जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 85 हजारांचा भेसळयुक्त साठा जप्त व नष्ट जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 85 हजारांचा भेसळयुक्त साठा जप्त व नष्ट नंदुरबार, दि. 16 सप्टेंबर : आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार विभागाच्या वतीने जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने नंदुरबार, शहादा व खांडबारा येथे विविध ठिकाणी तपासणी करून भेसळीच्या संशयावरून पेढा, मोतीचूर लाडू, मावा, कलाकंद यासह विविध दुग्धजन्य पदार्थांचा एकूण 210 किलो वजनाचा, सुमारे 85 हजार रुपये किमतीचा साठा जप्त करून नष्ट केला आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. सणासुदीच्या काळात मिठाई व दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता व सुरक्षितता तपासण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने संशयित ठिकाणी तपासणी केली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण होण्यासह विहित मानकांचे उल्लंघन व स्वच्छतेचा अभाव आढळून आला. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत कारवाई करत सुमारे 85 हजार रुपये किमतीचा दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. जप्त करण्यात आलेला साठा मानवी सेवनासाठी असुरक्षित, निकृष्ट दर्जाचा अथवा भेसळयुक्त असण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने तो नष्ट करण्यात आला. तसेच जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने पुढील तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषी व्यक्ती अथवा विक्रेत्यांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांनी मिठाई, मावा तसेच इतर दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. खरेदी केलेल्या पदार्थाच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास किंवा कुठेही अन्नभेसळ होत असल्याचे आढळून आल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे यांनी केले आहे.
जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 85 हजारांचा भेसळयुक्त साठा जप्त व नष्ट जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 85 हजारांचा भेसळयुक्त साठा जप्त व नष्ट नंदुरबार, दि. 16 सप्टेंबर : आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार विभागाच्या वतीने जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने नंदुरबार, शहादा व खांडबारा येथे विविध ठिकाणी तपासणी करून भेसळीच्या संशयावरून पेढा, मोतीचूर लाडू, मावा, कलाकंद यासह विविध दुग्धजन्य पदार्थांचा एकूण 210 किलो वजनाचा, सुमारे 85 हजार रुपये किमतीचा साठा जप्त करून नष्ट केला आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. सणासुदीच्या काळात मिठाई व दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता व सुरक्षितता तपासण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने संशयित ठिकाणी तपासणी केली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण होण्यासह विहित मानकांचे उल्लंघन व स्वच्छतेचा अभाव आढळून आला. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत कारवाई करत सुमारे 85 हजार रुपये किमतीचा दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. जप्त करण्यात आलेला साठा मानवी सेवनासाठी असुरक्षित, निकृष्ट दर्जाचा अथवा भेसळयुक्त असण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने तो नष्ट करण्यात आला. तसेच जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने पुढील तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषी व्यक्ती अथवा विक्रेत्यांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांनी मिठाई, मावा तसेच इतर दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. खरेदी केलेल्या पदार्थाच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास किंवा कुठेही अन्नभेसळ होत असल्याचे आढळून आल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे यांनी केले आहे.
- लाडगाव–हट्टी रस्ता ‘मरणाच्या दारात’; फरशी पुलाची अवस्था ‘आज मरू की उद्या?’ जीवघेण्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा कशासाठी? लाडगाव–हट्टी रस्ता ‘मरणाच्या दारात’; फरशी पुलाची अवस्था ‘आज मरू की उद्या?’ जीवघेण्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा कशासाठी? प्रतिनिधी | बोरगाव लक्ष्मण बागुल सुरगाणा तालुक्यातील लाडगाव–हट्टी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या मार्गावरील फरशी पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. पुलाची झालेली झीज पाहता हा पूल ‘आज मरू की उद्या?’ अशा अवस्थेत पोहोचला असून, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, फरशी पुलाचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत असून, पुलावरून पाणी वाहत असताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गाचा वापर परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच दुचाकी व चारचाकी वाहनधारक मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र रस्त्याची आणि पुलाची अवस्था पाहता प्रशासन एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून फरशी पुलाची दुरुस्ती अथवा आवश्यक ठिकाणी नव्याने बांधकाम करावे, तसेच रस्त्याची कायमस्वरूपी डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.1
- ऋषिपंचमी निमित्ताने आज मार्कंडेश्वर पर्वतावरती महिला भाविकांची मोठी गर्दी ऋषिपंचमी निमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर ती महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती - पुराणात सांगितले आहे की ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी ज्या शेतात बैलाने शेतीमध्ये राबलेले किंवा बैलाच्या साह्याने केलेली शेती त्याच्यातून निघालेले उत्पन्न हे ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांना खाता येत नाही त्या दिवशी सुवासिनी महिला व इतर महिला या सकाळी उठल्यानंतर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करून आल्यानंतर त्या महिला ज्या ठिकाणी ऋषी चे मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात . सप्तऋषीपैकी नाशिक जिल्ह्यात करंजी येथे कर्दम ऋषी मार्कंडेश्वर पर्वतावर ती मार्कंड ऋषी त्रंबकेश्वर येथे गौतम ऋषी व मनमाड जवळ अगस्ती ऋषी हे असून या ठिकाणी आज कृषी पंचमी निमित्ताने महिलांनी मोठी गर्दी केली होती . मार्कंडेश्वर पर्वतावरती दर्शनासाठी धुळे जळगाव नंदुरबार नाशिक व नगर येथील महिला भाविक ह्या दर्शनासाठी आल्या होत्या . यावेळेस कळवण पोलीस स्टेशन व दिंडोरी तालुक्यातील वनी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ही ठेवला होता .1
- चोरीची ॲक्टिव्हा विक्रीसाठी आणणारा १८ वर्षीय ताब्यात..... गुन्हे शाखा युनिट २ची कारवाई; मुंबईनाका पोलिस ठाण्यातील चोरीचा गुन्हा उघडकीस नाशिक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट २च्या पथकाने चोरीची ॲक्टिव्हा विक्री करण्यासाठी आलेल्या १८ वर्षीय संशयिताला सिडको परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीची ग्रे रंगाची ॲक्टिव्हा जप्त करण्यात आली असून, मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. वेदांत संजय चावरिया (वय १८, रा. गीतामळा, शताब्दी हॉस्पिटलमागे, हॅरिबेअर सोसायटीजवळ, मुंबईनाका, नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. मंगळवारी (१५ सप्टेंबर) गुन्हे शाखा युनिट २चे अधिकारी व कर्मचारी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण व सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त माहिती मिळाली. एक इसम चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी सिडको येथील संभाजी स्टेडियम परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर पोलिस पथकाने संभाजी स्टेडियम परिसरात सापळा रचला. संशयित इसम तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने ॲक्टिव्हा चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीची ॲक्टिव्हा जप्त करण्यात आली. त्याच्या कबुलीवरून मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आला. संशयितास जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी मुंबईनाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलिस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस अंमलदार प्रविण वानखेडे, मनोज शिंदे, संतोष सुपेकर आणि चापोहवा अतुल पाटील यांच्या पथकाने केली.2
- एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन.. एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन.. अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात गणपती बाप्पांचे झांज व ढोलताशाच्या गजरात आगमन झाले. बाप्पांच्या आगमनासाठी संस्थेचे खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक तथा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड हे उपस्थित होते. खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. तसेच प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बाप्पांच्या दर्शन घेतले. सर्वांनी बाप्पांकडे आपल्या व आपल्या देशासाठी शांतता, सुख व समृद्धी ची प्रार्थना केली.सर्वांना मोदक व खिरापत वाटप करण्यात आली. सदर बाप्पांच्या आगमनासाठी संदीप वाकचौरे, बाळासाहेब सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक दीपक खैरनार, अजहर खतीब, गणेश सोनवणे, मयूर भागवत सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.4
- पंचायत में भ्रष्टाचार की सभी आवेदन दिया गया आवेदन देने के बाद भी खबर में उजागर किया गया था कि भ्रष्टाचार बंद हो सके पंचायत में भ्रष्टाचार की सभी आवेदन दिया गया आवेदन देने के बाद भी खबर में उजागर किया गया था कि भ्रष्टाचार बंद हो सके1
- तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन. गुलालविरहित, सनई चौघड्याच्या निनादात भावपूर्ण निरोप अनेक वर्षाची परंपरा कायम, विसर्जन मिरवणूने वेधले लक्ष. तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन... गुलालविरहित, सनई चौघड्याच्या निनादात भावपूर्ण निरोप दिला.. मराठी पत्रकार संघाच्या अनेक वर्षाची परंपरा कायम, विसर्जन मिरवणूने वेधले लक्ष.... तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दीड दिवसाचा गणरायाची ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी स्थापना करण्यात आली. मंगळवारी तळोदा स्मारक चौकापासून सनईच्या सुरात, चौघड्याच्या निनादात, बाप्पाची पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गुलाल विरहित फूल पाकळ्यांची उधळण करण्यात येत होती. मिरवणुकीत नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, माजी मंत्री ॲड पद्माकर वळवी, राष्ट्रवादीचे योगेश चौधरी, शिवसेना विपुल कुलकर्णी, माजी नगरसेवक सुभाष चौधरी, बापू कलाल, भाजपाचे गौरव वाणी, नगरसेवक शिरीष माळी, सुरज माळी,नगरसेवक कपिल कर्णकार, योगेश पाडवी, अनिल पवार, शैलेश अहिरे भूषण सोनार, श्याम सोनागडवाला, सामाजिक राजकीय मान्यवरांसह पोलिस उपनिरीक्षक गुलाबसिंग पावरा, वाहतूक शाखेचे संदीप महाले, महेश महाले, होमगार्ड यशवंत कुकावलकर मिरवणुकीत सहभाग घेतला. विसर्जन मिरवणुकीत पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी, भरत भामरे, सुनील सूर्यवंशी, वसंत मराठे, किरण पाटील, महेंद्र लोहार, कैलास पाडवी, नरेश चौधरी, सम्राट महाजन, हेमंत मराठे, वैभव कर्णकार, सुशील सूर्यवंशी, बापू गुरव, मानसिंग राजपूत आदींनी परिश्रम घेतले.1
- पंचायत में भ्रष्टाचार की सभा आवेदन दिया गया आवेदन देने के बाद भी खबर में उजागर किया गया था कि भ्रष्टाचार बंद हो सके पंचायत में भ्रष्टाचार की सभा आवेदन दिया गया आवेदन देने के बाद भी खबर में उजागर किया गया था कि भ्रष्टाचार बंद हो सके1
- येवल्यात श्री गजानन महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषीपंचमी) निमित्त श्री गजानन महाराज मंदिर, दत्तनगर (विंचुर रोड, येवला) येथे श्री गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. दिवसाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता श्रीं ना महावस्त्र अर्पण आणि महाअभिषेक पूजेने झाली. सकाळी ७.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या या अभिषेकानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत श्रीं ची बावन्नी, महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन आणि स्वागत हिरालाल नारायणसा बाकळे, दिगंबर नारायणसा बाकळे व समस्त बाकळे परिवार (येवला) यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमास वक्रतुंड बिल्डर्स & डेव्हलपर्स (येवला व कोपरगाव) आणि इंजि. ऋषिकेश हिरालाल बाकळे यांचे सहकार्य लाभले. श्री गजानन महाराजांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- इलाज के नाम पर शर्मनाक हरकत? 15 साल की बच्ची ने डॉक्टर पर लगाए गंभीर आरोप ऐसी महत्वपूर्ण खबरों के लिए इलाज के नाम पर शर्मनाक हरकत? 15 साल की बच्ची ने डॉक्टर पर लगाए गंभीर आरोप ऐसी महत्वपूर्ण खबरों के लिए1