येवल्यात प्रशासकीय नियोजनाचा फज्जा! अवजड वाहनांच्या रांगांमुळे शहर 'जाम'; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. येवला शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी लागू केली आहे. मात्र, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत असून, शनिवारी गोपीनाथ मुंडे चौक हुडको कॉर्नर ते विंचूर चौफुलीपर्यंत अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीनंतर हे निर्बंध लादण्यात आले होते. परंतु, भरदिवसा पोलीसच ही वाहने सोडत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या गंभीर परिस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हा उपप्रमुख अमोल शिंदे व गटनेते गणेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली. यावेळीशिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे व शिवसेना गटनेते गणेश शिंदे तसेच शिंदे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अडकलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करून दिलासा दिला. प्रशासकीय नियोजनाचा फज्जा उडाला असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या यंत्रणेवर जिल्हाधिकारी आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येवल्यात प्रशासकीय नियोजनाचा फज्जा! अवजड वाहनांच्या रांगांमुळे शहर 'जाम'; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. येवला शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी लागू केली आहे. मात्र, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत असून, शनिवारी गोपीनाथ मुंडे चौक हुडको कॉर्नर ते विंचूर चौफुलीपर्यंत अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीनंतर हे निर्बंध लादण्यात आले होते. परंतु, भरदिवसा पोलीसच ही वाहने सोडत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या गंभीर परिस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हा उपप्रमुख अमोल शिंदे व गटनेते गणेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली. यावेळीशिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे व शिवसेना गटनेते गणेश शिंदे तसेच शिंदे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अडकलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करून दिलासा दिला. प्रशासकीय नियोजनाचा फज्जा उडाला असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या यंत्रणेवर जिल्हाधिकारी आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- येवला शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी लागू केली आहे. मात्र, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत असून, शनिवारी गोपीनाथ मुंडे चौक हुडको कॉर्नर ते विंचूर चौफुलीपर्यंत अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीनंतर हे निर्बंध लादण्यात आले होते. परंतु, भरदिवसा पोलीसच ही वाहने सोडत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या गंभीर परिस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हा उपप्रमुख अमोल शिंदे व गटनेते गणेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली. यावेळीशिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे व शिवसेना गटनेते गणेश शिंदे तसेच शिंदे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अडकलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करून दिलासा दिला. प्रशासकीय नियोजनाचा फज्जा उडाला असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या यंत्रणेवर जिल्हाधिकारी आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- लोकांना गॅस मिळत नाही आणि हे लोक गॅस चोरतात यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे 1 कोटी 26लाख रुपयाचा गॅस जप्त1
- नालंदा दुष्कर्म में न्याय दिलाने पहुंचे पासवान नेता और पुलिस में हुई भिड़ंत,पीड़ित से मिलने को रोका.1
- नाशिक:दिंडोरी शहरात स्नेहसंमेलनावरून परतत असताना कार उघड्या विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ विद्यार्थी व २ पालकांचा समावेश आहे. रात्री १० वाजता शिवाजीनगर भागात हा अपघात झाला. अग्निशमन व आपत्ती पथकाने तीन क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढली. गुदमरून व बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.1
- Aimim पर फिर हमलावर 'Sdpi': SIR | Shah Sameer Ahmed | Hindi News1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी : मराठा कुणबी मंत्रालय वेगळ्याने स्थापन करा मराठ्याचे मंत्री विखे पाटील कामच करत नाही मनोज जरांगे पाटील यांचा विखे पाटलावर..1
- नाशिक, दि. 3 : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या विविध विकास कामांची राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज दुपारी पाहणी करीत सविस्तर माहिती घेतली. यावेळी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, महानगरपालिकेचे उपायुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल आदी उपस्थित होते. मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी द्वारका सर्कल येथील भुयारी मार्ग, तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ बांधण्यात येणारा समांतर पूल, कपिला संगम, साधुग्राम, गोदावरी नदी काठावर जलसंपदा विभागातर्फे सुरू असलेल्या नवीन घाटांच्या कामांची तसेच नाशिक महानगरपालिकेतर्फे तपोवन, आगरटाकळी, दसक-पंचक येथे सुरू असलेल्या मल जल शुद्धीकरण प्रकल्पांची पाहणी केली. त्यानंतर मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी पांडव लेणीजवळील महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन, खत निर्मिती प्रकल्पांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट दिली तर राजुर बहुला येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या वीज उपकेंद्राचीही मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी पाहणी केली. द्वारका सर्कल येथे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संदीप पंडागळे यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. द्वारका चौकातील पायाभूत सोयीसुविधांचे काम पूर्ण झाल्यावर वाहतुकीचे नियोजन कसे राहील याविषयीची माहिती मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी जाणून घेतली. महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री, अतिरिक्त आयुक्त श्रीमती नायर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी तपोवन परिसरात कुंभमेळ्यानिमित्त आपापल्या विभागातर्फे सुरू असलेल्या विकास कामांची सविस्तर माहिती दिली. मुख्य सचिव श्री. अग्रवाल म्हणाले की, नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देश- विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतील. या भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा निर्मिती शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कुंभमेळ्यानिमित्त सुरू झालेली कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावयाची आहे. याबरोबरच ही सर्व कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होतील याचीही दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले की, पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे सर्वतोपरी नियोजन करण्यात आले आहे. विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करून विकास कामे सुरू झाली आहेत. ही विकास कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सनियंत्रण करण्यात येत असल्याचे सांगितले. कुंभमेळा आयुक्त श्री. सिंह यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांना दिली. मुख्य सचिव श्री. अग्रवाल हे सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी व कामांचा आढावा घेण्यासाठी आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. शनिवार, दि. 4 एप्रिल रोजी सकाळी ते पांडवलेणी येथे भेट देणार आहेत. त्यानंतर ते नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे रेल्वे विभागामार्फत सुरू असलेल्या कामांची पाहणी करतील. त्यानंतर ते धुळे रोडवरील पार्किंगची पाहणी करून रामकुंडावरील रामकाल पथच्या सुरू असलेल्या कामांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. तसेच स्मार्ट सिटी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याचा आढावाही घेणार आहेत.1