Shuru
Apke Nagar Ki App…
जलद आणि सुरक्षित Courier Service 🎯 पार्सल वेळेवर पोहोचणं महत्त्वाचं आहे! 🚚 📝 Documents असोत किंवा पार्सल, आमची Courier Service देते – ✔ वेळेवर डिलिव्हरी ✔ सुरक्षित हाताळणी ✔ विश्वासार्ह सेवा स्थानिक ते देशभर सेवा उपलब्ध. 📖 तुमच्या विश्वासाची कुरिअर सेवा. 👉 आजच पार्सल बुक करा 9545789966
Kiran Courier Services
जलद आणि सुरक्षित Courier Service 🎯 पार्सल वेळेवर पोहोचणं महत्त्वाचं आहे! 🚚 📝 Documents असोत किंवा पार्सल, आमची Courier Service देते – ✔ वेळेवर डिलिव्हरी ✔ सुरक्षित हाताळणी ✔ विश्वासार्ह सेवा स्थानिक ते देशभर सेवा उपलब्ध. 📖 तुमच्या विश्वासाची कुरिअर सेवा. 👉 आजच पार्सल बुक करा 9545789966
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यां स्थानिक नागरिकांना त्यांनी आवाहन केले यावेळेस खासदार भागवत कराड मंत्री अतुल सावे यांचे उपस्थिती होती1
- दहावी बारावीच्या परीक्षेत कॉफी चालणारच नाही -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल.1
- भोकरदन अल्पवयीन 16 वर्षीय पीडीत मुलगी तरुणाच्या मॅक्झीमो गाडीत भोकरदन ते नांजा गुरूकुल शाळेच्या समोर एका शाळु पिकाचे शेतामध्ये बळजबरीने नेवुन तीस जिवे मारण्याची धमकी देवन तीच्यावर बलात्कार केल्याची घटना दि. 02 फेब्रुवारी 2026 रोजी 09.00 वा चे सुमारास घडली आहे.आरोपी चे भरत भिमराव मगरे वय 32 वर्षे रा. कोदोली ता. भोकरदन जि.जालना असे नाव असून या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात आईच्या फिर्यादी वरून बलात्कार चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी टी सहाणे हे करीत आहे.1
- jategaon te lodhara rod khup kharab rod aahe4
- प्राप्त माहितीनुसार.:--आज दिनांक 4 फेब्रुवारी सुमारे 2:00 वाजे दरम्यान बीड जालना एसटी महामंडळ आगाराची बस अमरावती कडे जात असताना. बोरगाव.वसू पेट्रोल पंपाजवळ त्या बसला अपघात झाला असून त्या अपघातामध्ये समोरून येणाऱ्या मोटरसायकल वरील हे तिघेजण असून गंभीर जखमी असून यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.2
- "उबाळखेड ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा संशय; ग्रामसभेला सरपंच-ग्रामसेवकांची दांडी, ग्रामस्थांचे थेट जिल्हा परिषदेत धाव !"1
- कमलकिशोर जोगदंडे जालना, दि.4 बाल किशोरवयीन कामगार निर्मुलनासाठी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने दि.26 जानेवारी ते 31 मार्च 2026 या तीन महिन्याच्या कालावधीसाठी संपूर्ण भारतात बचाव आणि पुर्नवसन मोहीम आयोजित केली आहे. तरी जालना जिल्ह्यातील बाल आणि किशोरवयीन कामगारांची तसेच रस्त्यावरील मुलांची ओळख पटविणे, त्यांची सुटका करणे, जिल्ह्यातील हॉट स्पॉटची निवड करुन धाडसत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी पोलिस विभागाने जिल्ह्यातील बालकामगार मुक्त करण्यासाठी आपली यंत्रणा कार्यान्वित करावी. तसेच जालना जिल्हा बाल कामगार मुक्तीसाठी बाल मजूरीविरोधात तातडीने धाडसत्र राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दुरदृष्य प्रणालीद्वारे जालना जिल्हा कॉपीमुकत अभियान व बालकामगार शोध मोहीम विषयक बैठक पार पडली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. या निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, पोलिस उपअधिक्षक रविंद्र निकाळजे, शिक्षणाधिकारी बाळु खरात, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, सर्व यांच्यासह संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, बालमजूरी प्रथा समुळ उच्चाटन करुन बाल मजूरांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात समाविष्ठ करणे अत्यंत गरजेचे आहे. बाल कामगार (प्रतिबंध व निर्मूलन) अधिनियम 1986 कायद्यान्वये 14 वर्ष पुर्ण न केलेल्या बालकास धोकादायक उद्योग आणि प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. बाल कामगार मुक्तीबाबत दररोज कारवाई होणे अपेक्षित असून सर्व पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी आपल्या हद्दीतील किमान 5 बाल कामगार शोधून त्यांचे पुर्नवसन करावे. धोकादायक उद्योगातील 14 वर्षाखालील बाल मजूरांच्या मुक्ततेसाठी धाडसत्रे आयोजित करावीत. धाडसत्रात मुक्त करण्यात आलेल्या बाल मजूराच्या पालकांना जर संबंधित मालकाने आगाऊ उचल कोणत्याही कारणास्तव प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दिल्याचे तपासात आढळल्यास, अशा बाल कामगारास वेठबिगार कामगार म्हणून समजण्यात यावे आणि त्यानूसार मालकाविरुध्द कारवाई करावी आणि अशा वेठबिगार बालमजूरास नियमानुसार शासकीय फायदे मिळवून देण्यात यावेत. बालमजूर नियुक्त केलेल्या मालकाविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करुन अशा मालकांकडून प्रति बाल मजूर 20 हजार रुपये जिल्हा बाल कल्याण निधीत जमा करुन त्यात शासनाचा हिस्सा 5 हजार रुपये प्रति बाल मजूर जमा करावा. या जमा निधीचा विनीयोग शक्यतो त्याच बाल मजूरांच्या पुनर्वसनार्थ करण्यात यावा. दर आठवड्याला जिल्हा कृती दलाची आढावा बैठक आयोजित करण्यात यावी. बाल मजूरी ही सामाजिक अनिष्ठ प्रथा समुळ नष्ट करण्यासाठी जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी. बालकामगार मुक्त करण्यासाठी योगदान देणाऱ्या, उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिसांना बालस्नेही पोलिस पुरस्कार दिला जाईल. बालकामगार कामावर ठेवल्याने बाल कामगाराचे शारिरीक व मानसिक नुकसान होते. बाल कामगारास अत्यंत वेदना होतात व शिक्षणाच्या वयात काम करावे लागल्याने त्यांचे संपूर्ण भविष्य उध्वस्त होत असते. 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवणे हा कायदेशीर गुन्हा असून नागरिकांनी अशा घटना आढळल्यास त्वरित कामगार विभाग अथवा चाईल्ड हेल्पलाईन 1098 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जालना जिल्हा कॉपीमुक्तीसाठी पोलिसांची भुमिका महत्वाची जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) दि.10 फेब्रुवारी ते दि.18 मार्च 2026 तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) दि.20 फेब्रुवारी ते दि.18 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी 37 हजार 338 विद्यार्थ्यांसाठी 79 परीक्षा केंद्र आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 32 हजार 433 विद्यार्थ्यांसाठी 102 परीक्षा केंद्र आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली होणार असून जिल्ह्यातील संवेदनशील बारावीच्या 8 तर दहावीच्या 4 अशा एकुण 12 परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार असून चित्रीकरणही करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा भयमुक्त वातावरणात व पारदर्शक होणे गरजेचे असल्याने जालना जिल्हा कॉपी मुक्तीसाठी पोलिस विभागाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, तरी जिल्ह्यातील संवेदनशिल परीक्षा केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवून गैरप्रकाराला आळा घालावा. परीक्षा केंद्राच्या परिसरात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी अतिशय दक्षता बाळगावी. परीक्षा कालावधीत पोलिस विभागाने वेळोवेळी सहकार्य करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत दिल्या. या बैठकीस सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस ठाण्याचे प्रमुख ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.2
- बुलडाणा: वाचा आजचा पीपल्स न्यूज Digital Media Additions ५,१,२०२६1
- जल जीवन योजना गावात पण दोन महिने उलटले तरी थेंब नाही; रायपूरच्या रणरागिणींचा 'पाण्यासाठी' एल्गार !1