logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या तलाठी भवनातील तलाठी प्रवीण कस्तुरे यांच्या कार्यालयातील दिवे आणि पंखे सलग तीन दिवस, म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार, दिवसरात्र सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर शहरात सर्व शासकीय कार्यालये शुक्रवारी सायंकाळी बंद होताच त्यातील सर्व विद्युत उपकरणे बंद केली जातात. मात्र, शुक्रवार, २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता काही नागरिकांनी कामासाठी तलाठी कार्यालयास भेट दिली असता, कार्यालय बंद असले तरी आतील लाईट आणि पंखे सुरू असल्याचे दिसले. त्यावेळी कार्यालयात कोणताही तलाठी उपस्थित नव्हता. शुक्रवार सायंकाळ, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन शासकीय सुट्ट्यांमुळे हे कार्यालय बंद राहणार असतानाही दोन ट्यूब लाईट आणि दोन पंखे दिवसरात्र सुरू राहिल्याने नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. काही नागरिकांनी याबाबत तहसीलदारांना माहिती देण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही. या प्रकारामुळे संतप्त नागरिकांमध्ये, 'तहसीलदार आणि तलाठी भवनातील सर्व तलाठी वाळू चाळू लागले की काय,' अशा चर्चांना उधाण आले आहे. नागरिकांनी आपल्या कररूपाने शासकीय तिजोरीत जमा होणाऱ्या पैशांचा वापर शासकीय कार्यालयांच्या इतर खर्चांसाठी केला जातो, आणि याच पैशांचा फायदा लोकसेवक तलाठी व तहसीलदार घेत आहेत का, असा संतप्त सवाल विचारला आहे. तलाठी भवन कार्यालयातील तीन दिवस रात्रंदिवस सुरू असलेल्या लाईट आणि यामुळे व्यर्थ जाणाऱ्या नागरिकांच्या पैशांबाबत जिल्हाधिकारी साहेब चौकशी करणार का, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

5 hrs ago
user_Nitin Chalak
Nitin Chalak
Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
5 hrs ago

लातूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या तलाठी भवनातील तलाठी प्रवीण कस्तुरे यांच्या कार्यालयातील दिवे आणि पंखे सलग तीन दिवस, म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार, दिवसरात्र सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर शहरात सर्व शासकीय कार्यालये शुक्रवारी सायंकाळी बंद होताच त्यातील सर्व विद्युत उपकरणे बंद केली जातात. मात्र, शुक्रवार, २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता काही नागरिकांनी कामासाठी तलाठी कार्यालयास भेट दिली असता, कार्यालय बंद असले तरी आतील लाईट आणि पंखे सुरू असल्याचे दिसले. त्यावेळी कार्यालयात कोणताही तलाठी उपस्थित नव्हता. शुक्रवार सायंकाळ, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन शासकीय सुट्ट्यांमुळे हे कार्यालय बंद राहणार असतानाही दोन ट्यूब लाईट आणि दोन पंखे दिवसरात्र सुरू राहिल्याने नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. काही नागरिकांनी याबाबत तहसीलदारांना माहिती देण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही. या प्रकारामुळे संतप्त नागरिकांमध्ये, 'तहसीलदार आणि तलाठी भवनातील सर्व तलाठी वाळू चाळू लागले की काय,' अशा चर्चांना उधाण आले आहे. नागरिकांनी आपल्या कररूपाने शासकीय तिजोरीत जमा होणाऱ्या पैशांचा वापर शासकीय कार्यालयांच्या इतर खर्चांसाठी केला जातो, आणि याच पैशांचा फायदा लोकसेवक तलाठी व तहसीलदार घेत आहेत का, असा संतप्त सवाल विचारला आहे. तलाठी भवन कार्यालयातील तीन दिवस रात्रंदिवस सुरू असलेल्या लाईट आणि यामुळे व्यर्थ जाणाऱ्या नागरिकांच्या पैशांबाबत जिल्हाधिकारी साहेब चौकशी करणार का, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लातूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या तलाठी भवनातील तलाठी प्रवीण कस्तुरे यांच्या कार्यालयातील दिवे आणि पंखे सलग तीन दिवस, म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार, दिवसरात्र सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर शहरात सर्व शासकीय कार्यालये शुक्रवारी सायंकाळी बंद होताच त्यातील सर्व विद्युत उपकरणे बंद केली जातात. मात्र, शुक्रवार, २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता काही नागरिकांनी कामासाठी तलाठी कार्यालयास भेट दिली असता, कार्यालय बंद असले तरी आतील लाईट आणि पंखे सुरू असल्याचे दिसले. त्यावेळी कार्यालयात कोणताही तलाठी उपस्थित नव्हता. शुक्रवार सायंकाळ, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन शासकीय सुट्ट्यांमुळे हे कार्यालय बंद राहणार असतानाही दोन ट्यूब लाईट आणि दोन पंखे दिवसरात्र सुरू राहिल्याने नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. काही नागरिकांनी याबाबत तहसीलदारांना माहिती देण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही. या प्रकारामुळे संतप्त नागरिकांमध्ये, 'तहसीलदार आणि तलाठी भवनातील सर्व तलाठी वाळू चाळू लागले की काय,' अशा चर्चांना उधाण आले आहे. नागरिकांनी आपल्या कररूपाने शासकीय तिजोरीत जमा होणाऱ्या पैशांचा वापर शासकीय कार्यालयांच्या इतर खर्चांसाठी केला जातो, आणि याच पैशांचा फायदा लोकसेवक तलाठी व तहसीलदार घेत आहेत का, असा संतप्त सवाल विचारला आहे. तलाठी भवन कार्यालयातील तीन दिवस रात्रंदिवस सुरू असलेल्या लाईट आणि यामुळे व्यर्थ जाणाऱ्या नागरिकांच्या पैशांबाबत जिल्हाधिकारी साहेब चौकशी करणार का, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
    1
    लातूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या तलाठी भवनातील तलाठी प्रवीण कस्तुरे यांच्या कार्यालयातील दिवे आणि पंखे सलग तीन दिवस, म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार, दिवसरात्र सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर शहरात सर्व शासकीय कार्यालये शुक्रवारी सायंकाळी बंद होताच त्यातील सर्व विद्युत उपकरणे बंद केली जातात. मात्र, शुक्रवार, २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता काही नागरिकांनी कामासाठी तलाठी कार्यालयास भेट दिली असता, कार्यालय बंद असले तरी आतील लाईट आणि पंखे सुरू असल्याचे दिसले. त्यावेळी कार्यालयात कोणताही तलाठी उपस्थित नव्हता.

शुक्रवार सायंकाळ, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन शासकीय सुट्ट्यांमुळे हे कार्यालय बंद राहणार असतानाही दोन ट्यूब लाईट आणि दोन पंखे दिवसरात्र सुरू राहिल्याने नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. काही नागरिकांनी याबाबत तहसीलदारांना माहिती देण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही. या प्रकारामुळे संतप्त नागरिकांमध्ये, 'तहसीलदार आणि तलाठी भवनातील सर्व तलाठी वाळू चाळू लागले की काय,' अशा चर्चांना उधाण आले आहे.

नागरिकांनी आपल्या कररूपाने शासकीय तिजोरीत जमा होणाऱ्या पैशांचा वापर शासकीय कार्यालयांच्या इतर खर्चांसाठी केला जातो, आणि याच पैशांचा फायदा लोकसेवक तलाठी व तहसीलदार घेत आहेत का, असा संतप्त सवाल विचारला आहे. तलाठी भवन कार्यालयातील तीन दिवस रात्रंदिवस सुरू असलेल्या लाईट आणि यामुळे व्यर्थ जाणाऱ्या नागरिकांच्या पैशांबाबत जिल्हाधिकारी साहेब चौकशी करणार का, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • राज्यातील लाईव्ह इव्हेंट, कॉन्सर्ट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महोत्सवांच्या आयोजनासाठी परवानग्या कमी कालावधीत आणि सुलभरित्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत 'सिंगल विंडो क्लिअरन्स' प्रणाली विकसित करण्यात येत आहे. या प्रणालीमुळे लाईव्ह इव्हेंट क्षेत्राची कार्यप्रणाली निश्चितपणे गतिमान होईल, असा विश्वास माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केला. मंत्रालयातील परिषद सभागृहात लाईव्ह इव्हेंट्स क्षेत्रातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी हे विधान केले. त्यांनी सांगितले की, सध्या कार्यक्रम आयोजनासाठी विविध विभागांकडून स्वतंत्र परवानग्या घ्याव्या लागत असल्याने आयोजकांना अनेक अडचणी येतात आणि बराच कालावधी लागतो. या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी आणि कालबद्ध पद्धतीने परवानग्या उपलब्ध करून देण्यासाठी ही सिंगल विंडो प्रणाली विकसित केली जात आहे. महाराष्ट्रासाठी लाईव्ह इव्हेंट्सच्या परवानगीसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार केली जाणार असून, या आधारे आयोजकांना सर्व आवश्यक परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. प्रधान सचिव सिंह यांनी अधोरेखित केले की, लाईव्ह इव्हेंट क्षेत्राची आर्थिक, सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक प्रचंड क्षमता आहे आणि या क्षेत्राच्या विकासासाठी शासन सकारात्मक भूमिका घेत आहे. लाईव्ह इव्हेंट उद्योगासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्र आणि शासन यांच्यात समन्वय साधला जाईल. कौशल्य विकास, विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्यात येणार आहेत. परवानगी प्रक्रियेतील अडचणी दूर करून हा उद्योग अधिक सक्षम, सुलभ आणि स्पर्धात्मक बनवणे हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. या बैठकीत सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव समृद्धी अनगोळकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक किशोर गांगुर्डे आणि गोविंद अहंकारी यांसह ईव्हीए लाईव्ह, लक्ष मिडिया ग्रुप, मिडास नेक्स्ट मिडिया, ईईएमए, बीएमएस लाईव्ह, थिएटर प्रोड्यूसर अश्विन गिडवाणी, यूनडीपी इंडिया आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत उद्योग प्रतिनिधींनी परवानगी प्रक्रियेतील अडचणी, विविध विभागांमधील समन्वय, गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियोजन, सुरक्षा मानके, पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाचा वापर यासंदर्भात विविध सूचना मांडल्या. महाराष्ट्रातील सांस्कृतिक, संगीत, खाद्य आणि पर्यटन महोत्सवांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी ब्रँडिंग, प्रायोजकत्व, महसूल निर्मिती आणि खासगी क्षेत्राच्या सहभागावरही चर्चा झाली. तसेच, पर्यावरणपूरक 'ग्रीन इव्हेंट्स', कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतुकीचा वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उद्योग क्षेत्राने केलेल्या उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली. या उपक्रमामुळे राज्यातील मनोरंजन उद्योगाला चालना मिळण्याबरोबरच पर्यटन, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच्या संधींमध्ये वाढ होईल, तसेच महाराष्ट्राला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कार्यक्रमांसाठी आकर्षक केंद्र म्हणून विकसित करण्यास मदत होईल, असा विश्वास ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केला.
    1
    राज्यातील लाईव्ह इव्हेंट, कॉन्सर्ट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महोत्सवांच्या आयोजनासाठी परवानग्या कमी कालावधीत आणि सुलभरित्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत 'सिंगल विंडो क्लिअरन्स' प्रणाली विकसित करण्यात येत आहे. या प्रणालीमुळे लाईव्ह इव्हेंट क्षेत्राची कार्यप्रणाली निश्चितपणे गतिमान होईल, असा विश्वास माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केला.

मंत्रालयातील परिषद सभागृहात लाईव्ह इव्हेंट्स क्षेत्रातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी हे विधान केले. त्यांनी सांगितले की, सध्या कार्यक्रम आयोजनासाठी विविध विभागांकडून स्वतंत्र परवानग्या घ्याव्या लागत असल्याने आयोजकांना अनेक अडचणी येतात आणि बराच कालावधी लागतो. या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी आणि कालबद्ध पद्धतीने परवानग्या उपलब्ध करून देण्यासाठी ही सिंगल विंडो प्रणाली विकसित केली जात आहे. महाराष्ट्रासाठी लाईव्ह इव्हेंट्सच्या परवानगीसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार केली जाणार असून, या आधारे आयोजकांना सर्व आवश्यक परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

प्रधान सचिव सिंह यांनी अधोरेखित केले की, लाईव्ह इव्हेंट क्षेत्राची आर्थिक, सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक प्रचंड क्षमता आहे आणि या क्षेत्राच्या विकासासाठी शासन सकारात्मक भूमिका घेत आहे. लाईव्ह इव्हेंट उद्योगासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्र आणि शासन यांच्यात समन्वय साधला जाईल. कौशल्य विकास, विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्यात येणार आहेत. परवानगी प्रक्रियेतील अडचणी दूर करून हा उद्योग अधिक सक्षम, सुलभ आणि स्पर्धात्मक बनवणे हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. या बैठकीत सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव समृद्धी अनगोळकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक किशोर गांगुर्डे आणि गोविंद अहंकारी यांसह ईव्हीए लाईव्ह, लक्ष मिडिया ग्रुप, मिडास नेक्स्ट मिडिया, ईईएमए, बीएमएस लाईव्ह, थिएटर प्रोड्यूसर अश्विन गिडवाणी, यूनडीपी इंडिया आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत उद्योग प्रतिनिधींनी परवानगी प्रक्रियेतील अडचणी, विविध विभागांमधील समन्वय, गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियोजन, सुरक्षा मानके, पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाचा वापर यासंदर्भात विविध सूचना मांडल्या. महाराष्ट्रातील सांस्कृतिक, संगीत, खाद्य आणि पर्यटन महोत्सवांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी ब्रँडिंग, प्रायोजकत्व, महसूल निर्मिती आणि खासगी क्षेत्राच्या सहभागावरही चर्चा झाली. तसेच, पर्यावरणपूरक 'ग्रीन इव्हेंट्स', कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतुकीचा वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उद्योग क्षेत्राने केलेल्या उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली. या उपक्रमामुळे राज्यातील मनोरंजन उद्योगाला चालना मिळण्याबरोबरच पर्यटन, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच्या संधींमध्ये वाढ होईल, तसेच महाराष्ट्राला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कार्यक्रमांसाठी आकर्षक केंद्र म्हणून विकसित करण्यास मदत होईल, असा विश्वास ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केला.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    Advertising agency शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी किशोर महाराज शिवनीकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. खंडापूरकर यांनी म्हटले आहे की, किशोर महाराज शिवनीकर यांनी संतांच्या पादुका मेळाव्यात लाखो रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार केला आहे. याप्रकरणी किशोर महाराज शिवनीकर यांना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी केली आहे.
    1
    भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी किशोर महाराज शिवनीकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. खंडापूरकर यांनी म्हटले आहे की, किशोर महाराज शिवनीकर यांनी संतांच्या पादुका मेळाव्यात लाखो रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार केला आहे. याप्रकरणी किशोर महाराज शिवनीकर यांना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी केली आहे.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    21 hrs ago
  • म्हसावद येथील वीज उपकेंद्रातून होणाऱ्या सततच्या लोडशेडिंगमुळे संतप्त झालेल्या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास वीज उपकेंद्रावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. म्हसावद परिसरातील शेतकऱ्यांनी केळी, पपई, ऊस, मिरची, हळद आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. मात्र, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही आणि त्यामुळे पिके अक्षरशः जळू लागली आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. लोडशेडिंग कमी करून शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करावा, या प्रमुख मागणीसाठी म्हसावद परिसरातील विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने वीज उपकेंद्रावर दाखल झाले होते. अधिकारी आणि शेतकरी यांच्यात चर्चा सुरू असतानाच पुन्हा लोडशेडिंगचा संदेश आल्याचे कळताच शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. संतप्त शेतकऱ्यांनी “आम्ही वीज बंद करू देणार नाही, आमच्या नुकसानीची दाद कोण देणार?” असा आक्रमक सवाल उपस्थित केला. यादरम्यान, वीज कंपनीचे सहायक अभियंता विजय गहाणे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले. लोडशेडिंगच्या काळात खंडित झालेला वीजपुरवठा अतिरिक्त वेळ देऊन भरून काढण्यात येईल, तसेच शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांच्या या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, येत्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
    1
    म्हसावद येथील वीज उपकेंद्रातून होणाऱ्या सततच्या लोडशेडिंगमुळे संतप्त झालेल्या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास वीज उपकेंद्रावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. म्हसावद परिसरातील शेतकऱ्यांनी केळी, पपई, ऊस, मिरची, हळद आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. मात्र, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही आणि त्यामुळे पिके अक्षरशः जळू लागली आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

लोडशेडिंग कमी करून शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करावा, या प्रमुख मागणीसाठी म्हसावद परिसरातील विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने वीज उपकेंद्रावर दाखल झाले होते. अधिकारी आणि शेतकरी यांच्यात चर्चा सुरू असतानाच पुन्हा लोडशेडिंगचा संदेश आल्याचे कळताच शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. संतप्त शेतकऱ्यांनी “आम्ही वीज बंद करू देणार नाही, आमच्या नुकसानीची दाद कोण देणार?” असा आक्रमक सवाल उपस्थित केला.

यादरम्यान, वीज कंपनीचे सहायक अभियंता विजय गहाणे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले. लोडशेडिंगच्या काळात खंडित झालेला वीजपुरवठा अतिरिक्त वेळ देऊन भरून काढण्यात येईल, तसेच शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांच्या या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

मात्र, येत्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
    user_सुमन नागनाथ अलमलकर
    सुमन नागनाथ अलमलकर
    Local News Reporter शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • यशवंत संघर्ष सेनेने मनोज दादा जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
    1
    यशवंत संघर्ष सेनेने मनोज दादा जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
    user_अशोक दगडू वाघमारे
    अशोक दगडू वाघमारे
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    41 min ago
  • शिंदे शिवसेनेच्या वतीने अहमदपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश मेळाव्यात उदगीर येथील जावेद बागवान यांची लातूर जिल्हा अल्पसंख्यांक प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. हा मेळावा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी आमदार विनायकराव पाटील यांच्यासह तब्बल २५ हजार कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जावेद बागवान हे देखील या अनेक कार्यकर्त्यांपैकी एक होते ज्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश करत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारली.
    1
    शिंदे शिवसेनेच्या वतीने अहमदपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश मेळाव्यात उदगीर येथील जावेद बागवान यांची लातूर जिल्हा अल्पसंख्यांक प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. हा मेळावा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी माजी आमदार विनायकराव पाटील यांच्यासह तब्बल २५ हजार कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जावेद बागवान हे देखील या अनेक कार्यकर्त्यांपैकी एक होते ज्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश करत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारली.
    user_संग्राम पवार विक्रांत न्युज
    संग्राम पवार विक्रांत न्युज
    Press advisory उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ३० मे २०२६ रोजी उदगीर शहरामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर एक मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, लातूर, धाराशिव आणि बीड विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी लागू झालेल्या आचारसंहितेमुळे हा नियोजित मोर्चा आता स्थगित करण्यात आला आहे. मोर्चाचे मुख्य संयोजक आणि नेते तसेच उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्निल (अण्णा) अनिल जाधव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
    1
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ३० मे २०२६ रोजी उदगीर शहरामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर एक मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, लातूर, धाराशिव आणि बीड विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी लागू झालेल्या आचारसंहितेमुळे हा नियोजित मोर्चा आता स्थगित करण्यात आला आहे. मोर्चाचे मुख्य संयोजक आणि नेते तसेच उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्निल (अण्णा) अनिल जाधव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. महापौर सय्यद इकबाल यांनी माहिती दिली आहे की, आता जन्म दाखले वितरण सुरू झाले आहे. या सुविधेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
    1
    ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. महापौर सय्यद इकबाल यांनी माहिती दिली आहे की, आता जन्म दाखले वितरण सुरू झाले आहे. या सुविधेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.