logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मोती नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोलनाका सुरू करू नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा मुखेड महाविकास आघाडीचा इशारा! मुखेड-कौठा-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील मोती नदीवरील पुलाचे काम अद्याप अर्धवट असून, रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने मुखेडच्या तहसीलदार यांना निवेदन दिले. ​पुलाचे काम अपूर्ण असल्याने येथे वारंवार अपघात होत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून वाहतूक सुरक्षित झाल्यानंतरच टोलनाका सुरू करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून टोल सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या निवेदनावर डॉ. श्रावण रॅपणवाड, भालचंद्र नाईक, हणमंत नारनाळीकर, दिनेश पाटील केरूरकर, भाई असद बल्की यांच्यासह अनेक नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

6 hrs ago
user_महाराष्ट्र वृत्तवेध
महाराष्ट्र वृत्तवेध
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
6 hrs ago

मोती नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोलनाका सुरू करू नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा मुखेड महाविकास आघाडीचा इशारा! मुखेड-कौठा-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील मोती नदीवरील पुलाचे काम अद्याप अर्धवट असून, रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने मुखेडच्या तहसीलदार यांना निवेदन दिले. ​पुलाचे काम अपूर्ण असल्याने येथे वारंवार अपघात होत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून वाहतूक सुरक्षित झाल्यानंतरच टोलनाका सुरू करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून टोल सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या निवेदनावर डॉ. श्रावण रॅपणवाड, भालचंद्र नाईक, हणमंत नारनाळीकर, दिनेश पाटील केरूरकर, भाई असद बल्की यांच्यासह अनेक नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • धर्माबाद पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; ६.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत धर्माबाद पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे एक आयशर वाहन जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह तब्बल ६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ​नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, २७ जुलै रोजी धर्माबाद पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. सरजखोड येथून धर्माबादच्या दिशेने एका आयशर वाहनातून अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांना समजले. ​माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून सरजखोड-धर्माबाद मार्गावर संशयित आयशर वाहन अडवले. वाहनाची पाहणी केली असता, त्यात कोणताही अधिकृत परवाना किंवा पास नसताना वाळूची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तत्काळ वाहनासह वाळू असा एकूण ६.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ​या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
    1
    धर्माबाद पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; ६.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त


नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत धर्माबाद पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे एक आयशर वाहन जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह तब्बल ६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
​नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, २७ जुलै रोजी धर्माबाद पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. सरजखोड येथून धर्माबादच्या दिशेने एका आयशर वाहनातून अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांना समजले.
​माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून सरजखोड-धर्माबाद मार्गावर संशयित आयशर वाहन अडवले. वाहनाची पाहणी केली असता, त्यात कोणताही अधिकृत परवाना किंवा पास नसताना वाळूची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तत्काळ वाहनासह वाळू असा एकूण ६.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
​या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
    user_महाराष्ट्र वृत्तवेध
    महाराष्ट्र वृत्तवेध
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम यात फार मोठा फरक आहे.त्यामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या गोंधळात पडला आहे. शेतकऱ्यांनी,सरकारने जाहीर केलेल्या कर्जाच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम तपासून घ्यावी आणि दोन्ही रक्कम समान असेल तरच पुढची प्रक्रिया करावी अन्यथा करू नये. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना किती वेठीस धरणार,बंद करा. तात्काळ बॅंक व सरकार यांच्या कर्जमाफी यादीतील फरक दूर करा अशी मागणी मुख्यमंत्री महोदय, कृषीमंत्री साहेब आणि शेतकरी कर्जमाफी समितीचे अध्यक्ष यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे. अन्यथा शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. ----------------------------------- शिवशंकर पाटील कलंबरकर (मराठवाडा अध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी युवा संघटना ) सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम यात फार मोठा फरक आहे.त्यामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या गोंधळात पडला आहे. शेतकऱ्यांनी,सरकारने जाहीर केलेल्या कर्जाच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम तपासून घ्यावी आणि दोन्ही रक्कम समान असेल तरच पुढची प्रक्रिया करावी अन्यथा करू नये. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना किती वेठीस धरणार,बंद करा. तात्काळ बॅंक व सरकार यांच्या कर्जमाफी यादीतील फरक दूर करा अशी मागणी मुख्यमंत्री महोदय, कृषीमंत्री साहेब आणि शेतकरी कर्जमाफी समितीचे अध्यक्ष यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे. अन्यथा शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. ----------------------------------- शिवशंकर पाटील कलंबरकर (मराठवाडा अध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी युवा संघटना )
    1
    सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम यात फार मोठा फरक आहे.त्यामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या गोंधळात पडला आहे.
शेतकऱ्यांनी,सरकारने जाहीर केलेल्या कर्जाच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम तपासून घ्यावी आणि दोन्ही रक्कम समान असेल तरच पुढची प्रक्रिया करावी अन्यथा करू नये.
कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना किती वेठीस धरणार,बंद करा. तात्काळ बॅंक व सरकार यांच्या कर्जमाफी यादीतील फरक दूर करा अशी मागणी मुख्यमंत्री महोदय, कृषीमंत्री साहेब आणि शेतकरी कर्जमाफी समितीचे अध्यक्ष यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.
अन्यथा शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही.
-----------------------------------
शिवशंकर पाटील कलंबरकर
(मराठवाडा अध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी युवा संघटना )
सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम यात फार मोठा फरक आहे.त्यामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या गोंधळात पडला आहे.
शेतकऱ्यांनी,सरकारने जाहीर केलेल्या कर्जाच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम तपासून घ्यावी आणि दोन्ही रक्कम समान असेल तरच पुढची प्रक्रिया करावी अन्यथा करू नये.
कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना किती वेठीस धरणार,बंद करा. तात्काळ बॅंक व सरकार यांच्या कर्जमाफी यादीतील फरक दूर करा अशी मागणी मुख्यमंत्री महोदय, कृषीमंत्री साहेब आणि शेतकरी कर्जमाफी समितीचे अध्यक्ष यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.
अन्यथा शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही.
-----------------------------------
शिवशंकर पाटील कलंबरकर
(मराठवाडा अध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी युवा संघटना )
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • सैनिक रत्न पुरस्कार घोषित झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन* नांदेड : *ऑनररी कॅप्टन दत्ता मारोती पोतगंटे 16 मराठा लाईट इन्फंट्री* दिनांक 12 जुलै 1994 रोजी भारतीय सैन्यात भरती होऊन त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत स्वीकारले. सैन्य प्रशिक्षणानंतर नागालँड, काश्मीर, पुणे, राजस्थान आणि पंजाब अशा विविध संवेदनशील भागांमध्ये अत्यंत शौर्याने सेवा बजावली. देशसेवेप्रती असलेल्या निष्ठेमुळे सन 2012 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता सेनेमध्ये (United Nations Peacekeeping Force) शांतता सैनिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. काश्मीरमधील राजोरी येथे दहशतवाद्यांविरुद्धच्या चकमकीदरम्यान त्यांनी अतुलनीय धैर्य दाखवले. या मुकाबल्यात त्यांचा डाव्या पायाचा पंजा गमवावा लागला, तरीही देशसेवेची जिद्द आणि राष्ट्रभक्ती कधीही कमी झाली नाही. त्यांच्या शौर्यपूर्ण सेवेसाठी महाराष्ट्र शासनाकडून त्यांना ताम्रपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ऑपरेशन विजय, ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन पराक्रम तसेच ऑपरेशन हिफाजत कारगिल युद्धामध्ये त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील. सेवा निवृत्तीनंतरही ते सैनिक व माजी सैनिक समाजासाठी अखंडपणे कार्यरत आहेत. सैनिकांच्या समस्या, मार्गदर्शन, संघटनात्मक कार्य आणि समाजामध्ये देशभक्तीची भावना जागृत ठेवण्यासाठी ते सातत्याने योगदान देत आहेत. सीमारेषेवर देशाचे रक्षण करणारा हा वीर सैनिक आज समाजसेवेच्या माध्यमातूनही राष्ट्रसेवाच करत आहे. त्यांचा मुलगा इंजिनिअर असून मुलगी फॉरेन्सिक तज्ञ म्हणून कार्यरत आहे. देशसेवेचे संस्कार त्यांच्या कुटुंबातही दिसून येतात, ही अत्यंत गौरवाची बाब आहे. अशा शूरवीर सैनिकाचा “सैनिक रत्न पुरस्कार” जाहीर होणे हा संपूर्ण सैनिक समाजासाठी अभिमानाचा क्षण आहे. *ऑनररी कॅप्टन दत्ता मारोती पोतगंटे* साहेब यांना मनःपूर्वक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
    2
    सैनिक रत्न पुरस्कार घोषित झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन*
नांदेड :
*ऑनररी कॅप्टन दत्ता मारोती पोतगंटे 16 मराठा लाईट इन्फंट्री*
दिनांक 12 जुलै 1994 रोजी भारतीय सैन्यात भरती होऊन त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत स्वीकारले. सैन्य प्रशिक्षणानंतर नागालँड, काश्मीर, पुणे, राजस्थान आणि पंजाब अशा विविध संवेदनशील भागांमध्ये अत्यंत शौर्याने सेवा बजावली. देशसेवेप्रती असलेल्या निष्ठेमुळे सन 2012 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता सेनेमध्ये (United Nations Peacekeeping Force) शांतता सैनिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
काश्मीरमधील राजोरी येथे दहशतवाद्यांविरुद्धच्या चकमकीदरम्यान त्यांनी अतुलनीय धैर्य दाखवले. या मुकाबल्यात त्यांचा डाव्या पायाचा पंजा गमवावा लागला, तरीही देशसेवेची जिद्द आणि राष्ट्रभक्ती कधीही कमी झाली नाही. त्यांच्या शौर्यपूर्ण सेवेसाठी महाराष्ट्र शासनाकडून त्यांना ताम्रपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ऑपरेशन विजय, ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन पराक्रम तसेच ऑपरेशन हिफाजत कारगिल युद्धामध्ये त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
सेवा निवृत्तीनंतरही ते सैनिक व माजी सैनिक समाजासाठी अखंडपणे कार्यरत आहेत. सैनिकांच्या समस्या, मार्गदर्शन, संघटनात्मक कार्य आणि समाजामध्ये देशभक्तीची भावना जागृत ठेवण्यासाठी ते सातत्याने योगदान देत आहेत. सीमारेषेवर देशाचे रक्षण करणारा हा वीर सैनिक आज समाजसेवेच्या माध्यमातूनही राष्ट्रसेवाच करत आहे.
त्यांचा मुलगा इंजिनिअर असून मुलगी फॉरेन्सिक तज्ञ म्हणून कार्यरत आहे. देशसेवेचे संस्कार त्यांच्या कुटुंबातही दिसून येतात, ही अत्यंत गौरवाची बाब आहे.
अशा शूरवीर सैनिकाचा “सैनिक रत्न पुरस्कार” जाहीर होणे हा संपूर्ण सैनिक समाजासाठी अभिमानाचा क्षण आहे.
*ऑनररी कॅप्टन दत्ता मारोती पोतगंटे* साहेब यांना मनःपूर्वक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
    user_SANDEEP
    SANDEEP
    TV News Anchor देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र Sc आरक्षण उपवर्गीकरण समर्थनात लातूर महामोर्च्या लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र Sc आरक्षण उपवर्गीकरण समर्थनात लातूर महामोर्च्या
    1
    लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र 
Sc आरक्षण उपवर्गीकरण समर्थनात लातूर महामोर्च्या 
लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र 
Sc आरक्षण उपवर्गीकरण समर्थनात लातूर महामोर्च्या
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • वन विभाग व कर्मचाऱ्यांनी नंगानाच चालवलाय. म्हणून आता शेतकरी म्हणतात नुकसान भरपाई नको वन्यप्राणीच शेतात नको. या साहबाची धमकी ऐकुण शेतकरी निटच झाला.आता नांदेड कलेक्टर या सायबाला निट करतील का?
    1
    वन विभाग व कर्मचाऱ्यांनी नंगानाच चालवलाय. म्हणून आता शेतकरी म्हणतात नुकसान भरपाई नको वन्यप्राणीच शेतात नको.
या साहबाची धमकी ऐकुण शेतकरी निटच झाला.आता नांदेड कलेक्टर या सायबाला निट करतील का?
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Nanded, Maharashtra•
    6 hrs ago
  • मोंढा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत चार दुकाने फोडली, पोलिसांनी गस्त वाढवावी – व्यापाऱ्यांची मागणी
    1
    मोंढा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत चार दुकाने फोडली, पोलिसांनी गस्त वाढवावी – व्यापाऱ्यांची मागणी
    user_अरुण उजेडकर
    अरुण उजेडकर
    Press advisory उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पेडगाव येथील आरोग्य शिबिरात 867 रुग्णांवर उपचार- संतोष देशमुख स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पेडगाव येथील आरोग्य शिबिरात 867 रुग्णांवर उपचार- संतोष देशमुख
    1
    स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पेडगाव येथील आरोग्य शिबिरात 867 रुग्णांवर उपचार- संतोष देशमुख
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पेडगाव येथील आरोग्य शिबिरात 867 रुग्णांवर उपचार- संतोष देशमुख
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    4 hrs ago
  • नांदेडच्या कंधार-लोहा मार्गावर अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची मोठी कारवाई; ४० लाखांचा हायवा जप्त कंधार-लोहा मार्गावर अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकवर पोलिसांनी कारवाई करत सुमारे ४० लाख रुपये किमतीचा हायवा जप्त केला आहे. पोलिसांना पाहताच चालकाने रस्त्यावरच वाळू ओतून अंधाराचा फायदा घेत वाहनातून पळ काढला. ​कंधार-लोहा रस्त्यावरून अवैध रीतीने वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी हायवाचा पाठलाग केला. पोलिसांचे वाहन मागे असल्याचे लक्षात येताच चालकाने पकडले जाण्याच्या भीतीपोटी हायवामधील वाळू रस्त्यावरच टाकून दिली आणि वाहन तिथेच सोडून अंधारात पसार झाला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सुमारे ४० लाख रुपये किमतीचे वाहन ताब्यात घेतले. ​तपासादरम्यान सदर वाहनाचे मालक कैलास उद्धव रेंके व रमेश डिगंबर कदम (दोघे रा. बेनाळ, ता. लोहा) असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २८२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पसार चालकाचा पुढील शोध घेत आहेत.
    1
    नांदेडच्या कंधार-लोहा मार्गावर अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची मोठी कारवाई; ४० लाखांचा हायवा जप्त


कंधार-लोहा मार्गावर अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकवर पोलिसांनी कारवाई करत सुमारे ४० लाख रुपये किमतीचा हायवा जप्त केला आहे. पोलिसांना पाहताच चालकाने रस्त्यावरच वाळू ओतून अंधाराचा फायदा घेत वाहनातून पळ काढला.
​कंधार-लोहा रस्त्यावरून अवैध रीतीने वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी हायवाचा पाठलाग केला. पोलिसांचे वाहन मागे असल्याचे लक्षात येताच चालकाने पकडले जाण्याच्या भीतीपोटी हायवामधील वाळू रस्त्यावरच टाकून दिली आणि वाहन तिथेच सोडून अंधारात पसार झाला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सुमारे ४० लाख रुपये किमतीचे वाहन ताब्यात घेतले.
​तपासादरम्यान सदर वाहनाचे मालक कैलास उद्धव रेंके व रमेश डिगंबर कदम (दोघे रा. बेनाळ, ता. लोहा) असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २८२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पसार चालकाचा पुढील शोध घेत आहेत.
    user_महाराष्ट्र वृत्तवेध
    महाराष्ट्र वृत्तवेध
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.