बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी दत्तात्रय मानघाले यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी सध्या पावसाअभावी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. संपूर्ण जून महिना उलटला, तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरणी आणि हळद लागवड पूर्णपणे खोळंबली आहे. दत्तात्रय मानघाले यांनी हळद लागवडीसाठी शेतीची मशागत करून शेतात बेड तयार केले असले तरी, पाऊस नसल्याने हळदीचे बियाणे अद्याप घरातच पडून आहे. दुसरीकडे, त्यांच्या शेतातील विहिरीतील पाण्याची पातळीही मोठ्या प्रमाणात खालावली असून, सात फूट व्यासाच्या विहिरीत पाणी तब्बल ५० फूट खोलवर गेले आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी शेतीसाठी अपुरे पडत असून पिकांना पाणी देणेही कठीण झाले आहे. वेळेत पेरणी व लागवड न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने, त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून, दमदार पावसाची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी दत्तात्रय मानघाले यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी सध्या पावसाअभावी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. संपूर्ण जून महिना उलटला, तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरणी
आणि हळद लागवड पूर्णपणे खोळंबली आहे. दत्तात्रय मानघाले यांनी हळद लागवडीसाठी शेतीची मशागत करून शेतात बेड तयार केले असले तरी, पाऊस नसल्याने हळदीचे बियाणे अद्याप घरातच पडून आहे. दुसरीकडे, त्यांच्या शेतातील विहिरीतील पाण्याची
पातळीही मोठ्या प्रमाणात खालावली असून, सात फूट व्यासाच्या विहिरीत पाणी तब्बल ५० फूट खोलवर गेले आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी शेतीसाठी अपुरे पडत असून पिकांना पाणी देणेही कठीण झाले आहे. वेळेत पेरणी व लागवड
न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने, त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून, दमदार पावसाची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.
- बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी दत्तात्रय मानघाले यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी सध्या पावसाअभावी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. संपूर्ण जून महिना उलटला, तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरणी आणि हळद लागवड पूर्णपणे खोळंबली आहे. दत्तात्रय मानघाले यांनी हळद लागवडीसाठी शेतीची मशागत करून शेतात बेड तयार केले असले तरी, पाऊस नसल्याने हळदीचे बियाणे अद्याप घरातच पडून आहे. दुसरीकडे, त्यांच्या शेतातील विहिरीतील पाण्याची पातळीही मोठ्या प्रमाणात खालावली असून, सात फूट व्यासाच्या विहिरीत पाणी तब्बल ५० फूट खोलवर गेले आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी शेतीसाठी अपुरे पडत असून पिकांना पाणी देणेही कठीण झाले आहे. वेळेत पेरणी व लागवड न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने, त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून, दमदार पावसाची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.4
- शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी मविआने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. हे आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी या प्रमुख मागणीसाठी करण्यात आले.1
- मंठा शहरातील बसस्थानक परिसरात रविवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ हळहळ व्यक्त करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मंठा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तीला उपचारासाठी मंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीच्या जवळ सापडलेल्या मोबाईल फोन व आधार कार्डावरून त्याची ओळख जनार्धन बेळजी नादरे (वय ३९ वर्षे) अशी पटली. ते हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माळवटा येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.1
- राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.1
- अकोला जिल्ह्यातील अंदुरा जवळील पानखास पुलाजवळ रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे गेलेले हे तरुण अकोटच्या दिशेने परत येत असताना हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, रस्त्यावरील मोठ्या भेगांमुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला, ज्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपघातातील मृत तरुणांची नावे श्रीकांत पुरुषोत्तम बायस्कार (वय २५) आणि कुणाल राजू भोरे (वय २४, दोन्ही रा. गजानन महाराज नगर, अकोट) अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत आणि कुणाल हे दोघे एम.एच. ३० बी.ई. ७९७० क्रमांकाच्या दुचाकीने अकोट येथे परत येत असताना अंदुरा गावाजवळ त्यांची दुचाकी समोरून निंबा फाट्याकडे जाणाऱ्या चांदूर बाजार आगाराच्या एम.एच. १४ एम.टी. ०२५३ क्रमांकाच्या एसटी बसशी आदळली. ही बस चांदूर बाजार येथून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. या घटनेची माहिती मिळताच उरळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन खंडेराव आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळेच या दोन्ही निष्पाप तरुणांचा बळी गेल्याचा आरोप करत मृतकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला, ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोट येथे नेण्यात आले. उरळ पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.1
- श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. हजारो भाविकांच्या जयघोषात पार पडलेल्या या मंगल सोहळ्यात ‘सावली सेवा प्रकल्पाने’ साकारलेल्या जिवंत पालखी सोहळ्याच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पालखी मार्गावर उभारण्यात आलेला हा आकर्षक आणि जिवंत देखावा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. अकोल्यातील प्रसिद्ध डेकोरेशन कलाकार जगदीश मारमपल्ली यांनी आपल्या कलाकौशल्यातून साकारलेल्या या अप्रतिम कलाकृतीने वारीचा अनुभव अक्षरशः जिवंत करून दाखवला. देखाव्याची भव्यता, बारकावे आणि वास्तवदर्शी मांडणी पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले. या अनोख्या देखाव्यासमोर हजारो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी सेल्फी, छायाचित्रे काढत वारीचा आनंद द्विगुणित केला. सोशल मीडियावरही या देखाव्याची मोठी चर्चा रंगली असून अनेकांनी त्याचे कौतुक केले. यावेळी सावली सेवा प्रकल्पाचे संचालक प्रशांत देशमुख यांनी श्रींच्या चरणी विशेष प्रार्थना अर्पण केली. राज्यातील शेतकरी, पशुपक्षी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा, तसेच पावसाची प्रतीक्षा लवकर संपून भरपूर पाऊस व्हावा, असे साकडे त्यांनी श्री संत गजानन महाराजांना घातले. भक्ती, कला आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम घडवणारा सावली सेवा प्रकल्पाचा हा जिवंत पालखी सोहळा यंदाच्या वारीतील विशेष आकर्षण ठरला.1
- विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. या पायी वारीचे हे ५७ वे वर्ष असून, यामध्ये ७०० हून अधिक वारकरी भगव्या पताका घेऊन सहभागी झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरात संत गजानन महाराजांची पालखी आज सकाळी पंढरपूरकडे निघाली. शेगाव ते पंढरपूर असा सुमारे ७५० किलोमीटरचा प्रवास ही पालखी ३३ दिवसांत पूर्ण करेल आणि २३ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. त्यानंतर आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होऊन ही पालखी २८ जुलैपर्यंत पंढरपुरातच मुक्काम करणार आहे. या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आज लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झाले होते, ज्यामुळे संपूर्ण संत नगरी 'गण गण गणात बोते'च्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. पंढरपुरातील मुक्कामानंतर, पालखी शेगावसाठी परतीच्या प्रवासाला निघेल.4
- अकोला शहरातील दुर्गा चौक परिसरातील एका नामांकित हॉटेलच्या स्वयंपाकघरात अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, हॉटेलच्या स्वयंपाकघरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले, असून घटनेचा पुढील तपास सध्या सुरू आहे.1