सैनिक रत्न पुरस्कार घोषित झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन* नांदेड : *ऑनररी कॅप्टन दत्ता मारोती पोतगंटे 16 मराठा लाईट इन्फंट्री* दिनांक 12 जुलै 1994 रोजी भारतीय सैन्यात भरती होऊन त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत स्वीकारले. सैन्य प्रशिक्षणानंतर नागालँड, काश्मीर, पुणे, राजस्थान आणि पंजाब अशा विविध संवेदनशील भागांमध्ये अत्यंत शौर्याने सेवा बजावली. देशसेवेप्रती असलेल्या निष्ठेमुळे सन 2012 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता सेनेमध्ये (United Nations Peacekeeping Force) शांतता सैनिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. काश्मीरमधील राजोरी येथे दहशतवाद्यांविरुद्धच्या चकमकीदरम्यान त्यांनी अतुलनीय धैर्य दाखवले. या मुकाबल्यात त्यांचा डाव्या पायाचा पंजा गमवावा लागला, तरीही देशसेवेची जिद्द आणि राष्ट्रभक्ती कधीही कमी झाली नाही. त्यांच्या शौर्यपूर्ण सेवेसाठी महाराष्ट्र शासनाकडून त्यांना ताम्रपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ऑपरेशन विजय, ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन पराक्रम तसेच ऑपरेशन हिफाजत कारगिल युद्धामध्ये त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील. सेवा निवृत्तीनंतरही ते सैनिक व माजी सैनिक समाजासाठी अखंडपणे कार्यरत आहेत. सैनिकांच्या समस्या, मार्गदर्शन, संघटनात्मक कार्य आणि समाजामध्ये देशभक्तीची भावना जागृत ठेवण्यासाठी ते सातत्याने योगदान देत आहेत. सीमारेषेवर देशाचे रक्षण करणारा हा वीर सैनिक आज समाजसेवेच्या माध्यमातूनही राष्ट्रसेवाच करत आहे. त्यांचा मुलगा इंजिनिअर असून मुलगी फॉरेन्सिक तज्ञ म्हणून कार्यरत आहे. देशसेवेचे संस्कार त्यांच्या कुटुंबातही दिसून येतात, ही अत्यंत गौरवाची बाब आहे. अशा शूरवीर सैनिकाचा “सैनिक रत्न पुरस्कार” जाहीर होणे हा संपूर्ण सैनिक समाजासाठी अभिमानाचा क्षण आहे. *ऑनररी कॅप्टन दत्ता मारोती पोतगंटे* साहेब यांना मनःपूर्वक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
सैनिक रत्न पुरस्कार घोषित झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन* नांदेड : *ऑनररी कॅप्टन दत्ता मारोती पोतगंटे 16 मराठा लाईट इन्फंट्री* दिनांक 12 जुलै 1994 रोजी भारतीय सैन्यात भरती होऊन त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत स्वीकारले. सैन्य प्रशिक्षणानंतर नागालँड, काश्मीर, पुणे, राजस्थान आणि पंजाब अशा विविध संवेदनशील भागांमध्ये अत्यंत शौर्याने सेवा बजावली. देशसेवेप्रती असलेल्या निष्ठेमुळे सन 2012 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता सेनेमध्ये (United Nations Peacekeeping Force) शांतता सैनिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. काश्मीरमधील राजोरी येथे दहशतवाद्यांविरुद्धच्या चकमकीदरम्यान त्यांनी अतुलनीय धैर्य दाखवले. या मुकाबल्यात त्यांचा डाव्या पायाचा पंजा गमवावा लागला, तरीही देशसेवेची जिद्द आणि राष्ट्रभक्ती कधीही कमी झाली नाही. त्यांच्या शौर्यपूर्ण सेवेसाठी महाराष्ट्र शासनाकडून त्यांना ताम्रपत्र देऊन सन्मानित
करण्यात आले. ऑपरेशन विजय, ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन पराक्रम तसेच ऑपरेशन हिफाजत कारगिल युद्धामध्ये त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील. सेवा निवृत्तीनंतरही ते सैनिक व माजी सैनिक समाजासाठी अखंडपणे कार्यरत आहेत. सैनिकांच्या समस्या, मार्गदर्शन, संघटनात्मक कार्य आणि समाजामध्ये देशभक्तीची भावना जागृत ठेवण्यासाठी ते सातत्याने योगदान देत आहेत. सीमारेषेवर देशाचे रक्षण करणारा हा वीर सैनिक आज समाजसेवेच्या माध्यमातूनही राष्ट्रसेवाच करत आहे. त्यांचा मुलगा इंजिनिअर असून मुलगी फॉरेन्सिक तज्ञ म्हणून कार्यरत आहे. देशसेवेचे संस्कार त्यांच्या कुटुंबातही दिसून येतात, ही अत्यंत गौरवाची बाब आहे. अशा शूरवीर सैनिकाचा “सैनिक रत्न पुरस्कार” जाहीर होणे हा संपूर्ण सैनिक समाजासाठी अभिमानाचा क्षण आहे. *ऑनररी कॅप्टन दत्ता मारोती पोतगंटे* साहेब यांना मनःपूर्वक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
- सैनिक रत्न पुरस्कार घोषित झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन* नांदेड : *ऑनररी कॅप्टन दत्ता मारोती पोतगंटे 16 मराठा लाईट इन्फंट्री* दिनांक 12 जुलै 1994 रोजी भारतीय सैन्यात भरती होऊन त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत स्वीकारले. सैन्य प्रशिक्षणानंतर नागालँड, काश्मीर, पुणे, राजस्थान आणि पंजाब अशा विविध संवेदनशील भागांमध्ये अत्यंत शौर्याने सेवा बजावली. देशसेवेप्रती असलेल्या निष्ठेमुळे सन 2012 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता सेनेमध्ये (United Nations Peacekeeping Force) शांतता सैनिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. काश्मीरमधील राजोरी येथे दहशतवाद्यांविरुद्धच्या चकमकीदरम्यान त्यांनी अतुलनीय धैर्य दाखवले. या मुकाबल्यात त्यांचा डाव्या पायाचा पंजा गमवावा लागला, तरीही देशसेवेची जिद्द आणि राष्ट्रभक्ती कधीही कमी झाली नाही. त्यांच्या शौर्यपूर्ण सेवेसाठी महाराष्ट्र शासनाकडून त्यांना ताम्रपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ऑपरेशन विजय, ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन पराक्रम तसेच ऑपरेशन हिफाजत कारगिल युद्धामध्ये त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील. सेवा निवृत्तीनंतरही ते सैनिक व माजी सैनिक समाजासाठी अखंडपणे कार्यरत आहेत. सैनिकांच्या समस्या, मार्गदर्शन, संघटनात्मक कार्य आणि समाजामध्ये देशभक्तीची भावना जागृत ठेवण्यासाठी ते सातत्याने योगदान देत आहेत. सीमारेषेवर देशाचे रक्षण करणारा हा वीर सैनिक आज समाजसेवेच्या माध्यमातूनही राष्ट्रसेवाच करत आहे. त्यांचा मुलगा इंजिनिअर असून मुलगी फॉरेन्सिक तज्ञ म्हणून कार्यरत आहे. देशसेवेचे संस्कार त्यांच्या कुटुंबातही दिसून येतात, ही अत्यंत गौरवाची बाब आहे. अशा शूरवीर सैनिकाचा “सैनिक रत्न पुरस्कार” जाहीर होणे हा संपूर्ण सैनिक समाजासाठी अभिमानाचा क्षण आहे. *ऑनररी कॅप्टन दत्ता मारोती पोतगंटे* साहेब यांना मनःपूर्वक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!2
- धर्माबाद पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; ६.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत धर्माबाद पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे एक आयशर वाहन जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह तब्बल ६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, २७ जुलै रोजी धर्माबाद पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. सरजखोड येथून धर्माबादच्या दिशेने एका आयशर वाहनातून अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांना समजले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून सरजखोड-धर्माबाद मार्गावर संशयित आयशर वाहन अडवले. वाहनाची पाहणी केली असता, त्यात कोणताही अधिकृत परवाना किंवा पास नसताना वाळूची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तत्काळ वाहनासह वाळू असा एकूण ६.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.1
- सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम यात फार मोठा फरक आहे.त्यामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या गोंधळात पडला आहे. शेतकऱ्यांनी,सरकारने जाहीर केलेल्या कर्जाच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम तपासून घ्यावी आणि दोन्ही रक्कम समान असेल तरच पुढची प्रक्रिया करावी अन्यथा करू नये. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना किती वेठीस धरणार,बंद करा. तात्काळ बॅंक व सरकार यांच्या कर्जमाफी यादीतील फरक दूर करा अशी मागणी मुख्यमंत्री महोदय, कृषीमंत्री साहेब आणि शेतकरी कर्जमाफी समितीचे अध्यक्ष यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे. अन्यथा शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. ----------------------------------- शिवशंकर पाटील कलंबरकर (मराठवाडा अध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी युवा संघटना ) सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम यात फार मोठा फरक आहे.त्यामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या गोंधळात पडला आहे. शेतकऱ्यांनी,सरकारने जाहीर केलेल्या कर्जाच्या यादीतली रक्कम आणि बँकेतली कर्जाची रक्कम तपासून घ्यावी आणि दोन्ही रक्कम समान असेल तरच पुढची प्रक्रिया करावी अन्यथा करू नये. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना किती वेठीस धरणार,बंद करा. तात्काळ बॅंक व सरकार यांच्या कर्जमाफी यादीतील फरक दूर करा अशी मागणी मुख्यमंत्री महोदय, कृषीमंत्री साहेब आणि शेतकरी कर्जमाफी समितीचे अध्यक्ष यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे. अन्यथा शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. ----------------------------------- शिवशंकर पाटील कलंबरकर (मराठवाडा अध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी युवा संघटना )1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र Sc आरक्षण उपवर्गीकरण समर्थनात लातूर महामोर्च्या लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र Sc आरक्षण उपवर्गीकरण समर्थनात लातूर महामोर्च्या1
- मोंढा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत चार दुकाने फोडली, पोलिसांनी गस्त वाढवावी – व्यापाऱ्यांची मागणी1
- वन विभाग व कर्मचाऱ्यांनी नंगानाच चालवलाय. म्हणून आता शेतकरी म्हणतात नुकसान भरपाई नको वन्यप्राणीच शेतात नको. या साहबाची धमकी ऐकुण शेतकरी निटच झाला.आता नांदेड कलेक्टर या सायबाला निट करतील का?1
- लातूर. दशनाम गोसावी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प; २ ऑगस्टला लातूरमध्ये रंगणार भव्य 'पंचसूत्री' सोहळा* *दशनाम गोसावी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प; २ ऑगस्टला लातूरमध्ये रंगणार भव्य 'पंचसूत्री' सोहळा* पत्रकार परिषदेत धर्मवीर भारती व व्यंकटेश पुरी यांनी जागवल्या देव, देश अन् धर्माच्या स्मृती! लातूर (दि. २८ जुलै) : "दशनाम गोसावी समाजाने देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी ऐतिहासिक आणि अतुलनीय योगदान दिले आहे. हा गौरवशाली इतिहास डोळ्यांसमोर ठेवूनच, समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि पुढील पिढीला सक्षम करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत," असे प्रतिपादन व्यंकटेश पुरी आणि प्रतिष्ठित उद्योजक धर्मवीर भारती यांनी केले. दशनाम गोसावी समाज , लातूर या सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक सभागृहात सकाळी १०:०० वाजता आयोजित भव्य 'पंचसूत्री सोहळ्याची' माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते संयुक्तपणे बोलत होते. गेली ३१ वर्षे, म्हणजेच १९९६ पासून दशनाम गोसावी समाज ही संघटना लातूरमध्ये समाजकार्यात अत्यंत सक्रियपणे कार्यरत असून अनेक वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना सातत्याने प्रोत्साहन देत आहे, हाच वारसा पुढे नेत या भव्य कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेत उद्योजक धर्मवीर भारती यांच्या समाज उन्नतीसाठीच्या मोठ्या योगदानाचा आणि त्यांनी समाजातील होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वेळोवेळी पुढे केलेल्या मदतीच्या हाताचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी गोसावी वुमन्स विंगच्या सुरेखा धर्मवीर भारती (भारती मॅडम) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रतिष्ठानच्या व्यापक उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, २ ऑगस्ट रोजी होणारा हा पंचसूत्री सोहळा केवळ एक कौतुक सोहळा नसून समाज बांधणीसाठी घेतलेला एक ध्यास आहे. समाजातील गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी 'भारती फाउंडेशन'च्या वतीने शैक्षणिक साहित्यासोबतच शिलाई मशीन वाटप केवळ एवढ्यावरच न थांबता हळदीकुंकू आणि विविध सांस्कृतिक सणांच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचे काम ही विंग करत आहे. समाजातील विधवा महिलांना सन्मानाने मुख्य प्रवाहात आणून, त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा आमचा दृढ संकल्प आहे. कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणणे, हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले. या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत अल्का गोसावी यांच्यासह विनायक गिरी, राजेंद्र गिरी, मोती गिरी गोसावी, मकरंद गिरी, प्रमोद बन, पद्माकर गिरी, विश्वजीत गिरी, चंद्रशेखर गिरी आणि बाळासाहेब भारती आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या मुख्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून हभप श्री. महादेव महाराज चाकरवाडीकर तसेच प्रमुख वक्ते म्हणून हभप श्री. अविनाशजी भारती महाराज, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. स्वप्निल भय्या भारती, प्रमुख अतिथी सूर्यकांता गिरी गोसावी, पुणे यांच्या सह महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांतून नामांकित व्यक्ती श्री. सुखदेव गिरी (कोल्हापूर), श्री. अनुप गोसावी (नाशिक), श्री. ओमप्रकाश गिरी (बीड), श्री. मुन्ना गिरी गोसावी, पंढरपूर आणि श्री. गणेश पुरी (नागपूर) हे प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ्यात सत्कार आणि स्कॉलरशिपचा लाभ मिळवण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मार्क मेमोसह ९९२०६ २११११ (मयूर भारती प्रॉपर्टीज ऑफिस) या क्रमांकावर त्वरित संपर्क साधून आपली नावनोंदणी करून घेणे आवश्यक आहे. लातूरच्या या ऐतिहासिक आणि प्रबोधनपर सोहळ्यास दशनाम गोसावी समाजातील सर्व समाज बांधव, भगिनी, आणि युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उद्घाटकांच्या विचारांचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे नम्र आवाहन दशनाम गोसावी समाज, लातूरच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित सर्वांसाठी प्रीती भोजनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.1
- नांदेडच्या कंधार-लोहा मार्गावर अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची मोठी कारवाई; ४० लाखांचा हायवा जप्त कंधार-लोहा मार्गावर अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकवर पोलिसांनी कारवाई करत सुमारे ४० लाख रुपये किमतीचा हायवा जप्त केला आहे. पोलिसांना पाहताच चालकाने रस्त्यावरच वाळू ओतून अंधाराचा फायदा घेत वाहनातून पळ काढला. कंधार-लोहा रस्त्यावरून अवैध रीतीने वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी हायवाचा पाठलाग केला. पोलिसांचे वाहन मागे असल्याचे लक्षात येताच चालकाने पकडले जाण्याच्या भीतीपोटी हायवामधील वाळू रस्त्यावरच टाकून दिली आणि वाहन तिथेच सोडून अंधारात पसार झाला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सुमारे ४० लाख रुपये किमतीचे वाहन ताब्यात घेतले. तपासादरम्यान सदर वाहनाचे मालक कैलास उद्धव रेंके व रमेश डिगंबर कदम (दोघे रा. बेनाळ, ता. लोहा) असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २८२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पसार चालकाचा पुढील शोध घेत आहेत.1