढी एकादशीला मोठ्या संख्येने भक्त जमा झाले आहेत. हा उत्सव ३० जुलैला मुख्य सोहळ्याने साजरा केला जाईल. नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे विशेषत: या उत्सवाला मोठा उत्साह आहे.

या प्रसंगी, भक्तांनी मंदिरात विशेष पूजा केली आणि देवतांचे दर्शन घेतले. उत्सवाचा भाग म्हणून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. या उत्सवामुळे स्थानिक अर्थव्यवस्था देखील बळकट होते, कारण मोठ्या संख्येने भक्त येतात आणि तेथील दुकानदार, होटेल आणि वाहतुकीच्या साधनांचा वापर करतात.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी करपू लागलेली सोयाबीन, कापूस, तूर, उडीद आणि मूग ही पिके आता पुन्हा जोमाने वाढू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. यंदाच्या हंगामात सुरुवातीला झालेल्या पावसानंतर दीर्घ खंड पडल्याने अनेक ठिकाणी पिके धोक्यात आली होती. काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीचाही सामना करावा लागला होता. मात्र अलीकडे झालेल्या समाधानकारक पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसामुळे शेततळी, विहिरी आणि नाल्यांतील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. आगामी काळात आणखी चांगला पाऊस झाल्यास यंदाचे खरीप उत्पादन समाधानकारक होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
    1
    महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी करपू लागलेली सोयाबीन, कापूस, तूर, उडीद आणि मूग ही पिके आता पुन्हा जोमाने वाढू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

यंदाच्या हंगामात सुरुवातीला झालेल्या पावसानंतर दीर्घ खंड पडल्याने अनेक ठिकाणी पिके धोक्यात आली होती. काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीचाही सामना करावा लागला होता. मात्र अलीकडे झालेल्या समाधानकारक पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

पावसामुळे शेततळी, विहिरी आणि नाल्यांतील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. आगामी काळात आणखी चांगला पाऊस झाल्यास यंदाचे खरीप उत्पादन समाधानकारक होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • सडक अर्जुनी येथे २६ जुलै रोजी कारगिल दिवस, नीट पेपरफुटी प्रकरणी आत्महत्या केलेले विद्यार्थी आणि दिल्ली येथे लाठीहल्ल्यात शहीद झालेल्यांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी त्रिरत्न पत संस्था, शेंडा रोड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अशोककुमार लांजेवार व रोशन बडोले यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले आणि सामूहिक राष्ट्रगीत गाऊन शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन आशिष राऊत यांनी केले. या प्रसंगी महेंद्र चंद्रिकापुरे, भोजराज रामटेके, प्रा. संतोष रामटेके, असलेश अंबादे, चंद्रकांत गणवीर, शामराव बडोले, अतुल फुले, रजनीश पंचभाई, आशिष राऊत, पुरुषोत्तम रामटेके, अंगरराज सिडाम, बबन बडोले, राहुल गणवीर, निखिल शहारे व मनोज तागडे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
    4
    सडक अर्जुनी येथे २६ जुलै रोजी कारगिल दिवस, नीट पेपरफुटी प्रकरणी आत्महत्या केलेले विद्यार्थी आणि दिल्ली येथे लाठीहल्ल्यात शहीद झालेल्यांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी त्रिरत्न पत संस्था, शेंडा रोड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अशोककुमार लांजेवार व रोशन बडोले यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले आणि सामूहिक राष्ट्रगीत गाऊन शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन आशिष राऊत यांनी केले.

या प्रसंगी महेंद्र चंद्रिकापुरे, भोजराज रामटेके, प्रा. संतोष रामटेके, असलेश अंबादे, चंद्रकांत गणवीर, शामराव बडोले, अतुल फुले, रजनीश पंचभाई, आशिष राऊत, पुरुषोत्तम रामटेके, अंगरराज सिडाम, बबन बडोले, राहुल गणवीर, निखिल शहारे व मनोज तागडे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
    user_Ashlesh Made
    Ashlesh Made
    साडक-अर्जुनी, गोंदिया, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात असलेल्या बिबीटोला–सोनेगाव येथील शेतात बिबट्याची दोन लहान पिल्ले आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती दिल्यानंतरही वन विभागाचे पथक तब्बल ३ तासांनंतर घटनास्थळी पोहोचल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सुमारे १० दिवसांपूर्वी साहेसपूर येथील एका फार्महाऊसमध्येही बिबट्याची पिल्ले आढळून आली होती. अशा घटना वारंवार समोर येत असल्याने ग्रामस्थांची चिंता अधिकच वाढली आहे. बिबटे आता गावे आणि लोकवस्ती असलेल्या भागांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगत, वन विभागाने परिसरात गस्त वाढवावी, तातडीने रेस्क्यू टीम पाठवावी आणि मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
    1
    गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात असलेल्या बिबीटोला–सोनेगाव येथील शेतात बिबट्याची दोन लहान पिल्ले आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती दिल्यानंतरही वन विभागाचे पथक तब्बल ३ तासांनंतर घटनास्थळी पोहोचल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

सुमारे १० दिवसांपूर्वी साहेसपूर येथील एका फार्महाऊसमध्येही बिबट्याची पिल्ले आढळून आली होती. अशा घटना वारंवार समोर येत असल्याने ग्रामस्थांची चिंता अधिकच वाढली आहे. बिबटे आता गावे आणि लोकवस्ती असलेल्या भागांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगत, वन विभागाने परिसरात गस्त वाढवावी, तातडीने रेस्क्यू टीम पाठवावी आणि मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
    user_Town news
    Town news
    Media company गोंदिया, गोंदिया, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मुल तालुक्यात आज सकाळी 10 वाजता मुल पोलिसांनी एक धडक कारवाई करत अवैध गोवंश तस्करीचा मोठा डाव उधळून लावला आहे. छत्तीसगडहून आंध्र प्रदेशच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका संशयित आयशर वाहनाचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला जाळ्यात पकडले. या धडक कारवाईत वाहनातून ३७ गोधनांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी आयशर वाहनासह एकूण सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुल तालुक्यात अलीकडच्या काळात झालेली गोधन तस्करीविरोधातील ही सर्वात मोठी आणि कौतुकास्पद कारवाई मानली जात आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास मूल पोलीस करत आहेत.
    1
    मुल तालुक्यात आज सकाळी 10 वाजता मुल पोलिसांनी एक धडक कारवाई करत अवैध गोवंश तस्करीचा मोठा डाव उधळून लावला आहे. छत्तीसगडहून आंध्र प्रदेशच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका संशयित आयशर वाहनाचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला जाळ्यात पकडले.

या धडक कारवाईत वाहनातून ३७ गोधनांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी आयशर वाहनासह एकूण सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुल तालुक्यात अलीकडच्या काळात झालेली गोधन तस्करीविरोधातील ही सर्वात मोठी आणि कौतुकास्पद कारवाई मानली जात आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास मूल पोलीस करत आहेत.
    user_Disha News
    Disha News
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आर्वी नगरी में जैन समुदाय का स्वागत किया गया। यह आयोजन स्थानीय लोगों और जैन समुदाय के सदस्यों के बीच एकता और सद्भाव का प्रतीक है। इस अवसर पर, समुदाय के कई सदस्यों ने हिस्सा लिया और स्थानीय लोगों के साथ खुशी-खुशी समय बिताया। यह कार्यक्रम न केवल सांस्कृतिक आदान-प्रदान का माध्यम था, बल्कि यह समुदाय के बीच आपसी समझ और सहयोग को बढ़ावा देने का भी एक प्रयास था।
    1
    आर्वी नगरी में जैन समुदाय का स्वागत किया गया। यह आयोजन स्थानीय लोगों और जैन समुदाय के सदस्यों के बीच एकता और सद्भाव का प्रतीक है। इस अवसर पर, समुदाय के कई सदस्यों ने हिस्सा लिया और स्थानीय लोगों के साथ खुशी-खुशी समय बिताया। यह कार्यक्रम न केवल सांस्कृतिक आदान-प्रदान का माध्यम था, बल्कि यह समुदाय के बीच आपसी समझ और सहयोग को बढ़ावा देने का भी एक प्रयास था।
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • 'मराठीचे शिलेदार' अंतर्गत आयोजित 'गुरूवार ते शनिवार' या स्पर्धेत निवडल्या गेलेल्या आदर्श कवींना संगीतमय सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या विशेष उपक्रमाद्वारे स्पर्धेतील उत्कृष्ट कवींचा संगीतमय सन्मानपत्राच्या माध्यमातून विशेष गौरव करण्यात आला आहे.
    1
    'मराठीचे शिलेदार' अंतर्गत आयोजित 'गुरूवार ते शनिवार' या स्पर्धेत निवडल्या गेलेल्या आदर्श कवींना संगीतमय सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या विशेष उपक्रमाद्वारे स्पर्धेतील उत्कृष्ट कवींचा संगीतमय सन्मानपत्राच्या माध्यमातून विशेष गौरव करण्यात आला आहे.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • हिगना तालुक्यातील बाम्हणी गावात रविवारी 26 जुलै 2026 रोजी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कोंढा केंद्राचे केंद्रप्रमुख मानप्रकाशजी येळेकर यावेळी पूर्णवेळ उपस्थित होते. गावकऱ्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे देखील अभिनंदन केले.
    1
    हिगना तालुक्यातील बाम्हणी गावात रविवारी 26 जुलै 2026 रोजी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कोंढा केंद्राचे केंद्रप्रमुख मानप्रकाशजी येळेकर यावेळी पूर्णवेळ उपस्थित होते. गावकऱ्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे देखील अभिनंदन केले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील 'अरेबियन ताज बिर्याणी' हॉटेलचे संचालक आणि एमआयएमचे (MIM) नगरसेवक अझहर शेख यांच्यावर झालेला हल्ला प्राणघातक नव्हता, हे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी हे स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक अझहर शेख यांचा हा वाद तिरंगा रॅलीवरून झाला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून सुरुवातीला दोन व्यक्तींमध्ये आपापसात झटापटी झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या धारदार शस्त्राचा वापर झालेला नाही किंवा जीवघेणा हल्ला झालेला नाही, असे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी शहर पोलिसांत फरान फिरोज खान (२७), फेजान फिरोज खान (२२) आणि फिरोज गुलजार खान (४६) या तीन आरोपींविरोधात कलम ११८(१), २९६, ३५१, २८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे, असे प्रमोद चौगुले यांनी सांगितले.
    1
    चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील 'अरेबियन ताज बिर्याणी' हॉटेलचे संचालक आणि एमआयएमचे (MIM) नगरसेवक अझहर शेख यांच्यावर झालेला हल्ला प्राणघातक नव्हता, हे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी हे स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक अझहर शेख यांचा हा वाद तिरंगा रॅलीवरून झाला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून सुरुवातीला दोन व्यक्तींमध्ये आपापसात झटापटी झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या धारदार शस्त्राचा वापर झालेला नाही किंवा जीवघेणा हल्ला झालेला नाही, असे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी शहर पोलिसांत फरान फिरोज खान (२७), फेजान फिरोज खान (२२) आणि फिरोज गुलजार खान (४६) या तीन आरोपींविरोधात कलम ११८(१), २९६, ३५१, २८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे, असे प्रमोद चौगुले यांनी सांगितले.
    user_Disha News
    Disha News
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.